Skip to main content

अजुनी दूर किनारे

लेखक अर्व यांनी सोमवार, 25/05/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेत भाव काही संपलेत शब्द सारे संपला प्रवास केव्हाच अजुनी दूर किनारे जेथे मैफीली सुरांच्या होत्या कधी काळी सजली तिथे आता जखमांची मांदीयाळी भिजलेला श्रावणगंध वाहती अजूनी वारे ... संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे ... वाटेतल्या फुलांनो रोखा श्वास तुमचे विपरीत अर्थ आहेत तुमच्या स्पंदनांचे क्षण शेवटाचा उशाशी तरीही गंध का रे? संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे कवी :  निशांत तेंडोलकर ..
काव्यरस

चित्रकार पिंटू [बालकविता]

लेखक विदेश यांनी सोमवार, 25/05/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पिंटू चित्रकार छान चित्र काढताना पाठीची कमान .. जिराफाला असते गेंड्याची मान उंटाला दिसती हत्तीचे कान .. भूभूचे शेपूट सरळ असते हम्माचे शेपूट वाकडे दिसते .. मोरपिसारा कोंबड्याला असतो कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो .. झुरळ असते काढलेले हातभर मिशा त्याच्या फक्त चिमूटभर .. इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे सिंहाला नेमके पाय बगळ्याचे .. मुंगीचा डोळा वाघाला दिसतो घुबडाचा डोळा चिमणीला असतो .. चित्र रंगवताना डोलावतो मान म्हणतो स्वत:च "वा वा छान".. चित्रात भरताना विविध रंग स्वत:चे भरतो रंगाने अंग आमचा पिंटू चित्रकार छान मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. ! .
काव्यरस

एक वर्षानंतर . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/05/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ.

निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर

लेखक कहर यांनी सोमवार, 25/05/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
धन्यवाद आपल्या साऱ्यांच्या मदतीसाठी. आपल्या माहितीच्या आधारे पुरंदर मोहिम शनिवारी फत्ते झाली. किल्ल्याबद्दल म्हणाल तर - " निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर" याहून दुसरे शब्द सुचत नाही. रस्ता माहित नसल्याने आणि रस्ता चुकायची जुनी सवय असल्याने जरा लवकरच म्हणजे सकाळी ६.३० ला घरातून निघालो, दुचाकीवरून हडपसर-दिवे घाट-सासवड-पुरंदर (गाव) करत किल्ल्याच्या माचीपर्यंत पोचायला ८:३० झाले. उन्ह फारसे नसल्याने प्रवास मस्त झाला. किल्ल्यावर प्रवेश ९ वाजता होतो असे तिथे समजले (ओळखपत्र आणि दुचाकीवर हेल्मेट अनिवार्य ). मग तोपर्यंत तिथेच TP केल. शनिवार असून फारसे पर्यटक दिसले नाहित.

"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "

लेखक कैलास गायकवाड यांनी सोमवार, 25/05/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुक्त जाहलो आहे उन्मुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (धृ) ही स्थिती कोणती आहे कोणती अवस्था आहे अस्ताव्यस्तच असण्याची कोणती व्यवस्था आहे भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (1) मी स्पर्श कराया आलो की स्पर्श व्हावया आलो उत्कटता होता होता उत्कर्ष व्हावया आलो आरक्त जाहलो आहे आसक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (2) डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (3) --डॉ.कैलास गायकवाड

आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/05/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे. सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो. त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत. मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का? खर्च आपापला. कळावे, लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा. आपला, कट्टेकरी मुवि.

पोहू आनंदे.

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 25/05/2015 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवऱ्याने पार्टीचे आयोजन केले होते,एरवी आम्ही दोघातच साजरा करीत असू.नातेवाईक,मित्र मैत्रिणीफोनवरून ; आई ,पपा, भावंडे कधी भेटून कधी फोनवरून शुभेच्छा देत असत.तेव्हा आम्ही बांदऱ्याला रहात असू.कोरम फुल होता.मजा चालली होती.जावा, नणंद,वहिन्यांनी ओवाळले.केक कापला.पार्टी सुरु झाली. अचानक माझ्या मनात विचार आला.”पन्नास!

डॉ. उदय निरगुडकर यांची 'मन की बाते'

लेखक विशाखा पाटील यांनी सोमवार, 25/05/2015 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे आयोजित एका कार्यक्रमात डॉ. उदय निरगुडकर यांचे 'पत्रकारिता आणि व्यावसायिकता' या विषयावर भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी 'मन की बात' सांगणार आहे, हे स्पष्ट केलं. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, म्हणून ते इथे देतेय. १. वृत्तपत्रातल्या जाहिराती, पहिल्या पानावरच्या जाहिराती यावर आपण वाचक टीका करतो. डॉ. निरगुडकरांनी त्यामागची आर्थिक अडचण उलगडून सांगितली. अंक तयार करण्यासाठीचा खर्च आणि त्याची किंमत यातला फरक भरून काढण्यासाठी जाहिराती देणं भाग होतं. रुपयाची किंमत कमी झाली की आयात कराव्या लागणाऱ्या मालाचा खर्च वाढतो.

जर्मन वर्मन

लेखक मधुरा देशपांडे यांनी सोमवार, 25/05/2015 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये शशी गोडबोले इंग्रजीचे धडे घेत होती आणि साधारण त्याच काळात मी इकडे जर्मनचे. भारतात असताना थोडेफार शिकले असले तरीही ती थीअरी असते आणि पहिल्या १-२ कोर्सेस मधले अगदीच बेसिक होते. प्रत्यक्षात इथे आल्यानंतर खूप गोष्टी बदलतात, रोज एखादे नवीन संकट उभे राहते. कधी थोडेसे काही जमले तरी जग जिंकल्याचा आनंद होतो आणि कित्येक वेळा अगदी 'चुल्लूभर पानी में डूब मरू' अशी अवस्था होते. या सगळ्याला इथे शिकण्याची जोड मिळाली तरीही नवीन प्रश्नांचा, गमतीशीर घटनांचा प्रवास सुरु होतो आणि काही आठवणीत राहण्यासारखे किस्से घडू लागतात.

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ४ -सोरेंतो,काप्री-ब्लू ग्रोटो

लेखक अजया यांनी रविवार, 24/05/2015 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३ पॉम्पेहून परतताना सोरेंतो नावाच्या गावाला भेट आहे एव्हढाच पर्यटन संस्थेच्या माहितीपत्रकात उल्लेख होता.त्यामुळे,उगाचच प्रेक्षणिय स्थळांची नावं वाढवायला हे सोरेंतो टाकलंय असा माझा समज होता.पण बसने एक वळण घेतलं आणि अनपेक्षितपणे सोरेंतोचा देखणा देखावा समोर आला.मागे वेसुवियस पाठराखणीला.भुमध्य समुद्राचं निळंशार पाणी आणि समुद्रात घुसणारं बंदराचं टोक.जाताना लिंबाच्या आणि संत्र्याच्या मोठमो