Skip to main content

विदेशी फोन नंबर बाबत

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 11/11/2012 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे . काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात . यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.

खमंग व खुसखुशीत थालिपीठ.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 11/11/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. खरेतर आज मस्त गोडाची पाकृ टाकायला हवी होती.पण काय करणार काल पाहुण्यांनी व्हिजीट दिली आणि भात, आमटी,भाजी थोडं थोडं उरलं.मग काय धनत्रयोदशीच्या दिवशी नाश्त्याला शीळासप्तमी साजरी केली.चला आता साहित्य व पाककृतीकडे वळूया. साहित्यः-दोन वाट्या उरलेला भात. एक वाटी उरलेली आमटी. भाजी उरली असल्यास. एक वाटी बेसन्(पाहीजे असल्यास थोडे जास्त घेतले तरी चालेल) अर्धी वाटी तांदुळाचे पीठ. ज्वारीचे पीठ असल्यास. मिरची पूड. धणे-जिरे पूड. मीठ. तेल. कृती:- वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे.थोडे थो

मनातलं सांगताच येईना.....................

लेखक खान यांनी रविवार, 11/11/2012 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह मला नाकारता येईना म्हावरांचं कालवण पोटात मंथन करतंय ... वेदनेची बारीक कळही मला थांबवता येईना भरत आलेली बादलीच परत परत रिकामी होतेय ... खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता पचवता येईना आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ... इनोचा ग्लास घशात उलटला तरी अजिबातच आवाज थांबेना कधीतरी चांगला ढेकर येईल आपलीच समजुत घालतोय ...
काव्यरस

कितीक दिवस हे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी शनिवार, 10/11/2012 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे सोंग हे पांघरुन गुज मनी दडवून उगीच उगीच हासणे कितीक दिवस हे... हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे कितीक दिवस हे... सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे कितीक दिवस हे... फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे कितीक दिवस हे... गीत -- कौस्तुभ आपटे हे गाणे खालील लिंकवर ऐकू शक
काव्यरस

सकारात्मक दृष्टीकोण

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 10/11/2012 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहीण्याचा उद्देश : वेळ उपलब्ध असणे (वेळ जात नसणे), विचारवंत म्हणून प्रसिद्धीस येणे, आपोआप प्रकाशित होत असल्याने औत्स्युक्यापोटी इ. लेखाची प्रेरणा : कान डोळे आणि मस्तिष्कावर आदळणा-या बातम्या, लोकांच्या प्रतिक्रिया, जालीय काथ्याकूट इ. भारत या देशात नकारात्मक दृष्टीकोण असणारे लोक राहतात असं वाटतं. परवा एका नव्या टीव्ही वाहिनीच्या उद्घाटनास गेलो असता वक्त्यांनी सांगितले कि सकारात्मक दृष्टीकोण ठेवा. सतत नकारात्मक वार्तांकनांमुळे देशाचा दृष्टीकोण नकारात्मक बनत चालला आहे. म्हणूनच या वाहिनीवर फक्त सकारात्मक गोष्टी दाखवण्यात येतील.

दारू फुकट झालीच पाहिजे...

लेखक अस्वस्थामा यांनी शनिवार, 10/11/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
दारूच्या या गुत्त्यावरचा, गुंता काही सुटत नाही.. किती उधारी दिली तरी ही, हिशेब काही मिटत नाही.. चकन्यामधले शेंगदाणे, मी बारीक्क नजरेनं मोजतो आहे, रोज एक्केक दाणा कसा, कमी कमी भरतो आहे.. एक दिवस एकच शेंग, पाहून आमचा सरकला.. 'म्हागाई माजली न् भौ', संप्या वेटर चिरकला .. आधीच साला बायको आमची, पगार आमचा करीत नाई.. शेट्टी उधारी ठेवीत नाई, अन् आता संप्या चकनापण देत नाई.. डोक्याला हात लावून, बाटलीकडं बघत बघत.. टेबलावर उभा राहून बोलला बाब्या मोडक.. 'सरकारनं आता तरी, गरिबांकडं पाह्यल पायजे.. बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे.. बीपीयल(BPL) जनतेला, दारू फुकट झालीच पायजे..'
काव्यरस

केव्हा तरी पहाटे...

लेखक एस यांनी शनिवार, 10/11/2012 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश तारकांचा उतरून साज गेले अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले हा मंदगंध वारा विसरून तोच गेला निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला थरारले अधरही, आरक्त गाल झाले निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले चेहर्‍यावरी बटांचे रेंगाळणे उगाच निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...
काव्यरस

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 10/11/2012 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

<<मनातलं सांगताच येईना>>

लेखक प्रास यांनी शनिवार, 10/11/2012 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे?

चारोळी

लेखक कल्पी जोशी यांनी शुक्रवार, 09/11/2012 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी