ऐश्वर्य
एकत्रित असलेली काही नि:स्वार्थी नाती आणि काही वेळा काही मित्र/ मैत्रिणी ;
काळागणिक संवेदना अन् नाते विसरून व्यवहारी बनतात, अशाच काही व्यवहारी
लोकांच्यात; एकट्या पडलेल्या एका नि:स्वार्थी मनाचे चित्रण मांडण्याचा; प्रयत्न.
दिवस आजवरले, असे रंगलेले
नात्यांच्या गोडीतले, असे मौजलेले ll १ ll
कळीकाळ बदललेले, सारेच बेरंगलेले
व्यवहार मनी कोरलेले, ते नातेच निर्ढावलेले ll २ ll
संस्कार उध्वस्तलेले, पैशास धास्तावलेले
संवेदन मनातले, दिवसागणिक संपलेले ll ३ ll
देह सुबत्ती हरवलेले, मन धुंदीत लपेटलेले
त्यांच्या लेखी पटावरले, सारे गणित बदललेले ll ४ ll
त्यांच्या गटात न बसलेले, मी मलाच पाहिलेले
सारे
मिसळपाव
काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही.