मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नकटीच्या लग्नाला...

आपला अभिजित ·
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

सौरभ वैशंपायन ·

विकास 27/08/2008 - 20:24
चांगले विचार. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. भारताला महासत्ता बनवण्यासाठी वरील आणि अजून अनेक गोष्टींची गरज आहे. तसेच त्यावरून सावरकरांच्या शिवाजीला उद्देशून म्हणलेल्या (लताने गायलेल्या) ओळी आठवल्या, ज्यात ते "आम्हाला" म्हणजे "जनसामान्यांना" काय दे हे सांगतात... हे गूण फक्त शिवाजीतले त्यांनी दाखवलेत कारण ते एकत्रीत त्या व्यक्तिमत्वात दिसतात जे (व्यक्तिमत्व) तमाम मराठी माणसाला आपले वाटते. इतर अनेक नेतृत्वात (ऐतिहासिक विशेषकरून) ते दिसू शकतील..
जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे ती बुद्धी भाबड्या जीवा लाहू दे ती शक्ती शोणितामाजी वाहू दे दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुजज्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:59
मात्र "थोडक्यात या चौघांना 'आचरल्यास' भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे" हे वाक्य कळले नाही. या चौघांना आचरायचे म्हणजे काय करायचे याचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. आपला, (आचरट) आजानुकर्ण

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:48
अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते
बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. आपला, (हिंदू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 21:42
ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. बहुतांशी सहमत आणि योग्य मुद्दा! :-) काही मला वाटणारे फरक - (या चर्चेत कदाचीत गौण मुद्दा) हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. मोहेंजेदडो आणि हडप्पा ह्या संस्कृती होत्या म्हणण्या पेक्षा नागरी व्यवस्था होत्या ज्यांचे कौतूक आजही संस्कृतीपेक्षा नगररचना शास्त्रापुरते मर्यादीत होते. पण त्या विस्तृत प्रमाणावात हिंदू संस्कृतीच्याच भाग होत्या जी आपण म्हणल्याप्रमाणे र्‍हास झालेली नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 21:48
हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. बरोबर. आणि भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? आपला, (हिंदुत्त्ववादी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 22:12
भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? सिव्हीलिझेशनचा भाग म्हणून हिंदू म्हणता येतील. पण धर्म म्हणून त्यांचा धर्म वेगळाच आहे आणि तसे असण्यात काही गैर नाही. दुर्दैवाने "हिंदू" हा शब्द धर्माला चिकटला असल्याने आणि ते पण भारतात विशेषकरून त्यातून गैरअर्थ निघतात. अवांतरः मधे कधीतरी मी या संदर्भात लिहीले होते, पण गेल्या वर्षी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात, वातावरण बदलावरून असलेल्या कार्यक्रमात गेलो होतो. तेंव्हा पाण्यावरून एक परीसंवाद होता. त्यात एक युरोपमधील उच्च अधिकारी स्त्री विकसनशील देशातील पाण्यावरून बोलत होती. त्यात तिने भारतातील व्यक्तींचा उल्लेख हा "हिंदू" म्हणून केला "इंडीयन" म्हणून नाही. कारण अनेक शतके ते तसेच ऐकतात. थोडक्यात हा त्यांच्यासाठी भौगोलीक शब्द आहे. अतिअवांतर: अमेरिकेतील नेटीव्हांना ज्यांना भारतात आपण "रेड इंडीयन" म्हणतो त्यांना बर्‍याचदा येथे फक्त, "इंडीयन" म्हणतात. कारण जेंव्हा येथे युरोपातून लोकं आली तेंव्हा त्यांना हीच "इंडीया" वाटली होती आणि म्हणून ते "इंडीयन्स". अर्थात मी पहील्यांदा ते जेंव्हा ऐकले तेंव्हा "ऑफेन्सिव्ह" वाटले. नंतर समजले... तेंव्हा शब्दांचे अर्थ जरी भौगोलीक आणि राजकीय सीमांनी ठरतात तसेच धर्माधारीत पण जर असले तर तसे शब्द सार्वजनीक करण्याचे टाळावे. थोडक्यात संस्कृतिचा भाग असले तरी, "ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध " यांना हट्टाने हिंदू म्हणावे असे मला वाटत नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:33
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो आणि रस्त्यांवर गारूडी साप घेऊन फिरतात असा विचार करतात, असे 'इथे'च वाचले आहे. त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे कारण नाही! आपला, (देशी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य 28/08/2008 - 17:14
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो .... कधीतरी कोणीतरी अशा तर्‍हेचे अजूनही बोलतो हे खरे आहे. पण अलिकडे हे अज्ञानमूलक नसून थोडेसे खोडसाळपणाकडे असते. मला कोणी असे म्हणाल्यास माझे उत्तर तयार असते - हो आमच्याकडे तीन हत्ती आहेत. नुसता हत्ती ठेवणे बरं नाही, हत्तीणही पाळावी लागते ना. घरामागच्या तळ्यात दिवसरात्र डुंबत असतात. मस्त मजा येते. ही उपरोक्त प्रतिक्रिया वगळता अन्य कोणतीही प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली नाही. असो.... (महाभारतीय) एकलव्य

प्रियाली 27/08/2008 - 21:06
वर आलेले मुद्दे पुन्हा उगाळत नाही परंतु,
चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि
सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)

ऋषिकेश 27/08/2008 - 22:21
लेख आवडला. किंचीत शब्दबंबाळ वाटला. असो, या चार जणांचं महत्व वादातीत आहेच पण
ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा
हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत 27/08/2008 - 23:24
लेख छान झालाय. या चौघांपैकी आद्य शंकराचार्यांबद्दल जास्त माहिती नाही. मात्र त्या सर्वांचं काम मोठंच आहे. नीलकांत

प्रियाली 27/08/2008 - 23:34
रामदास का तुकाराम?
चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का?
शिवाजी महाराज रामदासांना उमेदीच्या काळात भेटल्याचे आठवत नाही. जेव्हा भेटले तेव्हा आधीच प्रस्थापित होते त्यामु़ळे वरील प्रश्न इथे लागू होत नाही असे वाटते. तुकारामांशी त्यांची भेट त्यामानाने लवकर झाली असावी असे वाटते.

In reply to by प्रियाली

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:37
शिवाजीराजे उमेदीच्या काळात तुकारामांनाही भेटले नाहीत आणि रामदासांनाही भेटले नाहीत. याबाबत रामदास आणि तुकाराम यांचे काही आक्षेप नसतील. मात्र असे म्हटले की रामदास आणि तुकारामांची ब्र्यांड अँबेसिडरशिप करणार्‍यांना ते कमीपणाचे वाटते. (शिवाय जातीयवादी असे लेबलही लागते) त्यामुळे हा मुद्दा काढला नाही. 'सोने आणि धन आम्हा मृत्तिकासमान' या तुकारामांच्या अभंगाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. मात्र त्याबाबत पुन्हा कधीतरी. आपला, (क्रमशः) आजानुकर्ण

दोयल 28/08/2008 - 02:25
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे.

In reply to by दोयल

विकास 28/08/2008 - 02:30
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे. मात्र असली प्रतिक्रीया नस्ता फाटा फोडत आहे असे वाटत नाही का? एखादा लेख वगैरे लिहील्यावर जर त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया आल्यातर त्याचे दोन अर्थ होतात - एक म्हणजे लोकांनी वाचले. दुसरे म्हणजे त्यांना काय वाटते ते सांगितले आणि त्यावर चर्चा सुरू झाली...थोडक्यात फाटा फोडला वगैरे काही वाटत नाही.

In reply to by विकास

प्रियाली 28/08/2008 - 03:05
जर ताबडतोब प्रतिक्रिया येणार्‍या संकेतस्थळावर लेख टाकला तर त्यातील त्रुटी दाखवणे, शंका विचारणे, वेगळे मत मांडणे इ. लोक करणारच तेव्हा उगीच असले विषयाशी संबंधीत नसणारे प्रतिसाद देऊन नस्ते फाटे फोडण्याची गरज नाही.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:40
विकास आणि प्रियालीशी सहमत आहे... सदर लेखात मला कोणतेही विषयांतर जाणवत नाही आणि फाटे फोडले गेले आहेत असे वाटत नाही.... तात्या.

राघव 28/08/2008 - 12:27
सुंदर लेख. चौघे कोण अन् चौघेच का याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण असे म्हणता येईल की या चौघांमुळे एक राष्ट्र म्हणून खूप बदल घडला. चाणक्यांनी राजनीतीचा पाया परत मजबूत केला. शंकराचार्यांनी धर्म, रूढी, रीतीरीवाज याबद्दल असणार्‍या मानसिकतेत काळानुरूप योग्य बदल घडवून आणला. शिवरायांनी तर धर्मरक्षण केलेय, नाही तर काय झाले असते ती कल्पना पण करवत नाही. विवेकानंदांनी सगळ्यांना भारताची ओळख करून दिली अन् राष्ट्रभिमान जागृत केला जे अत्यंत महत्वाचे होते त्याकाळच्या परिस्थितीत; किंबहुना आजही आहे. या सर्वात चाणाक्यांचे स्थान इतर तिघांच्या मानाने थोडे कमी वाटू शकेल पण त्यांनी सांगितलेल्या नीतीच्या विस्मराणामुळेच नंतर पृथ्वीराज चौहान सारखा नेता हकनाक हारला अन् परकियांच्या घनघोर आक्रमणांना वाटा फुटल्या. इतका छान लेख लिहील्याबद्दल पुन्हा अभिनंदन. मुमुक्षू

"बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. " "हिंदु धर्मावर" आणि "वैदिक संस्कृतीवर" अनेक धार्मिक, सामाजिक, राजकिय आक्रमणे झाली याबाबत कुणाचे दुमत नसावे. तुमच्या वरील वाक्यातील आक्षेप नीट लक्षात घेता मी हिंदु आणि वैदिक असे दोन भाग केले आहेत. मात्र दोन्हि गोष्टि एकमेकांपासुन फारश्या वेगळ्या नाहित. ख्रिश्चन, मुस्लिम, बौध्द, जैन हे मु़ख्यत्वे धर्म आहेत यांना संस्कृती कितपत म्हणता येईल हा वेगळा विषय आहे असं मला वाटतं. त्यातुन ख्रिश्चन, मुस्लिम ह्यांनी त्यांचा धर्म तलवारीच्या जोरावर पसरवला आहे हे सत्य आहे त्यामुळे त्यांना संस्कृती म्हणावं का? आणि बौध्द-जैन तत्वांबाबत म्हणाल तर ती हिंदु धर्माचीच नवी रुपे आहेत. एक उदाहरण घ्यायचे झाले तर यज्ञ हि वैदिक संस्कृती आहे जी ग्रीकांची देखिल होती ते सुध्दा यज्ञ करीत. पण आज तिथे ख्रिश्चन धर्म पसरला आहे, रोमन संस्कृती हि आज फक्त अवषेशांच्या रुपाने उभी आहे. पारसिक संस्क्रुती झोपवणारे ग्रीक कालांतराने स्वतः कालाच्या उदरात गडप झाले. मात्र वैदिक संस्कृती व हिंदु धर्म दोन्हि आजहि तग धरुन उभे आहेत. सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं. आदि शंकराचार्यांनी बुध्द धर्माने मिळमिळित केलेला भारत पुन्हा नव्या ताकदिने उभा केला. गुप्त साम्राज्य हा भारताचा सुवर्णकाल समजला जातो त्यावेळि अगदि कंबोडिआ पर्यंत आपले राज्य पसरले होते. नंतर खुळचट कल्पनांनी भारताचे नुकसान केले. मात्र फक्त एकाच भूमीत आपले पाय रोवुन देखिल हिंदु धर्माचा अथवा वैदिक संस्क्रुतीचा नाश झाला नाहि. तेच इतर साम्राज्यांचा व संस्कृतींचा विनाश झाला हे मला ठळक पणे दाखवुन द्यायचय.

धन्यवाद! हेच चौघे का? याचे उत्तर तुम्हि दिलेत याचा मला आनंद होतोय! या चौघांचा काल बघता त्या काळी त्यांच्या सारखेच काम करणारा दुसरा झाला नाहि. एकछत्री भारतीय साम्राज्य हे स्वप्न प्रथमतः चाणक्यांनी बघितल. म्हणुन खर तर राष्ट्रपिता एकच आर्य चाणक्य. जे राष्ट्र घडवतात तेच राष्ट्रपिता म्हणावले जाऊ शकतात. बुध्द धर्माच्या अतिक्रमणाने भारतीय पुरुषार्थाची अतोनात हानी झाली. मिन्यांडर्(मिलींद) बुध्द धर्म स्वीकारुन आपले साम्राज्य वाढवु पाहत होता आणि आम्हि आंधळेपणाने महान बौध्द राजा म्हणुन त्याला अजुनहि डोक्यावर घेतो. हा असला आचरट्पणा थांबवण्याचे कार्य आदि शंकराचार्यांनी केले. बौध्द धर्म जवळपास भारतातुन पिटाळुन लावला. पुढे मुस्लिम आक्रमकांनी नालंदा ३ वेळा जाळले आणि बुध्द धर्माच्या अहिंसेचा संपुर्ण पराभव झाला. मात्र त्याला उत्तर दिले शिवरायांनी. तलवारीला त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. पुढे बाजीरावांनी दिल्लीला धडक दिली. तर राघोबांनी अटकेवर. शस्त्र हेच शास्त्र टिकवुन ठेवते हेच अंतिम सत्य आहे. आत्यंतिक अहिंसेने काय होतं हे तिबेटच्या रुपाने आपण बघतोय नाहि का? आणि विवेकानंदांचे कार्य तर इतके अलौकिक आहे कि त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर "या विवेकानंदाने काय केले आहे हे जाणुन घ्यायला दुसर्‍या विवेकानंदालाच जन्म घ्यावा लागेल!" विवेकानंदांनी हिंदु धर्माला शिकागो येथिल परीषदेत ज्या ताकदिने पुढे आणले त्या बद्दल विवेकानंदांचे कार्य हे दुसरे शंकराचार्य जन्माला आले होते असेच करावे लागेल.

"हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या." ------------------------- आपण सांगितलेल्या व्यक्ती या मोठ्या आहेत यात वाद नाहि मात्र यांच्या समकालीन लोकांची लिस्ट मोठी आहे. गांधी, टागोर,नेताजी हि लोकं समकालीन होती. एकवेळ तुम्हि टिळकांचे नाव घेऊ शकता अगदी त्यांचे खंदे विरोधी शाहु राजे सुध्दा टिळक गेल्यावर म्हणाअले होते "मर्दानी माणुस गेला आता लढायचे कोणाशी? त्यांच्या मागे सगळाच पोरकटाअंचा बाजार. आम्हि एकत्र आलो असतो तर मोठे काम केले असते. पण दोघेहि चुकलो. नको इतके ताणाले!" आणि नंतरची १९४७ पर्यंतची ती वेळच अशी होती की एकाच वेळी शेकडो सारख्या ताकदिची माणसे वावरत होती ,डावपेच टाकत होती. मात्र वरील चौघांचा काल बघता अथवा त्यांचे कार्य बघता ते कार्य दुसर्‍याने क्वचित अथवा मु़ळिच केले नव्हते किंवा केले असले तरी त्याला अपयश आले होते उदा. शहाजी राजांनी केलेला स्वातंत्र्याचा प्रयत्न. आर्य चाण्यक्यच्या आधी आपले राज्य आणि आपण इतकाच हेतु होता. पांडवांनी राजसुर्य केला देखिल पण अशी कितीशी भुमी त्यांनी जिंकली? उलट भूमी न जिंकता फक्त "तु मोठा! हा कर घे आणि जा!" या प्रकाराने राजसुर्य यज्ञ होत असे. मात्र चाणक्याने एकच राज्य या उद्देशाने मोठि भूमी एकाच साम्राज्याखाली आणली. आदि शंकराचार्यांच्या कार्याला तर तोड नाहि कोणी झाला नाहि कोणी होणारहि नाहि. शिवरायांच्या समकालीन छत्रसाल बुंदेला लढत होता पण बुंदेल्याला वाट शिवरायांनीच दाखवली. शिवाय बुंदेल्याने साम्राज्य उभे केले पाहिजे अशी महत्वाकांक्षा धरल्याचे दिसत नाहि मात्र तेच शिवरायांनी "थोरली मसलत" नेहमी डोळ्या समोर ठेवुन कार्य केले आणि हि थोरली मसलत म्हणजेच "दिल्ली".

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 13:26
मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या चार जणांचं महत्व वादातीत आहेच . तेव्हा ते वेगळं पटवण्याची गरज नाहिच / नव्हती. प्रश्न इतकाच पडला की या चार जणांना समजून घेऊन सध्याचा भारत समजता कसा येईल? (कदाचित शिवरायांचा प्रभाव आधुनिक भारतावर काहि अंशी जाणवतो) .पुन्हा भारत म्हणताना मी केवळ सुशिक्षित - वाचक असा भारत म्हणत नाहि आहे. तर खरा ज्यात ३०-४०% लोकांना अक्षर ओळखही नाहि, १५-१७% लोकांना आपण कोणत्या देशात राहतो याचं उत्तर देता आलं नाहि इ. इ. (आकडेवारीला पाठबळ देणारे दुवे घरी गेलो की शोधुन देतोच) भारत म्हणतो आहे. तुम्हीच विचार करा अश्या भारताला ओळखण्यासाठी समजा एखाद्या परकीयाने चाणक्य, विवेकानंद, शिवराय आणि आद्य शंकराचार्य अभ्यासले तर त्याला खर्‍या आधुनिक भारताची ओळख होईल का? पुन्हा एकदा नमुद करतो मुळ लेखातील व्यक्ती या आदरणीय, स्फुर्तीस्थाने निश्चितच आहेत. परंतू त्यांचा काळ खूप पूर्वीचा असल्याने त्यांचे आपण केवळ विचार घेऊ शकतो. जिथे योग्य आहे तिथे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शतो. परंतू सध्याचा भारत ओळखायला सध्याच्या जनमानसावर पगडा असलेल्या प्रमुख व्यक्ती घेतल्या इतकंच. (त्याही चारच घ्यायच्या होत्या म्हणून नाहितर लोकमान्य, सावरकर, बाबा आमटे आदी मंडळी आहेतच) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दुर्दैवाने परकियांनी भारताला ओळखले म्हणुनच त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी ओळखले असे मी म्हणालो कारण एका इंग्रज अधिकार्‍याने १८१८ नंतर हुकुम काढला महाराष्ट्रातील किल्ले ओस पडतील असे बघा, त्यांच्या नित्याच्या वाटा बुजवुन टाका कारण शिवाजी लोकांच्या मनात जिवंत राहिल तोवर आपण इथे तग धरु शकणार नाहि. आणि म्हणुनच १८१८ नंतर रायगड आणि अनेक महत्वाचे गड हे तोफांचा मारा करुन झोपवले. तिथे वाट अडचणीची करुन टकली. आणि हेच ल़क्षात घेऊन टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला. तो अगदि बंगाल पावतो पसरला. त्यातुनच इंग्रजांना बायकी वाटणार्‍या बंगाल मधुन खुदिराम बोस उभे राहिले. शिवरायांची प्रेरणा घेऊन किती जणांनी आपले आयुष्य देशाला समर्पित केले याचा इतिहास आपल्याला माहितच असेल. मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत. कौटिलिय अर्थशास्त्राचे नियम आजहि राजकारणातले सर्वोत्तम नियम समजले जातात. राजेशाहि गेली अन्यथा आजहि कौटिलिय अर्थशास्त्र वापरता आले असते यात शंका नाहि. शिवरायांची युध्दनीती आज लष्करात धडा म्हणुन वापरतात. या चौघांना समजुन भारत कसा जाणुन घेता येईल या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे - यांची अनेक तत्वे हि आजहि लागु पडतात. मुळात ते द्र्ष्टे होते हि गोष्ट माझ्यासाठि खुप महत्वाची आहे. चाणक्याच अर्थशास्त्र व राजनिती. आदि शंकराचार्यांची वैदिक धर्मा वरील निष्ठा व त्याचे पुनरुत्थान करायला घेतलेले कष्ट. शिवरायांची युध्दनीती आणि माणसे जमावण्याची कला. विवेकानंदांची आधुनिक तरुणाईला जोश देणारी विचारसरणी. यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे. आणि या चौघांकडेहि कॉमन असलेली गोष्ट म्हणाजे धैर्य, ज्याला स्थल कालाच्या सीमा नसतात. प्रत्येक देशाचा-मातीचा एक स्वभाव असतो असे माझे मत आहे तो भूभाग कितिहि आधुनिक झाला तरी त्या भूमीचा मुळ स्वभाव बदलत नाहि. या मातीतुनच हि चार माणसे घडली होती.

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 21:56
मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत
: : :
यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे.
अगदी मान्य. प्रश्न हा नाहि की या व्यक्तींची पात्रता काय. प्रश्न हा आहे की या व्यक्तींच्या अभ्यासाने आधुनिक भारत पर्यायाने समाजाची जडणघडण कशी कळेल? माझा मुद्दा बहुदा आपल्याला कळला नसावा हा माझ्या लिखाणाचा दोष समजून आता अगदी उदा. देऊन सांगतो "समजा माझा / तुमचा एखादा परदेशी / देशी मित्र म्हणाला मला भारतात यायचंय तेव्हा भारतातील समाज कसा आहे? त्यांच्या समस्या काय? शक्तीस्थाने काय? भारत हा बाकी जगापेक्षा वेगळा आहे पण तो नक्की कसा आहे? मला भारतात येण्या आधी एक कल्पना म्हणून भारत समजून घ्यायचाय. खरंतर यासाठी बरंच वाचावं लागेल? पण अश्या चार व्यक्तींची नावं मला सांग ज्याच्याबद्दल वाचून मला हल्लीच्या भारतील समाजरचना, संस्कृती, विचार, आचार आणि संस्कार ढोबळपणे कळून येतील" व त्यावेळी जर मी आपण सांगितलेल्या वक्ती सांगितल्या तर मग त्याने भारत अतिशय प्रज्ञावंत देश आहे. तिथे तत्त्वज्ञान, अर्थकारण, धर्म आणि क्षात्रधर्माचा उत्तम मिलाफ आहे. पण भारतात घरासमोर हत्ती आहेत असा विचार केल्यास नवल नाहि ;) [शेवटी थोडे ह. घ्यावे आणि भावना समजून घ्याव्यात] आपण सांगितलेल्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात बरेच कार्य/संशोधन/पराक्रम केले आहेत आणि त्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो / व्हावाच. परंतू भारताची सद्यस्थिती, समाजरचना वगैरे समजून घ्यालला सध्याच्या जिवंत पिढीवर ज्या व्यक्तींचा बहुमताने पगडा आहे त्यांचाच विचार करावा लागेल. तुमच्यावर उपरोल्लेखित व्यक्तींचा पगडा आहे. पण तुमच्यासारखे आजच्या भारतात किती आहेत असे वाटते? अगदी शिवरायांच्या नावाने गोंगाट करणार्‍यांपैकी किती जणांनी राजा शिवछत्रपती (अथव असे कोणतेही चरीत्र्)एकदा देखील वाचले असेल व त्यांच्यावर त्याचा परिणाम वगैरे झाला आहे असे तुम्हाला वाटते? ;) तेव्हा, तुम्ही दिलेल्या वक्तीचा अभ्यास करून काहि अपेक्षा धरून भारतात आलेला मनुष्याचा कीती मोठा अपेक्षाभंग होईल विचार करा. म्हणून मी म्हणत होतो की उपरोल्लेखित व्यक्ती असामान्य आणि थोर असल्या (आहेतच!) तरी आधुनिक भारतावर (राजकारणावर नव्हे हा! )त्यांचा फारसा प्रभाव राहिलेला वाटत नाहि . आपल्या यादीतील विवेकानंद व शिवराय हे तुलनेने हल्लीचे नेते असल्याने भारतातील काहि समाजघटकांवर त्यांचा काहिसा प्रभाव जाणवतो हे कबूल -(सपष्ट) ऋषिकेश

"सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)"" ----------------------- माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे. संन्यासी नसणे आणि अविवाहित राहणे यांचा काहि संबध नाहि. शिवाय त्यांचे माता-पिता यांचा अंत जसा झाला ते बघता लग्नासाठी त्यांच्यावर दबाव टाकणारे कोणीच नव्हते. हा मनुष्य धेय्यासाठि पछाडलेला होता आणि आपले जिवन त्यांनी त्यालाच वाहिले होते. विवाह केलाच पाहिजे असा नियम कुठेहि नाहिये. उलट चाणक्यच त्यांच्या अर्थशास्त्रात हेर हे विवाहित नसतील तर उत्तम असेच म्हणातात. आणि "हेर" हे एखाद्या कळत्या मुला-मुली पासुन ज़ख्ख म्हातारा-म्हातारी पर्यंत कोणीहि असत. वेश्या वृतीच्या जोगिणींना हेर नेमावे असेहि कौटिल्य म्हणतो. आता जोगिण असुन वेश्या वृत्तीची कशी ?हा प्रश्न आपल्याला पडेलहि मात्र 'देवदासी' हा प्रकार काहिसा तसाच आहे. त्याचेह आधीचे रुप जोगिण भिक्षुकीण असे होते. अश्या स्त्रीयांचा वापर हेर म्हणुन करावा हे चाणक्याचे वाक्य आहे. राहता राहिला शिवरायांचा मुद्दा. तर शिवरायांची ८ लग्ने झाली होती व हि लग्ने सोयरीक या गोष्टिसाठि केली होती. त्यावेळची परीस्थिती बघता हि ८ लग्ने सांभाळायची(राज्याभिषेका पर्यंत ५(कि ६??) दोन(?) पत्नींचा तोवर मृत्यु झाला होता. ) कि राज्याचा व्याप सांभाळायचा हि चिंता होती. म्हणुनच मी दुर्लक्ष केले असे न म्हणता अधिक महत्व दिले नाहि असे म्हंटले आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 14:45
माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे.
संदर्भ आता जालावरील देणे म्हणजे शोधायला हवेत परंतु चाणक्य अविवाहीत निश्चित नव्हते. त्यांच्या पुत्राचे, नातवाचे इ. संदर्भ वाचलेले आहेत. तत्कालीन समाजरचनेनुसार चाणक्यांना अविवाहीत राहण्याचे काहीही कारण नाही. विवाहासाठी दबाव टाकावा लागतो असे वाटत नाही. ध्येयासाठी जीवन अनेकांनी टाकले - गांधींपासून, शिवाजीपर्यंत पण सर्वांचे विवाह झाले होते. ध्येय आणि विवाह यांचा परस्परसंबंध नाही. संन्यास आणि अविवाहीत राहणे यांचा नक्की आहे. चाणक्यांनी हेरांबद्दल लिहिले हे ठीक पण चाणक्य स्वतः [उघड]हेर नव्हते. त्यामुळे हेराचा मुद्दा इथे का यावा तेच कळल नाही. याहूनही पुढची गोष्ट अशी की चाणक्य आणि कौटिल्य हे एक होते का वेगळे यावर अनेक तज्ज्ञांचे वाद आहेत. (परंतु तो वेगळा मुद्दा) वर एका प्रतिसादात सिकंदराबद्दल वाचले. सिंकदर बॅबिलोनियात मेला इ.स्.पूर्व ३२३ मध्ये. भारत सोडला इ.स.पूर्व ३२६ मध्ये. चाणक्यांचे योद्धा म्हणून किंवा ब्राह्मण सल्लागार म्हणून कोठेही कार्य त्या काळात नाही, त्याकाळात ते विशीत असावेत. सोळाव्या वर्षी तक्षशीलेला अध्ययनासाठी गेल्याचा उल्लेख वाचला आहे आणि त्यानंतर तेथेच अध्यापनाचे कार्य सांभाळल्याचा. म्हणजे बहुधा शिकून अध्यापन करत असावेत (वयाचा फारसा संबंध नाही ) आणि त्याकाळात ते फार प्रस्थापितही नव्हते. तक्षशीलेत सिकंदराला अटकाव झालेला नाही. ज्या माळवा आणि इतर प्रांतात झाला त्यांचा आणि चाणक्याचा संबंध नाही. तक्षशीलेवर स्वारी केली असता, तिथे जी वाताहत झाली त्यातून चाणक्य पाटण्याच्या दिशेनेच गेल्याची ऐतिहासिक शक्यता जास्त. असाच सनावळ्यांचा गोंधळ रामदास आणि तुकारामांबद्दल. इतिहासाचा विचार केला असता, रामदास आणि तुकाराम हे राजांना गुरुस्थानी असतील पण ते राजांचे गुरू नसावेत. राजांचे गुरू त्यांचे आई-बाप, दादोजी आणि तत्कालीन राजकारण.
सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं.
कोणत्या काळात? आता शिवरायांबद्दल, मी आठ लग्नांबद्दल बोलत नाही, त्याचा मराठी साम्राज्याशी काय संबंध? सोयरिक साधून मराठे बांधून ठेवणे इतकाच असावा. संभाजी आणि सोयराबाईच्या अंतर्गत राजकारणाकडे महाराजांनी लक्ष पुरवले असते तर मराठ्यांचा इतिहास बदलता. बाप आणि नवरा आणि राज्याच्या भविष्याची चिंता म्हणून या गोष्टींना महत्त्व देता आले असते. राज्याचा युवराज घडवण्यात महाराज कमी पडले. (पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे महाराजांना सर्वच करणे शक्य होते असे नाही पण त्यांनी या गोष्टींना महत्व दिले नाही, हे मुद्दामहून सांगण्यासारखेही काही नाही)

In reply to by प्रियाली

चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती. चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे. चाणक्य त्यावेळि गुरुकुलात शिकवत होते. आणि त्यांच्या हाताखाली चंद्रगुप्त, अक्षय अशी मुले शिकत होती आज त्यातील काहि विद्यार्थ्यांची नावे मिळतात. सिकंदराविरुध्द मालवक, क्षूद्रक इ.इ. गणाराज्यांनी युध्द केले होते. सिकंदराने पौरवाला हरवले खरे मात्र परीस्थिती बघुन त्याने पौरवाला राज्यावरुन काढुन टाकले नाहि. अंभीने सिकंदराला मदत केली व पुढे त्यामुळे पौरवाकडुन आपल्या राज्याला धोका होऊ नये म्हणुन सिकंदराला मध्यस्थी करायला लावुन पौरवाशी सोयरीक जुळवली, त्याच्या मुलीशी लग्न केले. पुढे सिंहारण्य या माजी सेनापतीला हाताशी धरुन चाणक्याने सिकंदरा विरुध्द विरोधाची फळी उभी केली. सिकंदाराच्या सेनेतील अंतर्गत कुरबुरीमुले सिकंदराने परतीचा रस्ता धरला तेव्हा सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले. पुढे मगध साम्राज्याच्या आजुबाजुच्या राजांशी हातमिळवणी करुन नंदा विरुध्द कारस्थाने करुन नंद वंशाच उच्छेद केला. व जेव्हा मगधाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या त्या राजांना रस्त्यातुन अनेक प्रकारे हटवुन चंद्रगुप्ताला सम्राट बनवले होते. आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती. महाराज जौहराच्या वेढ्यातुन निसटुन उगीच विशाळगडावर गेले नव्हते. विशाळगडाची भौगोलिक परीस्थीती या कारणा बरोबर विशाळगड हे महाराजांचे सासर होते जिथे दगा होण्याची शक्यता नव्हती या कारणासाठिच महाराजांनी विशाळगडाला जवळ केले. अजुन महाराजांच्या आयुष्यातले काहि प्रसंग सांगता येतिल. आणि युवराज-महाराणी यांच्या संघर्षाबाबत म्हणाल तर महाराजांना खरच तिथे लक्ष द्यायला वेळ नसावा. महाराज वर्षातले किमान ६ महिने राजधानी बाहेर असायचे पुढे तर दिड वर्षांच्या द्ख्खन मोहिमेवर गेले आणि तिथुनच तंट्याला सुरुवात झाली.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 18:38
चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती.
कशाबद्दल क्रांतिकार्याची दिक्षा? चाणक्य युद्धनिती शिकवत होता का? (राजनीती किंवा अर्थशास्त्र शिकवत असावा असे मला वाटते) कुठे बंडाळी, अव्यवस्था सुरु होती की चाणक्य क्रांतीकारी निर्माण करत होता? की सिकंदर चालून येतो आहे म्हणून तो ग्रीक सैन्याविरूद्ध विद्यार्थ्यांची फळी निर्माण करत होता? तक्षशिलेत असताना चाणक्य हा एक सामान्य तरूण अध्यापक होता. बाकी, काहीही योगदान नाही. चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असल्याबद्दल आजच कळले. असावाही मला फारशी कल्पना नाही परंतु चंद्रगुप्त सिकंदराच्या सैन्यातून लढल्याच्याही कथा-आख्यायिका सांगितल्या जातात. चंद्रगुप्ताचे वय त्याकाळात १३-१४ असल्याने तो कितपत लढला असावा याचीही कल्पना नाही आणि चंद्रगुप्त भारताच्या वायव्येकडे राहिला होता यालाही काहीही ऐतिहासिक पुरावे नाहीत. आहेत त्या सर्व कपोलकल्पित कथा.
चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे.
बांधली पण ती मगध साम्राज्याविरुद्ध. वायव्य भारतात अशी फळी बांधल्याचे मी कोठेही वाचलेले नाही पण संदर्भ आवडेल.
सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले.
क्रांतिकारकांनी नाही, लहान मोठ्या गणराज्यांनी गनिमी काव्यांनी हल्ले करून मारले आणि चाणक्यांचा किंवा त्याच्या तथाकथित दूरवर पसरलेल्या शिष्यांचा यात काहीही संबंध नसावा. तक्षशीलेची वाताहत, युद्धपरिस्थिती वगैरेतून सुटका करून चाणक्य पाटलीपुत्राच्या दिशेने गेला. तेथे नंदाच्या दरबारी त्याने नोकरी स्वीकारली. आपल्या हुशारीमुळे वर चढला आणि हेकटपणा मुळे मूर्ख नंदाची मर्जी गमवून बसला आणि मगध साम्राज्याशी वैर धरले. ही परिस्थिती येईपर्यंत तो मगधसाम्राज्यातील एक राजकारणी म्हणून प्रसिद्धी पावलेला होता आणि म्हणूनच आजूबाजूच्या लहान-मोठ्या राज्यांशी हातमिळवणी करू शकला.
आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती.
हे तर मी म्हटलेलेच आहे पण बळकटी शासन करत नाही. महाराजांच्या आठ लग्नांबद्दल माझे काहीच म्हणणे नसल्याने मी त्यावर विषय वाढवत नाही. युवराज आणि महाराणींचा तंटा मात्र खूप जुना होता आणि महाराजांचे त्याकडे दुर्लक्षच झाले.

In reply to by प्रियाली

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत? कारण चाणक्य अथवा चंद्रगुप्त यांची अचुक जन्म तारिख कोणालाच माहित नाहि. चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात. सिकंदराशी अंभीने हातमिळवणी केल्याची बातमी आल्यावर त्यांनी हि फळी बांधायला सुरुवात केली होती. राजाच नाकर्ता निघाल्यावर काय करणार? संदर्भा साठि भा.द.खेर यांचे चाणक्य वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचा. शिवाय अजुन अनेक पुस्तके मिळतील. शिवाय चंद्रप्रकाश द्विवेदि यांची चाणक्य हि सिरीअल लागायची सध्या तिच्या सीडिज मिळतात. चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि. अगदिच कोणावरहि विश्वास ठेवा असे मी सांगत नाहिये. तुम्हि म्हणता तसे तो नंदाच्या दरबारी होता कि नव्हता याबाबत दे़खिल दुमत आहे. मात्र चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 19:03
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असण्याचा आणि १२-१४ वर्षांचा असण्याचा आणि एकत्रित अनुमानाचा संबंध काय? चंद्रगुप्ताचे वय इतिहासकारांनी निश्चित केले आहे. त्यानुसार जन्म सुमारे इ.स्.पूर्व ३४० ते ३३५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. अचूक तारखा माहित असण्याचा प्रश्न नाही. नंदराज्याचा कालावधी, मौर्यराज्याचा कालावधी, चंद्रगुप्ताचा शासनकाळ, त्यानंतर आलेले राजे यावरून हे वय निश्चित केले जाते.
चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात.
चाणक्याने चंद्रगुप्ताला विकत घेतले, चंद्रगुप्त नंदाचा अनौरस पुत्रच होता, नंदाने त्याला पितृत्व नाकारले होते वगैरे वगैरे या फक्त आख्यायिकाच आहेत. त्यांना पुष्टी देणारे कोणतेही संदर्भ नाहीत.
चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि.
चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ज्ञानाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही परंतु त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी त्यांनी सांगितलेल्या घटना प्रमाण मानाव्या असे कुठे आहे? यासंदर्भात मी पार्थसारथी बोस, डॉ. बरुआ यांचे लेख काही काळापूर्वी वाचले होते, कोणीही चाणक्याने सिकंदराविरुद्ध लढाई लढण्याबद्दल म्हटलेले नाही. ग्रीकांचा इतिहास वाचलेला आहे. त्यात तत्कालीन अनेक लहान मोठ्या राजा किंवा सेनानींची नावे आहेत..कुठेही चाणक्याचे नाव नाही.
चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.
चाणक्याचा अपमान याच कारणासाठी झाला की तो नंदाच्या दरबारी होता, नंदाला सल्ल्यांची नाहीतर हुजर्‍यांची गरज होती आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते.

लिखाळ 28/08/2008 - 15:23
सौरभ, लेख ठिक वाटला. वक्तृत्व स्पर्धेतले भाषण असते त्या धाटणीचा वाटला. लेख शेवटीसुद्धा कोठलीच ठोस माहिती वा मत मांडत नाही त्यामुळे तो वाचून संपल्यावर टाळ्या वाजवण्यापलिकडे हातात काहिच राहिले नाही. >>आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती. या सारख्या वाक्यांमुळे मला तसे वाटले असेल कदाचित. असो. पण, आपण निवड केलेल्या चारही व्यक्ती या नक्कीच अनेक शतके भारतावर, त्याच्या संस्कृतीवर प्रभाव पाडणार्‍या आहेत हे सत्यच. यांबद्दल आपल्याला वाटणारा आदरसुद्धा योग्यच आहे. शंकराचार्य आणि विवेकानंद यांनी भारतभ्रमण करुन भारताचा, तेथील लोकांचा स्वभाव ओळखला होता. मला त्यांच्या समाजकारणाचा हा भक्कम पाया वाटतो. पुढे झालेल्या रामदास आणि इतरही काही संत (आणि समाजसेवकांनी) मंडळींनी भारतभ्रमण करुन रावा पासून रंकापर्यंत सर्व समाजजीवन जवळून पाहिल्यामुळेच त्यांना सामाजिक स्थितीवर काही ठोस मते बनवता आली आणि उपाय योजता आले असे वाटते. सध्याच्या नेत्यांनी कितीही प्रवास केला तरी ते एक तर्‍हेच्या प्रभावळीत राहुन प्रवास करतात. त्यांना हे भान येणे शक्य दिसत नाही. आपले इतरही काही लिखाण वाचले. आवडले. शुभेच्छुक --लिखाळ.

लेखन आणि चर्चा दोन्ही वाचत आहे. लेख सोपा करता आला असता या विचारांशी सहमत. आपण लेखासाठी निवडलेल्या श्रेष्ठ माणसांनी भारतीय मनाला नेहमीच भुरळ घातली आहे. इतिहासाची आठवण यासाठी करावी की, भविष्यातली पावलं दमदार पडावी. इतिहासातील चरित्र /विचारांच्या पावलावर पाऊल टाकून आपण महासत्तेकडे कुच केले पाहिजे हा लेखनातला आशावाद आवडला. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. हम्म, नक्कीच बनवू शकते. पण सुरुवात कुठून करायची ? त्याचे जर विवेचन आले असते तर, लेखाला चार चांद लागले असते, असो आपले लेखन आम्ही आवडीने वाचत असतोच , लगे रहो. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 27/08/2008 - 20:24
चांगले विचार. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. भारताला महासत्ता बनवण्यासाठी वरील आणि अजून अनेक गोष्टींची गरज आहे. तसेच त्यावरून सावरकरांच्या शिवाजीला उद्देशून म्हणलेल्या (लताने गायलेल्या) ओळी आठवल्या, ज्यात ते "आम्हाला" म्हणजे "जनसामान्यांना" काय दे हे सांगतात... हे गूण फक्त शिवाजीतले त्यांनी दाखवलेत कारण ते एकत्रीत त्या व्यक्तिमत्वात दिसतात जे (व्यक्तिमत्व) तमाम मराठी माणसाला आपले वाटते. इतर अनेक नेतृत्वात (ऐतिहासिक विशेषकरून) ते दिसू शकतील..
जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे ती बुद्धी भाबड्या जीवा लाहू दे ती शक्ती शोणितामाजी वाहू दे दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुजज्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:59
मात्र "थोडक्यात या चौघांना 'आचरल्यास' भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे" हे वाक्य कळले नाही. या चौघांना आचरायचे म्हणजे काय करायचे याचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. आपला, (आचरट) आजानुकर्ण

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:48
अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते
बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. आपला, (हिंदू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 21:42
ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. बहुतांशी सहमत आणि योग्य मुद्दा! :-) काही मला वाटणारे फरक - (या चर्चेत कदाचीत गौण मुद्दा) हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. मोहेंजेदडो आणि हडप्पा ह्या संस्कृती होत्या म्हणण्या पेक्षा नागरी व्यवस्था होत्या ज्यांचे कौतूक आजही संस्कृतीपेक्षा नगररचना शास्त्रापुरते मर्यादीत होते. पण त्या विस्तृत प्रमाणावात हिंदू संस्कृतीच्याच भाग होत्या जी आपण म्हणल्याप्रमाणे र्‍हास झालेली नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 21:48
हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. बरोबर. आणि भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? आपला, (हिंदुत्त्ववादी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 22:12
भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? सिव्हीलिझेशनचा भाग म्हणून हिंदू म्हणता येतील. पण धर्म म्हणून त्यांचा धर्म वेगळाच आहे आणि तसे असण्यात काही गैर नाही. दुर्दैवाने "हिंदू" हा शब्द धर्माला चिकटला असल्याने आणि ते पण भारतात विशेषकरून त्यातून गैरअर्थ निघतात. अवांतरः मधे कधीतरी मी या संदर्भात लिहीले होते, पण गेल्या वर्षी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात, वातावरण बदलावरून असलेल्या कार्यक्रमात गेलो होतो. तेंव्हा पाण्यावरून एक परीसंवाद होता. त्यात एक युरोपमधील उच्च अधिकारी स्त्री विकसनशील देशातील पाण्यावरून बोलत होती. त्यात तिने भारतातील व्यक्तींचा उल्लेख हा "हिंदू" म्हणून केला "इंडीयन" म्हणून नाही. कारण अनेक शतके ते तसेच ऐकतात. थोडक्यात हा त्यांच्यासाठी भौगोलीक शब्द आहे. अतिअवांतर: अमेरिकेतील नेटीव्हांना ज्यांना भारतात आपण "रेड इंडीयन" म्हणतो त्यांना बर्‍याचदा येथे फक्त, "इंडीयन" म्हणतात. कारण जेंव्हा येथे युरोपातून लोकं आली तेंव्हा त्यांना हीच "इंडीया" वाटली होती आणि म्हणून ते "इंडीयन्स". अर्थात मी पहील्यांदा ते जेंव्हा ऐकले तेंव्हा "ऑफेन्सिव्ह" वाटले. नंतर समजले... तेंव्हा शब्दांचे अर्थ जरी भौगोलीक आणि राजकीय सीमांनी ठरतात तसेच धर्माधारीत पण जर असले तर तसे शब्द सार्वजनीक करण्याचे टाळावे. थोडक्यात संस्कृतिचा भाग असले तरी, "ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध " यांना हट्टाने हिंदू म्हणावे असे मला वाटत नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:33
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो आणि रस्त्यांवर गारूडी साप घेऊन फिरतात असा विचार करतात, असे 'इथे'च वाचले आहे. त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे कारण नाही! आपला, (देशी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य 28/08/2008 - 17:14
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो .... कधीतरी कोणीतरी अशा तर्‍हेचे अजूनही बोलतो हे खरे आहे. पण अलिकडे हे अज्ञानमूलक नसून थोडेसे खोडसाळपणाकडे असते. मला कोणी असे म्हणाल्यास माझे उत्तर तयार असते - हो आमच्याकडे तीन हत्ती आहेत. नुसता हत्ती ठेवणे बरं नाही, हत्तीणही पाळावी लागते ना. घरामागच्या तळ्यात दिवसरात्र डुंबत असतात. मस्त मजा येते. ही उपरोक्त प्रतिक्रिया वगळता अन्य कोणतीही प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली नाही. असो.... (महाभारतीय) एकलव्य

प्रियाली 27/08/2008 - 21:06
वर आलेले मुद्दे पुन्हा उगाळत नाही परंतु,
चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि
सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)

ऋषिकेश 27/08/2008 - 22:21
लेख आवडला. किंचीत शब्दबंबाळ वाटला. असो, या चार जणांचं महत्व वादातीत आहेच पण
ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा
हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत 27/08/2008 - 23:24
लेख छान झालाय. या चौघांपैकी आद्य शंकराचार्यांबद्दल जास्त माहिती नाही. मात्र त्या सर्वांचं काम मोठंच आहे. नीलकांत

प्रियाली 27/08/2008 - 23:34
रामदास का तुकाराम?
चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का?
शिवाजी महाराज रामदासांना उमेदीच्या काळात भेटल्याचे आठवत नाही. जेव्हा भेटले तेव्हा आधीच प्रस्थापित होते त्यामु़ळे वरील प्रश्न इथे लागू होत नाही असे वाटते. तुकारामांशी त्यांची भेट त्यामानाने लवकर झाली असावी असे वाटते.

In reply to by प्रियाली

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:37
शिवाजीराजे उमेदीच्या काळात तुकारामांनाही भेटले नाहीत आणि रामदासांनाही भेटले नाहीत. याबाबत रामदास आणि तुकाराम यांचे काही आक्षेप नसतील. मात्र असे म्हटले की रामदास आणि तुकारामांची ब्र्यांड अँबेसिडरशिप करणार्‍यांना ते कमीपणाचे वाटते. (शिवाय जातीयवादी असे लेबलही लागते) त्यामुळे हा मुद्दा काढला नाही. 'सोने आणि धन आम्हा मृत्तिकासमान' या तुकारामांच्या अभंगाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. मात्र त्याबाबत पुन्हा कधीतरी. आपला, (क्रमशः) आजानुकर्ण

दोयल 28/08/2008 - 02:25
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे.

In reply to by दोयल

विकास 28/08/2008 - 02:30
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे. मात्र असली प्रतिक्रीया नस्ता फाटा फोडत आहे असे वाटत नाही का? एखादा लेख वगैरे लिहील्यावर जर त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया आल्यातर त्याचे दोन अर्थ होतात - एक म्हणजे लोकांनी वाचले. दुसरे म्हणजे त्यांना काय वाटते ते सांगितले आणि त्यावर चर्चा सुरू झाली...थोडक्यात फाटा फोडला वगैरे काही वाटत नाही.

In reply to by विकास

प्रियाली 28/08/2008 - 03:05
जर ताबडतोब प्रतिक्रिया येणार्‍या संकेतस्थळावर लेख टाकला तर त्यातील त्रुटी दाखवणे, शंका विचारणे, वेगळे मत मांडणे इ. लोक करणारच तेव्हा उगीच असले विषयाशी संबंधीत नसणारे प्रतिसाद देऊन नस्ते फाटे फोडण्याची गरज नाही.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:40
विकास आणि प्रियालीशी सहमत आहे... सदर लेखात मला कोणतेही विषयांतर जाणवत नाही आणि फाटे फोडले गेले आहेत असे वाटत नाही.... तात्या.

राघव 28/08/2008 - 12:27
सुंदर लेख. चौघे कोण अन् चौघेच का याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण असे म्हणता येईल की या चौघांमुळे एक राष्ट्र म्हणून खूप बदल घडला. चाणक्यांनी राजनीतीचा पाया परत मजबूत केला. शंकराचार्यांनी धर्म, रूढी, रीतीरीवाज याबद्दल असणार्‍या मानसिकतेत काळानुरूप योग्य बदल घडवून आणला. शिवरायांनी तर धर्मरक्षण केलेय, नाही तर काय झाले असते ती कल्पना पण करवत नाही. विवेकानंदांनी सगळ्यांना भारताची ओळख करून दिली अन् राष्ट्रभिमान जागृत केला जे अत्यंत महत्वाचे होते त्याकाळच्या परिस्थितीत; किंबहुना आजही आहे. या सर्वात चाणाक्यांचे स्थान इतर तिघांच्या मानाने थोडे कमी वाटू शकेल पण त्यांनी सांगितलेल्या नीतीच्या विस्मराणामुळेच नंतर पृथ्वीराज चौहान सारखा नेता हकनाक हारला अन् परकियांच्या घनघोर आक्रमणांना वाटा फुटल्या. इतका छान लेख लिहील्याबद्दल पुन्हा अभिनंदन. मुमुक्षू

"बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. " "हिंदु धर्मावर" आणि "वैदिक संस्कृतीवर" अनेक धार्मिक, सामाजिक, राजकिय आक्रमणे झाली याबाबत कुणाचे दुमत नसावे. तुमच्या वरील वाक्यातील आक्षेप नीट लक्षात घेता मी हिंदु आणि वैदिक असे दोन भाग केले आहेत. मात्र दोन्हि गोष्टि एकमेकांपासुन फारश्या वेगळ्या नाहित. ख्रिश्चन, मुस्लिम, बौध्द, जैन हे मु़ख्यत्वे धर्म आहेत यांना संस्कृती कितपत म्हणता येईल हा वेगळा विषय आहे असं मला वाटतं. त्यातुन ख्रिश्चन, मुस्लिम ह्यांनी त्यांचा धर्म तलवारीच्या जोरावर पसरवला आहे हे सत्य आहे त्यामुळे त्यांना संस्कृती म्हणावं का? आणि बौध्द-जैन तत्वांबाबत म्हणाल तर ती हिंदु धर्माचीच नवी रुपे आहेत. एक उदाहरण घ्यायचे झाले तर यज्ञ हि वैदिक संस्कृती आहे जी ग्रीकांची देखिल होती ते सुध्दा यज्ञ करीत. पण आज तिथे ख्रिश्चन धर्म पसरला आहे, रोमन संस्कृती हि आज फक्त अवषेशांच्या रुपाने उभी आहे. पारसिक संस्क्रुती झोपवणारे ग्रीक कालांतराने स्वतः कालाच्या उदरात गडप झाले. मात्र वैदिक संस्कृती व हिंदु धर्म दोन्हि आजहि तग धरुन उभे आहेत. सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं. आदि शंकराचार्यांनी बुध्द धर्माने मिळमिळित केलेला भारत पुन्हा नव्या ताकदिने उभा केला. गुप्त साम्राज्य हा भारताचा सुवर्णकाल समजला जातो त्यावेळि अगदि कंबोडिआ पर्यंत आपले राज्य पसरले होते. नंतर खुळचट कल्पनांनी भारताचे नुकसान केले. मात्र फक्त एकाच भूमीत आपले पाय रोवुन देखिल हिंदु धर्माचा अथवा वैदिक संस्क्रुतीचा नाश झाला नाहि. तेच इतर साम्राज्यांचा व संस्कृतींचा विनाश झाला हे मला ठळक पणे दाखवुन द्यायचय.

धन्यवाद! हेच चौघे का? याचे उत्तर तुम्हि दिलेत याचा मला आनंद होतोय! या चौघांचा काल बघता त्या काळी त्यांच्या सारखेच काम करणारा दुसरा झाला नाहि. एकछत्री भारतीय साम्राज्य हे स्वप्न प्रथमतः चाणक्यांनी बघितल. म्हणुन खर तर राष्ट्रपिता एकच आर्य चाणक्य. जे राष्ट्र घडवतात तेच राष्ट्रपिता म्हणावले जाऊ शकतात. बुध्द धर्माच्या अतिक्रमणाने भारतीय पुरुषार्थाची अतोनात हानी झाली. मिन्यांडर्(मिलींद) बुध्द धर्म स्वीकारुन आपले साम्राज्य वाढवु पाहत होता आणि आम्हि आंधळेपणाने महान बौध्द राजा म्हणुन त्याला अजुनहि डोक्यावर घेतो. हा असला आचरट्पणा थांबवण्याचे कार्य आदि शंकराचार्यांनी केले. बौध्द धर्म जवळपास भारतातुन पिटाळुन लावला. पुढे मुस्लिम आक्रमकांनी नालंदा ३ वेळा जाळले आणि बुध्द धर्माच्या अहिंसेचा संपुर्ण पराभव झाला. मात्र त्याला उत्तर दिले शिवरायांनी. तलवारीला त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. पुढे बाजीरावांनी दिल्लीला धडक दिली. तर राघोबांनी अटकेवर. शस्त्र हेच शास्त्र टिकवुन ठेवते हेच अंतिम सत्य आहे. आत्यंतिक अहिंसेने काय होतं हे तिबेटच्या रुपाने आपण बघतोय नाहि का? आणि विवेकानंदांचे कार्य तर इतके अलौकिक आहे कि त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर "या विवेकानंदाने काय केले आहे हे जाणुन घ्यायला दुसर्‍या विवेकानंदालाच जन्म घ्यावा लागेल!" विवेकानंदांनी हिंदु धर्माला शिकागो येथिल परीषदेत ज्या ताकदिने पुढे आणले त्या बद्दल विवेकानंदांचे कार्य हे दुसरे शंकराचार्य जन्माला आले होते असेच करावे लागेल.

"हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या." ------------------------- आपण सांगितलेल्या व्यक्ती या मोठ्या आहेत यात वाद नाहि मात्र यांच्या समकालीन लोकांची लिस्ट मोठी आहे. गांधी, टागोर,नेताजी हि लोकं समकालीन होती. एकवेळ तुम्हि टिळकांचे नाव घेऊ शकता अगदी त्यांचे खंदे विरोधी शाहु राजे सुध्दा टिळक गेल्यावर म्हणाअले होते "मर्दानी माणुस गेला आता लढायचे कोणाशी? त्यांच्या मागे सगळाच पोरकटाअंचा बाजार. आम्हि एकत्र आलो असतो तर मोठे काम केले असते. पण दोघेहि चुकलो. नको इतके ताणाले!" आणि नंतरची १९४७ पर्यंतची ती वेळच अशी होती की एकाच वेळी शेकडो सारख्या ताकदिची माणसे वावरत होती ,डावपेच टाकत होती. मात्र वरील चौघांचा काल बघता अथवा त्यांचे कार्य बघता ते कार्य दुसर्‍याने क्वचित अथवा मु़ळिच केले नव्हते किंवा केले असले तरी त्याला अपयश आले होते उदा. शहाजी राजांनी केलेला स्वातंत्र्याचा प्रयत्न. आर्य चाण्यक्यच्या आधी आपले राज्य आणि आपण इतकाच हेतु होता. पांडवांनी राजसुर्य केला देखिल पण अशी कितीशी भुमी त्यांनी जिंकली? उलट भूमी न जिंकता फक्त "तु मोठा! हा कर घे आणि जा!" या प्रकाराने राजसुर्य यज्ञ होत असे. मात्र चाणक्याने एकच राज्य या उद्देशाने मोठि भूमी एकाच साम्राज्याखाली आणली. आदि शंकराचार्यांच्या कार्याला तर तोड नाहि कोणी झाला नाहि कोणी होणारहि नाहि. शिवरायांच्या समकालीन छत्रसाल बुंदेला लढत होता पण बुंदेल्याला वाट शिवरायांनीच दाखवली. शिवाय बुंदेल्याने साम्राज्य उभे केले पाहिजे अशी महत्वाकांक्षा धरल्याचे दिसत नाहि मात्र तेच शिवरायांनी "थोरली मसलत" नेहमी डोळ्या समोर ठेवुन कार्य केले आणि हि थोरली मसलत म्हणजेच "दिल्ली".

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 13:26
मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या चार जणांचं महत्व वादातीत आहेच . तेव्हा ते वेगळं पटवण्याची गरज नाहिच / नव्हती. प्रश्न इतकाच पडला की या चार जणांना समजून घेऊन सध्याचा भारत समजता कसा येईल? (कदाचित शिवरायांचा प्रभाव आधुनिक भारतावर काहि अंशी जाणवतो) .पुन्हा भारत म्हणताना मी केवळ सुशिक्षित - वाचक असा भारत म्हणत नाहि आहे. तर खरा ज्यात ३०-४०% लोकांना अक्षर ओळखही नाहि, १५-१७% लोकांना आपण कोणत्या देशात राहतो याचं उत्तर देता आलं नाहि इ. इ. (आकडेवारीला पाठबळ देणारे दुवे घरी गेलो की शोधुन देतोच) भारत म्हणतो आहे. तुम्हीच विचार करा अश्या भारताला ओळखण्यासाठी समजा एखाद्या परकीयाने चाणक्य, विवेकानंद, शिवराय आणि आद्य शंकराचार्य अभ्यासले तर त्याला खर्‍या आधुनिक भारताची ओळख होईल का? पुन्हा एकदा नमुद करतो मुळ लेखातील व्यक्ती या आदरणीय, स्फुर्तीस्थाने निश्चितच आहेत. परंतू त्यांचा काळ खूप पूर्वीचा असल्याने त्यांचे आपण केवळ विचार घेऊ शकतो. जिथे योग्य आहे तिथे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शतो. परंतू सध्याचा भारत ओळखायला सध्याच्या जनमानसावर पगडा असलेल्या प्रमुख व्यक्ती घेतल्या इतकंच. (त्याही चारच घ्यायच्या होत्या म्हणून नाहितर लोकमान्य, सावरकर, बाबा आमटे आदी मंडळी आहेतच) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दुर्दैवाने परकियांनी भारताला ओळखले म्हणुनच त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी ओळखले असे मी म्हणालो कारण एका इंग्रज अधिकार्‍याने १८१८ नंतर हुकुम काढला महाराष्ट्रातील किल्ले ओस पडतील असे बघा, त्यांच्या नित्याच्या वाटा बुजवुन टाका कारण शिवाजी लोकांच्या मनात जिवंत राहिल तोवर आपण इथे तग धरु शकणार नाहि. आणि म्हणुनच १८१८ नंतर रायगड आणि अनेक महत्वाचे गड हे तोफांचा मारा करुन झोपवले. तिथे वाट अडचणीची करुन टकली. आणि हेच ल़क्षात घेऊन टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला. तो अगदि बंगाल पावतो पसरला. त्यातुनच इंग्रजांना बायकी वाटणार्‍या बंगाल मधुन खुदिराम बोस उभे राहिले. शिवरायांची प्रेरणा घेऊन किती जणांनी आपले आयुष्य देशाला समर्पित केले याचा इतिहास आपल्याला माहितच असेल. मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत. कौटिलिय अर्थशास्त्राचे नियम आजहि राजकारणातले सर्वोत्तम नियम समजले जातात. राजेशाहि गेली अन्यथा आजहि कौटिलिय अर्थशास्त्र वापरता आले असते यात शंका नाहि. शिवरायांची युध्दनीती आज लष्करात धडा म्हणुन वापरतात. या चौघांना समजुन भारत कसा जाणुन घेता येईल या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे - यांची अनेक तत्वे हि आजहि लागु पडतात. मुळात ते द्र्ष्टे होते हि गोष्ट माझ्यासाठि खुप महत्वाची आहे. चाणक्याच अर्थशास्त्र व राजनिती. आदि शंकराचार्यांची वैदिक धर्मा वरील निष्ठा व त्याचे पुनरुत्थान करायला घेतलेले कष्ट. शिवरायांची युध्दनीती आणि माणसे जमावण्याची कला. विवेकानंदांची आधुनिक तरुणाईला जोश देणारी विचारसरणी. यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे. आणि या चौघांकडेहि कॉमन असलेली गोष्ट म्हणाजे धैर्य, ज्याला स्थल कालाच्या सीमा नसतात. प्रत्येक देशाचा-मातीचा एक स्वभाव असतो असे माझे मत आहे तो भूभाग कितिहि आधुनिक झाला तरी त्या भूमीचा मुळ स्वभाव बदलत नाहि. या मातीतुनच हि चार माणसे घडली होती.

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 21:56
मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत
: : :
यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे.
अगदी मान्य. प्रश्न हा नाहि की या व्यक्तींची पात्रता काय. प्रश्न हा आहे की या व्यक्तींच्या अभ्यासाने आधुनिक भारत पर्यायाने समाजाची जडणघडण कशी कळेल? माझा मुद्दा बहुदा आपल्याला कळला नसावा हा माझ्या लिखाणाचा दोष समजून आता अगदी उदा. देऊन सांगतो "समजा माझा / तुमचा एखादा परदेशी / देशी मित्र म्हणाला मला भारतात यायचंय तेव्हा भारतातील समाज कसा आहे? त्यांच्या समस्या काय? शक्तीस्थाने काय? भारत हा बाकी जगापेक्षा वेगळा आहे पण तो नक्की कसा आहे? मला भारतात येण्या आधी एक कल्पना म्हणून भारत समजून घ्यायचाय. खरंतर यासाठी बरंच वाचावं लागेल? पण अश्या चार व्यक्तींची नावं मला सांग ज्याच्याबद्दल वाचून मला हल्लीच्या भारतील समाजरचना, संस्कृती, विचार, आचार आणि संस्कार ढोबळपणे कळून येतील" व त्यावेळी जर मी आपण सांगितलेल्या वक्ती सांगितल्या तर मग त्याने भारत अतिशय प्रज्ञावंत देश आहे. तिथे तत्त्वज्ञान, अर्थकारण, धर्म आणि क्षात्रधर्माचा उत्तम मिलाफ आहे. पण भारतात घरासमोर हत्ती आहेत असा विचार केल्यास नवल नाहि ;) [शेवटी थोडे ह. घ्यावे आणि भावना समजून घ्याव्यात] आपण सांगितलेल्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात बरेच कार्य/संशोधन/पराक्रम केले आहेत आणि त्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो / व्हावाच. परंतू भारताची सद्यस्थिती, समाजरचना वगैरे समजून घ्यालला सध्याच्या जिवंत पिढीवर ज्या व्यक्तींचा बहुमताने पगडा आहे त्यांचाच विचार करावा लागेल. तुमच्यावर उपरोल्लेखित व्यक्तींचा पगडा आहे. पण तुमच्यासारखे आजच्या भारतात किती आहेत असे वाटते? अगदी शिवरायांच्या नावाने गोंगाट करणार्‍यांपैकी किती जणांनी राजा शिवछत्रपती (अथव असे कोणतेही चरीत्र्)एकदा देखील वाचले असेल व त्यांच्यावर त्याचा परिणाम वगैरे झाला आहे असे तुम्हाला वाटते? ;) तेव्हा, तुम्ही दिलेल्या वक्तीचा अभ्यास करून काहि अपेक्षा धरून भारतात आलेला मनुष्याचा कीती मोठा अपेक्षाभंग होईल विचार करा. म्हणून मी म्हणत होतो की उपरोल्लेखित व्यक्ती असामान्य आणि थोर असल्या (आहेतच!) तरी आधुनिक भारतावर (राजकारणावर नव्हे हा! )त्यांचा फारसा प्रभाव राहिलेला वाटत नाहि . आपल्या यादीतील विवेकानंद व शिवराय हे तुलनेने हल्लीचे नेते असल्याने भारतातील काहि समाजघटकांवर त्यांचा काहिसा प्रभाव जाणवतो हे कबूल -(सपष्ट) ऋषिकेश

"सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)"" ----------------------- माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे. संन्यासी नसणे आणि अविवाहित राहणे यांचा काहि संबध नाहि. शिवाय त्यांचे माता-पिता यांचा अंत जसा झाला ते बघता लग्नासाठी त्यांच्यावर दबाव टाकणारे कोणीच नव्हते. हा मनुष्य धेय्यासाठि पछाडलेला होता आणि आपले जिवन त्यांनी त्यालाच वाहिले होते. विवाह केलाच पाहिजे असा नियम कुठेहि नाहिये. उलट चाणक्यच त्यांच्या अर्थशास्त्रात हेर हे विवाहित नसतील तर उत्तम असेच म्हणातात. आणि "हेर" हे एखाद्या कळत्या मुला-मुली पासुन ज़ख्ख म्हातारा-म्हातारी पर्यंत कोणीहि असत. वेश्या वृतीच्या जोगिणींना हेर नेमावे असेहि कौटिल्य म्हणतो. आता जोगिण असुन वेश्या वृत्तीची कशी ?हा प्रश्न आपल्याला पडेलहि मात्र 'देवदासी' हा प्रकार काहिसा तसाच आहे. त्याचेह आधीचे रुप जोगिण भिक्षुकीण असे होते. अश्या स्त्रीयांचा वापर हेर म्हणुन करावा हे चाणक्याचे वाक्य आहे. राहता राहिला शिवरायांचा मुद्दा. तर शिवरायांची ८ लग्ने झाली होती व हि लग्ने सोयरीक या गोष्टिसाठि केली होती. त्यावेळची परीस्थिती बघता हि ८ लग्ने सांभाळायची(राज्याभिषेका पर्यंत ५(कि ६??) दोन(?) पत्नींचा तोवर मृत्यु झाला होता. ) कि राज्याचा व्याप सांभाळायचा हि चिंता होती. म्हणुनच मी दुर्लक्ष केले असे न म्हणता अधिक महत्व दिले नाहि असे म्हंटले आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 14:45
माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे.
संदर्भ आता जालावरील देणे म्हणजे शोधायला हवेत परंतु चाणक्य अविवाहीत निश्चित नव्हते. त्यांच्या पुत्राचे, नातवाचे इ. संदर्भ वाचलेले आहेत. तत्कालीन समाजरचनेनुसार चाणक्यांना अविवाहीत राहण्याचे काहीही कारण नाही. विवाहासाठी दबाव टाकावा लागतो असे वाटत नाही. ध्येयासाठी जीवन अनेकांनी टाकले - गांधींपासून, शिवाजीपर्यंत पण सर्वांचे विवाह झाले होते. ध्येय आणि विवाह यांचा परस्परसंबंध नाही. संन्यास आणि अविवाहीत राहणे यांचा नक्की आहे. चाणक्यांनी हेरांबद्दल लिहिले हे ठीक पण चाणक्य स्वतः [उघड]हेर नव्हते. त्यामुळे हेराचा मुद्दा इथे का यावा तेच कळल नाही. याहूनही पुढची गोष्ट अशी की चाणक्य आणि कौटिल्य हे एक होते का वेगळे यावर अनेक तज्ज्ञांचे वाद आहेत. (परंतु तो वेगळा मुद्दा) वर एका प्रतिसादात सिकंदराबद्दल वाचले. सिंकदर बॅबिलोनियात मेला इ.स्.पूर्व ३२३ मध्ये. भारत सोडला इ.स.पूर्व ३२६ मध्ये. चाणक्यांचे योद्धा म्हणून किंवा ब्राह्मण सल्लागार म्हणून कोठेही कार्य त्या काळात नाही, त्याकाळात ते विशीत असावेत. सोळाव्या वर्षी तक्षशीलेला अध्ययनासाठी गेल्याचा उल्लेख वाचला आहे आणि त्यानंतर तेथेच अध्यापनाचे कार्य सांभाळल्याचा. म्हणजे बहुधा शिकून अध्यापन करत असावेत (वयाचा फारसा संबंध नाही ) आणि त्याकाळात ते फार प्रस्थापितही नव्हते. तक्षशीलेत सिकंदराला अटकाव झालेला नाही. ज्या माळवा आणि इतर प्रांतात झाला त्यांचा आणि चाणक्याचा संबंध नाही. तक्षशीलेवर स्वारी केली असता, तिथे जी वाताहत झाली त्यातून चाणक्य पाटण्याच्या दिशेनेच गेल्याची ऐतिहासिक शक्यता जास्त. असाच सनावळ्यांचा गोंधळ रामदास आणि तुकारामांबद्दल. इतिहासाचा विचार केला असता, रामदास आणि तुकाराम हे राजांना गुरुस्थानी असतील पण ते राजांचे गुरू नसावेत. राजांचे गुरू त्यांचे आई-बाप, दादोजी आणि तत्कालीन राजकारण.
सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं.
कोणत्या काळात? आता शिवरायांबद्दल, मी आठ लग्नांबद्दल बोलत नाही, त्याचा मराठी साम्राज्याशी काय संबंध? सोयरिक साधून मराठे बांधून ठेवणे इतकाच असावा. संभाजी आणि सोयराबाईच्या अंतर्गत राजकारणाकडे महाराजांनी लक्ष पुरवले असते तर मराठ्यांचा इतिहास बदलता. बाप आणि नवरा आणि राज्याच्या भविष्याची चिंता म्हणून या गोष्टींना महत्त्व देता आले असते. राज्याचा युवराज घडवण्यात महाराज कमी पडले. (पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे महाराजांना सर्वच करणे शक्य होते असे नाही पण त्यांनी या गोष्टींना महत्व दिले नाही, हे मुद्दामहून सांगण्यासारखेही काही नाही)

In reply to by प्रियाली

चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती. चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे. चाणक्य त्यावेळि गुरुकुलात शिकवत होते. आणि त्यांच्या हाताखाली चंद्रगुप्त, अक्षय अशी मुले शिकत होती आज त्यातील काहि विद्यार्थ्यांची नावे मिळतात. सिकंदराविरुध्द मालवक, क्षूद्रक इ.इ. गणाराज्यांनी युध्द केले होते. सिकंदराने पौरवाला हरवले खरे मात्र परीस्थिती बघुन त्याने पौरवाला राज्यावरुन काढुन टाकले नाहि. अंभीने सिकंदराला मदत केली व पुढे त्यामुळे पौरवाकडुन आपल्या राज्याला धोका होऊ नये म्हणुन सिकंदराला मध्यस्थी करायला लावुन पौरवाशी सोयरीक जुळवली, त्याच्या मुलीशी लग्न केले. पुढे सिंहारण्य या माजी सेनापतीला हाताशी धरुन चाणक्याने सिकंदरा विरुध्द विरोधाची फळी उभी केली. सिकंदाराच्या सेनेतील अंतर्गत कुरबुरीमुले सिकंदराने परतीचा रस्ता धरला तेव्हा सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले. पुढे मगध साम्राज्याच्या आजुबाजुच्या राजांशी हातमिळवणी करुन नंदा विरुध्द कारस्थाने करुन नंद वंशाच उच्छेद केला. व जेव्हा मगधाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या त्या राजांना रस्त्यातुन अनेक प्रकारे हटवुन चंद्रगुप्ताला सम्राट बनवले होते. आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती. महाराज जौहराच्या वेढ्यातुन निसटुन उगीच विशाळगडावर गेले नव्हते. विशाळगडाची भौगोलिक परीस्थीती या कारणा बरोबर विशाळगड हे महाराजांचे सासर होते जिथे दगा होण्याची शक्यता नव्हती या कारणासाठिच महाराजांनी विशाळगडाला जवळ केले. अजुन महाराजांच्या आयुष्यातले काहि प्रसंग सांगता येतिल. आणि युवराज-महाराणी यांच्या संघर्षाबाबत म्हणाल तर महाराजांना खरच तिथे लक्ष द्यायला वेळ नसावा. महाराज वर्षातले किमान ६ महिने राजधानी बाहेर असायचे पुढे तर दिड वर्षांच्या द्ख्खन मोहिमेवर गेले आणि तिथुनच तंट्याला सुरुवात झाली.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 18:38
चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती.
कशाबद्दल क्रांतिकार्याची दिक्षा? चाणक्य युद्धनिती शिकवत होता का? (राजनीती किंवा अर्थशास्त्र शिकवत असावा असे मला वाटते) कुठे बंडाळी, अव्यवस्था सुरु होती की चाणक्य क्रांतीकारी निर्माण करत होता? की सिकंदर चालून येतो आहे म्हणून तो ग्रीक सैन्याविरूद्ध विद्यार्थ्यांची फळी निर्माण करत होता? तक्षशिलेत असताना चाणक्य हा एक सामान्य तरूण अध्यापक होता. बाकी, काहीही योगदान नाही. चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असल्याबद्दल आजच कळले. असावाही मला फारशी कल्पना नाही परंतु चंद्रगुप्त सिकंदराच्या सैन्यातून लढल्याच्याही कथा-आख्यायिका सांगितल्या जातात. चंद्रगुप्ताचे वय त्याकाळात १३-१४ असल्याने तो कितपत लढला असावा याचीही कल्पना नाही आणि चंद्रगुप्त भारताच्या वायव्येकडे राहिला होता यालाही काहीही ऐतिहासिक पुरावे नाहीत. आहेत त्या सर्व कपोलकल्पित कथा.
चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे.
बांधली पण ती मगध साम्राज्याविरुद्ध. वायव्य भारतात अशी फळी बांधल्याचे मी कोठेही वाचलेले नाही पण संदर्भ आवडेल.
सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले.
क्रांतिकारकांनी नाही, लहान मोठ्या गणराज्यांनी गनिमी काव्यांनी हल्ले करून मारले आणि चाणक्यांचा किंवा त्याच्या तथाकथित दूरवर पसरलेल्या शिष्यांचा यात काहीही संबंध नसावा. तक्षशीलेची वाताहत, युद्धपरिस्थिती वगैरेतून सुटका करून चाणक्य पाटलीपुत्राच्या दिशेने गेला. तेथे नंदाच्या दरबारी त्याने नोकरी स्वीकारली. आपल्या हुशारीमुळे वर चढला आणि हेकटपणा मुळे मूर्ख नंदाची मर्जी गमवून बसला आणि मगध साम्राज्याशी वैर धरले. ही परिस्थिती येईपर्यंत तो मगधसाम्राज्यातील एक राजकारणी म्हणून प्रसिद्धी पावलेला होता आणि म्हणूनच आजूबाजूच्या लहान-मोठ्या राज्यांशी हातमिळवणी करू शकला.
आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती.
हे तर मी म्हटलेलेच आहे पण बळकटी शासन करत नाही. महाराजांच्या आठ लग्नांबद्दल माझे काहीच म्हणणे नसल्याने मी त्यावर विषय वाढवत नाही. युवराज आणि महाराणींचा तंटा मात्र खूप जुना होता आणि महाराजांचे त्याकडे दुर्लक्षच झाले.

In reply to by प्रियाली

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत? कारण चाणक्य अथवा चंद्रगुप्त यांची अचुक जन्म तारिख कोणालाच माहित नाहि. चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात. सिकंदराशी अंभीने हातमिळवणी केल्याची बातमी आल्यावर त्यांनी हि फळी बांधायला सुरुवात केली होती. राजाच नाकर्ता निघाल्यावर काय करणार? संदर्भा साठि भा.द.खेर यांचे चाणक्य वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचा. शिवाय अजुन अनेक पुस्तके मिळतील. शिवाय चंद्रप्रकाश द्विवेदि यांची चाणक्य हि सिरीअल लागायची सध्या तिच्या सीडिज मिळतात. चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि. अगदिच कोणावरहि विश्वास ठेवा असे मी सांगत नाहिये. तुम्हि म्हणता तसे तो नंदाच्या दरबारी होता कि नव्हता याबाबत दे़खिल दुमत आहे. मात्र चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 19:03
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असण्याचा आणि १२-१४ वर्षांचा असण्याचा आणि एकत्रित अनुमानाचा संबंध काय? चंद्रगुप्ताचे वय इतिहासकारांनी निश्चित केले आहे. त्यानुसार जन्म सुमारे इ.स्.पूर्व ३४० ते ३३५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. अचूक तारखा माहित असण्याचा प्रश्न नाही. नंदराज्याचा कालावधी, मौर्यराज्याचा कालावधी, चंद्रगुप्ताचा शासनकाळ, त्यानंतर आलेले राजे यावरून हे वय निश्चित केले जाते.
चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात.
चाणक्याने चंद्रगुप्ताला विकत घेतले, चंद्रगुप्त नंदाचा अनौरस पुत्रच होता, नंदाने त्याला पितृत्व नाकारले होते वगैरे वगैरे या फक्त आख्यायिकाच आहेत. त्यांना पुष्टी देणारे कोणतेही संदर्भ नाहीत.
चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि.
चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ज्ञानाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही परंतु त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी त्यांनी सांगितलेल्या घटना प्रमाण मानाव्या असे कुठे आहे? यासंदर्भात मी पार्थसारथी बोस, डॉ. बरुआ यांचे लेख काही काळापूर्वी वाचले होते, कोणीही चाणक्याने सिकंदराविरुद्ध लढाई लढण्याबद्दल म्हटलेले नाही. ग्रीकांचा इतिहास वाचलेला आहे. त्यात तत्कालीन अनेक लहान मोठ्या राजा किंवा सेनानींची नावे आहेत..कुठेही चाणक्याचे नाव नाही.
चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.
चाणक्याचा अपमान याच कारणासाठी झाला की तो नंदाच्या दरबारी होता, नंदाला सल्ल्यांची नाहीतर हुजर्‍यांची गरज होती आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते.

लिखाळ 28/08/2008 - 15:23
सौरभ, लेख ठिक वाटला. वक्तृत्व स्पर्धेतले भाषण असते त्या धाटणीचा वाटला. लेख शेवटीसुद्धा कोठलीच ठोस माहिती वा मत मांडत नाही त्यामुळे तो वाचून संपल्यावर टाळ्या वाजवण्यापलिकडे हातात काहिच राहिले नाही. >>आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती. या सारख्या वाक्यांमुळे मला तसे वाटले असेल कदाचित. असो. पण, आपण निवड केलेल्या चारही व्यक्ती या नक्कीच अनेक शतके भारतावर, त्याच्या संस्कृतीवर प्रभाव पाडणार्‍या आहेत हे सत्यच. यांबद्दल आपल्याला वाटणारा आदरसुद्धा योग्यच आहे. शंकराचार्य आणि विवेकानंद यांनी भारतभ्रमण करुन भारताचा, तेथील लोकांचा स्वभाव ओळखला होता. मला त्यांच्या समाजकारणाचा हा भक्कम पाया वाटतो. पुढे झालेल्या रामदास आणि इतरही काही संत (आणि समाजसेवकांनी) मंडळींनी भारतभ्रमण करुन रावा पासून रंकापर्यंत सर्व समाजजीवन जवळून पाहिल्यामुळेच त्यांना सामाजिक स्थितीवर काही ठोस मते बनवता आली आणि उपाय योजता आले असे वाटते. सध्याच्या नेत्यांनी कितीही प्रवास केला तरी ते एक तर्‍हेच्या प्रभावळीत राहुन प्रवास करतात. त्यांना हे भान येणे शक्य दिसत नाही. आपले इतरही काही लिखाण वाचले. आवडले. शुभेच्छुक --लिखाळ.

लेखन आणि चर्चा दोन्ही वाचत आहे. लेख सोपा करता आला असता या विचारांशी सहमत. आपण लेखासाठी निवडलेल्या श्रेष्ठ माणसांनी भारतीय मनाला नेहमीच भुरळ घातली आहे. इतिहासाची आठवण यासाठी करावी की, भविष्यातली पावलं दमदार पडावी. इतिहासातील चरित्र /विचारांच्या पावलावर पाऊल टाकून आपण महासत्तेकडे कुच केले पाहिजे हा लेखनातला आशावाद आवडला. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. हम्म, नक्कीच बनवू शकते. पण सुरुवात कुठून करायची ? त्याचे जर विवेचन आले असते तर, लेखाला चार चांद लागले असते, असो आपले लेखन आम्ही आवडीने वाचत असतोच , लगे रहो. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास

चिन्या१९८५ ·

चिन्या, ऐक चांगला विषय चालु केल्याबद्दल आभार. जॉर्जिया हा रशिया(USSR)तुन १९९१ साली फुटुन निघाला. (जॉर्जिया हा रशिया(USSR) मध्ये १९२३ साली गेला होता. स्टैलिन हा जॉर्जिया तलाच होता.) जॉर्जियाने आसेतियाचा २ स्वयंनिर्णय डावलले. मला वाटते आहे की हे चुकीचे आहे. रशियाचे म्हणतो की आम्ही आमच्या नागरीकांचे रक्षण करणार जरी ते दुसर्या देशात असले तरी. हे कितपत बरोबर आहे, ह्याची मला शंका आहे. सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

चिन्या१९८५ 14/08/2008 - 16:43
मुळात रशिया ज्या नागरीकांचे संरक्षण करायचे म्हणत आहे ते खरेतर आसेतियन्स आहेत्.दोन्हीही बाजु एकमेकांवर जिनोसाईडचा आरोप करत आहेत्.इथे रहाणार्‍यांना तर अजिबात कळत नाहीये की कोण बरोबर आहे ते

अनिल हटेला 14/08/2008 - 09:27
चिन्या !! छान लेख !! कारण बातम्या वाचुन झाल्या तरी नेमक काय घडल ह्याचा अन्दाज येत नव्हता... हे वाचुन थोडी आयडीया आली.... अजुन काही नविन असेन तर अप्डेट कर ना राव !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by अनिल हटेला

चिन्या१९८५ 14/08/2008 - 16:54
धन्यवाद आन्या. सध्या सीझफायर झाल आहे.पण काहीकाही लोकांच म्हणन आहे की साकश्विलीनी चांगलाच डाव टाकला होता. रशियाने जर प्रतिहल्ला केला नसता तर आसेतियन्स मरत होते त्यामुळे आसेतियन्सनी परत रशियात जायला पाठींबा दिला नसता आणि रशियानी हल्ला केला आणि साखश्विलीनी आंतरराष्ट्रिय मिडीयाला हाताशी धरुन आता रशियाची ओळख ऍग्रेसर( हल्लेखोर?) झालीय. त्यामुळे रशियाने आता एक बाजु घेतली आहे.आता रशिया जॉर्जिया आणि आसेतियन्सच्या भांडणात मध्यस्त म्हणुन येउ शकत नाही.

सुचेल तसं 14/08/2008 - 10:21
चिन्या, छान माहिती दिलीस... >>पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही नक्कीच!!! जन्माने जॉर्जियन असलेल्या स्टॅलिननेच जॉर्जियाचे (आणि आसपासच्या काही छोट्या प्रदेशांचे) स्वातंत्र्य चिरडुन त्याला सोविएट रशियाशी जोडले होते. खरं पाहता दक्षिण ऑसेशियातील लोकांना रशियातच राहणे पसंत आहे. त्यासाठी तेथे नोव्हेंबर २००६ मध्ये मतदानही घेण्यात आले होते. त्यात ९५% लोकांनी मतदान केले. मतदानाचा कौल पाहता सरळसरळ असे दिसले की सार्वमत हे रशियाच्या बाजुने आहे. एकुण मतांपैकी ९९% लोकांनी रशियात राहण्याला पसंती दिली. या सार्वमतावर ३४ देशांच्या आंतरराष्ट्रीय समितीने देखरेख केली होती. पण तरीही या सार्वमताच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांनी व अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिली नव्हती. जॉर्जियातच असलेल्या अबखाझिया प्रांतालाही स्वातंत्र्य हवे आहे व रशियाची त्यालाही सहानुभूती आहे. अमेरिकेला मुख्य भिती अशी वाटत आहे की रशिया कदाचित पुन्हा जुन्या सोविएट साम्राज्याचा विस्तार करत आहे. त्यामुळे कदाचित अमेरिका आता जॉजिर्याला शस्त्रास्त्रांची मदत करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रशिया आणि अमेरिकेत पुन्हा एकदा शीतयुद्ध चालु होईल. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

चिन्या१९८५ 14/08/2008 - 17:16
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद्.तुम्ही लिहिलेल्या गोष्टी अगदी बरोबर आहेत्.मुळात उत्तर आसेतियाप्रमाणेच दक्षिण आसेतियालाही जॉर्जियात रहायच नाहीये.साकश्व्हिलीनी पुर्ण प्रयत्न केला की अमेरिकेने अथ्वा नॅटोने यात लष्करी हस्तक्षेप करावा पण सध्या इराकमधील परीस्थितीमुळे अमेरिका हे करु शकत नव्हत व नॅटोने जरी लष्करी मदत केली असती तरी आमच्या देशात लुडबुड केली म्हणुन रशियाशी संबंध अजुन खराब होण्याची शक्यता होती.पण या युरोपियन देशांनी अनेक शस्त्रास्त्रांची मदत जॉर्जियाला केलेली आहे.त्याबद्दल सर्व सविस्तर माहीती रशियन चॅनेल्स दाखवत होते

मदनबाण 14/08/2008 - 18:31
चिन्याराव उत्तम माहिती दिलीत... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

खादाड_बोका 14/08/2008 - 19:05
चिन्याराव उत्तम माहिती दिलीत. ईथे अमेरीकेत मिडीया असे प्रोजेक्ट करुन राहीली आहे की सगळी चुक रशीयाचीच आहे. पण बिचार्‍या अमेरीकेन बापड्यांना कोण खरे शिकवणार ? तुमची माहीती ईंग्रजी मध्ये करुन दुसर्‍या ब्लॉगवर टाका, म्हणजे थोडा खरा प्रसार होईल. सत्यमेव जयते....

अभिज्ञ 14/08/2008 - 23:46
मला वाटते कि मिडियाची माहिती बर्‍याच वे़ळा हि सत्य सांगतेच असे नाहि. त्यातल्या त्यात बीबीसी,सीएनएन सारख्या वाहिन्या ह्या आंतर्राष्ट्रीय बातम्या देताना नेहमीच पाश्चिमात्य देशांशी सुसंगत धोरण अवलंबतात. पॅलेस्टाइन्-ईस्त्राइल,भारत-पाक,चीन-तैवान ह्या सर्व वादग्रस्त संबंधांवर पाश्चिमात्य देश विशेषतः अमेरीका,ब्रिटन ह्यांच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरुन ह्यांचे वृत्तनिवेदन असते. त्या पार्श्वभूमीवर रशिया-जॉर्जिया वादात हेच पहायला मिळणे स्वाभाविक आहे. छान माहितीबद्दल चिन्या तुला धन्यवाद. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

चिन्या१९८५ 15/08/2008 - 20:12
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अभिज्ञ!!!!!!तुमच म्हणन एका अर्थानी बरोबर आहे आणि यावेळी तर साकश्विलीने त्याचा व्यवस्थित वापर करुन घेतला

चिन्या१९८५ 16/08/2008 - 17:08
शनिवार १६ ऑगस्ट २००८ बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्‍या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा जॉर्जियाला पाठींबा आहे वगैरे. नेमस्तक ,वरील माहीती माझ्या लेखाच्या शेवटी टा़काल का???इथे माझे लेख संपादित करता येण्याची सोय आहे का???

In reply to by चतुरंग

चिन्या१९८५ 19/08/2008 - 15:14
धन्यवाद व्हिडीओ शोधल्याबद्दल्.त्या राइस बाईंच्या पत्रकार परीषदेचाही एक असाच व्हिडीओ आहे वाटत बहुतेक बघा- http://gandharvablog.blogspot.com/

अभिज्ञ 16/08/2008 - 18:59
आज पहाटे बीबीसीवर रशियन सैनिकांनी आंतरराष्टिय पत्रकारांवर केलेला जीवघेणा हल्ला दाखवण्यात आला. तो प्रकारहि भयावह होता. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

चिन्या१९८५ 16/08/2008 - 23:07
असेलही. काही सांगता येत नाही.दोन्हीही बाजु आक्रमक आहेत. आता जॉर्जियाने जर प्रथम हल्ला केला तर रशियाने आसेतिया जिंकुन थांबायला हव होत पण त्यांचे सैन्य नंतर जॉर्जियातल्या गोरी शहरातही घुसले

ऋषिकेश 17/08/2008 - 18:38
चांगले संकलन. असे संकलन देताना आधी दोन्ही देशांचा, प्रवृत्तीचा किंचीत इतिहास, सध्याचा वाद आणि नंतर युद्धाचे संकलन आले असते तर वाचायला अधिक मजा आली असती असे वाटते. परंतू हे सगळं वाचून एक गोष्ट स्पष्टपणेसमोर आली आहे ते म्हणजे "मिडीया" या आयुधाचा वाढता वापर. भविष्यातील युद्धात मिडीयाचा उत्तम वापर हे सामरीक कौशल्याचा भाग म्हणून गणले जाईल हे नि:संशय.! -('मिसळ'लेला)

In reply to by ऋषिकेश

जेम्स बाँड चा ऐक ह्याच्या वर आधारीत चित्रपट आहे. काही तरी, चीन आणि ब्रिटन याचा संघर्ष दाखवला आहे. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

In reply to by ऋषिकेश

चिन्या१९८५ 18/08/2008 - 00:18
स्टॅलिन हा सोव्हियत युनियनचा राष्ट्राध्यक्ष जॉर्जियन होता.त्या वेळी स्थापन झालेल्या सोव्हियत युनियन मध्ये जॉर्जिया होता. नव्वदीत जेंव्हा युनियन फुटली तेंव्हा रशियाची अनेक शकले पडली त्यापैकी एक जॉर्जिया होते.जॉर्जियामध्ये असलेल्या आसेतिया प्रांताला जॉर्जियात रहायचे नव्हते म्हणुन त्यांनी विरोध केला. उत्तर आसेतिया रशियाचा भाग झाला तर दक्षिण आसेतियाला जॉर्जियात रहायचे नव्हते.त्यावेळी जॉर्जियाने तिथे सैन्य घुसवले.जॉर्जिया जिनोसाईड करत आहे असे रशियाचे म्हणने होते. नंतर १५ वर्षापुर्वी रशियाने दक्षिण आसेतियात शांतीसेना पाठवली.ती शांतीसेना अजुनही तिथे होती.आत्ताच्या वेळी आधी हल्ला कोणी केला हे नक्की सांगता येत नाही पण एकुण दोन्ही बाजु ऐकल्यानंतर मला असे वाटते आहे की जॉर्जियाने आधी हल्ला केला.मग रशिया पण त्या भागात सैन्यानीशी घुसला. अशी एकुण पार्श्व्हभुमी आहे.प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्.माझे लेख बर्‍याचदा फार मोठे असतात असे अनेकांना वाटते म्हणुन मी याबद्दल लिहिले नव्हते गटणे ,बहुतेक तु 'टुमारो नेव्हर डाईज' बद्दल बोलतोय्.पण तिथे मिडीया युध्द घडवुन आणतो.इथे तसे नाहीये असे .

In reply to by चिन्या१९८५

विकास 19/08/2008 - 01:25
लेख आवडलाच! (आज वाचला...) स्टॅलीन हा "गोरी" भागातीलच होता. दोन दिवसांपूर्वी एनपीआर वर ऐकले त्यात एक अमेरिकन ऍनॅलीस्टच म्हणत होता की असा हल्ला जर मेक्सिकोने आपल्या सरहद्दिवर केला असता तर आपण काय केले असते? तेच रशियाने एक महासत्ता म्हणून केले.. पण ते लांब राहूंदेत - आपण (भारत/भारतीय) असे प्रकार/कुरापती होतात तेंव्हा कसे विचार करतो - आधी व्यक्ती म्हणून मग समाज म्हणून आणि मग त्याचाच परीणाम म्हणून राजकारणी म्हणून या वर बरेच काही विचार करायला लावणारे वाटते.

आज चांगला लेख मटामध्ये आलाय रशिया संपलेला नाही! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3391184.cms सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

चिन्या, ऐक चांगला विषय चालु केल्याबद्दल आभार. जॉर्जिया हा रशिया(USSR)तुन १९९१ साली फुटुन निघाला. (जॉर्जिया हा रशिया(USSR) मध्ये १९२३ साली गेला होता. स्टैलिन हा जॉर्जिया तलाच होता.) जॉर्जियाने आसेतियाचा २ स्वयंनिर्णय डावलले. मला वाटते आहे की हे चुकीचे आहे. रशियाचे म्हणतो की आम्ही आमच्या नागरीकांचे रक्षण करणार जरी ते दुसर्या देशात असले तरी. हे कितपत बरोबर आहे, ह्याची मला शंका आहे. सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

चिन्या१९८५ 14/08/2008 - 16:43
मुळात रशिया ज्या नागरीकांचे संरक्षण करायचे म्हणत आहे ते खरेतर आसेतियन्स आहेत्.दोन्हीही बाजु एकमेकांवर जिनोसाईडचा आरोप करत आहेत्.इथे रहाणार्‍यांना तर अजिबात कळत नाहीये की कोण बरोबर आहे ते

अनिल हटेला 14/08/2008 - 09:27
चिन्या !! छान लेख !! कारण बातम्या वाचुन झाल्या तरी नेमक काय घडल ह्याचा अन्दाज येत नव्हता... हे वाचुन थोडी आयडीया आली.... अजुन काही नविन असेन तर अप्डेट कर ना राव !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by अनिल हटेला

चिन्या१९८५ 14/08/2008 - 16:54
धन्यवाद आन्या. सध्या सीझफायर झाल आहे.पण काहीकाही लोकांच म्हणन आहे की साकश्विलीनी चांगलाच डाव टाकला होता. रशियाने जर प्रतिहल्ला केला नसता तर आसेतियन्स मरत होते त्यामुळे आसेतियन्सनी परत रशियात जायला पाठींबा दिला नसता आणि रशियानी हल्ला केला आणि साखश्विलीनी आंतरराष्ट्रिय मिडीयाला हाताशी धरुन आता रशियाची ओळख ऍग्रेसर( हल्लेखोर?) झालीय. त्यामुळे रशियाने आता एक बाजु घेतली आहे.आता रशिया जॉर्जिया आणि आसेतियन्सच्या भांडणात मध्यस्त म्हणुन येउ शकत नाही.

सुचेल तसं 14/08/2008 - 10:21
चिन्या, छान माहिती दिलीस... >>पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही नक्कीच!!! जन्माने जॉर्जियन असलेल्या स्टॅलिननेच जॉर्जियाचे (आणि आसपासच्या काही छोट्या प्रदेशांचे) स्वातंत्र्य चिरडुन त्याला सोविएट रशियाशी जोडले होते. खरं पाहता दक्षिण ऑसेशियातील लोकांना रशियातच राहणे पसंत आहे. त्यासाठी तेथे नोव्हेंबर २००६ मध्ये मतदानही घेण्यात आले होते. त्यात ९५% लोकांनी मतदान केले. मतदानाचा कौल पाहता सरळसरळ असे दिसले की सार्वमत हे रशियाच्या बाजुने आहे. एकुण मतांपैकी ९९% लोकांनी रशियात राहण्याला पसंती दिली. या सार्वमतावर ३४ देशांच्या आंतरराष्ट्रीय समितीने देखरेख केली होती. पण तरीही या सार्वमताच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांनी व अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिली नव्हती. जॉर्जियातच असलेल्या अबखाझिया प्रांतालाही स्वातंत्र्य हवे आहे व रशियाची त्यालाही सहानुभूती आहे. अमेरिकेला मुख्य भिती अशी वाटत आहे की रशिया कदाचित पुन्हा जुन्या सोविएट साम्राज्याचा विस्तार करत आहे. त्यामुळे कदाचित अमेरिका आता जॉजिर्याला शस्त्रास्त्रांची मदत करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रशिया आणि अमेरिकेत पुन्हा एकदा शीतयुद्ध चालु होईल. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

चिन्या१९८५ 14/08/2008 - 17:16
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद्.तुम्ही लिहिलेल्या गोष्टी अगदी बरोबर आहेत्.मुळात उत्तर आसेतियाप्रमाणेच दक्षिण आसेतियालाही जॉर्जियात रहायच नाहीये.साकश्व्हिलीनी पुर्ण प्रयत्न केला की अमेरिकेने अथ्वा नॅटोने यात लष्करी हस्तक्षेप करावा पण सध्या इराकमधील परीस्थितीमुळे अमेरिका हे करु शकत नव्हत व नॅटोने जरी लष्करी मदत केली असती तरी आमच्या देशात लुडबुड केली म्हणुन रशियाशी संबंध अजुन खराब होण्याची शक्यता होती.पण या युरोपियन देशांनी अनेक शस्त्रास्त्रांची मदत जॉर्जियाला केलेली आहे.त्याबद्दल सर्व सविस्तर माहीती रशियन चॅनेल्स दाखवत होते

मदनबाण 14/08/2008 - 18:31
चिन्याराव उत्तम माहिती दिलीत... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

खादाड_बोका 14/08/2008 - 19:05
चिन्याराव उत्तम माहिती दिलीत. ईथे अमेरीकेत मिडीया असे प्रोजेक्ट करुन राहीली आहे की सगळी चुक रशीयाचीच आहे. पण बिचार्‍या अमेरीकेन बापड्यांना कोण खरे शिकवणार ? तुमची माहीती ईंग्रजी मध्ये करुन दुसर्‍या ब्लॉगवर टाका, म्हणजे थोडा खरा प्रसार होईल. सत्यमेव जयते....

अभिज्ञ 14/08/2008 - 23:46
मला वाटते कि मिडियाची माहिती बर्‍याच वे़ळा हि सत्य सांगतेच असे नाहि. त्यातल्या त्यात बीबीसी,सीएनएन सारख्या वाहिन्या ह्या आंतर्राष्ट्रीय बातम्या देताना नेहमीच पाश्चिमात्य देशांशी सुसंगत धोरण अवलंबतात. पॅलेस्टाइन्-ईस्त्राइल,भारत-पाक,चीन-तैवान ह्या सर्व वादग्रस्त संबंधांवर पाश्चिमात्य देश विशेषतः अमेरीका,ब्रिटन ह्यांच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरुन ह्यांचे वृत्तनिवेदन असते. त्या पार्श्वभूमीवर रशिया-जॉर्जिया वादात हेच पहायला मिळणे स्वाभाविक आहे. छान माहितीबद्दल चिन्या तुला धन्यवाद. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

चिन्या१९८५ 15/08/2008 - 20:12
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अभिज्ञ!!!!!!तुमच म्हणन एका अर्थानी बरोबर आहे आणि यावेळी तर साकश्विलीने त्याचा व्यवस्थित वापर करुन घेतला

चिन्या१९८५ 16/08/2008 - 17:08
शनिवार १६ ऑगस्ट २००८ बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्‍या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा जॉर्जियाला पाठींबा आहे वगैरे. नेमस्तक ,वरील माहीती माझ्या लेखाच्या शेवटी टा़काल का???इथे माझे लेख संपादित करता येण्याची सोय आहे का???

In reply to by चतुरंग

चिन्या१९८५ 19/08/2008 - 15:14
धन्यवाद व्हिडीओ शोधल्याबद्दल्.त्या राइस बाईंच्या पत्रकार परीषदेचाही एक असाच व्हिडीओ आहे वाटत बहुतेक बघा- http://gandharvablog.blogspot.com/

अभिज्ञ 16/08/2008 - 18:59
आज पहाटे बीबीसीवर रशियन सैनिकांनी आंतरराष्टिय पत्रकारांवर केलेला जीवघेणा हल्ला दाखवण्यात आला. तो प्रकारहि भयावह होता. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

चिन्या१९८५ 16/08/2008 - 23:07
असेलही. काही सांगता येत नाही.दोन्हीही बाजु आक्रमक आहेत. आता जॉर्जियाने जर प्रथम हल्ला केला तर रशियाने आसेतिया जिंकुन थांबायला हव होत पण त्यांचे सैन्य नंतर जॉर्जियातल्या गोरी शहरातही घुसले

ऋषिकेश 17/08/2008 - 18:38
चांगले संकलन. असे संकलन देताना आधी दोन्ही देशांचा, प्रवृत्तीचा किंचीत इतिहास, सध्याचा वाद आणि नंतर युद्धाचे संकलन आले असते तर वाचायला अधिक मजा आली असती असे वाटते. परंतू हे सगळं वाचून एक गोष्ट स्पष्टपणेसमोर आली आहे ते म्हणजे "मिडीया" या आयुधाचा वाढता वापर. भविष्यातील युद्धात मिडीयाचा उत्तम वापर हे सामरीक कौशल्याचा भाग म्हणून गणले जाईल हे नि:संशय.! -('मिसळ'लेला)

In reply to by ऋषिकेश

जेम्स बाँड चा ऐक ह्याच्या वर आधारीत चित्रपट आहे. काही तरी, चीन आणि ब्रिटन याचा संघर्ष दाखवला आहे. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

In reply to by ऋषिकेश

चिन्या१९८५ 18/08/2008 - 00:18
स्टॅलिन हा सोव्हियत युनियनचा राष्ट्राध्यक्ष जॉर्जियन होता.त्या वेळी स्थापन झालेल्या सोव्हियत युनियन मध्ये जॉर्जिया होता. नव्वदीत जेंव्हा युनियन फुटली तेंव्हा रशियाची अनेक शकले पडली त्यापैकी एक जॉर्जिया होते.जॉर्जियामध्ये असलेल्या आसेतिया प्रांताला जॉर्जियात रहायचे नव्हते म्हणुन त्यांनी विरोध केला. उत्तर आसेतिया रशियाचा भाग झाला तर दक्षिण आसेतियाला जॉर्जियात रहायचे नव्हते.त्यावेळी जॉर्जियाने तिथे सैन्य घुसवले.जॉर्जिया जिनोसाईड करत आहे असे रशियाचे म्हणने होते. नंतर १५ वर्षापुर्वी रशियाने दक्षिण आसेतियात शांतीसेना पाठवली.ती शांतीसेना अजुनही तिथे होती.आत्ताच्या वेळी आधी हल्ला कोणी केला हे नक्की सांगता येत नाही पण एकुण दोन्ही बाजु ऐकल्यानंतर मला असे वाटते आहे की जॉर्जियाने आधी हल्ला केला.मग रशिया पण त्या भागात सैन्यानीशी घुसला. अशी एकुण पार्श्व्हभुमी आहे.प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्.माझे लेख बर्‍याचदा फार मोठे असतात असे अनेकांना वाटते म्हणुन मी याबद्दल लिहिले नव्हते गटणे ,बहुतेक तु 'टुमारो नेव्हर डाईज' बद्दल बोलतोय्.पण तिथे मिडीया युध्द घडवुन आणतो.इथे तसे नाहीये असे .

In reply to by चिन्या१९८५

विकास 19/08/2008 - 01:25
लेख आवडलाच! (आज वाचला...) स्टॅलीन हा "गोरी" भागातीलच होता. दोन दिवसांपूर्वी एनपीआर वर ऐकले त्यात एक अमेरिकन ऍनॅलीस्टच म्हणत होता की असा हल्ला जर मेक्सिकोने आपल्या सरहद्दिवर केला असता तर आपण काय केले असते? तेच रशियाने एक महासत्ता म्हणून केले.. पण ते लांब राहूंदेत - आपण (भारत/भारतीय) असे प्रकार/कुरापती होतात तेंव्हा कसे विचार करतो - आधी व्यक्ती म्हणून मग समाज म्हणून आणि मग त्याचाच परीणाम म्हणून राजकारणी म्हणून या वर बरेच काही विचार करायला लावणारे वाटते.

आज चांगला लेख मटामध्ये आलाय रशिया संपलेला नाही! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3391184.cms सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही.

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

चिन्या१९८५ ·

अन्या दातार 22/07/2008 - 16:17
हाच हरामखोर, @%$#^%$(या जागा वाचकांनी माझ्या तीव्र भावना लक्षात घेउन आपापल्या वकुबाप्रमाणे भराव्यात) एकदा म्हणाला होता-- दहशतवाद्यांना शिक्षा देउ नका. त्यांच्या घरच्यांना काय वाटेल??????? :O अर्थात या सगळ्या संधिसाधूपणाची सुरुवात महात्मा(?????) गांधींच्या काळातील काँग्रेसनेच केली आहे.

अनिल हटेला 22/07/2008 - 16:34
आन्या दमानी घे राजा!!! कितीहे चिडलास किवा काहीही केलस तरी ही किड एका दिवसात जानारी नाही.... वाळवी सारखी आपल्या लोकशाही ला चिकटली आहे.... त्यावर अगदी पद्धत शीर पणे इलाज करावा लागेल ... आणी सुरुवात स्वतः पासुन करावी लागेल.... सगळे ह``````` आहेत........ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रिय मित्र चिन्या१९८५, आपला लेख पाहून असं वाटत आहे की आपण शिवसेना, भा.ज.प., सगळे डावे, तेलुगु देसम, अकाली दल, रिपब्लिकन (अनेक) पक्ष, म.न.से. इत्यादी अनेक पक्षांच्या चुका, संधीसाधूपणाकडे दुर्लक्ष केलं आहेत. काही उदाहरणं देत आहे; माझी माहिती खूपच अपूर्ण आहे आणि थोडं विस्मरण यामुळे काहीच उदाहरणं असतील, सगळी नाही: १. भा.ज.प.: सध्याचा महत्त्वाचा प्रश्न (म्हणे) अणुकरार आहे. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे. यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत. "मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार (मी मंदिरा बेदीबद्दल बोलत नाही आहे). "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात! मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं. २. शिवसेना: यांचं विदेशी धोरण काय? या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? हा पक्ष म्हणे, मराठी लोकांसाठी, मातीसाठी जन्माला आला. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? लोकसभेचे प्रवक्ते म्हणून हे खासदार उत्तम. आपण म्हणता तसे धर्माधारित दंगे महाराष्ट्रात युतीच्या राज्यात झाले नव्हते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? आणि युती सत्तेवर येण्याचं कारण काय होतं ... धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. आणि या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... बाकीच्यांचं काय ते पाहूच! हे हिंदुत्ववादी सत्तेत येण्यासाठी दंगली करतात, करवतात, देवळं पाडतात, बांधायच्या गोष्टी करतात आणि सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. लोणी खाण्यातच सगळा वेळ गेला की दंगली करायला वेळ मिळत नाही आणि त्याची गरजच नसते. ३. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता. आता का बोंब मारतात की हा अणुकरार केला तर आपल्याला अणुचाचण्या करता येणार नाहीत म्हणून? प. बंगालमधे किती लोकशाही आहे आणि किती ठोकशाही हा संशोधनाचा विषय ठरेल; तिकडे खेड्यांमधे म्हणे, "डाव्यांना मत नाही दिलं तर तुम्ही खपलात, पुन्हा घरी/गावी जायचं नाव काढता येत नाही" ... हे मी एका अनुभवी बंगाल्याकडून ऐकलं आहे. ४. रिपब्लिकन: मी काय बोलणार यांच्याबद्दल ... नियमितपणे पेपर वाचणाय्रा माणसाला मी काही अधिक सांगायची गरज नाही, या लोकांच्या निष्ठा कशा, कधी बदलतात ते! आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण माझा मुख्य मुद्दा तो पण नाही आहे! धर्म हेच सर्वस्व आहे का? आज आपल्या देशासमोर धर्म हाच एकमेव प्रश्न आहे का? गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? सगळे लोक धर्मपरायण हिंदु झाले तर या समस्या सुटणार आहेत का? आपलं इथलं घेतलेलं नाव पाहून माझा अंदाज की आपला १९८५ सालचा जन्म असावा! वयाच्या २२-२३ व्या वर्षी (खरंतर कोणत्याही वयात) आपण (प्रत्येकानेच) हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता, pseudo-secularism यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा?? धर्म हेच सर्वस्व असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट सांगते. तेव्हाच्या भारतात जोपर्यंत इतर धर्माचे लोक आले नव्हते तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. ते जास्त सुखात रहात असतील या कट्टर हिंदुत्ववाद्यांपेक्षा! आजच्या काळातलं एक राजकीय सत्य आहे, "फोडा आणि राज्य करा." चिन्या आणि संहिताची, हिंदू आणि मुसलमानांची, उच्चवर्णीय आणि बहुजनांची जुंपवून द्यायची आणि आपण सत्तेचा आणि त्या अनुषंगाने येणाय्रा पैसा, ताकद यांचा उपभोग घ्यायचा. आपल्यासाठी (तुम्ही, मी, आपण सर्व) हेच चांगलं आहे की आपण वेळेत डोळे उघडायचे आणि दुसय्रांचंही शक्य तेवढं प्रबोधन करायचं. बघा विचार करा. पटलं तर ठीक आहे नाहीतर बॅण्डविड्थ / स्टोरेज-स्पेस फुकट घालवली म्हणून मला बोल लावा. आणि मिसळपावाचा आनंद लुटा. संहिता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत. यावर त्यांचे उत्तर आहे भारताच्या अण्विकअस्त्र सज्जतेवर टाच येत असेल तर हा करार मान्य नाही. कदाचित त्यानीच बोलणी सुरू केलेल्या कराराला विरोध का आहे ते समजून घेता येईल. "मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार . हा मुद्दा पटला. "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात! हे मुद्दे पटले. मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं गोध्र्याची रेल्वे जाळली तेव्हा तिथे ३००० लोकांचा जमाव त्यात सामिल होता. त्या जमावामुळे आगीचा बंब पोचण्यात अडथळे आले आणले गेले. आता हा ३००० लोकांचा जमाव काय फक्त गावगुंडांचा होता का? गोध्र्यातले गरीब बिचारे लोक आले होतेच ना रेल्वे जाळायला? बाकी हींदू धर्मत्याग करायचा असेल तर हरकत नाही पण मग कोणता धर्म घेणार? सगळीकडे या गोष्टी अशाच आहेत. आणि भारतात तरी धर्म जन्मावरूनच ठरतो जोपर्यंत तुम्ही आहे तो बदलून दुसरा स्वीकारत नाही तो पर्यंत. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? पोलिसांच्या गोळीबारासाठी युती सरकारला दोष देता येईल. पण मग त्याच्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे झालेली हिंसा तुम्ही विसरलात का काय?माझ्या लक्षात आहे चांगली(कारण माझ्या शाळेला २ दिवस सुट्टी मिळाली होती :) ) . ती युती सरकारने घडवून आणली असे म्हणायचे आहे का? असे म्हणणे म्हणजे बुशनेच वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडविले असे म्हणण्यासारखे आहे. या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... हो पण त्याच वेळेला प्रक्षोभक भाषणे करणार्‍या कोणत्याही मौलवीला अटक झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा वेळोवेळी प्रक्षोभक भाषणे करणार्‍या जामा मशिदिच्या इमामावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा भिवंडीला २ पोलिस कर्मचार्‍याना दगडाने ठेचून मारणार्‍यांवरही काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. धर्म हेच सर्वस्व आहे का? हो आहे. भारतात तरी. गेल्या १००० वर्षाचा इतिहास तरी तसा आहे. गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? तुम्ही काय केलेत? त्यासाठी मी हापिसात जाणे येणे सोडून इतर सर्व ठीकाणी सायकल ने येणे जाणे चालू केले. :) तसेच हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा न घेण्याचे ठरवले :) इतर आर्थिक समस्या निवारण करता येतील कदाचित पण सामाजिक समस्या कशा निवारण करणार. सामाजिक समस्याविरहीत समाज कुठे अस्तित्वात असेल असे वाटत नाही. पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५ 22/07/2008 - 21:43
धन्यावाद दोन्हीही आन्या आणि संहिता. संहिता,तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतो. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील. जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात हो.पण कारवाई तर केली ना!!! बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.आणि हे काम मुस्लिम करत नाहीत का???आमच्या एका ओळखीच्यांनी भिवंडीच्या दंगलीत मुस्लिम माणसाने हिंदु गरोदर बाईचे पोट फाडताना बघितले होते.या गोष्टी दोन्हीकडुन होतात्.आणि ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. काफीराला मारल्याने मुस्लिमाला स्वर्ग मिळतो असे म्हणतात तर विचेस ना मारण्याने सतन विरुध्द जाउन ख्रिस्ताच्या राज्याला आवश्यक आहे असे चर्च म्हणे. हिंदु धर्मात तरी तुम्ही मुस्लिमाला मारा म्हणजे तुम्हाला स्वर्ग्,आध्यात्मिक प्रगती मिळेल असे कुठेही लिहिलेले नाही . हिंदु सामाजिक कारणांनी मारतो तर मुस्लिम्,ख्रिश्चन धार्मिक कारणांनी मारतात्.म्हणुनच इराकच्या युध्दाला 'क्रुसेड्सचे युध्द' म्हटले होते बुशने.त्यामुळे बाईच्या पोट चिरण्यावरुन धर्मत्याग करणार असाल तर तो बालिशपणा आहे. गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे. धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं. जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते. यांचं विदेशी धोरण काय? कुठल्याही परकीय शत्रुला दयामाया न दाखवण व मित्राला मदत करण हे त्यांच परकीय धोरण आहे. या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? अणुकरार देशाच्या हिताचा आहे पण हाईड ऍक्टकडे दुर्लक्ष केले जाउ नये. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? म्हणजे मला नक्की कळल नाही तुम्हाला काय म्हणायचय ते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत. धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. हिंदुंच्या रक्षणार्थ ते उतरले त्याचा त्यांना राजकिय फायदा झाला. या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय?? सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. बेसलेस विधान आहे हे. अहो मुस्लिमांनी मुंबईत दंगलीची आधीच तयारी केली होती. शिवसेना होती म्हणुन मुंबईत हिंदु वाचला. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत. धर्म हेच सर्वस्व आहे का? जोपर्यंत हिंदुंची त्यांच्याच देशात हेटाळणी होतेय तोपर्यंत हे होणारच.रामाच्या जन्माचा पुरावा का लागावा???अयोध्येतील एक मशिद मुस्लिमांनी हिंदु बांधवांना दिल्यास काय बिघडते???रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे??? तुम्ही मुस्लिम्,ख्रिश्चन्सना का नाही हे सांगत्???आम्हालाच हे लेक्चर्स का मिळतात?? यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा?? या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे?? तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.

In reply to by चिन्या१९८५

अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे. अणुचाचण्या घेतल्या ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्या झाल्यानंतर लगेचच स्वतःहून बंदी घोषित केली ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. माझा आक्षेप त्याला नाही आहे. माझा आक्षेप आहे तो अणुकराराचं राजकारण करण्यावर! (मी त्याही पुढच्या काही गोष्टी सांगते: सुवर्ण-चतुष्कोन प्रकल्प, नदी-जोड प्रकल्प आणि असे इंफ्रस्ट्रक्चरचे (याला मराठी शब्द काय?) चांगले प्रकल्प वाजपयी सरकारने सुरु केले आहेत म्हणूनही अमेरीकन मंदीची झळ आपल्याला कमी बसली आहे, आणि भविष्यातही अशा संकटात कमी परिणाम होईल. माझा कोणत्याही एका पक्षाला ना विरोध आहे ना मी कोणा एका पक्षाची प्रवक्ती आहे. चांगल्या गोष्टी चांगल्याच असतात, आणि वाईट गोष्टी वाईट) हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही. कोणाला (साला) इथे धर्म हवाय? चांगलं, निर्मळ, आनंदी आयुष्य जगण्यासाठी धर्माची काहीही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. या धर्मावरून भांडणच होताना दिसत आहेत. मंदिर बांधायचं का नाही याचा माझ्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मंदीरावर पैसे खर्च करायचे का गरीबांच्या उन्नतीवर? आज आपल्याला दोन वेळचं खायला नीट मिळत असणार म्हणूनच आपल्याला धर्म सुचतोय! उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम? हे काम माझ्यासारखी तुच्छ लोक नाही करू शकत. त्यासाठी राजकीय, सामाजिक वजन लागतं. ज्यांच्याकडे ते आहे ते मंदीर आणि सेतूचं राजकारण करतात याचं दु:ख होतं. जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते. मी कोणताही धर्मग्रंथ वाचला नाही आहे. (आपण कुराण, बायबल, अवेस्ता का काय असतं पारश्यांचं ते, आणि इतर ग्रंथ वाचले असावेत असं मानून) आपल्या माहितीबद्दल मला आदर आहे. जगात एकही धर्म नाही ज्यात स्त्रिया, बालकं, गरीब यांचा खून झाला नाही आहे. "अश्वं नैव, गजं नैव, व्य्राघ्रं नैवच नैवच | अजापुत्रं बलिं दद्यात दैवो दुर्बल घातकः" असं आम्हाला शाळेत शिकवलं. असो. मुद्दा असा आहे की हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले? तेव्हा का गुळणी तोंडात असल्याचा आव आणला? मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला? ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. पण तिथे कोट्यवधी लोक उपाशी, अर्धपोटी जगत नाहीत. ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. हिंदूंना पोप नाही; पण काही शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. आपल्याला माहिती असल्यास कृपया उपलब्ध करून द्या. मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत. पुन्हा तोच मुद्दा! दुसय्राकडे बोट दाखवलं की आपण दोषमुक्त होऊ शकत नाही. आणि कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का? गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय?? तुम्ही फारच टोकाची भूमिका घेता बाबा! गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं. पण गांधीजींच्याप्रमाणे आपण सुचवता तसंही म्हणता आलं असतं. आता इथेच कोणीतरी "संहिताची अक्कलशुन्य टिका" असं म्हटलंय. यावर मी एवढंच म्हणेन, "मला अक्कलच नाही तर मी अक्कलपूर्ण टीका कशी काय करणार? थोडी अक्कल उधारीवर किंवा विकत द्याल तर मी जरा विचार करेन म्हणते." (उपवादः टीका करायला अक्कल लागत नाही. उचललं बोट आणि छापलं काहीबाही असं करता येतं.) गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे. मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका. आणि दुसय्राने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये अशी म्हण हिंदु धर्मातल्या गायीच्या पावित्य्रावरूनच आली आहे ना? जे जळले ते तर जिवानिशी गेले. त्यांचा सूड घेण्याचा हक्क या दंगलखोरांना (जन्माचा पुरावा न देऊ शकणाय्रा) रामानी स्वप्नात येऊन दिला का? आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? त्या न जन्मलेल्या जीवानी काय बिघडलवलं होतं हो कोणाचं? तो का गेला जीवानिशी?? डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत. काही पुरावा का हे पण रामाच्या जन्मासारखंच? सगळे म्हणतात म्हणून मी पण म्हणणार? रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे??? रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. (आत्ता माझ्या तोंडावर पुरावा नाही; पण शोधण्याची तसदी घेऊ शकते मी.) ती रचना तोडायची अशासाठी की त्यामुळे भारतातच इंधन वाचेल. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल. आणि तुम्हाला देव-धर्म हवे आहेत का सबंध पृथ्वीवरचे सजीव प्राणी, माणूस पकडून? तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे?? मान्य! पण आपले हे (म्हणे) हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! (पुन्हा माझी माहिती आपल्यापेक्षा कमी असेल तर मला माहिती देऊन उपकृत करा). आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील. मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. आणि मी मनाने नाही विचार करत. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे). ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. (आणि अजूनही माझा यावर विश्वास नाही). मी स्वतः जोपर्यंत तो वाचत नाही किंवा कोणी जाणकार माणूस त्यात काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत ते का मान्य व्हावं? आणि कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? मला खरोखरच हा मोठा प्रश्न पडला आहे. या लेखाच्या निमित्ताने तो पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे. जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत. मान्य! आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील. आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? "मंदिर बनवायच" हा अजेंडा मायावतींना पंतप्रधान व्हायचंय म्हणून ब.स.पा.ला मतं द्या एवढाच पोकळ आणि तकलादू आहे. संहिता हिंदू आहे का ? असेल तर..... हिंदु धर्माला तिच्या सारख्या स्वधर्मिय लोकांच्या विचाराची वाळवी लागली आहे....ति प्रथम साफ करायला हवि.... मी हिंदू आहे का नाही असल्या फडतूस प्रश्नांनी आपण व्यथित होऊ नका. वाळवी, राम-मंदीर, सेतूसमुद्रम सारख्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, प्रश्न अजून सुटायचे बाकी आहेत. संहिता अवांतरः या चर्चेत फार वेळ जात आहे माझा, टंकलेखन करण्यात. जर मी उत्तर दिलं नाही तर याचा अर्थ एवढाच की मी पृथ्वीबाहेरच्या अंतराळातील विश्वाला या धर्म, भाजप वगैरे गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देत आहे. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्या१९८५ 23/07/2008 - 17:28
अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मशिदी आणि चर्चेस बद्दल हे वक्तव्य का येत नाही???ख्रिश्चन्स भारतात फक्त ३% आहेत तरी त्यामानाने चर्चेस प्रचंड आहेत. हा सगळा पैसा कुठुन येतो??? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. हो.तिथे शाळा,दवाखानेही सुरु होतील्.तुम्हाला माहीत नसाव पण या देशातील अनेक मंदिर शाळा,दवाखाने,अन्नदान इत्यादी अनेक प्रकारचे समाजकार्य करतात. उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम? कालच तुम्हाला पेशव्यानी विचारल होत त्याप्रमाणे मीही विचारतो की तुम्ही यासाठी काय केलय्???तुम्ही काहीच चैन करत नाही का??ती चैन करण्याआधी तुम्ही उपाशी ,गरीबांचा विचार करत नाही का???मिसळपावचा आस्वाद घेण्यापुर्वी हा विचार का नाही येत?? हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले त्या बाबु बजरंगीने कशावरुन सत्यच सांगितल???त्याने थापा कशावरुन नाही टाकल्या???आणि त्याला कोणी समर्थन केल्याचही आठवत नाहीये. मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? पुरावा काय द्यायचाय त्यात्???प्रकरण न्यायालयात आहे.त्यामुळे असे पुरावे बाहेर दिले तर न्यायालयाचा अवमान होतो. न्यायालयात ते पुरावा देतीलच का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला? त्या स्टिंग ऑपरेशनच्या विश्वासार्हतेची तुम्ही काय तपासणी करुन पाहीली???दिसल की ठेवला विश्वास्.त्या स्टींग ऑपरेशनमधे एका मनुष्याला 'रिऍलिटी शो' सारखा एक शो करायचाय हे सांगुन त्याला एक स्क्रिप्ट देण्यात आली होती.त्या मनुष्याने स्क्रीप्टमधले डायलॉग्स म्हटले.आणि नंतर त्याने या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावाही केला आहे. आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. जे डिव्होट ख्रिश्चन्स आहेत ते प्रचंड कट्टर आहेत. अमेरीकेत एका चर्चने फलक लावला होता चर्चबाहेर 'ओसामा ऍन्ड ओबामा- आर दे ब्रदर्स???'. आणि नंतर म्हटल होत की 'अमेरिकेचा राष्ट्रपती जर नॉन ख्रिश्चन झाला तर काय होईल एव्हढच मला सांगायच होत'. आणि या इतरांचा धर्माला सैतानाकडुन आलेला म्हणणार्‍या ख्रिश्चनांना इतका पैसा युरोप,अमेरिकाच पुरवतो हे तुम्हाला माहीत नाही काय?? ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. पोपने मागच्याच वर्षी तुर्कस्तानला जाण्यापुर्वी 'मुस्लिम धर्म हिंसाचारी धर्म आहे' असे म्हटले होते ज्यावर त्यांनी प्रचंड टिका केली होती. आणि माओरी च काय धरुन बसलाय. 'विच हंट' द्वारे कित्येक हजारो महीलांना जिवंत जाळुन टाकण्यात आल होत चर्चद्वारे.ख्रिश्चन्सने इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली जितके लोक मारले आहेत त्याच्या कितीतरी कमी लोक सध्याचा 'इस्लामी दहशतवादाने' मारलेले आहेत. शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही त्यांची कुठलीच प्रतिक्रिया कानावर येत नसते.मुख्य म्हणजे शंकराचार्य आणि दंगलींचा काय संबंध??? कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का? खैरलांजीच्या वेळी कुठल सरकार होत्???मुंबईतल्या दंगलींच्या वेळी कुठल सरकार होत??पुण्यात काही वर्षांपुर्वी गणपतीच्या मंदिराची वटंबना झाली होती त्यावेळी कुठल सरकार होत???शिखांचे दिल्लीत्,कानपुरात हत्याकांड करणार कुठल सरकार होत???,कश्मिरातल्या हिंदुंना बेघर केल गेल तेंव्हा कुठल सरकार होत्???अशी अनेक उदाहरणे देता येतील. गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं अस केल्यानी मुस्लिमांनी शांतता राखली असती तर या देशात कधीच दंगली झाल्या नसत्या.मुळात मंदिरात घुसुन मुर्ती तोडलीच का???मागच्या वर्षी गणपतीत खामगावमधे दंगल उसळली.कारण काय तर मुस्लिमांनी मागणी केली की विसर्जन मिरवणुक थांबवा कारण तांच्या नमाजाचा टाइम होतोय. ती थांबली नाही तर मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला. हा काय माज्???आम्ही तुम्हाला म्हणतो का की गणेशोत्सव आहे तुम्ही नमाज थांबवा??? मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका. पोलिसांच काम पोलिस करत नाहीत म्हणुन लोकांना शस्त्र हातात घ्याव लागत्.भिवंडीत पोलिसांना अमानुषपणे मुस्लिमांनी मारुन टाकल तरी अजुनही काहीही झालेल नाहीये. आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? रेल्वेच्या डब्यात बसलेल्या भाविकांची मुस्लिमांना काय त्रास दिला होता???त्यांना हकनाक शिक्षा का झाली?? रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. मुर्खपणाच विधान आहे हे. तो मानवनिर्मित आहे का नाही यावर अजुन संशोधनच झालेल नाहीये.ऐतिहासिक पुराव्यांअंती तो मानवनिर्मित आहे हे स्पष्ट होते. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. आजची जी अवाढव्य जहाज आहेत ज्यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ती जहाज तिथुन जाउ शकत नाहीत्.त्यांना लंकेला वेढा घालुन यावच लागणार. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल तिथुन होणार ट्रॅफिक खुप कमी असणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवर काही फारसा फरक पडणार नाही.ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास डीइंडस्ट्रिअलायझेशन आवश्यक आहे .ते कराव का आपण्??त्सुनामीची शक्यता रामसेतु तोडल्याने वाढेल.तुम्हाला कणवला असलेल्या हजारो गरीब कोळ्यांना या प्रकल्पाचा त्रास होणार आहे.म्हणुन त्यांनीही सेतुसमुद्रमला विरोध केलाय..अमेरिकेतल्या जहाज कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतीय कोळ्यांच्या तोंडातला घास हिरावुन घेण तुम्हाला चालत का??? याबद्दल खालील लेख आवर्जुन वाचा- http://www.rediff.com/news/2007/apr/25tarun.htm?zcc=rl 'The Sethu Samudram does not make nautical sense'- http://www.rediff.com/news/2007/oct/01inter.htm 'Adam's Bridge a man-made structure'- http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm 'Widening Ramar Sethu can amplify tsunamis- http://www.rediff.com/news/2007/jun/22inter.htm 'Project won't bring development or employment'- http://www.rediff.com/news/2005/jul/19inter.htm The purely scientific case for Rama's Bridge- http://www.rediff.com/news/2007/sep/17rajeev.htm हे सर्व व त्या ठीकाणचे इतर लेख वाचा आणि सांगा काय ते. हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! काय कराव अस तुम्हाला वाटत?? मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. मग ही खुळचट कल्पना कुठुन आली तुमच्या डोक्यात?? ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ आहेत हेही तुम्हाला माहीत नाही?? कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येइपर्यंत माहीत नव्हत अस विधान तुम्ही केल होत. त्यामुळे धर्म म्हणजे तुमच काय मत आहे?? जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत. मान्य! म्हणजेच या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येण्यापुर्वी माहीत होत. आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? सुखाचा आणि याचा काय संबंध्???युरोप्,अमेरिकेत पैसा आहे म्हणजे कुठलीच समस्या नाही असे का??ते सुखात आहेत का???

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 24/07/2008 - 00:46
जरा वेगळा मुद्दा येथे चर्चेला आणतो... मोदींच्या बाजूने नाही .. मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? या संदर्भात मोदींच्या बाजूने म्हणून नाही पण योग्य भूमिका म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेले भाषण आठवले. संदर्भ होता अमेरिकेने मोदींना नाकारलेला "डिप्लोमॅटीक व्हिसा". मूळ भाषण लगेच मिळाले नाही पण रिडीफमधील दुवा मात्र मिळाला. या भाषणामुळे अनेक मोदी विरोधक संस्था/माणसांनी पंतप्रधानांवर टिका केली होती. त्यातील मूळ मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो खाली त्याच शब्दात लिहीतो. (त्यातील ठळक गोष्टी मी मला महत्वाचा वाटणारा मुद्दा म्हणून दाखवत आहे):
"I share the concern expressed in this matter on all sides of the House. When I came to know of the denial of visa to Shri Modi yesterday (Friday), I immediately instructed our external affairs minister to call the US ambassador and explain we are greatly concerned and we greatly regret the decision," Dr Singh said. The US decision lacks senitivity and courtesy, he added. "The American government has been informed that while we respect their sovereign right to grant and refuse visa to any person, we do not believe it is appropriate to use allegations or anything less than due legal process to make a subjective judgement," the prime minister said.
हे सांगायचे कारण काय? तर मोदींची चूक जी पंतप्रधान वाजपेयींना वाटली असे त्यांनी सांगीतले ती म्हणजे राजधर्म पाळला नाही ही होती. त्याबद्दल ते जाहीर बोललेपण होते. पण गंमत बघा इंदीरा गांधींच्या हत्येनंतर ३००० शिखांना निर्घृणपणे मारणारी दंगल झाली. त्याबद्दल सबरंग, टेस्टा सेटलवाड वगैरे अथवा तत्सम तत्कालीन सामाजीक नेते काही मानवी हक्काच्या नावाने बोलताना दिसत नाही. पण त्याहून ही आश्चर्य म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी काय म्हणाले होते? - "मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना! पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
  1. जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
  2. दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे. बाकी चर्चा चालू देत!

In reply to by विकास

इथे पहा. अशी हिम्मत कोणताही भारतीय सेक्युलर नेता दाखवेल तर त्याची धर्म निरपेक्षता खरी नाहीतर ते निव्वळ ढोंगच. असाच ढोंगीपणा शिखांच्या शिरकाणानंतरच्या राजीव गांधींच्या विधानात दिसतो असे वाटते. पुण्याचे पेशवे

In reply to by विकास

कोलबेर 24/07/2008 - 01:09
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.) ८४ साली काँग्रेसने चुका केल्या म्हणून आज भाजप किंवा इतर कुणाला चुका करायची मुभा मिळत नाही. मोदी सरकारने जे केले ते चूकच (ह्याबाबतीत तुमची सहमती ग्राह्य धरायची का?). त्याबद्दल जर मिडीयाने आवाज उठवला तर तुम्ही ८४ साली कुठे होता? आता गप्प बसा, असे म्हणण्यात काय हशील? निदान आतातरी प्रसार माध्यमांना खरी जाग आली असे म्हणू नये का?

In reply to by कोलबेर

८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.) म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला. म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का? मग माफी मागणे हे निव्वळ मतांसाठी केलेले ढोंग का वाटू नये. जर ते कुंपण झाड याच्या विधानासोबतच माफीची पुस्ती जोडली असती तर त्याला थोडाफार अर्थ होता असे म्हणता येईल. प्रसारमाध्यामांबद्दल स्वतंत्र चर्चा करता येईल सदर विषय राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा आहे त्यामुळे त्यावर वेगळे लिहीता येईल. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोलबेर 24/07/2008 - 01:39
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला.
होय,जमावाच्या प्रक्षोभाला आवरण्याच्या दॄष्टीकोनातुन दोन्ही दंगे वेगळे. सामन्य माणूस आणि पंतप्रधान ह्यातील फरक तरी तुम्हाला मान्य असावा.
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का?
असे माझ्या प्रतिसादात नेमके कुठे दिसते ते सांगा. दंगलही कुणीही /कोणत्याही कारणासाठी केली तरी असमर्थनीयच. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते. माफीचा मुद्दा ह्या वाक्या संदर्भात होता -
मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!

In reply to by कोलबेर

विकास 24/07/2008 - 01:31
सर्वप्रथम, "८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही." या आपल्या विधानाशी मी सहमत नाही कारण दंगल ही दंगल आहे, हिंसा ही हिंसा आहे त्यात जर सामान्यांचे आणि निरपराध व्यक्तींचे हाल होतात तर ती कोणाला मारले म्हणून कमी अथवा जास्त ठरत नाही कारण त्या संदर्भात एकाचे प्राधान्य पंतप्रधान असेल तर दुसर्‍याचे कारसेवक. बरोबर दोघेही नाहीत कारण कायदा हातात घेत आहेत. म्हणून असली हिंसा कोणिही केलेली योग्य म्हणणे मला पटत नाही. शिवाय सोनियाने माफी ही जस्टीस नानावटींचा शिखविरोधी दंगलीवरील रीपोर्ट प्रकाशीत झाल्यावर मागितली... पण, माझा मुद्दा मी माझ्याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मोदी अथवा दंगल समर्थनाचा नव्हता. तसेच राजीव गांधींच्या टिकेपेक्षा या संदर्भात जो दुटप्पीपणा असतो त्याबद्दलचा होता. म्हणून लोकशाहीचे तत्व म्हणून खालील दोन मुद्दे मान्य होतात का? का चुकीचे वाटतात?
पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
  1. जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
  2. दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे.

In reply to by विकास

कोलबेर 24/07/2008 - 01:58
प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते.
जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का? निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्‍याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय?
दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे?

In reply to by कोलबेर

विकास 24/07/2008 - 02:26
प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते. आपल्या मूळ प्रतिसादातील, "...देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे ..." हा जो भाग आहे त्यात स्वाभाविक / ऑब्व्हियस असणे हे आहे त्यात आपण प्राधान्य दिलेत असे वाटले. म्हणून म्हणले की आपल्याला पंतप्रधानाची हत्या स्वाभाविक कारण वाटेल तर दुसर्‍याला कारसेवकांची हत्या, तिसर्‍याला अजून काही तरी...आपले तसे म्हणणे नसेल तर ठीकच आहे. अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का? हो मला असेच वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जो पर्यंत कोर्टात अथवा संशयविरहीत एखादी गोष्ट सिद्ध झालेली नसेल तो पर्यंत त्या विरुद्ध, विशेष करून गुन्हेगार म्हणून बोंब करणे मला योग्य वाटत नाही. अतिरेकी म्हणून एन्काऊंटर केलेले पण अयोग्यच वाटते. संशयविरहीत म्हणजे कशी तर उदाहरणार्थ अमेरिकेतील रॉडनी किंग या काळ्या माणसाला पोलीसांनी कायदा हातात घेऊन बदडला आणि ते टिव्हीचॅनल्सनी सरळ प्रक्षेपीत केले. तेंव्हा कोर्टाच्या आधीपण पोलीसांचा माजोरीपणा सिद्ध झाला होता. निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्‍याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय? न्यायालयाच्या विरुद्ध बोंब मारा, आरोप सिद्ध न झालेल्या आरोपीच्या विरुद्ध नको. त्यातही मी आपल्याला स्मरणशक्तीच्या आधारावर जसे आठवते तसे एक उदाहरण सांगतो: जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपींना सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा झाली होती. सुप्रिम कोर्टानेपण ती वैध ठरवली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नाकारला होता. पण त्याची अंमलबजावणी करायचे कारण माहीत नाही पण लांबवले जात होते. जोशी-अभ्यंकर कुटूंबियांनी या संदर्भातपण बोंबाबोंब न करता सर्वोच्च न्यायालयाला आणि केंद्रसरकारला विनंती केली की भावनांशी खेळू नका आणि नंतर अंमलबजावणी झाली... न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे? राजकारणी, समाजकारणी आणि प्रसारमाध्यमांनी असे वागवणे. उदाहरणच द्यायचे झाले तर सावरकरांचे आहे - गांधी हत्येतून त्यांची विशेषकोर्टातून सन्मान्य मुक्ततता होऊनपण आजही काँग्रेसी, कॉमीज आणि विशेष करून इंग्रजी प्रसार माध्यमे त्याचा वापर करतात. अशा घटनासंदर्भात मला म्हणायचे आहे की,"जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?"

In reply to by कोलबेर

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:03
पण पंतप्रधानांची हत्या का झाली???जे ऑपरेशन ब्लु स्टार केले गेले त्यात किती निर्दोष लोक मारले गेले याची माहीती आहे का???ज्या दिवशी सुवर्णमंदिराचा स्थापना दिवस होता त्या दिवशी तिथे खुप गर्दी जमते.मग त्या दिवशीच हे ऑपरेशन ब्लु स्टार करण्ञाची गरज का होती???त्यामुळे शिखांकडे असा संदेश गेला की भारत सरकार आपल 'एथनिक क्लिनसिंग' करु पहातय. तडकाफडकी निर्णय घ्यायची घाणेरडी सवय इंदिरांना होती. भिंद्रनवाले जेंव्हा मु.म्बईला व इतर ठीकाणी गेला तेंव्हा त्याला अटक का केली गेली नाही?? आणि त्यानंतर पीमची हत्या झाली त्यानंतर ४००० शिखांची हत्या काँग्रेसने केली.यांचे हात रक्ताने इतके माखले आहेत्,त्यांना इतरांना कम्युनल म्हणायचा हक्कच नाही. आणि गुजरातच म्हणाल गोध्राबाबत सो कॉलड सेक्युलर्सना आम्ही ओरडताना पाहील नाही. मग हिंदु मेल्यावर तुम्ही दखलही घेत नाही आणि मुस्लिम गेल्यावर बेंबीच्या देठापासुन बोंबा मारता याला काय अर्थ आहे???आणि पींम चा खुन २ माणसांनी केला होता .ते दहशतवादी होते. आणि गोध्रात ट्रेन २०००च्या जमावाने जाळली होती. त्यामुळे पीएम च्या खुनच्या नंतर जनप्रक्षोभ स्वाभाविक होता तर गोध्रानंतर तो २००० पटींनी जास्त साभाविक होता

In reply to by कोलबेर

अमितकुमार 25/07/2008 - 11:50
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे आपल्याला असे म्हणायचे आहे का कि आपले नातेवाईक, भाउबंध, आप्तेष्ट याच्या निर्घण हत्ते पेक्षा देशाच्या पंतप्रधनाच्या हत्ते मूळे लोक अधिक पेटून उठ्तात ???? ८४ दंगे हे नालायाक कॉग्रेस वाल्यानि केले त्यात सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या माणसाचे सर्मथन कधिच नव्हते......... या उलट...२००४ चे दंगे.. हे सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या हिंदू पेटून उठल्यानेत झाले. २००४ मध्ये हिंदू जनतेने कॉग्रेसला दाखवून दिले कि तूम्हि कितिहि आम्हाला अहिंसेचे (षंड्।त्वाचे) डोस पाजा...... हिंदू हा प्रभु रामचंद्रा प्रमाणे वेळ पड्ल्यास शस्त्र उच्अलेल.

In reply to by विकास

चिन्या१९८५ 24/07/2008 - 13:54
काय आहे माहीती का विकासराव्,आपल्याभोवती एखादी गोष्ट जर का सतत घुमवली तर ती आपल्याला सत्य वाटायला लागते.मोदीविरोधाच तेच आहे. मिडीयानी हे इतक मोठ केलय की लोक मोदींची बाजु ऐकुन घ्यायलाही तयार नाहीत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संहिता, आपल्याला म्हणायच्या असलेल्या गोष्टी कुणी आयत्या मुद्देसूद मांडून दिल्या की किती बरं वाटतं म्हणून सांगू!

In reply to by मेघना भुस्कुटे

चिन्या१९८५ 25/07/2008 - 13:27
अहो,संहिताच्या पोस्टला उत्तरेही दिली आहेत. त्याच्याबद्दल संहिताने काहीही लिहिलेले नाही.तुमची आणि त्यांची मते एकसारखी असतील तर तुम्ही त्याला उत्तरे द्या

In reply to by चिन्या१९८५

या वादातून काहीच निष्पन्न होणार नाही, असा निष्कर्ष मला वाटतं संहितानी पुढे मांडला आहे. संहिताच्या या निष्कर्षाशीही मी सहमत आहे.

अनिल हटेला 23/07/2008 - 12:09
चीन्या !!! एकदम detail मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!! सहीता मॅडम बद्दल काहीही बोलण्यात हशील नाहीये... त्यान्ची चुकी नाही... "हिन्दू" धर्मीयानी अत्याचार सहन करत रहावेत ... कुणी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसावे अशी सर्व जगाची इच्छा आहे ... कारण आज पर्यन्त तसच होत आलये... सेक्युलर !! सेक्युलर !!! सेक्युलर !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by कोलबेर

चिन्या१९८५ 23/07/2008 - 22:40
तुमचा गळा कापायला आल्यावर तुम्हीच त्याचा गळा नाही तर ऍट्लिस्ट हात तरी कापा आणि तरीही मानला नाही तर गळा कापायलाही मागेपुढे पाहु नका. यात काही चुक नाही.सेल्फ डिफेन्स म्हणतात याला. आणि तुम्हाला कोणी हातच कसा लावतो????

अमितकुमार 23/07/2008 - 15:01
मि गुजराथ मध्ये राहतोय. संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण....... सत्य असे आहे. २००२ च्या दंगलीत.... ३५८ मुस्लिम (त्या पैकि ८२ पोलिस फायरिंग मध्ये) व १३४ हिंदु मारले गेलेत पैकि ७७ पोलिस फायरिंग मध्ये) १२ मशिदिची नासधूस झाली व ८२ छोटे मोठे मंदिराचि... त्या आधिच्या आकाड्या कडे नजर ताकु... १९८१ ते १९९४ पर्यतच्या हिंदु मुस्लिम दंगलित... १७०२ हिंदू व १८४ मुस्लिम....... सत्य हे हि आहे.... काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५% पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८% पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९% केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८% या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर..... हिंदूनी अत्याचार सहन करावे....प्रतिकार करायचा तो अहिंसेनी व कायद्यनि ....असा सर्व सहीता सारख्या "विचावंताचा"विचार....

नारायणी 23/07/2008 - 11:50
चिन्या, तुमचं पटतं पण तुमचा नेमका पवित्रा कोणता? तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि? मी पुन्हा सांगते, हिंदुंवर अन्याय होतात हे मला पूर्ण मान्य आहे पण तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही. खरंतर कोनाकडेही काही उपाय नाही. प्र्त्येक मुसलमान व्यक्ती वाईट नसतो. पण त्यांचे हे धर्मान्ध नेते,मौलवी त्यांना भडकवतात.तो दिल्लिचा ईमाम तर समाजासाठी अत्यंत घातक आहे. या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का? नाहि. कारण तेचं. मतं. तुम्ही पुन्हा म्हणाल कि केलं असतं पण आघाडिचं सरकार होतं. याचाचं अर्थ, बाकि सगळ्या पक्षांप्रमाणे भाजपालाही फक्त सत्ता हवी आहे. कोणत्याही पक्षाकडे काहिहि उपाय नाहि हेचं खरं आहे. काहि कठोर पाउले उचललि तर सगळिकडे दंगे उसळतील. पुन्हा निरपराध लोकचं बळि जातिल. हिंदु आनि मुस्लिम सगळेचं.

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 23/07/2008 - 22:52
निरपराध मुस्लिमांना मारा अस मी म्हणतच नाहीये.पण मुस्लिमांची ८०%हिंदुंना मारण्याची हिम्मतच झाली नाही पाहीजे. पण भिवंडीसारखी,मालेगावसारखी प्रकरणे होतात आणि मग मुस्लिमांना वाटते आपण काहीही कराव. त्यांना स्पष्ट समजले पाहीजे की हा हिंदुस्तान आहे.पाकिस्तान्,अफगाणिस्तान नाही. इथे राहुन हिंदुंवर हल्ले करुन चालणार नाही. अशी भिती त्यांच्यात असली तर आपोआपच हे सगळ बंद होईल. मी फक्त सेक्युलर डबल स्टँडर्ड्स दाखवुन दिले.जेंव्हा निरपराध हिंदु मरतो तेंव्हा हे सेक्युलरवादी निषेधही नोंदवत नाहीत आणि निरपराध मुस्लिम मरतो तेंव्हा हे हादरुन जातात,आरडाओरडा करतात. तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही. हिंसेचा आग्रह मी करतच नाही. गुजरातमधे अमानुष प्रकरण झाल पण गोध्रात मरणार्‍या हिंदुला मारणही तितकच अमानुष होत. या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का? कस कंट्रोल करणार त्याला??भाजप कंट्रोल ठेवु शकत नाही कारण समस्त सेक्युलर लगेच आकांडतांडव करतील. मुस्लिमांनी धर्मांधता सोडेपर्यंत या समस्येला उपाय नाही. त्यांनी धर्मांधता सोडली की प्रश्नच मिटेल्.पण गांधिवादी बनुन हिंदुंनी स्वतःचे वाटोळे करुन घेउ नये.

In reply to by नारायणी

तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि? गांधीजी म्हणत असत की 'कोणी तुमचा एक डोळा फोडला तर तुम्ही त्याचा एक डोळा फोडू नका अशाने सारे जगच एक दिवस आंधळे होईल'. पण मी म्हणेन माझा एक डोळा कोणी फोडला तर मी त्याचे दोन्ही डोळे फोडेन जेणे करून इतर अनेक लोकांचे दोन्ही डोळे अशा माथेफिरूपासून सुरक्षित राहतील. या साठी मला कोणी माथेफिरू म्हटले तरी हरकत नाही. कधी कधी जसात तसा जवाब देणे आवश्यक असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नारायणी 23/07/2008 - 23:54
नाही नाही मी निरपराध मुस्लिमांविषयी बोलत होते. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही अवश्य झोडा. मीही येईन तुमच्यासोबत. पण ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा करा. फक्त गुन्हेगार एका विशिष्ट धर्माचा होता म्हणुन त्या धर्माच्या एकुन एक माणसाला मारायला हवे, या भुमिकेच्या मी विरोधात आहे.

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:12
नारायणी,तुमच बरोबर आहे. पण तुमचा एक डोळा फोडण्याचा प्रश्न वेगळा आहे कारण एक डोळा फोडण एक आहे आणि एका २००-३०० च्या जमावाने तुमच्यावर हल्ला करण वेगळ आहे .नीरपराधांना मारायला नको हे मान्य आहे पण याची दखल मुस्लिमांनी घ्यायला हवी. धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती जी तुर्कीत मुस्तफ्फा केमालने घडवली तशी यांनी घडवायला हवी. कुराणातील मतांना बुध्दिवर तपासुन पहायला हवे. जी मते बुध्दिस पटत नाहीत व दुसर्‍यास अन्यायकारक आहेत(४ बायका,जिहाद्,काफीर इत्यादी) ती सोडायला हवीत.हाच याला उपाय आहे. नाहीतर असे दंगे होणारच.

अन्या दातार 23/07/2008 - 11:58
मि. मोदींनी गुजरातमध्ये जे काही केले त्याची फळे आता गुजरातमधील जनतेला आता मिळत आहेत. ती दंगल झाल्यानंतर एकदाही तिथे दहशतवादी हल्ला झालेला नाही. त्यांचे सगळे स्लीपर सेल्स बंद पडले आहेत. तेच भिवंडीत अगदी ठरवून पोलिसांची कत्तल करण्यात आली. तेथील मुसलमानांकडून परिस्थिती मुद्दाम चिघळवण्यात आली जेणेकरुन मुंबई उपनगरातील पोलिस तिकडे(भिवंडीकडे) वळले. आणि लगेच दोन दिवसात मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मात्र चुकीने भिवंडीतील कृत्य झाले असा निर्वाळा त्या संघटनेतर्फे करण्यात आला व कृत्याबद्दल माफी मागण्यात आली. अशा लोकांवर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुद्दा क्र.२] अफजल गुरु माफी प्रकरण ज्या अफजल गुरुवर असलेले सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झालेले आहेत; न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आहे त्याने आता राष्ट्रपतींना माफीचे पत्र पाठवले आहे. त्यावरील निर्णय अजूनही निकालात लागलेला नाही, कारण सरकारला मुस्लिमांची मते गमवायची नाहीत. त्याला जरी जन्मठेप झाली तर मग कोणीतरी दहशतवादी कोणातरी मंत्र्याचे, त्याच्या नातेवाईकाचे अपहरण करतील आणि त्याबदल्यात या देशद्रोह्याची सुटका करण्याची मागणी करतील. आणी षंढ सरकार ती मागणी पूर्ण करेल यात काही शंका असू नये. सुटका झाल्यानंतर हा माणूस अजून किती निरपराध लोकांचे जीव घेईल हा विचार कोणीच करणार नाही. मग कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेऊन त्याला फाशी का देऊ नये? मग कट्टर म्हणवून घेण्यात मला आजिबात गैर वाटणार नाही.

In reply to by अन्या दातार

चिन्या१९८५ 23/07/2008 - 22:54
बरोबर आहे तुमच्.पोलिस ,कायदे हे फक्त हिंदुंविरुध्दच कठोर बनतात. मुस्लिमांना गुन्हे करायला मोकळ रान मिळत. जर पोलिसांनी कठोरपणे आपल काम केल तर आपोआपच ही सर्व हिंसा थांबेल.

सुचेल तसं 23/07/2008 - 23:10
काही एन.जी.ओज, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवुन घेणारे समाजसेवक केवळ अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करताना आढळतात. कारण आपल्या देशात हिंदु हे बहुसंख्यांक आहेत आणि इतर सगळे धर्म अल्पसंख्यांक. मला कुठेही वाचल्याचं किंवा पाहिल्याचं आठवत नाही की एखाद्या हिंदु धर्माच्या माणसानी कोणावर धर्मांतराची जबरदस्ती केली आहे. आपण बर्‍याचदा "चलता है" असं म्हणुन चाललयं त्याकडे दुर्लक्ष करतो. अफजल सारख्या एखाद्या प्रकरणाचं पाकिस्तान किंवा तत्सम राष्ट्रामधे "भिजत घोंगडं" राहिलं नसतं हे नक्की. आणि चुकुन जरी राहिलं असतं तरी लोकांनी तुरुंगात घुसुन त्यांच्या संसदेवर हल्ला करणार्‍याला ठार मारलं असतं. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:16
सुपरकॉप के.पी.एस्.गिलनी अस दाखवुन दिल आहे की काही एन्.जी.ओ.ज स्वतः दहशतवाद्यांच्या विचारसरणीशी संलग्न आहेत. ते एन्.जी.ओ., ह्युमन राईट्स च्या नावाखाली देशद्रोह्यांना वाचवत आहेत

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सगळी कार्यकारिणी निद्राधीन झालेली दिसते. आम्ही तर काळजीपुर्वक वाचतोय !!! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 24/07/2008 - 01:01
मग http://www.misalpav.com/node/2550 ह्या धोरणाची अंमलबजावणी का होत नाहीये ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास 24/07/2008 - 01:02
जाती-धर्म विषयक लिखाणाचे मिपाचे धोरण ??? उगाच तात्विक प्रतिसाद देण्याऐवजी चर्चेची "कत्तल' करायला हवी होती. मिपाचे धोरण विसरूनच गेलो :) चाळीशी नंतर असेच (विसरणे) होणार काहो ? ;)

प्रियाली 24/07/2008 - 01:08
याबाबत योग्य आहे असे वाटते. वर एका सदस्येवर झालेल्या चिखलफेकीचे प्रतिसाद मी उडवले आहेत.

In reply to by प्रियाली

टिउ 24/07/2008 - 01:29
प्रतिसाद तसेच ठेवुन सदस्यास समज देण्यात यावी...म्हणजे नंतर वाचणारयांना मिपाचं धोरणही कळेल (वैयक्तीक टिका) आणि कोण कसं वागतं/लिहितं तेही कळेल... तीन वेळा समज दिल्यावर सदस्यत्व रद्द करण्यात यावं... अश्या प्रकारच्या लेखांना मिपा वर जागा असु नये असं वाटतं.

सुनील 24/07/2008 - 10:27
वास्तविक ह्या निरर्थक चर्चेत भाग घेण्याची इच्छा नव्ह्ती. परंतु अमितकुमार यांनी आकडेवारी सादर केल्यामुळे लिहावेसे वाटले. मोघम विधानांकडे सहज दुर्लक्ष करता येते पण आकडेवारीला एक प्रकारचे वजन असते आणि त्यामुळे अधिकृतपणाचा आभास निर्माण होतो. प्रेषक अमितकुमार ( बुध, 07/23/2008 - 15:01) . सत्य हे हि आहे.... काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५% पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८% पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९% केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८% या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर..... वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल. कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे. तसेच केरळातदेखिल हिंदूंची संख्या ५६.१६% आहे. १९५१ चे खात्रीलायक आकडे मला उपलब्ध होऊ शकले नाहीत. तुमच्याकडे असतील तर त्याचे source द्यावेत म्हणजे पडताळणी करता येईल. १९५१ सालच्या पाकिस्तानात आजचा बांगलादेशही समाविष्ट होता, हे तुम्ही ध्यानात घेतले नसेल तर पाकिस्तानातील हिंदूंच्या संखेबद्दल केलेली तुलना ही संत्र्या-सफरचंदाच्या तुलनेसारखी ठरेल! सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत? बाकी लेख आणि इतर प्रतिक्रिया याबाबत आनंदी-आनंद आहे!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अमितकुमार आपण माझ्या माहितीच्या स्रोताबद्दल पुढील विधान केले आहे: संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण....... मी (माहितीजालावरील) वृत्तपत्र आणि माहितीजाल वाचून, माहिती मिळवली आणि माझी मतं गोळा केली. त्यामुळे तुमचं विधान नक्कीच अर्धतरी खरं आहे. आता हे सर्व किंवा काही स्रोत किती "बाजारू" आहेत याची मला कल्पना नाही. पण जेव्हा धूर येतो तेव्हा तिथे आग असण्याची शक्यता खूपच जास्त असते. आणि जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचणारी ९९% पेक्षा जास्त प्रसिद्धीमाध्यमं एकच घटना सांगतात तेव्हा माझ्यासारखे लोक त्यावर विश्वास ठेवतात. या स्रोतांच्या "बाजारू"पणाबद्दल माझ्यापर्यंत कुठूनही काहीही आकडेवारी पोहोचत नाही तेव्हा मी कशावर विश्वास ठेवावा. दुसरा मुद्दा: अमितकुमार साहेब, आपण ज्या विश्वासाने ही आकडेवारी छापली आहेत, गुजराथमधे राहता असे म्हटले आणि प्रसिद्धीमाधमांवर अविश्वास दाखवला त्याचा अर्थ माझ्या (रिकाम्या) डोक्याने असा काढला की आपण स्वतः गुजराथमधे फिरून ही आकडेवारी जमा केली. (जर तसं नसेल तर कृपया माझा गैरसमज दूर करा.) तर मी आपल्या व्यासंग आणि चिकाटीला दाद देऊन विचारते की आपण तेव्हा फक्त आकडेवारी गोळा केलीत का "योग्य" (याचा अर्थ आपण हिंदू आणि दंगलपीडीत किंवा फक्त दंगलपीडीत असा घ्यावात) लोकांना मदतही केलीत? काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५% याचं सर्वात मुख्य कारण लादलेलं किंवा परिस्थितीप्राप्य स्थलांतर! माझा असा अंदाज आहे की सर्वांनाच ही परिस्थिती काय ते आपण सर्वांनाच माहित आहे. आणि मी त्या कारणाचं समर्थन करीत नाही. पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८% पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९% दुसय्रा देशात कायदे वेगळे आहेत आणि मी स्वतः कधीच या देशांत जाऊन पाहून आले नाही. पण त्याच (बाजारू?) माधमांकडून मिळालेली माहिती: पाकिस्तानात किमान एकतरी हिंदू न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहे; आणि त्यांनी हंगामी सरन्यायाधीश म्हणूनही काम केलं आहे. पण माझा मुद्दा असा आहे की जर या "काथ्याकूटा"ची सुरुवात जर भारतातील राजकीय पक्षांपासून झाली आहे तर आपण पाकिस्तानातली आकडेवारी दाखवून भारतातल्या राजकीय पक्षांवर आगपाखड करू नये. आणि तरीही तुमच्या या बहुसंख्यांच्या धर्माची कड घेणाय्रा पक्षाने कधी पाकिस्तान / बांग्लादेशाला खडसावल्याचं माझ्या ऐकीवात नाही. उलट कारगिलच्या युद्धात सरकारकडून किती हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे आपले किती सैनिक धारातिर्थी पडले याची आकडेवारी आपण देणार नाही का? कारण माझ्या आकड्यांवर आपण कवडीभर विश्वासही ठेवणार नाहीत. तर याच युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या शवपेटीकांच्या घोटाळ्याचं काय? तो पण वाजपेयी सरकारच्या कारकीर्दीतला आहे. देशासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकणाय्रा सैनिकांना तुमचे हिंदुत्त्ववादी पक्ष ही अशी वागणूक देतात. रामानीच म्हटलं आहे ना रामायणात "मरणान्तानि वैराणि"? इथे तर स्वतःच्याच सैनिकांच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या होत्या. केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८% मी तुम्हाला माझ्या एका चांगल्या मित्राने सांगितलेला किस्सा सांगते. तो खडकीला (पुण्यातच आहे हे ठिकाण, केरळ, काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेश नव्हे ... भटा-बामणांचं पुणं) एका ठिकाणी धर्मांतर चाललं होतं तिथे गेला होता; असंच पहायला की लोकं का धर्म बदलतात. तिथे बरेचसे कनिष्ठ आर्थिक वर्गातलेच लोक दिसत होते. याने काही लोकांना विचारलं तुम्ही धर्म का हो बदलतात. त्यावर त्यांचं उत्तर होतं, "आपले राम वगैरे काही पावरबाज नाहीत; पण त्यांचा देव जाम पावरफूल असतो; जाम भारी असतो म्हणून आमी आलो हिकडं." आणि त्यांच्यावर कोणीही काही सक्ती केली नव्हती, मतपरिवर्तन असेल तर गोष्ट वेगळी. आता पुढे माझा प्रश्न ऐका: या लोकांना जर हिंदू धर्मात धरून ठेवायचं होतं तर का नाही त्यांना योग्य शिक्षण दिलं गेलं? या धर्मांतराचा सक्तीशी काहीही संबंध नाही हे मी पुनःपुन्हा सांगत आहे.

अमितकुमार 24/07/2008 - 11:23
प्रेषक सुनील ( गुरू, 07/24/2008 - 10:27) .--- वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल. wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites, अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल. कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे. मि काश्मिर बद्द्ल लिहले आहे.... जम्मु व काश्मिर बद्द्ल नाहि. सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत? भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि.

In reply to by अमितकुमार

भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि. तुमच्यासारखा विचार प्रत्येकाने करावा अशी काही सक्ती आहे का हिंदू धर्मात/धर्मग्रंथात किंवा आधुनिक संदर्भपुस्तकांमधे? wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites, अच्छा असं आहे तर! आता तुम्हाला वैज्ञानिक जगातल्या काही गोष्टी सांगते. आम्हाला सगळ्यात पहिले सांगतात, की wikipedia हा संदर्भ मान्य होत नाही. याचं कारण असं आहे की उद्या मी काहीही लिहिलं तिथे, खोटंनाटं, तर ते मान्य करावं का? पुन्हा मी पाकिस्तानबद्दल बोलणार नाही. बाहेरच्या देशांवर अजूनतरी आपले राजकीय पक्ष राज्य करत नाही. आणि जसं आपण म्हणता की ही "बाजारू" (मला हा शब्द बिलकुल आवडला नाही आहे, पण आपल्यामुळेच मी अजूनही तो वापरत आहे) माध्यमं जे काही म्हणतात त्यावर आपण विश्वास ठेवत नाही तसंच नावातच एवढा धर्म असणाय्रा माहितीस्थलांवर आम्ही का विश्वास ठेवावा हो? काही तटस्थ संदर्भ (उदा: भारत सरकारचं माहितीस्थल) दाखवा मी मान्य करेन. (तटस्थ) संहिता

In reply to by अमितकुमार

सुनील 24/07/2008 - 13:04
wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites, अच्छा तर हे तुमचे खात्रीशिर माहिती देणारे स्त्रोत! मग चालूद्यात तुमचं, माझं काऽऽऽही म्हणणं नाही!! अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल. एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल. शुभेच्छा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अमितकुमार 24/07/2008 - 13:15
एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल. माझ्या बांधवावर कोठे अत्याचार होतोय याचि दखल घ्यायचि...कि बाकि धर्मियावर हि अत्याचार होतात त्यामूळे हे चालतेच असे मानून गप्प बसायचे....

In reply to by सुनील

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:27
सुनिल आणि संहिताच मत काय आहे हेच कळत नाही. अरे पाकिस्तानात्,बांग्लादेशात हिंदुंची निर्घुण हत्या अथवा तलवारीच्या जोरावर धर्मांतर केल गेल हे कुणालाही अमान्य होणार नाही.काश्मिरात तर हिंदुंना ' उद्या सकाळपर्यंत घर सोडून जा नाहीतर जगणार नाही आणि जाताना आपली बायको आणि मुली इथेच सोडुन जा' असे फतवे निघाले तेंव्हा तुम्ही लोक कुठे होता???कित्येक काश्मिरी हिंदु आता रेफ्युजीसारखे रहात आहेत. त्यांचे काय???आणि दुसर्‍या प्रकारच धर्मांतर मीही डोळ्यांनी बघितलय. सुमो वगैरे गाड्यांमधुन मिशिनरीज येतात्.पैसे काढतात गरीबांना देतात आणि धर्मांतर घडवुन आणतात. मणिपुरमधल्या एका ओळखिच्यानी सांगितल होत की त्यांच्याकडे मिशिनरीज मोठी बिल्डींग बांधतात आणि नंतर सांगतात की ख्रिश्चन व्हा आणि ही बिल्डींग तुमच्या नावावर करुन घ्या. हे बेकायदेशिर आहे. आम्ही गरीब म्हणुन आमचा धर्म संपवावा हे चुक आहे.

In reply to by चिन्या१९८५

अमितकुमार 24/07/2008 - 14:38
त्यांना फक्त ऐवढेच म्हणायचे असेल....जो पर्यत मुस्लिमाच्या धर्मांधतेचा त्रास आम्हाला होत नाहि तो पर्यत आम्हि ह्या सार्‍या कडे काना डोळा करू.........

अन्या दातार 24/07/2008 - 11:43
गांधी: भारतवासीयांनो, शत्रुवर विश्वास ठेवा, त्याच्यावर प्रेम करा. सावरकरः शत्रुवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा सावरकरः स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. हिंदूंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा गळाच उरत नाही. गांधी: मी पण एक हिंदू आहे. हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात. सावरकरः तुम्ही पोकळ हिंदू आहात. प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य आहे; श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. सज्जनाच्या रक्षणासाठी देवांनाही हातात शस्त्रे घ्यावी लागतात. गांधी: शत्रुशी लढायचे असेल तर तत्त्वांशी लढा. हाती शस्त्र घेणे कदापि वाईटच सावरकरः युद्धात तत्त्वे नाही, तलवारी टिकतात व जिंकतात.राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात. तत्त्वांनी नव्हे. गांधी: हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रुचे मन जिंका सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते यानुसार जे लोक हिंदूंची देवळे, मुर्त्या यांची नासधूस करतात त्यांना अजून मंदिरे मोकळी करुन देण्यात काहीच उपओग नसतो. त्यांना काठीनेच वठणीवर आणावे लागते कधीतरी या विषयावर पाहुणा संपादक म्हणून सविस्तर लिहिनच.

In reply to by अन्या दातार

आपण जो वाद इथे दिला आहेत त्याचा संदर्भही दिलात तर बरं कारण आज या दोन्ही व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या नावावर खपवल्या जाणाय्रा विधनांचा बचाव करण्यासाठी हयात नाहीत. जर हा वाद खरा आहे असं मानलं तर ... १. स्वातंत्र्यवीरांनी कधी निर्दोष लोकांना मारा असं सांगितलं का? २. गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा याच गांधींनी म्हणे असंही सांगितलं की पळपुटेपणा करण्यापेक्षा आक्रमकाचा प्रतिकार करा. ३. सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते पुन्हा तेच, सावरकर असं म्हणाले का, "त्यांनी मंदिर फोडलं तर तुम्ही मशीद्/चर्च पाडा"? याच हिंदू धर्मातल्या ज्ञानेश्वरांनी शेवटी हे ही सांगितलं, "दुरितांचे तिमिर जावो" संहिता

अनिल हटेला 24/07/2008 - 12:31
हाच तर प्रॉब्लेम आहे आपला !! आप्न सर्वाना समानतेची , अहिन्सेची च शिकवण देत आलोये... आज वर्च्या इतीहासात आपण ( भारत देश म्हणा किवा हिन्दुनी म्हणा) कधीच कुणावरही जाअणुन बुजुन आक्रमन ही लेलेल नाही.किवा कुणाच्या स्वातन्त्रायावर ही घाला घातलेला नाही.. आपली सभ्यता आपल हिन्दु धर्म सान्गतो की प्रेमाने जिन्का !! मान्य !! एकदम मान्य !! पन लातो के भूत बातोसे मानते नही !! पार सन्सदे वर हल्ला करण्या इतपत ह्या लोकाची हिम्मत होते... आणी आपन अजुन ही न्यायदेवतेचा मान ठेउन त्याच्या शिक्षेची अम्मल बजावणी केलेली नाही... प्रत्येक वेळी असच होत आलये ... का म्हणुन प्रत्येक वेळी सहन करत रहावे आपनच !! तीकडे इस्रायल मध्ये काहीही घातपात झाला की सरळ रणगाडे घेउन घुसतात ते !! आपणच काय म्हणुन ह्यान्न प्रेमाने शिकवण्याचा प्रयत्न करावा .. आणी किती वेळ !!! वरील सहीता मॅडम असोत वा सुनिल राव !! ह्याच्या मताचा च मी पण आहे !! पण कधीतरी रक्त खवळून येत !! (इथ मिपा च्या धोरणानुचा आदर ठेउन अगदी मवाळ भाषेत लिहिल आहे ,वास्तवीक सेक्युलर पणाचा कोणीही आव आणला की ~~~~~~~~) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

या सर्व वादा-प्रतिवादानंतर मला असं वाटतंय की मी इथे एवढा वेळ का "घालवते" ते ही जरा सांगावं. यात महत्त्व मला नाही तर कारणाला आहे, मी निमित्त आहे. अनेक लोकांची विचार करण्याची पद्धत थोड्या-बहुत फरकाने माझ्यासारखीच असेल पण त्यांना वेळ नसेल, (किंवा माझ्यासारखे ह.प.चे धं. करण्याची इच्छा नसेल,) किंवा मी बोलत आहे ते पटत आहे म्हणून शांत बसत असतील किंवा काहीही कारण असेल. तर असं नमनाला थोडं तेल वाया घालवल्यावर ... ० माझ्या मते सगळेच राजकीय पक्ष थोड्याफार फरकाने स्वतःचंच कल्याण करण्यासाठी आहेत; सामान्य, कर-भरणारी आणि कर भरण्याच्या उत्पन्नाच्याही खाली असणारी, दोन वेळचं खायलाही न मिळणारी जी बहुसंख्य जनता आहे त्यांच्यासाठी विचार, कृती करणारे फारच कमी राजकारणी असतील. जे असे भले लोक असतील, त्यांतसुद्धा किती लोक non-polar (मी secular मुद्दामच म्हणत नाही आहे) असतील माहिती नाही. ० या देशात आणि संपूर्ण जगातच थोड्याफार फरकाने काही गट आहेत; उदा: श्रीमंत आणि गरीब, संधी मिळालेला वर्ग आणि वंचित वर्ग, ज्यांना दोन वेळेचं पोटभर जेवण मिळतो तो आणि ज्यांना एक अधिक मूल म्हणजे कमावणारे दोन जास्तीचे हात हे कळतं तो वर्ग. तर यातल्या दुसय्रा प्रकारच्या लोकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात जर आपण फक्त नैसर्गिक नियम मान्य केले तर गरीब, दुबळे लोक मरू देत असं म्हणता येईल. पण आपल्या आणि इतर बय्राचशा देशात मानवतावादी दृष्टीकोन कायद्याने मान्य केला आहे आणि राज्य कायद्याचं आहे. त्यामुळे या वंचित वर्गाच्या कल्याणची जबाबदारी बहुतांशी policy makers => राजकारणी लोकांवर आहे. (अर्थात आपण आपली जबाबदारी मान्य केलीच पाहिजे पण ती तुलनात्मकरित्या कमी येते. उदा: मी सायकल घेऊन हापिसात आले म्हणून ग्लोबल वॉर्मींगवर लक्षणीय परिणाम होणार नाही, पण मी माझ्या जबाबदारीतला थोडा वाटा तरी उचलते.) ० भारतात आणखी एक गंमत आहे; बहुसंख्य लोकांना (उदा: हिंदू) असं वाटतं की आपल्यावर अन्याय होतो, कारणं अगदी गांधीजींपासून दिली जातात. आणि इतर बय्राचशा अल्पसंख्य लोकांप्रमाणे मुसलमानांना असं वाटतं की आम्हाला डावलतात. आता दोन्ही गोष्टी खय्रा असतील तर फायदा कोणाचा होतो? राजकारणी आणि उद्योगपतींचा? बहुतेक हो! हे उत्तर योग्य वाटतं. ० हिंसेमुळे हिंसा संपते का? उदाहरणच घ्या, अगदी इथलंच ... चिन्यानी हा लेख लिहिला. मी त्याच्या विरुद्ध बोलले आणि इतरांनी माझ्या विरुद्ध गरळ ओकून झालं. (चिन्या, तुमच्या खिलाडूवृत्तीबद्दल मला खरोखर आदर आहे.) याशिवाय वादामुळे वाद वाढला. कमी झाला का? आणि का कमी व्हावा. मी चिन्या, अन्या, अमितकुमारच्या विचारांच्या विरुद्ध लिहिलं, त्यांनी का म्हणून ऐकून घ्यावं. मला त्यांचं हिंसेचं समर्थन आवडत नाही मी तरी का असे (माझ्या मते) भडक लेख तसेच सोडून द्यावेत? (शिवाय एक बिन महत्त्वाचं कारण आहे तात्यामहाराज आणि मिपा च्या व्यवस्थापनाने आत्तापर्यंततरी या चर्चेला जागा उपलब्ध करून दिली आहे. मिपाचं धोरण मी विसरले होते. सर्कीटरावांंनी आठवण करून दिली म्हणून हा प्रतिसाद लिहित आहे.) तर मुद्दा असा की मला एवढंच म्हणायचं होतं की हिंसेमुळे हिंसा वाढत जाते, ती शारिरीक असेल अथवा शाब्दीक! माझ्या टिकेला "अक्कलशून्य टीका" म्हणणाय्रांची अक्कल मी काढली असती तर संभाषणाची पातळी कुठे जाऊ शकली असती याचा जरा विचार करा. पण माझा आणि इतर अनेक लोकांचा असा स्वभाव नसतो. त्यामुळेच की काय, दादरला दंगली झाल्या १९९३ मधे तेव्हाही खूपच कमी प्रमाणात लोक त्या हिंसेत सहभागी झाले होते. आता याचं कारणंच शोधायचं तर, अयोध्येत (जिथे युद्ध होत नाही ती नगरी अयोध्या, काय विरोधाभास आहे पहा ना) हिंसाचार झाला, त्याची परिणती मुंबईच्या बाँबस्फोटात झाली, त्यातून पुढे दंगली झाल्या, मुसलमानांना या देशात फारच असुरक्षित वाटू लागलं (किंवा असा विचार करण्याची सबब मिळाली). किंवा अगदी अयोधेत असं मंदीर होतं, ते मुसलमानांनी फोडलं असं मानलं तरीही हिंसेतून हिंसाच आली शांतता नाही. (आणि "धर्मच सगळं काही आहे का?" या माझ्या प्रश्नाचा रोख या मुद्द्याकडे होता.) तुम्हाला हे आपलं उदाहरण पटत नसेल तर दुसरं, बाहेरचं उदाहरण देते. आजचा इस्रायल, १९४८ च्या आधी अरबांचा पॅलेस्टाईन होता. आणि त्याच्या २००० वर्ष आधी ती जागा ज्यू लोकांची होती म्हणतात. जेव्हा इस्रायल असं स्वतंत्र राष्ट्र घोषित झालं तेव्हा तेव्हाच्या इस्रायली परदेश मंत्री रश्यात (Russia) होत्या. क्रेमलिनमधे असं मत होतं की आत्त नको, थोडं थांबा. तेव्हा या बाई म्हणाल्या, "अजून किती वर्ष थांबू आम्ही, २००० वर्ष तर अशीच गेली". आणि आज इस्रायल-पॅलेस्टाईन या प्रकरणामुळे किती अशांतता आहे हे आपल्याला माहिती आहे. आज जगाच्या त्या भागात शांतता असती, तर जग बरंच शांत असतं, किमान आत्ता आहे त्यापेक्षा असं मलातरी वाटतं. जरा विचार करून पहा. ० बय्राच प्रतिसादांचा असा सूर आहे, "बाई गं, शांती, सबुरी या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, जरा दुसय्रा बाजूलाही (उदा: मुसलमान) जाऊन असली बडबड कर. आम्हालाच का अक्कल शिकवतेस?" पण यातही दोन मुद्दे आहेत. एकतर जे लोकं विचार करू शकतात त्यांच्याशी वाद-विवाद केला जातो, म्हणून मी इथे माझा वेळ, वीज खर्च करून (फुकट घालवून असं मी म्हणणार नाही. मला अजूनही आशा आहे, की या वादविवादामुळे कोणीतरी तरी हिंसेला त्याज्य मानेल) प्रतिसाद देत आहे. मी बंदूका आणि सुय्रांना जाऊन सांगणार नाही की हिंसेने कोणाचंही भलं होणार नाही. दुसरा मुद्दा: मला असं वाटतं की माझ्या नावामुळे मी हिंदू आहे असं बहुतांश लोकांचं मत असेल. (मी कागदोपत्री हिंदूच आहे. माझं आणि इतरांचं मत काय हा एक मोट्ठा प्रश्नच आहे. पण तो मुद्दा नाही.) तर एका हिंदूने दुसय्राला सांगितलं की हे तुझं जे चाललंय ते बरं वाटत नाही, "अहिंसा परमोधर्मः" प्रत्यक्ष आचरणातही चांगलं आहे असं मला वाटतं, तर ऐकणारा ऐकून घेण्याची, त्यावर विचार करण्याची शक्यता फारच वाढते. पण समजा कोणी "महम्मद फकीरुद्दीन" नावाच्या माणसाने हेच, याच शब्दात सांगितलं असतं तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या? आता याच उदाहरणाचा दुसय्रा बाजूने विचार करा. कोणी डॉ. संहिता जोशी नावाची पोरगी/बाई जाऊन सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगते की तुम्ही हिंदूंच्या विरोधात हिंसा करू नका. याची प्रतिक्रिया काय होईल? याचंच एक आत्यंतिक (पुन्हा एकदा) उदाहरण देते: जॉर्ज बुश नावाचा एक इसम त्याच्या टोनी, माईक, इयन, कोंडोलिसा, डिक नावाच्या मित्रांबरोबर जाऊन त्याच सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगतो की लोकशाहीचाच स्वीकार करा. धर्म वगैरे त्याच्या जागी ठीक आहे, पण लोकशाहीचाच स्वीकार करा तर त्याचं काय झालं? (अर्थात प्रत्यक्ष आयुष्य एवढंच काय काहीच सरळसोट नाही याची मलाही कल्पना आहे.) ०. हिंसा टिकाऊ नाही याचं आणखी एक उदाहरण देते. ओसामा बिन लादेन हिंसा करतो, तो आज काय प्रकारचं आयुष्य जगत असेल? लपून छपून, कोणावरही विश्वास ठेवता येत नसेल, याच्या मुलाला ब्रिटीश बाईशी लग्न करूनही ब्रिटिश व्हीजा मिळत नाही (मोदींच्या बाजूने डॉ. मनमोहन सिंग बोलले तरी, ओसामापुत्राचं काय?) .... झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे येणार म्हणून गॉर्डन ब्राऊन शिखर बैठकीला जात नाही आणि असे अनेक! महात्मा गांधी, नेल्सन मंडेला ही दुसरी टोकं! जसं आपण गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली तशीच मंडेलांनाही दिली जावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे (संदर्भः म.टा., एक "बाजारू" वृत्तपत्र). ०. तर प्रश्न असा आहे की आपल्याला काय हवंय? दीर्घकाळ टीकणारी शांतता, प्रगती, हवी आहे. चीन/पाकिस्तान आपल्या डोक्यावर जाऊन नाचायला हवे आहेत का आपणही एक सुखी देश असावं? आपल्याला एक हेकेखोर हिंदू देश अशी ओळख हवी आहे का ग्रॉस हॅपीनेस कोशंट सगळ्यात जास्त असणाय्रा देशांमधे स्थान हवंय? माझ्या बाजूने मी जाहीर करत आहे की मी आता या वादात नाक खुपसणार नाही. एक-एक उदाहरण देऊन "मी आणि माझ्यासारखे विचार करणारे सुनील, कोलबेर इत्यादी भारी की चिन्या आणि आन्या, अमितकुमार वगैरे भारी" अशा प्रकारचं काथ्याकूट करून माझा हेतू साध्य होणार नाही आहे. वादात तुम्हाला भारी वाक्य टाकता आलं म्हणून तुमचा मुद्दाच बरोबर हे मला पटत नाही ( अशोक गोडबोले यांचं हे वाक्य आहे). अशा वादांतून (फार) काही निष्पन्न होत नाही या मिपाच्या धोरणावर माझा (जवळजवळ) संपूर्ण विश्वास आहे (जवळजवळ अशासाठी की माझंही एका भल्या मित्राने मतपरिवर्तन केलं). मिपाने मला ही बाजू मांडण्याची (नेहेमीप्रमाणे, पण थोडेफार धोरणाविरुद्ध जाऊन) संधी दिली त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. आणि माझ्या बाजूने हा वाद मी बंद करत आहे. (अवकाशस्थ वस्तूंमधल्या polarization चा अभ्यास करणारी, पण non-polar) संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्या१९८५ 24/07/2008 - 15:12
संहिता," aim of an argument or a discussion should be progress and not victory" अस कुणीतरी म्हटलय. मी या वाक्याला धरुन बोलतो त्यामुळे मी शक्यतो वैयक्तिक चिखलफेक करत नाही. तुमच्या कालच्या पोस्ट्सना मी उत्तर दिली आहेत त्याची उत्तरे द्यावित मी वाट पहातोय.सर्वात महत्वाच म्हणजे माझा लेख अजिबात भडकावु नाही.ते राजकीय विश्लेशण आहे.त्याला तुम्ही दिलेले उत्तर भडकावु आहे. *हिंसेमुळे हिंसाच मिळते.-प्रश्न असा आहे की जगाच्या इतिहासात तुम्हाला कधी शांतता दिसली आहे??सतत कुठे ना कुठे हिंसा होतीच्.मुळ मुद्दा हा आहे की हिंसेला हिंसेनी उत्तर दिल तर प्रश्न बिकट होतात का. कधीकधी होतात कधीकधी नाही. अहिंसेनी हिंसेविरुध्दच युध्द जिंकता येत का???हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही उदाहरणे नाहीत्.भारताच स्वातंत्र्य म्हणाल तर ते गांधींच्या अहिंसेनी मिळाल हे मला मान्य नाही. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात ब्रिटनला प्रचंड हानी झाली होती.त्यानंतर भारतातील आर्मीमधे उठाव सुरु झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पार्लिमेंटमधे सांगिता होत की ' भारतातील सैन्य आता आपल्या ताब्यात राहीलेले नाही त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्याशिवाय पर्याय नाही'.पण हिंसेनी अनेकदा समस्यांच समाधान झालय. हैद्राबादचा भारतात समावेश्,गोव्याचा भारतात समावेश्,काश्मिरमधे हिंसेनीच भारतीय सैन्याने जो सध्या काश्मिर आपल्याकडे आहे तो राखला,फ्रेंच राज्यक्रांती,अमेरिकन राज्यक्रांती इत्यादी अनेक उदाहरणे आहेत ज्यात हिंसेने प्रश्न सुटले आहेत.दिर्घकाळ शांततेसाठी दुसर्‍यानी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.दुसर म्हणजे सावरकर म्हणतात त्याप्रमाणे 'शत्रुला दया दाखवा' या हिंदु धोरणामुळे हिंदु धर्माला अत्यंत हानी झाली आहे. मग ते धोरण सोडुन द्यावे. आपण अनेक अंधश्रध्दांचा त्याग केला आहे.त्याप्रमाणे ज्याला वाटेल त्याने हिंदु धर्मातील अहिंसेच्या तत्वाचे जरुर पालन करावे पण ते वैयक्तिक पातळीवर. सार्वजनिक अथवा सरकारी पातळीवर तसे करणे म्हणजे देश संकटात टाकणे आहे. आम्हालाही हिंसा करायची अजिबात इच्छा नाही. पण आम्ही जर घरी बसुन राहीलो तर उद्या दाढ्यावाले आम्हाला आमच्या घरात घुसुन मारतील. कारण ते धर्मांध आहे. त्यांच्या धर्मात काफिराला संपवणे मान्य आहे. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरही हे लिहितात की 'मुस्लिम नेहमी 'दार्-उल्-हरब' म्हणजे अनैस्लामिक आणि 'दार्-उल्-इस्लाम' म्हणजे जिथे इस्लामी राजवट आहे असा भेद करतात . हरबला इस्लाम बनवण्यासाठी वेळ आल्यावर जिहाद पुकारु शकतात आणि जे मुस्लिम नाहीत त्यांची कत्तल करु शकता.' मग यांचा विरोध केला नाही तर हे आपल्याला संपवतील. म्हणुन वेळ पडल्यास पोथीला बाजुला ठेवुन शस्त्र हातात घेणे जरुरीचे आहे. *इस्राईलने २००० वर्ष गुलामगिरी सहन केलीय. आता ते थांबणार नाहीत. *संहिताने हिंदुंनाच अहिंसेचे धडे देणे-आम्ही समजु शकतो हे ठिक आहे.पण आमचा हिंसेचा पुरस्कार जोपर्यंत ते करत आहेत तोपर्यंतचाच आहे. त्यांनी सांगितल की आम्ही जिहाद्,काफीर,धर्मावर आधारीत हिंसाचार, 'इस्लाम हाच खरा धर्म आणि हिंदु धर्म सैतानाचा' या गोष्टींचा त्याग करत आहोत त्यानंतर आम्हीही शस्त्र टाकुन त्यांना मिठी मारु.पण सध्या ज्याच्या हातात शस्त्र आहे आणि जो मला मारायची तयारी करतोय त्याला मिठी मारुन त्याला माझा गळा कापायला देणे ही आत्महत्या आणि मुर्खपणा आहे. जे हिंदु आम्हाला विरोध करतात ते याचा विचार करत नाहीत. होय्,हिंदुत्व हा एक प्रतिकार आहे. घराला कुलुप नसाव ही चांगली ,आदर्श गोष्ट आहे.पण जगात जोपर्यंत चोर आहेत तोपर्यंत आम्ही दाराला कुलुप लावणार्.चोर संपले की कुलुप लावणे आम्हीही बंद करणार.मानवता हेच आमचे ध्येय आहे.माणुसकी हाच सर्वांचा धर्म आहे.पण जोपर्यंत इस्लामी जिहादाची दारु पिउन मुस्लिमांचा दहशतवादाचा नंगानाच देशात चालेल तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकणारच.शेंडिच्या गाठीत्,जाणव्याच्या दोरीत्,वेदांच्या उक्तित हिंदुत्व नाही. देशद्रोह्यांची ,धर्मांधांची दाढी उपटन्यात हिंदुत्व आहे.

In reply to by चिन्या१९८५

अमितकुमार 24/07/2008 - 15:26
अप्रतिम उत्तर...... गांधिने देशाला स्वातंत्र मिळवून दिले हे म्हणने हूतात्मा क्रांतिकारांचा अपमान आहे.

ऍडीजोशी 24/07/2008 - 13:46
मला मोदींचा अभिमान वाटतो. गेल्या हजारो वर्षात असं रिटॅलीएशन हिंदूंनी कधीही केलं नव्हतं. तसंच, शिवसेना होती म्हणून बाँबस्फोटानंतरच्या दंगलीत मुंबईमधला हिंदू वाचला हे १००% खरं आहे. दर वर्षी नित्यनेमाने अमरनाथ आणि इतर यात्रांवर होणारे अतिरेकी हल्ले बाळासाहेबांनी "हे हल्ले थांबले नाहित तर ह्यापुढे मुंबईतून एकही मुसलमान हज ला बहेर पडू शकणार नाहे" असे सांगितल्यावरच थांबले. त्यावेळी हे असे बजाऊन सांगण्याचा कुणातही दम नव्हता. हिंदूंचा इतिहास पहाता मागची शेकडो वर्ष कुणी ना कुणी आपल्यावर राज्य केले. पण कुणाही हिंदू राजाने कारण नसताना स्वार्थापायी एखाद्या देशावर हल्ला करून त्याची वाट लावल्याचे दिसत नाही (जेत्यांनी लिहिलील्या इतिहासातही अशी नोंद नाही) ह्या उलट मुसलमान हे कायम हिंसकच होते. एकत्र जगण्यापेक्षा दुसर्‍याला मारून त्याची संपत्ती बळकाऊन स्वतः सम्रुद्ध होण्यावरच त्यांचा भर आहे. स्वतःच्या भावांना, जन्मदात्याला सत्तेपायी मारणारे त्यांच्यातच जन्मले. अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते. त्यांनी तेच केले. फाळणी नंतर गाड्या भरभरून हिंदूंची प्रेते भारतात पाठवली गेली. आपण ते न केल्याची फळे आपण आता भोगतो आहोत. अतिरेक्यांना इथलेच मुसलमान कसे साथ देतात हे नव्याने सांगायला नको. दंगली नंतर शिवसेनेनी केलेल्या मुसलमानांच्या कत्तलींमुळे आणि मोदींच्या जशास तशा धोरणामुळे आत ते बरेच शांत झाले आहेत. मुसलमान जिथे जिथे गेले तिथे त्यांनी वाटच लावली. नुस्ते देश जिंकून न थांबता कायम त्यांनी दुसर्‍याच्या बायकांवर सामूहीक बलात्कार, मुलांची कत्तल, मंदीरांची तोडफोड, ग्रंथालये जाळणे, लोकांना बाटवणे असले किळसवाणे प्रकार केले. आता ह्यांच्या पुढे आपण दुसरा गाल करावा अशी अपेक्षा आहे का? नको तिथे दाखवलेली सहिष्णूता भ्याडपणात मोडते. ग्रंथांच्या संरक्षणासाठी तलवारच लागते. एक मंदीर गेल्याने काय फरक पडणार आहे? अस प्रश्न काही दळभद्री मंडळी विचारतात. पण का सोडावं एक मंदीर तरी? त्यात ज्या ठिकाणी रामजन्म झाला तिथलं मंदीर. जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी काय केलं. मुर्त्या फोडल्या, देवळांच्या मशिदी बनवल्या, हजारो लोकांना बाटवलं. आता हा हिंदूस्थान आहे. त्यामुळे खरं तर आपण बाटवलेली सगळी मंदीरं पुन्हा बनवली पाहिजेत. आणि कायमच मुसलमानांवर वचक ठेवला पाहिजे. थोडी सूट दिली की लगेच त्यांचे उद्योग सुरू होतात. अशा विंचवांना ठेचलंच पाहिजे. त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे. त्याशिवाय ते प्रथम १ हिंदू मारायचे थांबवणार नाहीत. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

चिन्या१९८५ 24/07/2008 - 15:22
ऍडी बर्‍याच अंशी बरोबर आहे तुमच. मुस्लिम धाकात असले तरच व्यवस्थित वागतात. धाक सुटला की मग भारतातच काय लंडनमध्येही टेररिस्ट कँप्स सुरु होतात आणि मग त्यालाही लोक 'लंडनीस्तान' म्हणुन लागतात.

अमितकुमार 24/07/2008 - 14:00
१०००% सहमत जोशि साहेब आपणाशि...... हिंदू मधिल जे सेक्यूलर आहेत ...ते तो पर्यत जागे होणार नाहित्...जो पर्यत... त्याच्या घरातिल श्रधा स्तान असणारे देवारे हे मुस्लिम येउन तोडनार नाहित... काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच

अमितकुमार 24/07/2008 - 14:59
संहिता व सूनिल ....मान्य आहे वरिल माहिति देणारे स्त्रोत हे हिंदू संस्थांनि चालवलेले आहेत ....पण डोंगरितिल हनूमान मंदिर पाड्ण्याचे बातमि ५व्या पानावर ४ ओळि मध्ये देणार्‍या व दर ६ डिसेला बाबरि मश्जिदे बाबत पान रंगवणार्‍या म्.टा. पेशा आधिक पारदर्शक आहेत.....

नारायणी 24/07/2008 - 21:12
त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का? अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल. मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशा काही विधानां मुळेचं एक हिंदु सुध्धा त्यांना मत देताना कचरतो. आले सत्तेवर तरि अघाडि असेल आनि मग आहेचं पुन्हा हिदुंचे हाल. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!! ऍडी तुम्ही इतकं छान लिहिता.(ट्रकवाले सारखा हळुवार लेख लिहिणारे तुम्हीचं ना?)हे वाक्य तुमच्याकडुन येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.

