Skip to main content

गझल

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
अनुवादीत लोक अकारण निमत्त विचारतील उदासीनतेचं विचारतील कारण तुझ्या बेचैन होण्याचं बोटं दाखवतील सोडलेल्या तुझ्या केसांकडे दृष्टी लावून पहातील व्यतीत झालेल्या काळाकडे पाहून कंकणाकडे काही करतील पोटात मळमळ पाहून थरथरत्या हाताला करतील काही खळखळ होऊन आततायी ताने देतील अनेक बोलण्या बोलण्यात करतील माझा उल्लेख नको होऊस प्रभावित त्यांच्या बोलण्यावर समजून जातील पाहूनी छ्टा तुझ्या चेहर्‍यावर नको विचारू प्रश्न त्यांना काही झाले तर नको बोलूंस त्यांच्याकडे माझ्या विषयावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
काव्यरस

दगड!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 04/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
a चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार ब्लॉग दुवा रागाची ती उचल काय, दगड! विचारांची मजल काय, दगड! जात पात वजा भाग गणित गणिताची उकल काय, दगड! अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं पुतळे तोडून तुटंल काय, दगड! देऊळ म्हणून आत गेलो बघत गर्दीपुढे अचल काय, दगड! बळावलेला ज्वर आहे, जबर औषधानं निघंल काय, दगड! तोड-फोड टीका निषेध कहर सरतेशेवटी सफल काय, दगड! नीट बघा, कळणार नाही फर
काव्यरस

कोरडा स्वर

लेखक प्राजु यांनी शनिवार, 10/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर जीवना नाराज मी नाही तुझ्यावर मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला आठवांनो घाव घाला.. या..! मनावर फेरफटका मारण्याचे टाळते मी आठवांची वाट झाली खूप खडतर तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर आपले नाते सुगंधी राहिले ना पण तरी सजवू फुलांनी आपुले घर मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन् मौन समजावून गेले कोरडा स्वर शोधसी ‘प्राजू’ खुणांतूनी कुणाला सांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर? - प्राजू
काव्यरस

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 05/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
 'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

कळले नाही

लेखक सोहम कामत यांनी मंगळवार, 29/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कळले नाही कोठे चाललो मी.. तुझ्याच दारी जणु भुललो मी.. प्रेमात तुझ्या जरी पडलो परि.. अंतरी तुझ्या पार हरलो मी.. संपले दुवे सारे संपली आशा.. आभाळी कोठे धुंद विरलो मी.. आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या.. स्वप्नात फक्त आता उरलो मी.. होतीस तेंव्हा तूच मनाची आस.. अजूनी का तुझ्यात अडलो मी?...
काव्यरस

चांदण्याला चांदणे समजू नये

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 27/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

हजारो ख्वाहिशे ऐसी

लेखक ईंद्रधनु यांनी बुधवार, 12/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्जा गालिब हे शायरी मधलं एक अजरामर नाव. गालिबची "हजारो ख्वाहिशे ऐसी" हि गझल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. कितीतरी लोकांनी याचं रसग्रहण आपापल्या शब्दात केलं आहे त्यात माझीही एक भर घालतो. "हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ , लेकिन फिर भी कम निकले" यामध्ये गालिबने माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षांचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलं आहे. एक एक इच्छा पूर्ण करताना जन्म संपेल अशा हजारो इच्छा आहेत.

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 27/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.

गझल - अनुवाद करण्यास मदती हवी.

लेखक निनाव यांनी बुधवार, 14/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ?
काव्यरस