मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

यारहो ...

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो जीव माझा आरशावर भाळलेला यारहो बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे? कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो ! हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो © विशाल वि. कुलकर्णी

आठवणींचा कप्पा म्हणजे...

सत्यजित... ·
लेखनविषय:
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती... आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती! काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी... वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!

साधले तर वार कर ...

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
कोण जाणे रोज ओझे जीव कसले वाहतो बंद डोळ्यांनी सुखाचे भोग फसवे भोगतो वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो अंबराची सांगता महती मला का सारखी मी इथे मातीतुनी दररोज इमले बांधतो सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो साधले तर वार कर या काळजावरती सखे अन्यथा मी पाठ फिरवुन नयन हलके झाकतो © विशाल विजय कुलकर्णी

लाज

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
******************* पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते ******************* © विशाल विजय कुलकर्णी

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित... ·
लेखनविषय:
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

नवखेच सखे फसतात इथे

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

सत्यजित... ·
लेखनविषय:
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!) सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला! पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला! आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी? मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला! वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला! भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला! —सत्यजित

तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल ! ताईने दिलेली ओळ होती... या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला ********************* नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला बा निसर्गा का असा छळवाद तू रे मांडला? बरसणे त्या पावसाचे फक्त आठवते मला ओळखीचा चोर कोणी मान अलगद कापतो त्याच खांद्य

अभिजात(चारोळी)

पराग देशमुख ·
छंदात बांधण्याचे, गेले सखे दिवस ते | मज अभिजात जे उमजले, ते मुक्त छंद होते....||

प्रीती तुझ्यावरी पण...

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही. या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा? शब्दात सांगताना,उरते मनात काही. या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा? एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा. मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा? मोडून एक काठ,वळते नदी जराशी. मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा? जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे. गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा! आता मनावरूनी, सोडून देतं सारे. दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा! सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे. हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा. थांबवू कशास मग मी?