Skip to main content

gazal

घे भरारी..मन म्हणाले...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 12/03/2017 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो... सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो! जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती... वाटले की..वाट चुकले कोकरु झालो! राजरस्त्याची तमा ना आडवाटेची... मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो! गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले... धन्य झाला जन्म की मी वासरु झालो! बासरीचा सूर होणे मज कुठे जमले? राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो! हुंदके दाबून सारे स्वागता गेलो... अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो! घेतली हाती कलम बहुधा बरे झाले... मी मुक्या संवेदनांची आबरु झालो! —सत्यजित

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 08/03/2017 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

शांत अता या गाजा होणे नाही ..

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 08/02/2017 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

दु:ख अवघा धृवतारा मागते

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/02/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

चांदण्याला चांदणे समजू नये

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 27/10/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

माहेर

लेखक प्रास यांनी रविवार, 23/10/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा
काव्यरस

गझल - अनुवाद करण्यास मदती हवी.

लेखक निनाव यांनी बुधवार, 14/09/2016 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ?
काव्यरस

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी

लेखक निनाव यांनी सोमवार, 12/09/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी - निनाव (१२.०९.२०१६) व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी
काव्यरस

जाणिवांच्या जखमा

लेखक महेश रा. कोळी यांनी शुक्रवार, 09/09/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या
काव्यरस