लग्न .... एक घटना
पहिली घटना....
तारीख:20 डिसेम्बर 1990.
स्थळ: साठे कॉलेजच्या जवळील चहाची टपरी
वेळ: दुपारी 12.30
पात्र: तृतीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी
सागर:हाय चैताली.
चैताली मैत्रिणींबरोबर क्लासला जायला निघाली होती. एकीने तिला कोपराने ढोसल. दुसरीने डोळा मारला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चैताली उत्तरली, "हाय सागर".
सागर:कुठे क्लासला का? मी पण निघतोच आहे. एकत्र जाऊ या?
चैतालीने काही म्हणायच्या आत मैत्रिणी हसत म्हणाल्या,"बाय चैताली. आलिस तर क्लासला भेटु. तू ये सावकाश. आम्ही पुढे जातो."
मैत्रिणींना डोळे मोठे करून दाखवत चैताली सगरच्या दिशेने वळली.
मिसळपाव