मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालकथा

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

आमचाही पाउस.....

ज्ञानोबाचे पैजार ·
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी मिपावर माझ्या मुलीच्या (परीच्या) जन्माची कहाणी लिहिली होती. तेव्हा येणार्‍या काळात तिच्या छोट्यामोठ्या आठवणी लिहून काढायच्या असे मनाशी ठरवले होते. पण हल्ली आठवणींची साठवण फोटो आणि विडीओमध्येच सोयीस्कर पडत असल्याने अगदी तसेच काही झाले नाही. पण फेसबूक स्टेटसच्या निमित्ताने मात्र काही आठवणी कागदावर उतरल्या. काल सहज त्या पहिल्यापासून वाचतानाही गेल्या वर्षभराच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि म्हणूनच त्या संकलित करून ब्लॉगवर ठेवायचे ठरवले.

तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

ज्ञानोबाचे पैजार ·
लेखनप्रकार
पावसात जळाया लागलो... या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १० दिवस ज्याच्या साक्षीने ऐश केली त्या गणपती बप्पाला त्याच्या घरी पोचवायला आम्ही मिरवणूकीने निघालो होतो. मोठे मोठे डिस्कोलाईट होते आणि डिजेचा फुल साउंड सोडला होता आणि आम्ही सगळेजण त्याच्या तालावर बेभान होउन नाचत होतो. बर्‍याच वेळेला गाणे कोणते चालले हे पण समजत नव्हते. फक्त रीदम ऐकून मी त्यावर नाचत होतो. कारण मी जवळजवळ गेले १० तास त्या मिरवणूकीत नाचत होतो पण अजून मनाचे समाधान होत नव्हते. आजूबाजूला मिरवणूक बघायला येणारे लोक सारखे बदलत होते.

“मिपा वाचकांनो थोडीतरी खाज बाळगा!

नाखु ·
लेखनविषय:
नेतागिरी नेते मा. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदारचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १८ जुलै १९७६ पूर्वी नेता पित्त्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण नेता पित्त्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण या राष्ट्रीय धुरंधर नेत्याने गाव-गुंड पुंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा कायद्याला घाबरणारा नेता समाज गावात सोडलेल्या बेफाम वळूसारखा उधळू लागला. नुसताच उधळू लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा नेता चक्क मूठ आवळून त्यालाच दिमतीला बोलावू लागला. विधायक विचारवंतांशी दोन हात करायला सज्ज झाला.

मी आणि परी

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी.

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

अजया ·
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

सूड ·
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौ

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.