मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं म्हणतात. एखादं सुख कधी लाभतं, कधी लाभत नाही. एखादं सुख लाभल्यानंतर ते सुख वाटत नाही. एखादं वाटलं तरीही ते क्षणभंगुर निघतं. एखाद्या सुखाचं रुपांतर नंतर दुःखात होतं. सुखाच्या अनेक प्रकारांचे आपलेच अनंत रंग आहेत. कधी कधी परिस्थिती इतकी विषण्ण करणारी होते की शेवटी आपण स्वतःवरच हसतो. ते देखील एक वेगळ्याच प्रकारचं सुखच आहे. साधारणपणे आंबा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि तो खावासा वाटतो. परंतु त्याच क्षणी बरेच आंबे नासके असतात, बेचव असतात, उतरलेले असतात, किडे लागलेले असतात, तसंच काहीसं सुखांचं देखील आहे.
सुखाचा शोध तसा सामान्यतः सुखकर नसतो.
- डॉ. सुधीर रा. देवरे
आपल्यातल्याच काही विभूती दैनंदिन स्तुत्य कृतीतून विकास पावत इतिहासात लोकदेव झाले. कृतीतून त्यांनी लोकांना त्यांच्यातला देवत्वाचा दृष्टांत दिला. परोपकार देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आयुष्यातील कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येतं. कृतीतून देवमाणूस होत जाणं साधी सोपी गोष्ट नाही. आपण अशा देवमाणसांचा आदर्श न घेता मंदिरं बांधून दानपेट्या ठेवत कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरु करतो.
माणसाला एकुलतं एक आयुष्य मिळतं. त्यातलं निम्म्याधिक आयुष्य झोपेत निघून जातं. बालपणातलं आयुष्यही बेरजेत नसतं. उरलेल्या आयुष्यात माणूस कष्ट करत दोन वेळचं जेवण कमवतो.
प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ
आपली संयमी फलंदाजी
तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर
गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ
सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी
सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी
त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती
कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती
देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग
तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग
ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी
एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी
भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले
हीच ती शोएब अख्तर जिच्या शोधास मन आसुसले
काय तिची ती अदा वर्णावी, बॉल टाकते गदागदा
सेहवाग
मी बिचारा एक म्हातारा
ती गेली देवाघरी
आज बैसलों हसत एकटा
या हास्यकट्ट्यावरी
माती सरत चालली होती
तरी जीव थकला नव्हता
आजही थरथरत्या हातांना
ओला स्पर्श हवा होता
रोज यायची नटून थटुनी
दिसायलाही होती बरी
म्हाताऱ्याला हात पुरे तो
कशाला हवी आता परी
मी देखील नित्यनेमाने
दात काढुनी हसायचो
तिला हसताना बघून मात्र
गुलाबी स्वप्नं बघायचो
कधी कुलू तर कधी मनाली
बेत ठरायचे मनात
हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या
सर्व बेत गेले मसनात
==========================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
अभ्यास केला पण भोकात गेला
शिकून काय झाले
मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही
ओझे तसेच राहिले
लहानपणी मी खिडकीतून
मुले खेळताना बघितली
हाती पुस्तक धरूनही
वीतभर फाटत राहिली
साहेब साहेब करूनहि माझे
कल्याण नाही झाले
पुस्तक माथी मारूनही
माझे बालपण हरवले
आज छकुला निरागसपणे
अहोरात्र खेळत राहतो
मी मात्र इथं कामावरती
दिवसभर चोळत राहतो
चोळण्यासाठी जन्म नव्हे हा
हे कळतेय मजला आज
स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी
अंगी असावा लागतो माज
=============================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?"
ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत.
कटाक्ष-
नेटफ्लिक्स
माहितीपर
सहा भागांची लघू-मालिका.
एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे
भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग)
ओळख-
नेटफ्लिक्स ची 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रजनीश तथा ओशो च्या कारकीर्दीवर आधारित एक सत्यकथा आहे. पुण्यातील रजनीश आश्रम सोडून अमेरिकेतील ओरेगोन राज्यात जवळपास 80 हजार एकर जमीन खरेदी करून तेथे उभारलेल्या अत्याधुनिक 'रजनीशपुरम' या शहराभोवती ही मालिका फिरते.
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? असा प्रश्न कुणाच्या मनात कधी आला असेल का? माहीत नाही. पण माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही.
हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?
५ दिवसाआधी आजी ( आई ची आई एक्स पायर झाली ,गावाकडे ,
तिचा मुलगा ,माझा मामा ३ वर्ष आधीच गेला
तिचा माझ्यावर जीव होता ,त्यामुळे मला दहावा व तेरावा करायचा आहे
पण मी हैदराबाद मध्ये अडकलो आहे
कोणी मदत करू शकेल ?
संपादक मंडळ यांशी ,हा धागा प्रशोंत्तरे सदरात टाकायला पाहिजे पण गाम्भीर्य आणि लगो लगता म्हणून येथ टाकत आहे
समजून घ्यावे
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.
मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य.