Skip to main content

अमरनाथ यात्रा - माहिती हवी आहे

लेखक गिरकी यांनी गुरुवार, 11/06/2015 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आई आणि बाबांच्या (वय ६० आणि ६५) मनात खूप वर्षे अमरनाथ यात्रा करायचे चालू होते. त्यांनी चार धाम यात्रा ३ वर्षांपूर्वी व्यवस्थित पार पाडली. पण अमरनाथला होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांमुळे आम्ही कायम नकारघंटाच वाजवायचो. शिवाय ते जाऊन आल्याच्या पुढच्याच वर्षी केदारनाथ दुर्घटना झाली. त्यामुळे अमरनाथचा विषयच काढायचा नाही असे बजावले होते. पण त्यांना जायची अतिशय इच्छा असल्याने त्यांनी परस्पर या सीझनची टूर बूक करून टाकली आहे. त्यासोबत वैष्णोदेवी, कत्रा, काश्मीर सुद्धा आहे. आता त्यांना कटकट करण्यापेक्षा त्यांची ट्रीप आरामदायी कशी होईल यासाठी प्रयत्न करणे आले.

जन्म घेतला तेव्हाच....!!

लेखक गोल्या यांनी गुरुवार, 11/06/2015 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म घेतला तेव्हाचं खोदून कबर आलो औपचार म्हणून आयुष्य घालवीत होतो आलो त्याच्या कडून जायचे त्याच्याच पाशी प्याला जीवनाचा घोट घोट संपवित होतो परत करावयाचा उसना देहाचा अंगरखा हा मिजाशीने त्याला म्हणुन वागवीत होतो पुरी होती करावयाची कहाणी जिंदगी ची आयुष्याची कोरी पाने मी जगुनी भरवीत होतो उभ्या आडव्या धाग्यातून निसटणार शिताफिने नाती स्नेहाची मी वृथा गुंतवित होतो होता सोडायचाच मंच दुनियेचा तोंड रंगुवुनी पात्र मात्र वठवित होतो!! ------------------------------------- धागा संपादित केला आहे.
काव्यरस

नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 10/06/2015 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम) वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप... टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे.

वाट

लेखक अनिल रामेश्वर लांडे यांनी बुधवार, 10/06/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा लागली जीवाला, ओढ तुला टिपण्याची, साक्ष देईल प्रेमाची, भाषा ओल्या पापण्यांची. नाही हा भाव मनाचा द्वेष जरी हा डोळ्यांत, वाट पाहतो दारात पुन्हा घेण्यास घरात . चुका विसरुनी साऱ्या दुखं ठेवील पोटांत , मिरवीन चार-चौघात गोड बोलुनी ओठांत. फक्त विचारीन काय होती चुक माझ्या मागण्यांची, शिक्षा दिली एवढी दिशा पांगण्यांची. केले केव्हाच माफ सख्या आता आहे तुझी पाळी, फक्त वाट त्या क्षणाची केव्हां चुकवशील हि उधारी. @अनिल …

देवलसीकर्मकांडिपणा : माझे विचार

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 10/06/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
अत्रुप्त यांच्या ह्या धाग्यावरील प्रतिसादांतून सुचलेलं पण बराच काळ मनात साचलेलं...
देवलसीकर्मकांडिपणा >> म्हणजे जगातील कुठल्याही प्रकारच्या अज्ञाताला शरण जाण्याची निसर्गदत्त मूलभूत प्रवृत्ति. धर्मात ती देवाप्रधान कर्मकांडात्मक असते,आणि अधर्मात निधर्मात कुठल्याही गोष्टी अथवा गृहितकांवरचि संपूर्ण शरणागत अंधनिष्ठा असते. दोन्हीकडे कर्मकांडां सारखं काहीतरी करून समाधान/फ़ायदा/फलप्राप्ति मिळवण्याचि प्रवृत्ति असते. तिलाच मी या शब्दसंहतित कोंडलं आहे.

सांधण दरीतील थरार

लेखक बज्जु यांनी बुधवार, 10/06/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी संध्याकाळी नाक्यावर बसलो असताना अचानक सांधण दरी चा विषय निघाला आणि जायच असेल तर आताच गेलं पाहिजे नंतर पाऊस लागला कि पुढच्या वर्षी शिवाय जायला जमणार नाही, दरीत काही ठिकाणी छातीभर पाणि असतं वगैरे वगैरे चर्चा झाल्या आणि उद्याच म्हणजे रविवारी पहाटे निघायचं ठरलं. एक दिवसात सामरद मार्गे पुर्ण सांधण दरी उतरून पुन्हा सामरदला येउन मग घरी एव्हढ सगळं करायचं तर पहाटे लवकर निघ्ण्याशिवाय पर्याय न्हवता. पहाटे ४.३० ला मी, सुजीत, गिरीष आणि भूषण, भूषणच्या गाडीतून निघालो, म्हणजे मोटारच्या यंत्राचा आवाज पहाटे ४.३० ला चालु झाला. ठाणे ते सामरद अंतर साधारण १७० कि.मी.

माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-२

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 10/06/2015 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ मागील भागात :- तेव्हा कळले की याच मरिन ड्राईव्हला जावुन तिथुन बोटीने शिपयार्ड, डचपॅलेस, पाहुन संध्याकाळी मुन्नारसाठी रवाना व्हायचे आहे. अशा रितीने पहिला दिवस पार पडला.>>>>> मग सकाळी ८.०० वाजता सर्वांना कालच्या मरिन ड्राईव्हवर घेवुन गेले. तिथे एक बोट उभी होती. माणशी काहीतरी रुपये १५०/- घेतले. त्या बोटीत वरच्या डेकवर एकंदर १०० खुर्च्या होत्या त्यावर स्थानापन्न झालो. आता आमच्या व्यतिरिक्त तिथे अजुन दुसरा तामिळनाडुचा एक मोठा २० लोकांचा ग्रुप होता. तर इतरही काही लोक होते.

गाणं बघणं 

लेखक शेखर काळे यांनी बुधवार, 10/06/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ज्येष्ठ मित्रांनी प्रश्न केला की गाणं प्रत्यक्ष ऐकतांना जास्त का भावतं, किंवा जास्तं भावावं का ? जर मी तेच गाणं तबकडीवर किंवा कुठल्या ध्वनिक्षेपकावरून ऐकलं आणि तेच गाणं प्रत्यक्ष गायकाला गाताना ऐकलं तर ते श्रोत्याला वेगळं आवडेल का ? प्रत्यक्ष गाण्याचा परिणाम अधिक चांगला का वाटतो ? गाणार्याला श्रोत्याला समोर बघून अधिक चांगले गायचा हुरूप येतो का ? की श्रोत्यालाच द्रुक-श्राव्य असे दोन्ही तर्हेने ते गाणी अधिक भावते ? केवळ स्वरांतून श्रवण-जादू निर्माण करायला फार कमी लोकांना जमते.

कोकण की विदर्भ?

लेखक सचिन७३८ यांनी बुधवार, 10/06/2015 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सुट्टया चालू असल्यामुळे मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखत आहे. १३ जून ते १९ जून या कालावाधीत. मग कोकणात जाणे योग्य ठरेल कि विदर्भात? कारण पावसाळा चालू आहे आणि दोन्ही ठिकाणाकडील सद्यस्थितीतील हवामानाची माहिती मला नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........