Skip to main content

शांतरस

लिहितो कविता तुमच्यासाठी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 22/11/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाखु Tue, 22/11/2016 - 15:26 नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी
-------------------------------------- (खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! ) लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री! विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग?

तत्वा, तुझी किंमत बघ!

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 21/11/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता चोरी, लबाडी यांच्या वाटा गजबजल्यात सार्‍या सत्याची तर वर्गवारी 'अन्य' झालीय आता आपली झोळी भरत जावं अगदी मनोभावे जावो बाकी खड्ड्यामधे आपण सुखी रहावे कर्माची ही नवी व्याख्या मान्य झालीय आता आदर बिदर लाड झाले, विचारणंही खूप आपलं अडल्यास बोंबाबोंब बाकी चिडीचूप वागण्याची ही तर्‍हाच 'सौजन्य' झालीय आता कोण तो लाकूडतोड्या सांग त्याचे काय झाले आज इतिहासातले आदर्शही ते चूक ठरले माणसांची ती प्रजाती 'वन्य' झालीय आता तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता - अपूर्व ओक
काव्यरस

"स्व"....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 22/10/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

एकांत

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 14/10/2016 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
काय लिहावं? काय वाचावं? काय आठवावं? काय गुणगुणावं ? चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना बळेच एकत्र मांडावं नेमकं त्याच कडव्यावर का मनानं सांडावं? आजच्या बंडखोर लेखकानं कालच्याला भांडावं! दोघांचही चुकत नसतं कुणाला समोर ठेवावं? तिन्हीसांजेची वेळ समोर अन एकांतानं घेरावं कितीही नको म्हटलं तरी का आठवणींनी आठवावं? शीळ येते मुक्कामी शब्दांनी का रुसावं? सुस्कारे नि हुंकार याला गुणगुणनं कसं म्हणावं काय लिहावं? काय वाचावं? काय आठवावं? काय गुणगुणावं ? - संदीप चांदणे
काव्यरस

(*गणे कसेच होते)

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/08/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

जगणे...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/07/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

वाट पहात आहे.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 11/06/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

हिरवीन

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 24/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.

समरस व्हावे ऐसे

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/05/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल