Skip to main content

क. सांगता येत नाही

लेखक जातवेद यांनी सोमवार, 09/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
असो. आता या पुलाखालचं नुस्तं पाणिच काय अख्खा पुल वाहून गेल्यात जमा झाला आहे कदाचित कोरड्या प्रवाहामुळेपण पुल पडत असतो अशा ह्या विचित्रपणाचा मी पहिल्यांदाच अनुभव घेतलाय म्हणलं ठिकाय, आपण आता नविन पुल बांधुया ठरलं तर. पण नविन पुल बांधायचा कुठे जुन्या पुलाचा पाया तर काढता येत नाही तसही इथे पाणि कुठाय?

वैदिक काळातील वीरांगना

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/02/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला.

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

दोस्ताना!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 09/02/2015 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक पुस्तक दिसल... 'एका मैत्रीची कहाणी'... नाव होत.. 'मैत्री'त कहाणी कशी असेल? 'कहाणी'तली मैत्री कशी असेल? कुतूहल माझ जागं झाल... पुस्तक माझ्या घरी आल! तेवढ्यात पक्या घरी आला... दोस्तीची 'आण'देऊन पान खायला घेऊन गेला... 'साल्या तुझी तंगी हाय? दोस्त न तुझा? सांगायच नाय?' जीव आत कसानुसा झाला... 'याला कोणी सांगितल?' प्रश्न मनात आला... मुलांची फी.. आईच् आजारपण.. बायकोची नोकरी गेली... राहाते राहिलो कमावते आपण.. पैसा पूरा पडेना... आयुष्यच तंग.. काहीच मला बोलवेना... उलाघाल मनाची... दोस्ताला कळली... 'तू नाही बोललास... काल आई भेटली... साल्या दोस्ती आपली फार जुनी हाय.. तुझ्यामुळे बुकं शिकलो..

जडण-घडण 19

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 09/02/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंरचे दिवस मात्र काहीसे अस्वस्थ करणारे होते. झालं काय, तर मी गिफ्ट नाकारल्याचं विद्यार्थ्यांकडून पालकांना आणि अर्थात माझ्या सहशिक्षिकांनाही समजलं. काही पालक हटवादीपणे दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर स्वत:च गिफ्ट घेऊन आले. पण मला ते पटणार नव्हतंच. त्या भेटी मी अर्थात स्वीकारल्या नाहीत. माझ्यापुरता तो विषय संपला, पण माझ्या सहशिक्षिकांनी मात्र त्यावरून मला टोमणे मारायला सुरूवात केली. खरं तर त्या सगळ्या माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या, वयानेही आणि सेवाज्येष्ठतेनेही. मी काही त्यांना प्रत्युत्तर द्यायच्या भानगडीत पडले नाही. कालांतराने ते ही मागे पडलं. विद्यार्थ्यांशी उत्तम नाळ जुळली होती.

ई शॉपिंग - बिचारे डिलिव्हरी वाले

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 09/02/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता थोड्यावेळापूर्वी एका मिटिंग ला जातांना ऑफिस रिसेप्शनमध्ये दुसर्या कलीग साठी थांबलो होतो ...तर तिथे रिसेप्शन मध्ये एका ई शॉपिंग वाला मुलगा डिलिव्हरी साठी बसलेला पहिला ...५-१० मिनटे हातात होती म्हणून कुतूहलापोटी नीट पहिले तर साधारण २.५ x २.५ x २.५ फुट मापाची एक मोठी bag त्यातून एकेक वस्तू काढून तो डिलिव्हरीची तयारी करत होता ... ती साधारण उचलून पहिली तर सुमारे १२-१३ किलो सहज असावी ...

पनीर /चीझ/मटार गुजिया /करंजी

लेखक पियुशा यांनी सोमवार, 09/02/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स मिपाकर्स .... आज खुप दिवसानी मिपावर जिलबी पाडु योग आलाय ;) नेहमी मी जे ठरवील ते बनेलच असा काही नियम नाही ( म्हणजे माझा नेम नाही ) म्हणजे यु के जाना था जापान और पहुच गये चीन अस वरचेवर माझ्या बाबतीत तरी घडत असत बनवायला घेतला होता पनीर चीझ रोल अन झाली मटार पनीर चीझ करंजी / गुजिया ईत्यादी ईत्यादी . दिमाखात किचन मध्ये प्रवेश केला होता आज काही झाल तरी मी पनीर चीज रोल बनवणारच ! पण भाजी तयार झाल्यावर पहिला रोल बनवला तर भाजी इकडून तिकडून बाहेर डोकावू लागली मग कडा पाणी लावून बंद केल्या तर आतली बाजू कच्ची राहिली , मग आधी पोळी बनवून ती एका बाजून शेकून घेतली शेकलेल्या ब

Lumber Spondylosis .............

लेखक नितीन पाठक यांनी सोमवार, 09/02/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी .............. दि. 27 आणि 28 डिसेंबर रोजी मित्राच्या मुलीचे कोल्हापूर येथे लग्न होते. त्यानिमित्त अहमदनगरहून कोल्हापूर ला जायचा योग आला होता. कोल्हापूरला जाण्यासाठी लक्झरी बस होती. आम्ही दोघे सकाळीच मित्राच्या घरी पोहोचलो. मित्राच्या घरी गेल्यावर थोडे फार कामे केली. सामान, बॅग उचलणे इ इ कामे केली. बस मध्ये मागील बाकावर बसून, साधारण 8 तास प्रवास करून आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. संध्याकाळचा सीमंतपूजन कार्यक्रम झाला. जेवणे झालीत आणि आम्ही सर्व जण झोपी गेलो. दुस-या दिवशी सकाळी उठलो तर काय ... माझी पाठ पूर्णपणे आखडून गेली होती. प्रचंड पाठ दुखत होती. मला तर सरळ असे उभे रहाता येईना.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 09/02/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल. ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत.