फरपट
नशीबाच्या शोधात दूर देशी आलो
अन इथवर येऊन परतीच्या वाटाही विसरून गेलो
हीच झाडं, हेच वारे, हेच ऋतू आपले
पसरलेले हिरवे माळ अन रस्तेही आपले
इथल्या मातीत पाय रोवून उभे राहू लागलो
पाळामूळांसकट आता इथेच गुंतू लागलो
तरीही येतो एक क्षण असाच अडवा तिडवा
हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा
फरपट्ल्यासारखा घेऊन जातो पुन्हा घरट्याकडे
रक्ताळलेले आपण खोल आत मनामध्ये
जखमा तशाच भरून निघतात पण व्रण मात्र तसेच
प्रत्येक व्रण एक दूत होतो आठवणींचा पूल होतो
आता पाय मातीत रोवूनही त्यात मूळं रुजत नाहीत
त्यांनाही कदाचित वाटत असावं ही माती आपली नाही
पायाखालची जमिन सरकतानाही रुजल्याचा आव आणतो
ही माती ही झाडं हे सारं आपल
मिसळपाव
आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.
मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली.