Skip to main content

मुक्त कविता

साम दाम दंड भेद

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 26/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
साम दाम दंड भेद आमच्या घामाला दाम नाही हे रामा, आता जगण्यात राम नाही किती हि कष्ट केले तरी कनवटीला छदाम नाही नियतीला पण काही ना वाटे परिस्थितीशी साम नाही अहोरात्र धडपडतो पण वेदनेला बाम नाही भरल्या गोकुळात भरकटतो भेटत अजून श्याम नाही गतजन्मीच्या कर्माचा दंड हा ह्यात काही भेद नाही जगण्याशिवाय तरी आता या जगात दुसरे काम नाही राजेंद्र देवी

राया...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 24/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी

हेमलकसा

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 22/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हेमलकसा रंजले गांजले आदिवासी जमात त्यांची माडीया लुटुनी त्यांचे अनुदान अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या नक्षलवादाचा घेऊन संशय मांडला त्यांचा छळ जन्मताच ज्यांची ठेचली गेली नाळ जगण्यासाठी करती कसबसे मेळ वर्दीतील जनावरे करिती शरीराशी खेळ निबिड अरण्यात शिरला प्रकाशाचा एक कवडसा घेऊन मानवतेचा वसा गाव वसवले हेमलकसा अनाथ प्राण्यांसाठी काढले त्यांनी निवास बनले प्राणिमित्र गौरविले त्यांस भारतरत्न सहकारी भेटले सारे होते ध्येयाने भारलेली सहचरी पण अद्वितीय भुवरी देवमाणसे पेरलेली राजेंद्र देवी

श्वास...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 21/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

सुख म्हणजे काय असते?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!
काव्यरस

एकक !

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका : ही कविता जमेल तेथे फक्त एक शब्द वापरून करण्याचा प्रयत्न आहे. एका स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचे क्षण /घटना एका शब्दानं प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केले आहे. म्हणून शीर्षक एकक असे नाही . तर, एक स्त्री चे विश्व कसे एकक असून, साखरे प्रमाणे इतरांच्या आयुष्यात विरघळून जाते - इतरांच्या आयुष्यास अर्थ भरण्यास तिची स्वतःची ओळख.. अगदी तिच्या बाबांनी उत्कट प्रेमानं तिला दिलेले नाव सुद्धा - ती विसरून जाते (लग्न नंतर नाव बदलण्याच्या रीती वरून) - एका परिवारास अनेक प्रकारे जोडून -मात्र कुठे तरी ती 'एकक' म्हणून हरवून जाते... ह्या छोट्या अश्या निरीक्षणा वर लिहिण्याचा अल्प सा प्रयत्न आहे.
काव्यरस

मिठीतली रात्र

लेखक निनाव यांनी बुधवार, 14/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षानी जुनी पाने पालटली आज, आणिक हि कविता नजरेस अाली मिपा वर बरेच नविन कवि वर्ग जुडले आहे, तेव्हा पुन्हा सादर करतो आहे. "मिठीतली रात्र" आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत

दारी श्रावण दारी साजण....

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 14/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
दारी श्रावण दारी साजण.... पाऊस आला पाऊस आला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सरींवर सरी अशा कोसळल्या डोळ्याच्या कडा ढासळल्या असा काही बरसला श्रावण न्हाऊन निघाली तुझी आठवण रोज खेळते आठवणींची भातुकली वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली कळलेच नाही कधी ठाकला दारी श्रावण दारी साजण.... राजेंद्र देवी

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी