विकासाची भारतीय संकल्पना..
फार दिवसांपासून हा विषय मनात घोळत होता , खरेतर १५ तारखेच्या दरम्यान च लिहिणार होतो पण मुहूर्त लागला नाही.
गेल्या दोन वर्षांत भारतीय राजकारणामध्ये मोदी नावाच्या नव्या आशावादाचा जन्म झाला आहे आणि " विकासपुरुष" असा श्री . मोदी यांचा उल्लेख होत असतो आणि तो रास्त ही आहे.
या निमित्ताने " विकास" म्हणजे नेमके काय याचा थोडा विचार करावा म्हणून हा लेखन प्रपंच !
मध्ययुगाच्या शेवटी शेवटी युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि विकास या शब्दाचे परिमाण बदलले. माणसाने दैवजात तैल बुद्धी वापरून माणसाच्या सुख- सुविधांसाठी नव-नवीन शोध लावले , आणिअधिकाधिक सुख मिळवण्याचा मार्ग स्वीकारला. अगोदर या सार्या साठी त्याने प्राण्यांची मदत घेतली ( घोडा / बैल / याक ) आणि मग यंत्रांची !
घोडागाडीच्या ऐवजी अगोदर वाफेच्या इंजिनावर चालणारी आणि नंतर डि़झेल्वर चालणारी गाडी आली, हातमाग जाऊन त्याऐवजी यंत्र्माग आले. यांत्र्क शेती ही आली , थोडक्यात औद्यगिकरणाने माणसाचे आयुष्य सुखकर झाले. शारिरिक कष्ट कमी झाले आणि मानवाचा विकास होऊ लागला असे ढोबळ्पणाने म्हणावे लागते. म्हणजे सुख आणि विकास यांचा प्रत्यक्ष संबंध आहे हे स्पष्ट्च आहे.
माणसाची जगण्याची मूलभूत प्रेरणा " सुख " आहे आणि अधिकाधिक सुख मिळवणे , त्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे आणि सुख मिळवणे याच साठी मनुष्य जगत असतो. आणि मनुष्यच नव्हे तर आखिल प्रणिमात्र हे सुखासाठीच धडपडत असतात.
सुख म्हणजे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती ! गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली , गुलाब्जाम मिळाले सुख ! तहान लागली थंड्गार पाणी मिळाले सुख ! झोप आली , आरामदायी शय्येवर सुरेख झोप मिळाली , सु़ख ! थोडक्यात-
आपल्या मनातील इच्छांची पूर्ती पुन्हा पुन्हा होत राहणे म्हणजे पुन्हा पुन्हा सुख !
अधिकाधिक इच्छांची पूर्ती म्हणजे अधिकाधिक सुख !
मनातील इच्छांची पूर्ती
सुख = -------------------
मनातील एकूण इच्छा
इतकी सुखाची साधी सोपी सरळ व्याख्या निर्माण झाली, पण सुखाची साधने मर्यादित होती आणि त्यामानाने इच्छुक मात्र उदंड अशी स्थिती निर्माण झाली. मग मनुष्य अधिकाधिक सुखासाठी अधिकाधिक उपभोगाची साधने निर्माण करु लागला / खरेदी करु लागला आणि अश्या प्रकारच्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी अधिकाधिक धनसंचय करु लागला आणि धन संचय म्हणजे सुख असा काहींसा समज दृढ झाला. आणि या पैश्याच्या हव्यासासाठी सुखाच्या मागे धावणारा माणूस प्रत्यक्षात मात्र दु:खी झाला !
आणि ही साधने मर्यादीत न रहावीत म्हणून औद्योगिक क्रांती द्वारे अधिकाधिक उत्पाद्न सुरु झाले. अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी बाजारपेठ अशी चक्राकार गती सुरु झाली.
आणि अश्या प्रकारची विकसित बाजार पेठ निर्माण करणे, त्यामध्ये खर्च करु शकेल असा वर्ग निर्माण करणे आणि सतत पोकळी निर्माण करून त्यात भर टाकत राहणे यालाच "विकास " असे म्हंटले गेले !
दुर्दैवाने पाश्चिमात्य जगातील हीच विकासाची व्याख्या भारतीयांनी स्वाकारली आणि अक्षय सुखाचा ठेवा देणारी सर्वंकष भारतीय जीवन शैली नाकारली.
मनातील इच्छांची पूर्ती
सुख = -------------------
मनातील एकूण इच्छा
हे समिकरण प्राचीन भारतीयांना माहीत नव्हते काय ? त्याशिवाय चार्वाकांसारखे दार्शनिक ही होते. ययाती सारखी ओर्बाडून सुख घेऊ पाह्णारे ही होते , पण भारतीय तत्ववेत्त्यानी सधा विचार केला , हा भागाकार पूर्ण १ यायचा असेल तर " छेद " कमी केला पाहीजे ! इच्छा कमी केल्या की आपोआपाच भागाकार १ कडे जाईल.
पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील !
आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !
( क्रमशः)
Book traversal links for विकासाची भारतीय संकल्पना..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय .. उत्तम मालिका
वाचतोय .. उत्तम मालिका
वाचत आहे
बरचसं बरोबर.
वा... मस्त !!!
+१ पुढचा भाग येऊ द्या लवकर
+१
वाचत आहे....
लेख आवडला... !
पुढचा भाग २-३ दिवसात