Skip to main content

अनईझी.......!!

लेखक गोल्या यांनी शुक्रवार, 12/06/2015 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण उभा यमुना किनारी होऊनी अनईझी, गोपिका तिकडे मजेत वाट्सप्प वरती बीझी...!! दुध लोणी गायब झाले फास्ट फुडचा जमाना, गोपी खाती नुडल्स भरती बर्गर चा बकाना...!! पुर्वी एकच पेंद्या होता आता सारेच पेंद्या झाले मैदानी खेळ सोडूनी, फेसबुक वरती आले...!! गोधन झाले आऊट डेटेड गोकुळात मॉल आले, गोवर्धन विकला गुण्ठे वारी मथुरा कॉस्मोपॉलिटन झाले .!!!
काव्यरस

फक्त तू नाही आहेस..................

लेखक झंडुबाम यांनी गुरुवार, 11/06/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी उठल्यावर आरसा बघितला की जाणवतं जे तुझ्या डोळ्यात दिसतं ते आरशात दिसत नाही आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस नंतर अंघोळ करताना दिसतात शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच मग पुन्हा पुन्हा कवितांची आवर्तनं आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस एकटा असताना तुझा गंध जाणवतो खूप जवळ उभी आहेस वाटून जातं पण एक जीवघेणी शांतता असते सगळीकडे तुझा मोहक आवाज कुठेच नसतो आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस रात्री आकाशाकडे एकटक बघणं होतं चंद्र रोजच्यासारखाच असतो पण चांदण्यात तू नसतेस तेव्हा तुझी एक एक आठवण माझ्या डोळ्यातून ओघळत असते आणि मग जाणव

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच - इमानदार सत्यवादी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 11/06/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत त्यांच्या पुढ्यात बसलो होतो. अचानक स्वामीजींनी डोळे उघडले. क्षण ही न गमावता मी लगेच प्रश्न विचारला, स्वामीजी एक शंका आहे. आजकाल इंद्रप्रस्थि जे काही चालले आहे, ते बघून सत्यवादी इमानदार या शब्दांबाबत शंका उपस्थित झाली आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, इमानदार व्यक्ती हा सत्यवादी असतो, सत्यवादी हा इमानदार असतो. इमानदार सत्यवादी कधीच खोटे बोलत नाही. संभ्रमात पडलेल्या अज्ञानी मानवांना हे कळणे कठीणच आहे.

भूक

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 11/06/2015 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे ! तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं . डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो. त्या निमित्ताने देशात बर्‍याच ठिकाणी फिरलो . आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे ! मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं. एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा.

काशिद बिच आणि बिर्ला मंदिर

लेखक जगप्रवासी यांनी गुरुवार, 11/06/2015 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
या रविवारी अलिबागच्या फणसाड अभयारण्यात जायचं प्लान केला होता पण तो प्लान काही कारणाने रद्द करावा लागला. म म्हटलं आता निघायचं फिक्स केल आहे तर कुठेतरी फिरून येऊ म्हणून मग काशिद बिच ला जायचं फिक्स केल. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे घरातून बाहेर जाण्यासाठी तसा विरोधच होता पण रविवारी सकाळी वातावरण नीट असल्यामुळे मग ग्रीन सिग्नल मिळाला आणि सकाळी ७ वाजताच बाइकला किक मारून काशिद कडे प्रस्थान केलं. घरून निघताना काहीच खाल्ल नसल्यामुळे मग वडखळ नाक्याला थांबून वडा मिसळ हाणली, आणि त्या दुकानातली चहा इतकी आवडली कि दोन कप चहा घशाखाली कधी उतरली ते कळाल पण नाही.

६ जून - उत्साही नॉन-पुणेकरांचा कट्टा

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 11/06/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्यावेळी "रानमळा"ला झालेल्या कट्ट्याला वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या मिपाकरांना बोलवायला जमले नाही...यावेळी काळ्या दगडावरची रेघ असणार्या मध्यवर्ती ठिकाणी होणार्या कट्ट्यामुळे पुणेकरांची जळजळ होऊ नये या उदात्त हेतूने पुण्यातसुध्धा कट्टा होऊन जाउदे असे ठरवले...अनायसे पनीर शेखसुध्धा पुण्यात होते (कट्टेवालोंको कट्टे का सिर्फ बहाना चाहिये).

संपादक मंडळ

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 11/06/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही दिवसांपुर्वी संपादक मंडळाला विश्रांती दिली होती. आता संपादक मंडळ परत सक्रिय करतो आहे. या टप्यावर स्पंदना (अपर्णाताई) व लिमाऊजेट संपादन थांबवत आहेत याची नोंद घ्यावी. मिपावरील वातावरण योग्य ठेवण्यासाठी संपादकांना खास अधिकार दिले आहेत. संपादकांना लेखन अप्रकाशित करण्याचा व प्रतिक्रिया संपादित किंवा अप्रकाशित करण्याचे अधिकार आहेत.तुमचे लेखन ( साहित्य) अप्रकाशित केले असल्यास तुम्ही संपादक मंडळ या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवून चौकशी करू शकता. संपादक स्वतःहून स्पष्टीकरण देणे शक्य नाही. नवीन सदस्यांनी मिपाचे धोरन नक्की वाचावे.

बोलक्या जगातील... मुक्या कळ्या

लेखक अमृत यांनी गुरुवार, 11/06/2015 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर यापूर्वी लिहिलेल्या व या विषयाशी संबधीत असलेल्या प्रयास वरदान या लेखांवर खूप सकारात्मक व आपुलकिच्या प्रतिक्रीया आल्यात म्हणूनच या लेखाचे प्रयोजन.) आजच्या लोकमतला एक बातमी आहे '१५४२ अपंगांना आधार'. महाराष्ट्र शासनातर्फे अपंगांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य केले जाते त्यासंबंधीची ही बातमी. बातमीत सुरूवातीलाच लिहिलय की अपंगाना शासकीय नोकरीत ३% आरक्षण असूनसुद्धा जवळपास ४०% अनुशेष आहे. हा इतका मोठा अनुशेष असण्यामागचे कारण काय? याचा कधी विचार केला गेलाय का?

प्रेम करुन करुन दमावं

लेखक चिन्ट् यांनी गुरुवार, 11/06/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम करुन करुन दमावं असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही, आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही. प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे, समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय, त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय. आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत, तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत. आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे, लग्नानंतर येईलच की बायको, फिर यारो डरना कायको? ------------------- लेखन संपादित केले आहे