व्यथा
लेखनविषय:
काव्यरस
गरिबीचा आसूड
दुनिया माझी न्हवं,
पायात डोकं
दुमडून घ्यावं .....!
अछुत जीव
मनास ठावं,
क्षुद्र मराण
भाळी ल्यावं .....!
हक्काचं मागणं
घोर जीवा लावं,
शिक्षेच्या झाकोळात
मुजून जावं .....!
आक्रीत करण्यां
मन वेडं धावं,
चाकोरीबाहेर पाऊल
मरणास भ्यावं .....!
आश्रूंभिजल्या भूमीच्या
गंधात न्हावं,
'कर' नभाकडं
मातीत एकरूप व्हावं .....!
श्री. साजीद यासीन पठाण
वाचने
702
वाचनखूण
प्रतिक्रिया
0