Skip to main content

ट्रेडींग करताना स्टॉपलॉस कसा लावावा?

लेखक संदीपसाठे यांनी गुरुवार, 08/11/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेडींग करताना स्टॉपलॉस कसा लावावा? शेअरबाजारात होणारे संभाव्य नुकसान कमीतकमी राखण्यासाठी अनुभवी ट्रेडर्स स्टॉपलॉसचा प्रभावी वापर करतात- हे आपणाला माहितच आहे. एकाच ट्रेडमध्ये मोठे नुकसान करून घेवून बाजाराला रामराम ठोकणा-या ट्रेडरपेक्षा अनेक ट्रेडमध्ये किंचित नुकसान घेणारा ट्रेडर बाजारात अधिक काळ टिकून राहू शकतो. मोठ्या फायद्याची संधी त्यालाच मिळत असते. साधारणपणे डे-ट्रेडच्या बाबतीत जास्तीत जास्त १% ते २% नुकसान ही मर्यादा पाळण्याची पद्धत आहे.

कोर्लई चा किल्ला आणि पोर्तुगीज (क्रिओल) भाषा....

लेखक संदीपसाठे यांनी गुरुवार, 08/11/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे. इ.स.

ऊन-सावली नाते अपुले

लेखक जयवी यांनी गुरुवार, 08/11/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
. पानावरच्या दवबिंदूपरी सजते, निसटुनिया विरते ऊन - सावली नाते अपुले कधी हसते अन्‌ कधी रुसते कधी हिरवाईच्या मखमाली भिरभिरते अन्‌ बागडते कधी काहिली, कधी होरपळ कधी पेटुनी धगधगते कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी चमचमते अन्‌ लखलखते कधी गर्द अवसेच्या राती काळोखातुन पाझरते लडीवाळ कधी मोरपिसापरी हळुच कानी कुजबुजते कधी अनावर प्रपातापरी दुमदुमते अन्‌ कोसळते कधी मौनाच्या बंद क्षणांनी हिरमुसते अन्‌ मुसमुसते कधी शब्दांच्या पागोळ्यातुन गहिवरते अन्‌ रिमझिमते विरहाच्या एकांती नाते उष्ण आसवांनी भिजत
काव्यरस

स्वार्थ..

लेखक राघव यांनी गुरुवार, 08/11/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी! निस्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे! ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले.. माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे.. संतांस काय जाते नीती जपा म्हणाया.. नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी.. आता मिजास माझी.. तुमची वरात आहे.. -- चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना? आमीष हाडकाचे.. अन्‌ मी सुखात आहे! राघव

खंडोबा मंदिर - मुळगाव, बदलापूर

लेखक सौरभ उप्स यांनी गुरुवार, 08/11/2012 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
खूप इच्छा होती सगळ्यांची नाईट आउट करायची, दसर्यादरम्यान ठरवलेला प्लान कोसळून गेला, ठरता ठरता २७ ऑक्ट ला शनिवारी रात्री जायची मुहूर्तमेढ झाली. मागच्या प्लान पेक्षा काहीजण वाढले पण अन्याने मात्र ऐन वेळी टांग दिली (चालायचंच). कल्याण ला सगळे बाईकस्वार भेटलो, आणि हिरवा झेंडा फडकला.... पेट्रोल भरण्यासाठी मी आणि किसन मध्ये थांबून पेट्रोल पंपावर गेलो, आणि २ जण स्पा ची वाट बघत थांबले जेणेकरून तो पुढे जाऊन चुकामुक नको व्हायला, आणि व्हायचे तेच झाले, स्पांडूराव आपण मागे राहिलो कि काय या विचाराने जे सुसाट पुढे गेले ते आम्हाला गावलेच नाहीत, १५-२० मिन्तानी आम्ही गाड्या काढून पुढे झालो, कारण फोने पण लागत नव

जंबो पास्ता शेल्ल्स सॅलॅड

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 07/11/2012 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः जंबो पास्ता शेल्ल्स - १०-१२ चिकन - १ कप (उकडुन आणि shreded) क्रिम चिज - १ कप (मी लसुणच्या फ्लेवरचे घेतले होते) स्वीटकॉर्न - १/४ कप चेरी टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन (टोमॅटो मधील गर काढुन टाकावा) गाजर - ३ चमचे बारीक चिरुन बेसील - २ पाने बारीक चिरुन ऑलिव्ह ऑईल - २ चमचे काळि मिरी पावडर - १ चमचा मिठ चवीनुसार पाणी पास्ता उकडण्यासाठी कृती: १. एका भांड्यामधे पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल व २ चमचे मिठ टाकावे. २. पाणी उकळल्यावर त्यात पास्ता टाकुन १०-१२ मिनिटे शिजवुन घ्यावा.

चिकन शवर्मा

लेखक गणपा यांनी बुधवार, 07/11/2012 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात व्हेजींसाठी फलाफील आणि व्हेज-शवर्मा झाला. एक आठवडा कोंबडीलाही विश्रांती मिळाली असेल. म्हणुन पुन्हा सामिश प्रेमींसाठी चिकनकृती. :) साहित्य : . चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.) २ चमचे तंदुर मसाला. २ चमचे आलं वाटण. १ चमचा काश्मिरी लाल तिखट. १ चमचा काळीमिरी पुड. १ चमचा लसुण पुड.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/11/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय?