Skip to main content

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य.

मॉरिशियसचा प्रवास

लेखक rajujumle यांनी शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मागीलवेळी आम्ही थायलंडचा परदेशातला प्रवास केला. ह्यावेळी मॉरिशियसच्या प्रवासाला जायचं ठरविलं. आता फिरायला जायचे म्हणजे मी आणि कुसुम असे दोघेचजण जात असतो. मुलं आता मोठी झालीत. कामोकामी लागलेत. सर्वांचे लग्न झालीत. पाखरासारखे दूर उडून गेलेत. आता त्यांची सोबत नसते. मग आम्ही दोघेच फिरत असतो. पूर्वी मी नोकरीत असतांना मुलं लहान होते, त्यावेळी १९८६ साली आम्ही सर्वजण नेपाळ येथे काठमांडू पर्यंत गेलो होतो. त्यावेळी मोठा प्रज्ञाशील १० वर्षाचा, संघशील ८ वर्षाचा व करूणा ६ वर्षाची होती. मी अकोला येथेच केसरी टूरच्या ब्रांच ऑफिसला मॉरिशियसचं बुकिंग केलं.

विषाणू

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगत दूरच्या काळात, मंगळावर घडलेली ही कथा. अर्थात, त्यावेळी मराठी किंवा इतर भाषा नव्हत्या. थांबा, तुम्ही नीट समजावून घेतले नाही बहुदा! इतर भाषा नव्हत्या, म्हणजे, भाषाच नव्हत्या. माणसे होती, पण ती देखील आज आपल्याला समजणार नाहीत अशी! जेथे ही कथा घडली तेथे माणूस होता, पण त्याला ना मन होते, ना भाषा! जे काही होते, ते कालच्या काळापेक्षा खुपच वेगळे, आपल्या समजण्याच्या बाहेरचे. म्हणून, आजच्या वाचकांसाठी त्यांना समजेल अशी सादर केली आहे.

आयला लाईन चुकली राव!!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक पुस्तक हाती आले.आजकाल पुस्तके घरी येत असतात, पण वाचायला वेळ मिळेलच असे नाही. मिळाला तरी सलग पुस्तक वाचुन होत नाही. रोज थोडे थोडे वाचुन लिंक लागतेच असे नाही.तरी वाचायची हौस काही जात नाही. जित्याची खोड.... तर ह्या पुस्तकाचे नाव निसर्गपूर्ण. कोणी एक लेखक नाही पण दोन संपादक. पुस्तकाची टॅगलाईनच सांगते की निसर्गाच्या विशिष्ट पैलूंचे अभ्यास आणि जतन करणार्‍या निसर्गप्रेमींचे आत्मकथन.पुस्तक हाती आले आणि एकामागुन एक प्रकरणे वाचत गेलो. प्रत्येक प्रकरणाचा लेखक त्याच्या विषयात मास्टर.

भीतीच्या भिंती: १

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 05/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.) १. एक तास जास्तीचा “विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं.

Calligraphy: मराठी सुलेखन

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 05/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Su1 स्केच पेन ने देखील सुलेखनाचे वेगळे प्रयोग करता येतात. Su2 Su3 Su4

मिपाकराशी भेटताना....

लेखक अमितसांगली यांनी शुक्रवार, 05/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
'दोस्त फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब वो फर्स्ट आता है तो और दुख होता है' असच काहीतरी माझ्या बाबतीत घडत होत. मग त्यातून सुरु झाला सुख,समाधान,अपेक्षा,मागण्या,स्वार्थी मदत,निस्वार्थी मदत यासारख्या शब्दांचा खेळ. पण कळत नकळत भातुकलीच्या या खेळाचे प्रचंड यातनांमध्ये कधी रुपांतर झाले व अपेक्षांच्या ओझ्याची तलवार कधी मानेवर ठेवली ते कळलेच नाही. लहानपणापासून समाजसेवा,संशोधन असले विचार डोक्यात होते. शिक्षण चालू असेपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्नही करीत होतो. पण नोकरी लागली आणि प्रत्यक्षात GLAMOR या शब्दाचेच आकर्षण वाटू लागले. पैसा येऊ लागला,वाढू लागला पण त्याचबरोबर राहणीमान बदलले.

....... इथले संपत नाही

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 05/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय.

अग्निपंख.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे ४.३० ला निघालो आणि सरळ सोलापूर रस्त्याला लागलो.