Skip to main content

काथ्याकुटातून रसग्रहण

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 11/02/2015 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक) आज टीम लंचला बाहेर पडलो, टेबलावरची महत्वाची डायरी ड्रोवरमधे लॉक करायची विसरलो. टीमबरोबर हॉटेलमधे गेल्यावर जेवताना लक्षात आलं, ऑफीसात फोन करून कोणाला तरी सांगाव म्हटलं, तर जवळ बसणारे सगळे इथे हॉटेलात, धाकधूक होतीच, पण म्हटलं जाऊ दे, हा लंच तर एन्जोय करू. लंचवरून परत आलो तर डायरी टेबलावरच होती पण, माझ्या डायरीच्या ऐका पानावर कोणीतरी लिहून ठेवलं होत. म्हटलं मिपाकरांना सुद्धा ते शेअर करू, प्रतीक्रीयामधून काथ्याकुटातून रसग्रहण तरी होईल.

नेमक काय चुकतंय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 11/02/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला ती म्हणाली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, संसाराच्या गाड्यात माझं एकटीच तिरकिट होतंय, तिचं देखील बरोबर आहे मला हे पटतंय, पण काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी तिचा हात प्रेमाने हातात घेतो, अलगदपणे मग तिला माझ्या मिठीत घेतो, जेव्हा ती पाघळत असते मिठीत माझ्या, नेमक तेव्हाच गॅसवरच दुधसुद्धा उकळतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… रात्रीच्या वेळी मी थोडा निवांत बसतो, तिच्याकडे पाहून मग छानसा हसतो, जेव्हा ती हि हसते गालात हळूच, नेमक तेव्हाच कार्ट आमचं भोकाड पसरतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी हिच्यासाठी मुद्दाम सुट्टी काढतो, कुठेतरी फिरवावं हिल
काव्यरस

भूमी अधिग्रहण कायदा

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 11/02/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भूमी अधिग्रहण कायदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. त्यामधले मुख्य बदल खालीलप्रमाणे १. पूर्वी संपादनासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती बंधनकारक होती . ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. यामुळे विरोध असतानाही सरकार बळजबरीने खाजगी / सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेउ शकते . २. संपादन केलेली जमीन त्या प्रोजेक्टसाठी जर ५ वर्षात वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकर्‍याला परत करण्यात यावी . ही अट काढून टाकली आहे. या मुळे जमीनी फक्त संपादीत करून योग्य भावाची वाट बघत पड ठेवण्याचे प्रमाण वाढेल. आणि शेतकर्‍याकडे असलेला जमिनीचा ट्क्का अजून कमी होइल.

आणिक एक आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 11/02/2015 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी होती; 'शेअर टॅक्सी मधे पुढची पॅसेंजर सीट महिलांसाठी आरक्षित.' त्यावर अनेक प्रतिक्रिया होत्या. सामाजिक संस्था, प्रवासी संघटना, इत्यादींनी अगदी स्वागतार्ह निर्णय वगैरे संबोधून या गोष्टीचं कौतुक केलं होतं. ट्रेनचे डबे झाले, बसच्या सीट झाल्या आता टॅक्सीच्याहि सीट महिलांसाठी आरक्षित; किंवा राखीव. यामागचं कारण असं की मागच्या सीट वर इतर दोन पुरुष प्रवाशांबरोबर (अर्थातच अनोळखी) प्रवास करताना त्यांना जो त्रास होतो तो होऊ नये. सद्ध्याच्या एकंदरित सामाजिक मानसिकतेकडे आणि घडणा-या घटनांकडे बघता हे अगदी योग्य आणि रास्त वाटतं.

वैभवशाली वाडा जुना

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 11/02/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना, ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं, गवताच्या पातीशी आता जडलंय नातं, दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं, अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं, कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य, असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं, डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं, आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न, कोणा एके काळी झडत असतील नौबती, अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती, आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल, तरीही, वैभवशाली अस्तित्वाच्या उध्व

उल्लेखनीय मराठी साहित्याचा पुस्तक-परिचय करुन हवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/02/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ मराठी भाषा दिवस म्हणून नव्हे तर मराठी भाषेसंबंधी बरच काही चांगल या फेब्रुवारी महिन्यात होत असतं. फेब्रुवारी महिन्याचा आणि मराठी भाषेचा निश्चीत काहीतरी ऋणानुबंध असला पाहीजे. भालचंद्र नेमांडेंच्या बद्दलच्या धागाचर्चेत आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्‍यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्‍यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही.

पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/02/2015 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या प्रमाणे व्हॅलेंटाईन डे आपला का बाहेरचा वगैरे चर्चा रंगतीलच, विरोध आणि विरोधाच्या काट्या मधूनही गुलाब लाल रंगाची उधळण होत राहील. भारतात तर भारतात पण पाकीस्तान सारख्या इस्लामी देशांमध्ये सर्व कडक कायदे आणि अतीरेकी हाताशी असूनही व्हॅलेंटाईन डे संस्कृतीने बर्‍या पैकी आव्हान उभ केल आहे. सनातनी लोक हिजाब डे अथवा मॉडेस्टी डे म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करू पहात आहेत. तर कुणी केवळ गझलांच्या कार्यक्रमांवर भागवतात पण मोटरसायकला बांधून लाल हृदयी फुग्यांच्या विक्रीचे फोटोग्राफ काही पाकीस्तानच्या तरुणाईच वेगळ चित्र उभे करतात.

त्रिकूट - भाग १

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी बुधवार, 11/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चिवचिव" "चिवचिव" तिची तंद्री अखेर मोडलीच त्या आवाजाने. मान वेळावून न पाहता तिने तो आवाज पुन्हा ऐकला. हं! आल्या चिमण्या. रोजच येतात म्हणा. आणि रोजच आपण त्यांना खायला टाकतो. आज फरक फक्त इतकाच आहे की रोज ऑफिसला धावतपळत जायची घाई असते. धावतपळत?! स्वतःशीच हसली ती. रावी. तिचं नाव. एक नावाजलेली उद्योजिका. ती इंजिनीअर झाली तेंव्हाच ठरवून मोकळी झाली होती की आयुष्यभर कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करणार. सुरूवातीची काही स्ट्रगलची वर्षे सोडली की स्वतःची कंपनी सुरू करायची. तिच्या धडाडीने आणि गुणवत्तेने ते फारसं अवघडही नाही गेलं म्हणा तिला.