Skip to main content

काळ्या किनारीचे सोनेरी पान

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 10/12/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास हा जेत्यांनी, राज्यकर्त्यांनी लिहिलेला असतो. त्यामुळे जेत्यांना नसलेले गुण चिकटवण्यात आणि पराभूतांना नसलेले दुर्गुण चिकटवण्यात इतिहासकारांचे बरेच श्रम खर्ची पडतात. त्यातून जर जेते वा राज्यकर्ते संकुचित, कोत्या, प्रतिगामी विचारांचे असतील तर विचारायलाच नको. राजकारणातील दबाव हे देखील एक कारण असू शकते. आधुनिक इतिहासकारांना मात्र लोकशाहीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे अकबराच्या तथाकथित नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फझलसारख्या तथाकथित इतिहासकारांची भाष्ये विश्वासार्ह अशा ऐतिहासिक पुराव्यांवर तपासून घेण्याची वेळ आलेली आहे असे काही मान्यवरांचे मत आहे.

"घन आज तो कठोर आहे"

लेखक वैभवकुमारन यांनी मंगळवार, 10/12/2013 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
"घन आज तो कठोर आहे" कीती फोडशील हंबरडा तू घन आज तो कठोर आहे ना थांबे तुझ रानापाशी कोणाशी तरी फितूर आहे तुझाच अश्रू तुझ्याच रानात गळण्यासाठी आतुर आहे कोरडी गर्जना ऐकवत कानी घन आज तो कठोर आहे आसुसलेली नजर तुझे ती नभापाशी का लाचार आहे नभी कडाडी वेजेची ती अर्थहीन पण वाचाळ आहे तुझेच काळीज पेटवायला पाणी हे एक हत्यार आहे दु:ख आपले गीळत बस तू घन आज तो फितूर आहे

जरा सांगा कुठे जाऊ !

लेखक आनंदराव यांनी सोमवार, 09/12/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रनो आणि मैत्रिनिनो , ४ दिवस मी आणि बायको फिरायला जाईन म्हणतोय. लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय हो. आम्हाला स्वताच्या गाडीने फिरण्याची फार हौस अहे. ( खाज?) आणि कोकण किनारपट्टी ला आमचे जाऊन झाले अहे. कोस्टल कर्नाटक पण झाले अहे. केरळ ४ दिवसात जाऊन होणार नहि. आणि कोलकत्ता वगैरे तर फारच लांब हो. म्हणजे आम्हाला कसे पाहिजे कि ट्रीप तर ४ दिवसाचीच झाली पाहिजे, पण ठिकाण पण बघून झाले पहिजे. मध्य प्रदेश - म्हणजे इंदोर वगैरे …. काय ? जरा कुठे जाऊ ते ठरवायला मदत करा कि. हक्काची विनंती आहे तुम्हाला .

जत्रा

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता, कवी ,सर्वांची माफी मागून जत्रा -भारनियमनाची हा भार सोसंना जनता झालीय हैराण गावात लाईट नाई बंद पडलीय गिरण , सांग तू माझ्या राजा कस आणू मी दळण , दिवाळी आली हि दारात पर नाई नाई लाईट हि घरात बोंब बोंब बोंब बोंब बोंब . . . . . . -------------विनय गदो

अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 09/12/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा.

'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 09/12/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः http://www.misalpav.com/node/26057 निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे: वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले. वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ.

सखे ..........

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सखे , खर सांगू , आता न खूप हलके वाटतेय! खर तू परत आलीस, यावर विश्वास बसतच नव्हता. का कुणास ठाऊक, तुझ्यात ती पूर्वीची तू दिसत नव्हतीस, आणि ते तू कबुल हि केलेस. एरव्ही माझ्या एका शब्दाला तुझे १० शब्द असायचे पण आज ? चक्क तू ? तूच होतीस ती ? कदाचित माझ्या जागी तू जरी असतीस तरी विश्वास ठेवला नसतास यावर. शांतपणे म्हणालीस तू ‘’ .... मी आता तिला ( माझ्या त्या पूर्वीच्या ) ..... मारून टाकलेय. आतापर्यंत हळवी, मनमिळाऊ. भावनाप्रधान, पाहिलीस तू मला, पण आज मी त्या माझ्या रुपाला तिलांजली दिलीय .......किती धक्कादायक सुखद धक्का होता तो? तुझा विश्वास बसणार नाही पण मला तू अशीच हवी होतिस.

बोकुल्या ये ना

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न बोकुल्या ये ना , प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे कशी ही जिंदगीत आणिबाणी रे ये ना बोकू मी तर प्रेम दिवाणी मनुली दे प्यार जरासा बोकुल्या प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले तुला सोडून मी छळून गेले रे ये बोकुल्या ! विसर झाले गेले सख्या रे शरण आले बोकुल्या तुला रे मस्त मस्त हि दुधारी हवा दुग्ध गंध हा कसला नवा साथ हि मलाच तुझी हवी एकटा असा छळतो हा tomya मला तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा दुधावर जशी गोड येई सायबाई तू ये ना, तू ये ना ना ना ना ! ये असा बिळात ये बोकुल्या तुझा नवाच ड्रेस घालूनी स्वप्न आज जा