नशीब...
जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर
काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर
आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर
आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर
राजेंद्र देवी
पाखरे उडता आकाशी या
घरटे सुने सुनेच उरते..
परतीची ही ओढ लागता
तसे पाऊल मागे वळते..
कानोसा घेऊ राञ निघाली..
कात टाकुनी पहाट ही आली..
रानपाखरे घरट्यातुन या
उंच भरारी घेऊ लागली...
उन्हे दाटता डोक्यावरती
घरटे आतुर रडु लागले...
डोळे शिणले वाट पाहुनी
काळजीचे मग बांध ही फुटले...
तु असा गेलास कुठे की
हरवलास या वाटेवरती...
शोधलास तु मार्ग नवा की
विसरलास ही माझी प्रिती.....
आसमंत तो काळोखाने
पूर्ण व्यापला होता
रायगडावर अडकुन पडली
सैरभैर ती माता
मावळतीला गेला सूर्य
बंद जाहली दारे
दंडक होता शिवरायांचा
शिस्त पाळती सारे
कष्टकरी ती नार अपूर्व
नाव जाणती हिरा
गडाखालती राहत होती
वाळूसरेतील घरा
दूध विकाया रायगडावर
ती मायमाऊली जाई
उरकुन जाता काम रोजचे
घरास परतुन येई
एके दिवशी गड सोडण्या
वेळ जाहला तिला
उघडण्याला बंद ती दारे
त्यांनी नकार दिला
घरास होते बाळ तान्हुले
कंठ दाटुनी आला
राहावयाचे कसे लेकरु
गलका मनात झाला
भिरभिर फिरली रायगडावर
शोधित तिथल्या वाटा
उंच कडा एक दिसला जेथे
ना पहारा फौजफाटा
उतरु लागली मरणकडा तो
बाळासाठी जीव तुटे
खरचटला तो सारा देह
तिला परंतु भान कुठ
आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
-शिवकन्या
माझे स्वप्न...
तुझी नाजुकता फुलात आहे
फुलाचा गंध तुझ्यात आहे
तुझी अवखळता पाण्यात आहे
पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे
तुझ्या रागाची धग आगीत आहे
आगीची तेजस्विता तुझ्यात आहे
तुझा अबोला वाऱ्यात आहे
वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे
तुझे अस्तित्व स्वप्न आहे
माझे स्वप्न तुझ्यात आहे
राजेंद्र देवी
अंधारलेल्या निशा...
पाहून स्वप्ने उद्याची
सोकावली आहे निराशा
आता कोठे जागू लागल्यात
आठवणी जराश्या
का करीशी वणवण
या रखरखलेल्या वाळवंटात
आता कोठे विसावल्यात
उन्हात सावल्या जराश्या
आजूबाजूला कोलाहल किती
कोण ऐकेल माझे
वाचाळ झाली आता कोठे
माझी मौनाची भाषा
ना भिजते मन माझे
या कोसळत्या पावसात
राहतं नाही माझ्या
आठवणी पारोश्या
भरकटत जात आहे मी
दिशाहीन झाल्या या दिशा
दाविती उजेड मज
या अंधारलेल्या निशा
राजेंद्र देवी
देगा देवा एकच दान
मना लागे समाधान
होऊ नये उंच एवढा
इतर वाटती लहान !!१!!
देगा देवा एवढे बळ,
सोसण्या आयुष्यातली झळ,
जगणे कर एवढे सुंदर,
मरण तर आहे अटळ !!२!!
देगा देवा दया- माया,
व्हावे मी एखाद्याची छाया,
झालो आधार न कोणाचा,
तर व्यर्थची गेली ही काया !!३!!
देगा देवा एवढे ज्ञान,
असे भल्या-बुऱ्याची जाण,
अहंकार न अंगी यावे,
असावे मज सदैव भान !!४!!
देगा देवा सदाचार,
उजळत जावे माझे विचार,
अंतरीतला राम विजयी व्हावा
रावणाचे करून संहार !!५!
मोल...
या दुनियेत कोणी कोणाचा नाही
जो तो पैशात तोलुनी पाही
नव्हता मजकडे पैसा
जो आजपण नाही
म्हणून तर आजपण कोणी
मला ओळखत नाही
सारी नाती गोती बेताची
ठेवून अंतरे वितांची
गळाभेट तर नाहीच नाही
साधी विचारपूस पण नाही
या दुनियेत कोणी कोणाचा नाही
मी पैशाचा वा पैसा माझा नाही
राहतील फक्त शब्द माझे
त्याला काही मोल नाही
राजेंद्र देवी
केली कल्पना स्त्री विना जगताची, आदराने शिष झुके.
निसर्गाची मोठी किमया, ती नसती तर संसार मुके,
घेउनी बीज तिज पोटाशी, नेण्या मानवतेचे वेल पुढे,
स्त्री न असती या पृथ्वीवर, सकल अस्तित्वाचा प्रश्न पडे ?