Skip to main content

समाज

हैलो, ह्यलो.....

गुरुवार, 10/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
१. "हैलो, रामराम ,काय चाललय?" "रामराम, काय नाय बरायं की" "जेवन झालं का?" "न्हाय अजुन, सैपाक हुतुय" "कदी आला कामावरनं?" "हि काय आत्ताच यीवुन बसलुयं" "काय म्हणतयं पौसपाणी" "चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?" "न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं" "व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत." "कसला यीतुयन काय....

पण लक्षात कोण घेतो ??

गुरुवार, 10/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला पण नेहमीप्रमाणे घुश्शातच होता …. तोंडाने नेहमीची बडबड चालली होती, हातवारे चालले होते …. आमचं भेटायचं ठरतं नेहमी… मी वेळेवर पोचतो पण ह्याचा उशीर कायम ठरलेला…कारण ह्याचे समाजकार्य ! त्याला काहीच वेळ काळ नसतो…सदानकदा कुठेतरी वाहिलेलाच…. जिथे कुठे काही चुकीचं चाललं असेल तिथे हा बरोब्बर पोचतो …. मला नेहमी कुतूहल वाटतं ह्याचं पण त्यावर त्याचं ठरलेलं उत्तर …"अरे, सध्या वेळच अशी आहे की कुठेतरी काहीतरी चाललेलं असतंच… इतरांनी झापडं लावून घेतली आहेत , फक्त माझे डोळे उघडे असतात !" अरे पण तू कशाला तुझा जीव धोक्यात घालतोस नाहक ?? आपण बरं आणि आपलं काम बरं….

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

लेखक सोत्रि
गुरुवार, 10/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee "आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत. “अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात. “अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे. "बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे. "अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा

या पाच गोष्टी कायम कराव्यात

मंगळवार, 08/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

या पाच गोष्टी कोणालाही सांगू नयेत

रविवार, 06/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील. 2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील. 3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील. 5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.

कास्टीझम

लेखक कोमल
रविवार, 06/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी कॅफेटेरिया मधल्या सगळ्यांचे डोळे टीवी कडे होते. पटेल रॅली मुळे पेटलेला गुजरात सगळे भेदरलेल्या नजरेने पाहत होते. "का चालू झालंय हे सगळ पण?" तिने त्यांच्या टेबल वर विषय सुरु केला. "अरे पटेल कास्ट साठी आरक्षण पाहिजे म्हणे. तो म्हणतोय कि त्यांना द्या किंवा कोणालाच नको" त्याने माहिती पुरवली. "आणि त्याच्या साठी संपूर्ण गुजरातेत जाळपोळ सुरु झालीये" QA वाला म्हणाला. "कोणाचं काय जातंय तोडफोड केली आणि जाळपोळ केली तरी. भुर्दंड सरकारी तिजोरीला पडणारे आणि पर्यायाने आमच्या खिशाला. बर आठवलं टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे. आत्ता जाऊन करतो." TL उठला पाठोपाठ टीम पण उठली.

सच्चे वरण

रविवार, 06/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

दूध पोळलं

शनिवार, 05/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
दूध पोळलं श्रीकृष्णाने फार पूर्वीच गोकुळ सोडले होते. तो आता द्वारकानाथ झाला होता. त्या अवधीत तो एकदाही गोकुळात फिरकला नव्हता. राधेला मात्र त्याचा विसर पडला नव्हता. बऱ्याच वर्षांनी ती मनाचा हिय्या करून कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेस निघाली. तिने एकटीने प्रवास केला. किती केला, कसा केला! तिचा तिलाच माहित...... केवळ कृष्णाला पाहण्यासाठी, त्याला एकवार भेटण्यासाठी! साधीभोळी राधा, कृष्णाच्या श्रीमंत महालात पोहचली. तिथले वैभव पाहून, बिचारी भांबावली. जराशी गोंधळली. तिने निरोप पाठवला, तशी कृष्णाच्या राणीवशात ‘हीच का ती !’ च्या अनेक भिवया वर झाल्या.

अचंबीत करणारे तरीही सुखद.

लेखक नाखु
शनिवार, 05/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हाणामारी-राजकीय गदारोळाच्या वाहिन्या पाह्ण्यापेक्षा दूर्दर्शन सह्याद्रीच्या बातम्या पाहणे जास्त चांगले आणि हितावह वाटते. अगदी सरकारी वाहिनी असूनही पुरस्कृत केल्यासार्ख्या आक्रस्ताळी, व मिपा भाषा परीकोषानुसार पालीचा डायनासोर करीत नाहीत. मोजके आणि नेमके. अशातच काल रात्री साडे नऊच्या बातम्यात एक सुखद आणि आश्चर्य्जनक बातमी पाहिली आणि अवाक झालो.(टीप ज्यांना अगोदरपासून माहीत असेल त्यांनी माफ करावे) कारण नुकतेच मिपावर मांझी चित्रपटाचे परीक्षण समीक्षण वाचले गेले.

द लास्ट पोस्ट

शनिवार, 05/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी रायफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा वीरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर.पी.जी. अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुवा, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते.