एक होतं आटपाट नगर. त्यात होता एक शिंपी. त्यानं नुकताच बापाचा व्यवसाय सांभाळला होता.आणी हळुहळु शिंपी काम सुरु केलं होतं.
जीवन त्याचं कसं छान चाललं होतं. नवनवीन,वेगवेगळे कपडे तो शिवत होता. आणि चरितार्थही व्यवस्थित चालत होता.
पण एवढ्यात झालं काय की त्याला टोचली एक सुइ. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ.
झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन.
पण सुइ म्हणली "मी तर पडले सरळ-सोट्.बोलुन चालुन एक सरळ्-टोकदार सुइ. मी कशाला जाउ वाकड्यात?
तुम्ही शिवता तिथं पोचणं, टाके मारणं इतकच तर माझं काम."
पण शिंपी काही ऐकेना. त्यानं ठरवलं "देउ हिला हाकलुन.