लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि,
आदरणीय लोकमान्य,
खूप दिवस तुमच्याशी बोलावे असे मनात होते. सद्य परिस्तिथी तुम्हाला ठावूक असणे खरच निकडीचे आहे. तुमच्या सारख्या प्रज्ञावंत, दूरदृष्टी असणाऱ्या, खंबीर आणि लोकमान्यता असणाऱ्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही म्हणाल कि, मग तुमच्यात असा कुणी नाही का? असतील हि, पण कोशात गुरफटून बसले असतील, प्रत्येकलाच दुसऱ्यांनी कुणीतरी हि जबाबदारी घ्यावी असे वाटतय. असो. पण आता तुम्हाला आठवण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हीच सुरु केला न हो हा गणेशोत्सव. घरातला उत्सव, सार्वजनिक केल्याचे श्रेय तुम्हाला आहेच. पण दुर्दैवाने आज केवळ उत्सवच उरला आहे, तुम्हाला आम्ही विसरलोच आहोत.
लेखनविषय:
याद्या
2728
मिसळपाव