मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्य

अभिषेक पांचाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं - अभिषेक पांचाळ

वाचने 759 वाचनखूण प्रतिक्रिया 1