पानिपत
प्रिय अमोल,
काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.
कुणी जाल का
काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता.
काव्यरस
ओला...स्पेन!
ओला!....स्पेन....!
नेमेची येतो.....दर वार्षिप्रमाणे, मुलांच्या सुट्टीत कुठे जायचे यावर घरी चर्चा सुरू झाली. नुकताच झोया अख्तर चा ZNMD तिसर्यांदा बघितला होता त्यामुळे कुठे जायचं हे लगेच ठरल्या गेलं----स्पेन!
स्पेन... अर्ध्या जगावर अधिराज्य गाजविलेलं एकेकाळचं एक बलाढ्य साम्राज्य. क्रिस्टोफर कोलमबस सारख्या अनेक खलाशांनी नवे जग शोधायला प्रस्थान ठेवले ते इथूनच. फुटबॉल, बूलफाइटस, फ्लेमिन्को नृत्य आणि पाब्लो पिकासो तसेच जगप्रसिद्ध वाइन्स आणि ऑलिव्स चा हा देश.
चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग ३ अंतीम.
पूर्वीची हवा भाग २
या नंतरचे व्यक्तीमत्व हे सध्या पुण्यात स्थाईक असले तरी अस्सल बदलापुर येथील आहे.त्यांचे नाव जरी हूड असले तरी..
निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.त्यांचे नाव सूड असे आहे काय सू$$$$$ड उगाच चुकीची नावे वाचता आणि मला कामाला लावता.
ध.स.: अस्का, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून,
सूड साहेब तुम्हाला सांगतो ही पोरं फार चुकीचे लिहितात हो आणि मला त्याची बोलणी खावी लागतात.
सुंदरीचे ओझे
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले.
तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.
सत्य घटनेवर आधारित
कॉल सेंटर मधून एका मुलीने कॉल केला न झाली चालू बडबडायला .
ती : नमस्कार चमत्कार झाल्यावर, मी श्वेता बोलते .
मी : बोल की श्वेता. ( माजी लई जुनी मैत्रीण असल्यासारख मी पण हाणून दिलो )
ती : सर तुम्ही पाटील बोलत का
मी : होय.
ती : सर तुमचा रेचारज संपून १५ दिवस झाले अजून का रेचार्ज केला नाही अमुक तमुक आता रेचार्ज केला तर हे ऑफर आहे , १ वर्षा चा करा हे ते ……
मी : नाही ग नको कशाला … आजकाल मी tv पाहत नाही .
ती : का हो सर ?
सफर तामिळनाडुची! - भाग १
माझं न नवर्याचं एक तत्व आहे.. समजा पैसे असतीलच.. तर माणसानी दुनिया पहावी.. बावळट सारखं घराला डेकोरेटच करणं, इंटीरियरच करणं ह्या सारख्या क्षुद्र गोष्टींवर पैसे घालवु नयेत.. आता ह्या वाक्यातली मुदलातली "समजा पैसे असतीलच तर.." हीच अट पुर्ण होत नसल्याने आम्ही पुढच्या भागाकडे कधी वळलोच नाही..! पण तरी वर्षातुन एकदा "कुठे तरी जायला हवं राव" नावाचा किडा वळवळतो..आणि मग लोक कसं ऋण काढुन सण साजरा करतात.. तसं आम्ही ऋण काढुन भटकायला जातो..! तसंही पैसा नाही म्हणुन कुरकुरायचय.. असंही कुरकुरायचय..
डिस्कशन महत्वाचा
बरेच दिवस एक विचार डोक्यात होता ,खुप सार बोलायचे असत ,पण ऐकून घेईल असा समोरच कोणीतरी असाव लागत.
गूगल वर खुप सर्च केल,पण मराठी जनांशी चर्चा करण्यासाठी मिसळपाव सारखा कोणीच मिळाला नाही.
एक अजुन विचार होता डोक्यात,आजकालचा जमाना whatsapp चा आहे,तर एखादा whatsapp ग्रुप का नसावा,फ़क्त एखादया खास विषयापेक्षा जनरल गप्पासाठी.
काय बोलता ?
मिसळपाव