Skip to main content

वाङ्मय

आतां आमोद सुनांस जाले

Anand More यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके

अत्रे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या ओळखीच्या एका मुलाला नुकतेच दहावीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्याला बक्षीस म्हणून पुस्तक द्यायचा विचार करत आहे. कृपया १. करीयर मार्गदर्शन २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) या विषयांवरील वाचनीय पुस्तके (शक्यतो मराठी) सुचवा. धन्यवाद.

शैक्षणिक बाजारहाट

डॉ. सुधीर राजा… यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे आजचा जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी. पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं.

वाट पहात आहे.....

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

झुक आयी बदरिया सावन की

प्रसाद गोडबोले यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार

झुक आयी बदरिया सावन की

संध्याकाळचे साधारण पाच साडेपाच वाजले असावेत. पण आभाळ भरुन आल्याने कसं सारं अंधारलं होतं. पाऊस येणार अशी चांगलीच लक्षणे दिसत होती वार्‍यात अजुनही गरमीच होती, शिवाय धूळही, पण का कोणास ठाऊक ही पावसाची चाहुल ही एक भन्नाट गोष्ट आहे, सगळ्यांना कसे नकळत खेचुन आणते ते कळत नाही. ऑफीसच्या टॉप टेरेस ओपन क्यँन्टीन मध्ये नेहमीपेक्षा बरीच जास्त गर्दी होती. टेबलांवर नेहमी लावलेल्या छत्र्या मात्र आज काढुन ठेवल्या होत्या त्यामुळे कसे चारही बाजुंना अगदी क्षितीजापर्यंत नजर जात होती.

पळता येणार नाही राजकारणापासून दूर

डॉ. सुधीर राजा… यांनी या दिवशी प्रकाशित केले.

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!

डॉ. सुधीर राजा… यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे मला एका संपादक मित्राने विचारलं, ‘लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ मी पटकन दिलेल्या ‘नाही’ उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘का?’ ‘कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी.

समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप यांनी या दिवशी प्रकाशित केले.
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल