Skip to main content

जादूगार डाइनमो

लेखक कंजूस यांनी सोमवार, 08/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रैडफॉर्ड इंग्लडचा लोकप्रिय जादूगार DYNAMO याचे जादूचे प्रयोग HISTORY TV CHANNEL 18 वर दाखवतात. युट्युबवरही पाहता येतात. आतापर्यँत चौदा मोठे शोज झाले आहेत. त्याच्या गाजलेल्या जादूंमध्ये या आश्चर्यकारक ठरल्या आहेत: १)थेम्स नदीवर चालणे. २)कागदाची फुलपाखरे जिवंत करणे. ३)रिओ डि जाने मध्ये हवेत उडणे. ४)टाईम्स स्क्वेअरमध्ये एकाच वेळी एकाच नंबरवरून शेकडो लोकांना कॉल येणे. ५)कारंज्याचा पाण्याचा बर्फ करणे. तुम्ही या डाइनमोचे कार्यक्रम पाहिलेत का ? मागच्या वर्षी तो वाराणसी आणि धारावीत येऊन गेला होता . आता क्रिसमसला नवीन शो दाखवतील असे वाटते.

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे. मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्‍यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०१४-१५) - यावेळी तरी लाज राखणार का?

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
_________________________________________________________________________________ मंगळवार २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ऑस्ट्रेलियाचा तरूण व भरवशाचा फलंदाज फिल ह्यूज स्थानिक सामना खेळताना एक उसळता चेंडू हेल्मेटच्या खाली कानाच्या मागे लागून मैदानावरच कोसळला व दोनच दिवसांनी गुरूवार २७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी कोमातच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचे दु:खद निधन झाले.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 08/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 ******************************************** नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!

अंधार क्षण भाग ४ - पीटर ली (लेख १७)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 08/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - पीटर ली ऐतिहासिक घटना समजून घेण्यातलं एक आव्हान म्हणजे भूतकाळ आणि आपण स्वतः यांची सांगड घालणं किंवा स्वतःची भूतकाळात कल्पना करणं. आपल्याला अशा जगाचा विचार करायला लागेल जिथे आज आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो - इंटरनेट, विमानप्रवास, मोबाइल फोन - त्या तर नव्हत्याच पण लोकांची मूल्यव्यवस्थादेखील पूर्णपणे वेगळी होती. जर माझ्या आईवडिलांच्या पिढीचा विचार केला तर ही पिढी दुस-या महायुद्धाच्या वेळी तरूण होती आणि  सूर्य न मावळणारं  ब्रिटिश साम्राज्य अनुभवणारी शेवटची पिढी होती.

खटाटोप

लेखक Yash यांनी रविवार, 07/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सरत चालली संध्याकाळ, कामातून निघत नाही वेळ... कसा काढावा येथून पळ, घरी वाट बघे छोटा बाळ... ही सांज भारी खट्याळ, पुढे सरकत नाही घड्याळ... पोटासाठी चालली सर्व धावपळ, झाला चैनीच्या वस्तूंचा सुकाळ... आप्तजनांशी नाही मेळ, कसा हा सर्व खेळ... गणित चुकले जीवनाचे.. नाही कसला ताळमेळ, अंधारातून चालतो आहे.. कधी होईल सकाळ..!!

नवलकोलची भाजी

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 07/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार. navalcol साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक). कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या.

कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव

लेखक शरद यांनी रविवार, 07/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती ! व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् ! विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण. मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल.

रसायनीमार्गे कर्नाळा

लेखक कंजूस यांनी रविवार, 07/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कलादालनात अंतर्भूत करण्याइतके चांगले फोटो नाहीत तरी देत आहे. या नवीन भटकंतीच्या जागेची ओळख करून द्यावी हा हेतू आहे. काल रसायनी स्टेशन मार्गे कर्नाळा करून आलो. ही वाट गार सावलीची आहे आणि गुळसुंदाकडून येणाऱ्या वाटेपेक्षा अधिक रम्य आहे. 'आपटा - गुळसुंदा - कर्नाळा (+फोटो)' हा मिसळपाववरचा लेख इथे आहे. मार्ग :रसायनी रेल्वे स्टेशन - फाटकातून उजवीकडे -तुराडा कष्टकरी नगरातून - पुढे चांगल्या पायवाटेने अर्धा तास चालत - तुराडा ठाकरवाडी - सुगम पायवाटेने ४००मिटर्स चढून किल्ला आहे. मला कर्नाळा किल्यापेक्षा अभयारण्याची भटकंती आवडते ती इथे मिळाली.

मराठी अस्मिता … जपली बरं का !

लेखक सवंगडी यांनी शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले राजकारणाबद्दल कोणी लेख लिहिला नाही. विधानसभा निवडणुका झाल्या,त्यानंतर भरपूर आडवणुका पण झाल्या. पण त्यावर कुणी काही लिहेना "राजकारण" हा सगळ्यांच्या आवडीचा विषय जरी असला तरी तो जरा संवेदनशील पण आहे त्यामुळे त्याकडे वळताना थोडी भीतीच वाटते. निवडणुकांनंतर तर या लोकांनी सर्कसच सुरु करून सामान्य लोकांची काही दिवस करमणूक केली खरी,पण नंतर मात्र "रोजच मरं,त्याला कोण रडं ?" अशी तऱ्हा झाली आणि मग सगळेच त्या चर्चेकडे दुर्लक्षच करू लागले. त्यात राष्ट्रवादीने आपला विदुषकाचा खेळ करून दाखवला.