Skip to main content

समाज

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 25/03/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो. माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न!

भेळ..... तर फक्त निमित्त आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 21/03/2021 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा, अस्मितेसाठीच काढला आहे...धागा अराजकीय आहे... मराठी भाषा, हवी तशी वळवता येत असल्याने आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असल्याने, खूप गहनविचार न करणेच उत्तम... खूप दिवसांनी, ठाण्याला, बहिणीकडे भाऊबीजेसाठी, सगळी भावंडे जमलो होतो. मामलतदाराची मिसळ, सकाळीच खाल्ली होती. तशी मला ही मिसळ अजिबात आवडत नाही. म्हणजे, आधी आवडत होती पण, सध्या घरीच, खिमामिसळ बनवत असल्याने, आता ही शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही. एकदा प्रयोग म्हणून, कोळंबीमिसळ पण बनवून बघीतली, पण, खिमामिसळ ती खिमामिसळच... आता संध्याकाळी काय खायचे?

दातही होते, दाणेही होते...

लेखक आजी यांनी मंगळवार, 09/03/2021 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी रेडियोवर नोकरी करत असतानाची गोष्ट. मी माॅर्निंग ड्यूटी करत होते. मी पहाटे चार वाजता उठले. माझं आवरलं. सासूबाईंना बाय करुन आणि झोपलेल्या मुलाचं पांघरूण नीट करुन, पावणेपाचला मी माझी कायनेटिक सुरू केली. अर्ध्या रस्त्यात आले आणि लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. परत जाणं शक्य नव्हतं. साडेपाचला ट्रान्समिशन ओपन होणार होतं. त्याआधी मटेरियल चेक करायचं होतं. मी कायनेटिक चा स्पीड वाढवला आणि ऑफिसला पोहोचले. कामाला सुरुवात केली. फक्त एक कप चहा पिऊन मी घरातून निघालेली होते. खूप काम होतं. सकाळी नऊ वाजता कोपऱ्यावरच्या चहावाल्याकडून चहा आणि वडापाव मागवला. प्यून सांगत आला चहा तयार होता.

महिलादिन

लेखक nanaba यांनी सोमवार, 08/03/2021 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ती आपली भाकरी स्वतः कमवेल. (ते करत नसतानाही ती त्या भाकरीच्या किमतीहून अधिक कष्ट घरात घेत असते ह्याची जाणीव तिला असेल.) ती साडी नेसेल वा मिनी स्कर्ट घालेल. ती लग्न करेल वा करणारही नाही. तीला मुलं नको असतील किंवा कदाचित तिला लग्न नको असेल - पण मुले हवी असतील - तो तिचा निसर्गदत्त अधिकार आहे असेही तिला वाटत असेल. ती डे सेलिब्रेट करेल वा न करेल. ती दागिने घालेल वा तिला त्यांचा तिटकारा वाटेल. ती सणांसाठी पाळी पुढे ढकलणे नाकारेल.. तिला देवाधर्माची खूप आवड असेल आणि त्यापुढे संसार तुच्छ वाटत असेल किंवा कदाचित तिचा देवावर विश्वास नसेलही... तिला कदाचित घरकामाची तितकीच आवड असेल जितकी तुम्हाला..

मातीतली माणसं

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 06/03/2021 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटते सोशल मीडिया म्हणजे समुद्र , खुप काही चांगल्या वाईट गोष्टींचा खजिना,आणी बरेच काही.आसेच एक दिवस कोणीतरी मारवाडी मीत्राने मारवाडी समाजाचे सुंदर विवेचन शेअर केले. मला नाही माहीत की तो मारवाडला कधी गेला होता का नाही पण मी त्या भागात खुप फिरलो आहे. जोधपुर मधे बराच काळ होतो. त्यावेळची परिस्थिती आणी आताचे जोधपूर फारच अंतर आहे. नोकरी बरोबरच संध्याकाळी काँलेजात शिक्षण घेत असल्या मुळे बरेच मारवाडी मीत्र, मैत्रीणी. लग्न समारंभ, सणवार किवा असाच पारीवारीक संबध आला व त्यातुनच काही गोष्टी लक्षात आल्या. नोकरी मुळे सिकर, बारमेर, पोखरण, रामदेवरा, लूणी, मारवाड या भागात पण भरपूर फिरणे झाले.

विस्मरणात गेलेला कारागीर - लोहार

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
मीत्रानों एकदा राजस्थान मधे ट्रेनिंग मधे असताना सीमावर्ती भागात गाडी घेऊन दुसर्‍या डिटँचमेन्टला भेट द्यायला चाललो होतो. गाडी मीच चालवत असताना अचानक जोरात खडखडाट झाला व गाडीचा दरवाजा दुर फेकला गेला. तसाच दरवाजा गाडीत टाकला आणी पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक छोटीशी वस्ती दिसली, म्हटलं बघाव काही मदत मीळतीय का? दोन तीन बैलगाड्या, मोकळे आजुबाजुला नसलेले गवत चरत आसलेले बैल, चार सहा वेगवेगळ्या वयाची पोर. रस्त्याचे कडेला काही पुरूष लोखंडी शेतीची आवजार बनवत होते तर बायका तात्पुरती बनवलेल्या चुलीवर जेवण बनवत होत्या.

विस्मरणात गेलेले कारागीर

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 03/03/2021 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण???? हरवलं त्यात ते सुंदर बालपण....... हा लेख आयुष्यातील विसाव्याच्या क्षणी जुना काळ आठवत मित्र आणी नातवंडां बरोबर वाटण्याचा प्रयत्न आहे.पुन्हा एकदा ते सोनेरी निरागस बालपण आठवणीत जगण्याचा प्रयत्न आहे. आजच्या जाती पाती वरुन होणार्‍या राजकारणाच व सामाजिक उद्रेकाचा याच्याशी या लेखाचा बादरायण संबध जोडू नये. इथे कोणालाही दुखावणे अथवा अपमानीत करण्याचा उद्देश नाही. हल्ली कुणी कुणाची जात काढायची नाही, जातीला उद्देशून काही बोलायचं नाही.

बुरुड

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 03/03/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात अठरा पगड जातीं. एकमेकांना पूरक आणी गावगाड्याचे महत्त्वाचे घटक. एकोपा हा गावाचा कणा तर एकमेकांन बद्दल असणारे प्रेम, आदर आणी आस्था हा आत्मा. तुम्हाला सांगतो हे आज जर कुणी वाचले तर म्हणेल काय फेकता राव! पुढे वाचा म्हणजे कळेल. तुम्हाला माहितीच आहे की हिन्दू संस्कृती प्रमाणे अंतेष्टी हा सोळा संस्कारां पैकी एक आणी त्यातील मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म हा त्यातला एक भाग.   लहानपणी गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर बातमी वार्‍यासारखी पसरायची. शेजारी पाजारी व नातेवाईकां बरोबर गावातील काही ठराविक मुले माणसं जरुर हजर आसायची.

करोनाची लस : एक थोतांड

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 01/03/2021 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.