Skip to main content

पाऊस म्हणजे?

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी सोमवार, 22/06/2015 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस म्हणजे? पाऊस म्हणजे उल्हास मनी दाटलेला, निसर्गाच्या सानिध्यात मन वेडा फुललेला। पाऊस म्हणजे चौफेरे दाटलेली हिरवळ, क्षणात दूर करते मनात आलेली मरगळ। पाऊस म्हणजे उत्साह शरीरात दाटलेला, रखडलेली कामे करण्यास बोनस वेळ मिळालेला। पाऊस म्हणजे उगाच सुट्टी मिळालेली, विसरून चिंता कामाची कुटूंबासोबत घालवलेली। पाऊस म्हणजे चिखलाचाच राडा सारा, उग्रट दर्प हवेत अन् वाटेभर कचरा पसारा । पाऊस म्हणजे नदिला आलेला पूर, घरात साचलेलं पाणी अन् मुलांच्या रक्षणाची हुरहुर। पाऊस म्हणजे फक्त पाऊसच आहे, जितके लिहावं त्यावर तितके कमीच आहे। पाऊस म्हणजे शब्दांची सरच बरसते, खोलवर मनात रूतलेली सहजच कविता खुलते। यल्

रानी

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 22/06/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नथं नाकातं खुलली लाली गालात फुलली कई होटातं ऊलली कोन्या जगातं भुलली खाली झुकली नजर कायं दिसलं गोजरं मले पाऊनं खरचं तूह्यं हासनं लाजरं तुले कोनाची कदरं डोई घेतला पदरं चालू नकोसं तर्तरं जीवं उळते वधरं पापन्याची फळंफळं पदराची सळंसळ कायं मनी गळंबळं सांग मले घळंघळं डूलं डुलतातं कानी मानं सुरई च्या वानी मोठ्या मोठ्या डोयातनी रूपं साकारलं रानी

गुजरात........७ - मोढेरा...सूर्यमंदीर...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 22/06/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात........७ - मोढेरा...सूर्यमंदीर... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मी आधीच कबूल केले आहे की प्रवासवर्णन (वाचकांना आवडू शकेल असे) लिहिणे फार अवघड आहे. पण परत परत मी तो प्रयत्न का करतो याला कारण आहेत उत्कृष्ट प्रवासवर्णने लिहिणारे मिपाकर. त्यांची प्रवासवर्णने वाचून मी परत परत चांगली प्रवासवर्णने लिहिण्याचा प्रयत्न करतो व परत परत तोंडघशी पडतो.

विस्मरणातील पांडुरंग

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 22/06/2015 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसं निसर्ग नियमानुसार जन्माला येतात, मात्र ती का जन्माला येतात किंवा जन्माला येणे हा काही त्यांचा गुन्हा असतो काय ? भविष्य काळात जे जीवन त्यांना जगावे लागणार आहे, त्याला ते कितपत जबाबदार असतात ? असा प्रश्न मानवी मनाला अनेक वेळा पडतो. कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र आमच्या मामाच्या घरात जन्मभर मानवी पाण्याचा पंप अर्थात पाणक्या बनून रहावे लागले. आम्ही सुट्टीत नृसिंहवाडीला गेलो, की पांडु हा आमच्या कुतुहलाचा विषय असायचा.

सखी तुझ्या अंतरात होतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 22/06/2015 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे कुणाच्या घरात होतो सखी तुझ्या अंतरात होतो दहाजणींतून देखणी तू तसाच मी शंभरात होतो जिथे तिथे गाय लंगडी अन सदैव मी वासरात होतो अता जमीनीवरी परंतु कधीतरी अंबरात होतो उन्हात मी जन्म काढला पण तुझ्यासवे एक रात होतो डॉ.सुनील अहिरराव ---------------- धागा संपादित केला आहे
काव्यरस

मध्य लटपटीत

लेखक ओंकारा यांनी रविवार, 21/06/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंडाला अस्मितेच्या कोंदणात बसवून राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 19 जून 1966 या दिवशी मुंबईत जन्मलेल्या शिवसेनेनं आता सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याच्यावरचा अन्याय या भोवती फिरणारी शिवसेना मराठी माणसांच्या मनात तर आहे. पण दुर्दैवानं ती त्या प्रमाणात राजकारणात दिसते का याचा विचार होणं आवश्यक आहे. एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे, शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे.

माझा पुणे सिटी बसमधील प्रवास

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 21/06/2015 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते. नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती. बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई.