मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

उत्सव

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
स्वच्छ किनारी हिरव्या दारी नभी खगांची सोनभरारी आकाशी विरघळे चांदवा दिवस; उषेच्या दरबारी पुनव जशी; शीतल अंबारी स्वप्न पापण्यांच्या मखरी ओतप्रोत गाण्यांच्या लहरी जळ; प्रतिमेच्या गाभारी गोड पिसे स्वच्छंद अंबरी दिसे दूरचे जवळ उरी उत्सव हा जुळल्या धाग्यांचा रोज असावा संसारी .............................अज्ञात

सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ "

रघु सावंत ·
लेखनविषय:
काव्यरस
सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ " तुझ्याकडे पाहून तुला हवय काय माझ्या शिवाय कुणाला कळेल काय डोळ्यातले भाव ह्रदयातील ताना माझ्या शिवाय कधी कळतील काय ओझरता स्पर्श अनं भरलेले ऊर माझ्या शिवाय कधी मिळतील काय जाशील तू दूर पण सवयीचा श्वास माझ्या शिवाय कुठे मिळेल काय असशील सुखात पण प्रेमाची शाल माझ्या शिवाय कुणी पांघरेल काय येताजाता तुझ्या प्रेमाचा कटाक्ष माझ्या शिवाय कुणी झेलेल काय ते आसुसलेले ओठ ती प्रेमाची भूक माझ्या शिवाय कुणी क्षमवेल काय रुपगव्रीते तुझ्या तारुण्याची तारिफ माझ्या शिवाय कुणी करेल काय रंगल्या रात्री तुझ्या प्रेमाचा मिलाप माझ्या शिवाय कुणी करेल काय तुझ्या ह्रदयाला हाक प्रेमाची

वाळलेले दोन गजरे..

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी - संध्या २० एप्रिल २०१०

(स्त्री मन)

नाना चेंगट ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा - http://misalpav.com/node/21683 वळवळण्याने तिच्या जाग आली मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके वळवळायला?' शिरली अलगद केसात माझ्या, लागली कचकचून चावायला, कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला, थापटून डोक्याशी थोपटले किंचीत इथे तिथे, राहिचना, शेवटी मस्त खाजवून डोक्यावर, थोपटले जरा मानेवर, जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . . .'अग! डोक्यात उवा झाल्यात माझ्या, शिकेकाईने जरा घासून दे'..

तीन गझला

JAGOMOHANPYARE ·
लेखनविषय:
काव्यरस
------------१-------------------- बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये --------------२------------------------ प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे

चिरजीवीत कहाणी

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
सरले ते पळ,......मन भरुनी जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;.. शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी ............................अज्ञात

झ झ झ झ झोपडीत

राजेश घासकडवी ·
झझझझ झोपडीत चचचच चारपाई झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे कुकरू कुकरू हू तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना कुकरू कुकरू हू टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो...

अंदोलने

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू ओठांस माणकांची आलेपणे फिरंगी गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी अस्पर्श गोत न्यारे गेले विरून सारे चहुओर रजतकांती आनंदघन पसारे हळव्या सुरात हलके गंधर्वगीत भारे गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय वारे ............................अज्ञात

का रे असा अबोल तू

नरेंद्र गोळे ·
काव्यरस
20080414 का रे असा अबोल तू तीः का रे असा अबोल तू, काहीतरी तू बोल ना । शब्दांना तुझ्या तहानले, मनातले काही बोल ना ॥ तोः तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा । सुरस कितीही बोललो, रुचेल का तुझ्या मना ॥ तीः स्फटिक जणू तुझे विचार, स्पष्ट किती तुझे आचार । मी गुंतते गुंतते सदा, शब्दांच्या तुझ्या आवर्तनांत ॥ तोः वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके । जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥ काही गीते स्वतःतच एक नाद घेऊन येत असतात. ती इतर गीतांच्या चालीत म्हणता येतीलही. मात्र ह्या कथेत स्वतःची एक सादही आहे. ही कविता माझीच आहे. हा कुठल्याही गीताचा अनुवाद नाही.

पैंजणवाले जप जरा

नरेंद्र गोळे ·
काव्यरस
लचकत मुरडत चाले कामिनी दिपवत चमकत चपळ दामिनी वो बावळी ओ सावळी अगं ए चंचल क्षणभर थांब ना थांब ना थांब ना पैंजणवाले जप जरा, इथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना जशी दामिनी ती, मेघांतून उडे थोडी चाले पुढे, हलकेच वळे उचल ए, नयन तव काळे पण एवढे समज की, कुणाची लागो हाय ना कुठे जाशी अशी मदिराशी पिऊन मदमस्त पवन पदरात भरून आहे सारे जगच मस्तीभरे पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे फिरकी ही माझी, तुझा नाच बने नाच ना, ना बनून चकोरी घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना एक राज की बात, सांगत आहेत किशोरदा. मात्र त्यांना शब्द कुणी पुरवले आहेत?