Skip to main content

'स्थितप्रज्ञ'

लेखक एस यांनी बुधवार, 02/09/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या दोरीला बांधत अजून एका शतकाची गाठ स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात अजून किती जगशील तू? तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी की काळाची? अन् मग संवेदना बधीर करत भिनेल ते विष हळूहळू सर्वांगात? जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या साक्ष देती कशा आजही कैक पावसाळ्यांच्या अन् तख्तपालटांच्या! त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण पेरते का रे आजही तेच विचार तुझ्याकडे कधीकधी वळणार्‍या नजरांमध्ये? की विझते आजही धुमसती संघर्षाची धुनी तुझ्या स्फूर्तीने? आलाय वाटतं जवळ तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट ते पहा, मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय कधीच ओसाड पडलेलं हे शहर येताहे
काव्यरस

अनाथांची माई - सिन्धुताई सपकाळ

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 01/09/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
सिन्धुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील 'पिंपरी मेघे या गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव अभिमान साठे, ते गुराखी होते. सिंन्धु नकोशी मुलगी, म्हणून घरात तिला सर्वजण चिंधी' या नावाने हाक मारीत. त्यांच्या वडीलांनी बायकोच्या विरोधाला न जुमानता सिन्धुला शाळेत पाठवले. पण आईचा विरोध, आर्थिक परस्थिती, घरची जबाबदारी, बालविवाह या कारणामुळे चौथी पास झाल्यावर सिन्धुला शाळा सोडावी लागली. सिन्धुताई 10 वर्षाची असताना त्यांचे लग्न ३० वर्षीच्या 'श्रीहरी सकपाळ'शी झाले. जेव्हा त्यांचे वय 20 वर्षाचे होते तेव्हा त्या 3 मुलांच्या आई झाल्या.

दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 01/09/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३ सैरभैर हात या हाताना काम हवे एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले.

किकलीच्या मध्ययुगीन परिसरात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 01/09/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
रेच दिवस चंदन वंदनच्या पायथ्याशी असलेल्या किकलीचे मध्ययुगीन मंदिर बघायला जायचे होते. तो योग अखेर आला आणि ८ ऑगस्टच्या शनिवारी मी, बुवा, गणेशा आणि किसनदेव असे पुण्याहून एकत्र निघालो. पुणे सातारा रस्त्यावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर आधी वाईचा सुरुर फाटा येतो. त्यानंतर लगेच ४/५ किलोमीटर अंतरावर हमरस्त्यावरच भुईंज गाव लागते. तिथून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. तर किकलीच्या गावच्या मागेच चंदन वंदन हे दोन्न बलदंड जोडकिल्ले उभे आहेत.

पावसाळी कट्टा - भाजे लेणी

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 01/09/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा दिवसांपुर्वी सुधांशु नूलकर यांनी कर्जत /लोणावळा पावसाळी कट्टा करण्याबद्दल विचारले होते आणि थोडीफार चर्चा होऊन मळवली स्टेशनपासून दीड-दोनेक किमीवरच्या भाजेलेणी ( लोणावळापासून अंदाजे बारा किमी )येथे येत्या रविवार दिनांक सहा (६) सप्टेंबरला कट्टा करण्याचे ठरले आहे.पक्के करायला उशीर झाल्याने धागा काढायला उशीर झाला याबद्दल कृपया समजून घ्यावे. सध्या मुंबईचे पाच आणि पुण्याकडूनचे प्रचेतस ( पुर्वीचे नाव वल्ली )धरून चारजण येत आहेत असे कळवले आहे. वेळ आणि आराखडा याप्रमाणे- पुण्याकडून येणारे लोणावळा लोकल पकडून मळवलीस येऊ शकतात पहिली ७.३०ला आणि नंतरची ९.११ ला येते.मुंबईकडून डेक्कन एक्सप्रेसने ( 11007

ती सकाळ आणि ती!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 01/09/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वारा कधी झाडांवरच्या पानांबरोबर तर कधी खाली निवांत पहुडलेल्या पाला-पाचोळ्यांबरोबर खेळत होता. धुकही आता आजूबाजूच्या परिसराला मिठीत घ्यायला लागल होत. बाहेर भिरभिरणारा वारा आता शिरीषच्या बेडरुमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आत शिरला व शिरीषच्या तोंडावर झुलणा-या चादरीच्या टोकाला धरून हलवू लागला.

एक अनुभव

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 01/09/2015 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात तसे भूताखेतांचे किस्से खूप ऐकवले जायचे. कधीतरी मलासुद्धा भूत पाहायला मिळाव हे अगदी मनापासून वाटायचं मला. अंधारात दुरून दिसणाऱ्या झाडाला हात लाऊन परत येण्याची पैज मी कित्येकदा जिंकली असेल. (खर सांगायचं तर जीवावर उदार होऊन आणि मनातली भीती लपवत करत असायचो मी हे सगळ), आजवर मी कुणाच्या अंगात भूत आलेलं पाहिलं नव्हत. आणि त्या दिवशी तो योग जमून आला. माझ्या शेजारच्याच घरी हळदीचा कार्यक्रम होता, माझी वर्गमैत्रीण हि त्याच घरात होती. त्यानिमित्ताने तिच्याशी बोलन होईल म्हणून तिथे गेलो होतो, अपेक्षेप्रमाणे ती एकटी बसलेली दिसली मला. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो..

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (१)

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 01/09/2015 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================== भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५ ================================================================ मॅनी माझा शेजारी, त्याचा एक दिवस टेक्स्ट मेसेज आला, "घरी केंव्हा येशील ते कळव, माझा दूरचा भाचा

सलामी

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 31/08/2015 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी, कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती, कसली तुझी ती आठवणींची नाती, मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती. नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला, ही एक माजुरडी सलामी होती. मी उदास होतो, हताश होतो, निष्प्रभ प्रांगणात , माझे दु:ख उगाळून घेतो. तुझ्या डोळ्यांतील चांदणे, मी टिपांत गाळून टाकतो. चाललेल्या या विषण्ण तपाला, ही एक टोचरी सलामी देतो. तुझ्या स्वप्नांचे शिंतोडे, घरादारात हुंदडत राहो. तुझ्या अल्लड रातींची पाखरे, आभाळभर उडत राहो. तुझ्या वैराग्याच्या खपल्या, रानोमाळी झरून जावो. येणाऱ्या आव्हानी तपांना, ही सलामी जिव्हारी जावो.
काव्यरस

दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 31/08/2015 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास ऊस तोडणी औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता.