'स्थितप्रज्ञ'
काळाच्या दोरीला बांधत
अजून एका शतकाची गाठ
स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा
पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात
अजून किती जगशील तू?
तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी
की काळाची?
अन् मग संवेदना बधीर करत
भिनेल ते विष हळूहळू
सर्वांगात?
जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या
साक्ष देती कशा आजही
कैक पावसाळ्यांच्या
अन् तख्तपालटांच्या!
त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण
पेरते का रे आजही तेच विचार
तुझ्याकडे कधीकधी वळणार्या
नजरांमध्ये?
की विझते आजही धुमसती
संघर्षाची धुनी
तुझ्या स्फूर्तीने?
आलाय वाटतं जवळ
तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट
ते पहा,
मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय
कधीच ओसाड पडलेलं हे शहर
येताहे
काव्यरस
मिसळपाव
एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले.
औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता.