का पाहूनही टाळत राहतेस...
का पाहूनही टाळत राहतेस,
काळीज माझे पिळत राहतेस…
असताना सोबतीस आठवणींचे मोती,
का आसवे शिंपल्यात गाळत राहतेस…
तोडून सारे बंध मनाचे,
का दुःख धाग्यातून माळत राहतेस…
पसरून भूतकाळाच्या तप्त निखार्यांना,
का स्वतःला जाळत राहतेस…
झाले गेले विसरून जावे,
का त्या क्षणांना उगाळत राहतेस…
करून मला दूर स्वतःपासून,
का स्वप्नातून माझ्या जवळ राहतेस…
आशिष
काव्यरस
मिसळपाव
२१ जून हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारा दिवस म्हणुन परिचित आहेच, आता या दिवसाला आणखी नवी ओळख मिळाली आहे. २७ सप्टेंबर, २०१४ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करतांना भारताचे पंतप्रधान श्री.