In reply to by नारायणी

या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? नाही कारण दंगली करणारे लोक गुंडच असतात असे नाही. आणि जेव्हा दंगली होतात तेव्हा त्यात सहभाग घेणारे युध्द म्हणूनच भाग घेतात. आता त्या युध्दात आपलीच माणसे मारली जाऊ शकतात ही दुर्दैवी बाब आहे. पण म्हणूनच माझा त्या वाक्याला आक्षेप नाही. निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हो कदाचित माझ्या आईला कोणी मारले तर मी मारेकर्‍याला न मारता त्याच्या आईला मारेन म्हणजे त्याला जाणीव होईल की आई जाण्याचे दु:ख काय असते ते. आता तुम्ही म्हणाल की त्यात त्याच्या आईचा अपराध काय होता तर मी म्हणेन माझ्या तरी आईचा अपराध काय होता? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का? नाही हिंदुत्व म्हणजे हेच नाही पण परिस्थिती प्रत्येक गोष्ट घडवत असते. ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल. अहो तसे बघाल तर अनेक मुस्लिम कलाकार, सैनिक, पोलिस आणि प्रशासकिय अधिकारी, शास्त्रज्ञ, कवि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले म्हणून त्यामुळे देश बंद पडला का? (अब्दुलकरीम खां साहेबांचा चाहता) पुण्याचे पेशवे

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 24/07/2008 - 23:14
निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? बरोबर आहे. पण जनता भडकल्यावर जनतेला कोण समजावणार?? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. ते तसेच करतात. हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात त्यांनी दहशतवाद्यांना मदत करायची थांबवली की मग दंगली होणारच नाहीत. आणि कोण अपराधी,कोण निरपराधी हे ठरवण अवघड असत. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग शिवसेना म्हणत नाही की सर्वांना मारुन टाका. धर्मांध मुस्लिमांना विरोध आहे.पण आता जे देशभक्त आहेत त्यांनी यांना पकडुन द्यायला हव. मुस्लिम लोकांच्या बस्त्यांमधे ही सगळी काम होतात. तिथल्या देशभक्त मुस्लिमांनी देशद्रोह्यांना ,धर्मांधांना पाठीशी घालु नये,त्यांना पकडुन द्याव. पण ते तस करत नाहीत्.ते गप्प रहातात. मग दंगली झाल्या की या धर्मांधांबरोबर यांचही घर जळत. पण आजपर्यंत प्रखर राष्ट्राभिमानी मुस्लिम संस्था झालेली नाही की जी म्हणेल की आम्ही प्रखर देशभक्त आहोत,इस्लाम आणि देशभक्ति यांच्यातील निवड करायची झाल्यास आम्ही देशभक्तीच निवडु.बहुसंख्य मुस्लिम समाज मुल्ला,मौलवीच्या ऐकण्यात असतो. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशी भाषा त्यांनी कधी केलिय्???मागच्या वर्षी लालबागच्या गणपतीसमोर मुस्लिमांनी फटाके फोडुन स्वागत केले होते. त्याचे बाळासाहेबांनी अग्रलेख लिहुन कौतुक केले होते.२ वर्षांपुर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर काही मुस्लिमांनी रॅली काढुन बॉम्बब्लास्टचा निषेध केला होता. बाळासाहेबांनी त्यावेळेसही रॅलीत भाग घेणार्‍या मुस्लिमांना अग्रलेखातुन सलाम केला होता.पण तुमची सेक्युलर मिडीया तुम्हाला हे सांगत नाही. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!! कुठल्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही???हिंदुत्ववाद्यांच्या शासनात कायदा आणि सुव्यवस्था कितीतरी चांगली असते कारण मुस्लिमांना हा संदेश जातो की त्यांचा माज चालवुन घेतला जाणार नाही.

In reply to by नारायणी

ऍडीजोशी 24/07/2008 - 23:53
मी जे लिहीलंय ते पुर्ण विचरांतीच लिहीलं आहे. चुकून काहीही नाही. त्यावेळी जे रहिले त्यांना आता मारा असं मी म्हणालो नहिये. पण आता जे आहेत त्यांना तरी धाकात ठेवा. कारण ते अतिरेक्यांना समर्थन देतात हे सत्य आहे. जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हो. कारण त्यांनी आधी मारलेला मनुष्य सुद्धा कुणाचा मुलगा / भाऊ / नवरा होताच ना. हेचं का हिंदुत्त्व? नाही. हे स्वसंरक्षण. मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. म्हणूनच धाकात ठेवायचं. नाहितर ते आपलीच सिस्टीम आपल्याविरुद्ध वापरतील. बराच काळ बुळचट अहिंसा कवटाळून बसल्याने हे प्रकार झाले आहेत आणि आपण दुसरा गाल पुढे केला की ती लोकं दुसर्‍या गालावरही थापड मारत आहेत. गोध्रा मधे झालेल्या दंगलींमधे सगळ्यांनी मुसलमान मारल्या गेले म्हणून दु:ख व्यक्त केलें. पण ते का मारल्या गेले ह्याचा विचार नाही केला. कधी ऐकलंय का हिंदू पारसी दंगल झाल्याचं. मिळून मिसळून रहाणे म्हणजे काय हे मुसलमानांना महितीच नाहिये. कुठेही बघा, ह्यांचे कायम वेगेळे भागच असतात. धाकात असल्या शिवाय मुसलमान सरळ वागत नाही हा इतीहास आहे. ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नारायणी 24/07/2008 - 23:30
वा. सगळे मुद्दे cover केले तुम्ही. अशी भाषा त्यांनी कधी केलिय्??? हा .... असं नका म्हणु. नक्किचं ते असं बोलतात. कुठे,कधी हे सगळे तपशील नाहित मझ्याकडे पण शिवसेनेने केलेल्या अशा काही भडक विधानांमुळेचं मला हा पक्ष आवडत नाही .त्यामुळे माझी ईथे नक्किचं चुक झालेली नाही. बाकी तुम्हि बाळासाहेंबा विषयी जे जे सांगितलत ते मला खरोखर माहित नव्हतं. हे खरं असेल तर उत्तमचं.

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 25/07/2008 - 00:12
हे खर आहे.वाटल्यास मी लिंक्स देतो. बाळासाहेबांनी मुस्लिमांविरुध्द भडकावु भाषण नक्की दिली आहेत. पण सरसकट सगळ्यांना काढुन टाका अथवा मारुन टाका असे ते म्हणालेले नाहीत्.मी सामना वाचतो त्यामुळे मला माहीत आहे.मुस्लिमविरोधी लेखांमधे नेहमीच धर्मांध मुस्लिम लिहिलेले असते पण मिडीयावाले भाषांतर करताना धर्मांध काढुन टाकतात्.बाळासाहेबांची भुमिका स्पष्ट आहे. मुस्लिमांनी इथल्या मातीशी इमान ठेवाव तर त्यांच्याविरुध्द दंगे होणार नाहीत.

अनिल हटेला 25/07/2008 - 10:08
ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं. काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच (एक हिन्दुस्तानी) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अमितकुमार 25/07/2008 - 11:11
हिंदूचे दमण आणि मुस्लिमाचे तूष्टिकरण याचे ताजे उदहरण .... अमरनाथला दिलेलि जमिन.... ३ दिवसाच्या मुस्लिमाच्या आंदोलना नंतर सरकारने निर्णय माघारे घेतला पण गेलि २५ दिवस हिंदू जम्मू येथे आंदोलन करतायत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातायत......

In reply to by अमितकुमार

चिन्या१९८५ 25/07/2008 - 13:21
तेच ना. ठिकठीकाणी यांचे डबल स्टँडर्ड्स दिसुन येतात. आता अमरनाथला १००एकर जमीनही हिंदुंना मिळु नये???बर त्या जमिनी कुणाच्याही नाहीत.त्यामुळे त्याचा तोटा तर कुणालाच नाही. हिंदुंच्या सोईसाठी मुस्लिम काहीच करत नाहीत्.सरकार करत तर त्याचा विरोध करत. मग हिंदुंनी त्यांची काळजी का घ्यावी??

अमितकुमार 25/07/2008 - 13:30
अश्या मुद्द्यावर माझे सो कॉलड सेक्यूलर मित्र गप्प राहने पसंत का करतात ?

अनिल हटेला 25/07/2008 - 16:21
घ्या !! बन्गलूरू मध्ये अजुन बॉम्ब्स्फोट झालेत !!! आणी फक्त निष्पाप लोकाना त्रास ह्या सर्वाचा !!!! सहन शक्ती ला सुद्धा मर्यादा असतात !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विजुभाऊ 26/07/2008 - 18:20
मिपावर बरेच दिवसानी मुद्देसूद चर्चा चालली आहे (कृपया ह्या वाक्यावरुन प्रस्तुत लेखकाला गुद्दे देवु नयेत) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला 27/07/2008 - 11:50
पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला 27/07/2008 - 11:51
पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अन्या दातार 22/07/2008 - 16:17
हाच हरामखोर, @%$#^%$(या जागा वाचकांनी माझ्या तीव्र भावना लक्षात घेउन आपापल्या वकुबाप्रमाणे भराव्यात) एकदा म्हणाला होता-- दहशतवाद्यांना शिक्षा देउ नका. त्यांच्या घरच्यांना काय वाटेल??????? :O अर्थात या सगळ्या संधिसाधूपणाची सुरुवात महात्मा(?????) गांधींच्या काळातील काँग्रेसनेच केली आहे.

अनिल हटेला 22/07/2008 - 16:34
आन्या दमानी घे राजा!!! कितीहे चिडलास किवा काहीही केलस तरी ही किड एका दिवसात जानारी नाही.... वाळवी सारखी आपल्या लोकशाही ला चिकटली आहे.... त्यावर अगदी पद्धत शीर पणे इलाज करावा लागेल ... आणी सुरुवात स्वतः पासुन करावी लागेल.... सगळे ह``````` आहेत........ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रिय मित्र चिन्या१९८५, आपला लेख पाहून असं वाटत आहे की आपण शिवसेना, भा.ज.प., सगळे डावे, तेलुगु देसम, अकाली दल, रिपब्लिकन (अनेक) पक्ष, म.न.से. इत्यादी अनेक पक्षांच्या चुका, संधीसाधूपणाकडे दुर्लक्ष केलं आहेत. काही उदाहरणं देत आहे; माझी माहिती खूपच अपूर्ण आहे आणि थोडं विस्मरण यामुळे काहीच उदाहरणं असतील, सगळी नाही: १. भा.ज.प.: सध्याचा महत्त्वाचा प्रश्न (म्हणे) अणुकरार आहे. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे. यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत. "मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार (मी मंदिरा बेदीबद्दल बोलत नाही आहे). "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात! मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं. २. शिवसेना: यांचं विदेशी धोरण काय? या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? हा पक्ष म्हणे, मराठी लोकांसाठी, मातीसाठी जन्माला आला. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? लोकसभेचे प्रवक्ते म्हणून हे खासदार उत्तम. आपण म्हणता तसे धर्माधारित दंगे महाराष्ट्रात युतीच्या राज्यात झाले नव्हते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? आणि युती सत्तेवर येण्याचं कारण काय होतं ... धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. आणि या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... बाकीच्यांचं काय ते पाहूच! हे हिंदुत्ववादी सत्तेत येण्यासाठी दंगली करतात, करवतात, देवळं पाडतात, बांधायच्या गोष्टी करतात आणि सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. लोणी खाण्यातच सगळा वेळ गेला की दंगली करायला वेळ मिळत नाही आणि त्याची गरजच नसते. ३. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता. आता का बोंब मारतात की हा अणुकरार केला तर आपल्याला अणुचाचण्या करता येणार नाहीत म्हणून? प. बंगालमधे किती लोकशाही आहे आणि किती ठोकशाही हा संशोधनाचा विषय ठरेल; तिकडे खेड्यांमधे म्हणे, "डाव्यांना मत नाही दिलं तर तुम्ही खपलात, पुन्हा घरी/गावी जायचं नाव काढता येत नाही" ... हे मी एका अनुभवी बंगाल्याकडून ऐकलं आहे. ४. रिपब्लिकन: मी काय बोलणार यांच्याबद्दल ... नियमितपणे पेपर वाचणाय्रा माणसाला मी काही अधिक सांगायची गरज नाही, या लोकांच्या निष्ठा कशा, कधी बदलतात ते! आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण माझा मुख्य मुद्दा तो पण नाही आहे! धर्म हेच सर्वस्व आहे का? आज आपल्या देशासमोर धर्म हाच एकमेव प्रश्न आहे का? गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? सगळे लोक धर्मपरायण हिंदु झाले तर या समस्या सुटणार आहेत का? आपलं इथलं घेतलेलं नाव पाहून माझा अंदाज की आपला १९८५ सालचा जन्म असावा! वयाच्या २२-२३ व्या वर्षी (खरंतर कोणत्याही वयात) आपण (प्रत्येकानेच) हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता, pseudo-secularism यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा?? धर्म हेच सर्वस्व असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट सांगते. तेव्हाच्या भारतात जोपर्यंत इतर धर्माचे लोक आले नव्हते तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. ते जास्त सुखात रहात असतील या कट्टर हिंदुत्ववाद्यांपेक्षा! आजच्या काळातलं एक राजकीय सत्य आहे, "फोडा आणि राज्य करा." चिन्या आणि संहिताची, हिंदू आणि मुसलमानांची, उच्चवर्णीय आणि बहुजनांची जुंपवून द्यायची आणि आपण सत्तेचा आणि त्या अनुषंगाने येणाय्रा पैसा, ताकद यांचा उपभोग घ्यायचा. आपल्यासाठी (तुम्ही, मी, आपण सर्व) हेच चांगलं आहे की आपण वेळेत डोळे उघडायचे आणि दुसय्रांचंही शक्य तेवढं प्रबोधन करायचं. बघा विचार करा. पटलं तर ठीक आहे नाहीतर बॅण्डविड्थ / स्टोरेज-स्पेस फुकट घालवली म्हणून मला बोल लावा. आणि मिसळपावाचा आनंद लुटा. संहिता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत. यावर त्यांचे उत्तर आहे भारताच्या अण्विकअस्त्र सज्जतेवर टाच येत असेल तर हा करार मान्य नाही. कदाचित त्यानीच बोलणी सुरू केलेल्या कराराला विरोध का आहे ते समजून घेता येईल. "मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार . हा मुद्दा पटला. "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात! हे मुद्दे पटले. मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं गोध्र्याची रेल्वे जाळली तेव्हा तिथे ३००० लोकांचा जमाव त्यात सामिल होता. त्या जमावामुळे आगीचा बंब पोचण्यात अडथळे आले आणले गेले. आता हा ३००० लोकांचा जमाव काय फक्त गावगुंडांचा होता का? गोध्र्यातले गरीब बिचारे लोक आले होतेच ना रेल्वे जाळायला? बाकी हींदू धर्मत्याग करायचा असेल तर हरकत नाही पण मग कोणता धर्म घेणार? सगळीकडे या गोष्टी अशाच आहेत. आणि भारतात तरी धर्म जन्मावरूनच ठरतो जोपर्यंत तुम्ही आहे तो बदलून दुसरा स्वीकारत नाही तो पर्यंत. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? पोलिसांच्या गोळीबारासाठी युती सरकारला दोष देता येईल. पण मग त्याच्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे झालेली हिंसा तुम्ही विसरलात का काय?माझ्या लक्षात आहे चांगली(कारण माझ्या शाळेला २ दिवस सुट्टी मिळाली होती :) ) . ती युती सरकारने घडवून आणली असे म्हणायचे आहे का? असे म्हणणे म्हणजे बुशनेच वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडविले असे म्हणण्यासारखे आहे. या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... हो पण त्याच वेळेला प्रक्षोभक भाषणे करणार्‍या कोणत्याही मौलवीला अटक झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा वेळोवेळी प्रक्षोभक भाषणे करणार्‍या जामा मशिदिच्या इमामावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा भिवंडीला २ पोलिस कर्मचार्‍याना दगडाने ठेचून मारणार्‍यांवरही काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. धर्म हेच सर्वस्व आहे का? हो आहे. भारतात तरी. गेल्या १००० वर्षाचा इतिहास तरी तसा आहे. गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? तुम्ही काय केलेत? त्यासाठी मी हापिसात जाणे येणे सोडून इतर सर्व ठीकाणी सायकल ने येणे जाणे चालू केले. :) तसेच हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा न घेण्याचे ठरवले :) इतर आर्थिक समस्या निवारण करता येतील कदाचित पण सामाजिक समस्या कशा निवारण करणार. सामाजिक समस्याविरहीत समाज कुठे अस्तित्वात असेल असे वाटत नाही. पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५ 22/07/2008 - 21:43
धन्यावाद दोन्हीही आन्या आणि संहिता. संहिता,तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतो. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील. जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात हो.पण कारवाई तर केली ना!!! बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.आणि हे काम मुस्लिम करत नाहीत का???आमच्या एका ओळखीच्यांनी भिवंडीच्या दंगलीत मुस्लिम माणसाने हिंदु गरोदर बाईचे पोट फाडताना बघितले होते.या गोष्टी दोन्हीकडुन होतात्.आणि ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. काफीराला मारल्याने मुस्लिमाला स्वर्ग मिळतो असे म्हणतात तर विचेस ना मारण्याने सतन विरुध्द जाउन ख्रिस्ताच्या राज्याला आवश्यक आहे असे चर्च म्हणे. हिंदु धर्मात तरी तुम्ही मुस्लिमाला मारा म्हणजे तुम्हाला स्वर्ग्,आध्यात्मिक प्रगती मिळेल असे कुठेही लिहिलेले नाही . हिंदु सामाजिक कारणांनी मारतो तर मुस्लिम्,ख्रिश्चन धार्मिक कारणांनी मारतात्.म्हणुनच इराकच्या युध्दाला 'क्रुसेड्सचे युध्द' म्हटले होते बुशने.त्यामुळे बाईच्या पोट चिरण्यावरुन धर्मत्याग करणार असाल तर तो बालिशपणा आहे. गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे. धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं. जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते. यांचं विदेशी धोरण काय? कुठल्याही परकीय शत्रुला दयामाया न दाखवण व मित्राला मदत करण हे त्यांच परकीय धोरण आहे. या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? अणुकरार देशाच्या हिताचा आहे पण हाईड ऍक्टकडे दुर्लक्ष केले जाउ नये. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? म्हणजे मला नक्की कळल नाही तुम्हाला काय म्हणायचय ते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत. धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. हिंदुंच्या रक्षणार्थ ते उतरले त्याचा त्यांना राजकिय फायदा झाला. या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय?? सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. बेसलेस विधान आहे हे. अहो मुस्लिमांनी मुंबईत दंगलीची आधीच तयारी केली होती. शिवसेना होती म्हणुन मुंबईत हिंदु वाचला. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत. धर्म हेच सर्वस्व आहे का? जोपर्यंत हिंदुंची त्यांच्याच देशात हेटाळणी होतेय तोपर्यंत हे होणारच.रामाच्या जन्माचा पुरावा का लागावा???अयोध्येतील एक मशिद मुस्लिमांनी हिंदु बांधवांना दिल्यास काय बिघडते???रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे??? तुम्ही मुस्लिम्,ख्रिश्चन्सना का नाही हे सांगत्???आम्हालाच हे लेक्चर्स का मिळतात?? यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा?? या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे?? तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.

In reply to by चिन्या१९८५

अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे. अणुचाचण्या घेतल्या ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्या झाल्यानंतर लगेचच स्वतःहून बंदी घोषित केली ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. माझा आक्षेप त्याला नाही आहे. माझा आक्षेप आहे तो अणुकराराचं राजकारण करण्यावर! (मी त्याही पुढच्या काही गोष्टी सांगते: सुवर्ण-चतुष्कोन प्रकल्प, नदी-जोड प्रकल्प आणि असे इंफ्रस्ट्रक्चरचे (याला मराठी शब्द काय?) चांगले प्रकल्प वाजपयी सरकारने सुरु केले आहेत म्हणूनही अमेरीकन मंदीची झळ आपल्याला कमी बसली आहे, आणि भविष्यातही अशा संकटात कमी परिणाम होईल. माझा कोणत्याही एका पक्षाला ना विरोध आहे ना मी कोणा एका पक्षाची प्रवक्ती आहे. चांगल्या गोष्टी चांगल्याच असतात, आणि वाईट गोष्टी वाईट) हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही. कोणाला (साला) इथे धर्म हवाय? चांगलं, निर्मळ, आनंदी आयुष्य जगण्यासाठी धर्माची काहीही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. या धर्मावरून भांडणच होताना दिसत आहेत. मंदिर बांधायचं का नाही याचा माझ्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मंदीरावर पैसे खर्च करायचे का गरीबांच्या उन्नतीवर? आज आपल्याला दोन वेळचं खायला नीट मिळत असणार म्हणूनच आपल्याला धर्म सुचतोय! उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम? हे काम माझ्यासारखी तुच्छ लोक नाही करू शकत. त्यासाठी राजकीय, सामाजिक वजन लागतं. ज्यांच्याकडे ते आहे ते मंदीर आणि सेतूचं राजकारण करतात याचं दु:ख होतं. जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते. मी कोणताही धर्मग्रंथ वाचला नाही आहे. (आपण कुराण, बायबल, अवेस्ता का काय असतं पारश्यांचं ते, आणि इतर ग्रंथ वाचले असावेत असं मानून) आपल्या माहितीबद्दल मला आदर आहे. जगात एकही धर्म नाही ज्यात स्त्रिया, बालकं, गरीब यांचा खून झाला नाही आहे. "अश्वं नैव, गजं नैव, व्य्राघ्रं नैवच नैवच | अजापुत्रं बलिं दद्यात दैवो दुर्बल घातकः" असं आम्हाला शाळेत शिकवलं. असो. मुद्दा असा आहे की हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले? तेव्हा का गुळणी तोंडात असल्याचा आव आणला? मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला? ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. पण तिथे कोट्यवधी लोक उपाशी, अर्धपोटी जगत नाहीत. ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. हिंदूंना पोप नाही; पण काही शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. आपल्याला माहिती असल्यास कृपया उपलब्ध करून द्या. मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत. पुन्हा तोच मुद्दा! दुसय्राकडे बोट दाखवलं की आपण दोषमुक्त होऊ शकत नाही. आणि कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का? गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय?? तुम्ही फारच टोकाची भूमिका घेता बाबा! गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं. पण गांधीजींच्याप्रमाणे आपण सुचवता तसंही म्हणता आलं असतं. आता इथेच कोणीतरी "संहिताची अक्कलशुन्य टिका" असं म्हटलंय. यावर मी एवढंच म्हणेन, "मला अक्कलच नाही तर मी अक्कलपूर्ण टीका कशी काय करणार? थोडी अक्कल उधारीवर किंवा विकत द्याल तर मी जरा विचार करेन म्हणते." (उपवादः टीका करायला अक्कल लागत नाही. उचललं बोट आणि छापलं काहीबाही असं करता येतं.) गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे. मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका. आणि दुसय्राने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये अशी म्हण हिंदु धर्मातल्या गायीच्या पावित्य्रावरूनच आली आहे ना? जे जळले ते तर जिवानिशी गेले. त्यांचा सूड घेण्याचा हक्क या दंगलखोरांना (जन्माचा पुरावा न देऊ शकणाय्रा) रामानी स्वप्नात येऊन दिला का? आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? त्या न जन्मलेल्या जीवानी काय बिघडलवलं होतं हो कोणाचं? तो का गेला जीवानिशी?? डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत. काही पुरावा का हे पण रामाच्या जन्मासारखंच? सगळे म्हणतात म्हणून मी पण म्हणणार? रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे??? रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. (आत्ता माझ्या तोंडावर पुरावा नाही; पण शोधण्याची तसदी घेऊ शकते मी.) ती रचना तोडायची अशासाठी की त्यामुळे भारतातच इंधन वाचेल. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल. आणि तुम्हाला देव-धर्म हवे आहेत का सबंध पृथ्वीवरचे सजीव प्राणी, माणूस पकडून? तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे?? मान्य! पण आपले हे (म्हणे) हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! (पुन्हा माझी माहिती आपल्यापेक्षा कमी असेल तर मला माहिती देऊन उपकृत करा). आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील. मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. आणि मी मनाने नाही विचार करत. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे). ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. (आणि अजूनही माझा यावर विश्वास नाही). मी स्वतः जोपर्यंत तो वाचत नाही किंवा कोणी जाणकार माणूस त्यात काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत ते का मान्य व्हावं? आणि कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? मला खरोखरच हा मोठा प्रश्न पडला आहे. या लेखाच्या निमित्ताने तो पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे. जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत. मान्य! आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील. आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? "मंदिर बनवायच" हा अजेंडा मायावतींना पंतप्रधान व्हायचंय म्हणून ब.स.पा.ला मतं द्या एवढाच पोकळ आणि तकलादू आहे. संहिता हिंदू आहे का ? असेल तर..... हिंदु धर्माला तिच्या सारख्या स्वधर्मिय लोकांच्या विचाराची वाळवी लागली आहे....ति प्रथम साफ करायला हवि.... मी हिंदू आहे का नाही असल्या फडतूस प्रश्नांनी आपण व्यथित होऊ नका. वाळवी, राम-मंदीर, सेतूसमुद्रम सारख्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, प्रश्न अजून सुटायचे बाकी आहेत. संहिता अवांतरः या चर्चेत फार वेळ जात आहे माझा, टंकलेखन करण्यात. जर मी उत्तर दिलं नाही तर याचा अर्थ एवढाच की मी पृथ्वीबाहेरच्या अंतराळातील विश्वाला या धर्म, भाजप वगैरे गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देत आहे. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्या१९८५ 23/07/2008 - 17:28
अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मशिदी आणि चर्चेस बद्दल हे वक्तव्य का येत नाही???ख्रिश्चन्स भारतात फक्त ३% आहेत तरी त्यामानाने चर्चेस प्रचंड आहेत. हा सगळा पैसा कुठुन येतो??? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. हो.तिथे शाळा,दवाखानेही सुरु होतील्.तुम्हाला माहीत नसाव पण या देशातील अनेक मंदिर शाळा,दवाखाने,अन्नदान इत्यादी अनेक प्रकारचे समाजकार्य करतात. उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम? कालच तुम्हाला पेशव्यानी विचारल होत त्याप्रमाणे मीही विचारतो की तुम्ही यासाठी काय केलय्???तुम्ही काहीच चैन करत नाही का??ती चैन करण्याआधी तुम्ही उपाशी ,गरीबांचा विचार करत नाही का???मिसळपावचा आस्वाद घेण्यापुर्वी हा विचार का नाही येत?? हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले त्या बाबु बजरंगीने कशावरुन सत्यच सांगितल???त्याने थापा कशावरुन नाही टाकल्या???आणि त्याला कोणी समर्थन केल्याचही आठवत नाहीये. मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? पुरावा काय द्यायचाय त्यात्???प्रकरण न्यायालयात आहे.त्यामुळे असे पुरावे बाहेर दिले तर न्यायालयाचा अवमान होतो. न्यायालयात ते पुरावा देतीलच का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला? त्या स्टिंग ऑपरेशनच्या विश्वासार्हतेची तुम्ही काय तपासणी करुन पाहीली???दिसल की ठेवला विश्वास्.त्या स्टींग ऑपरेशनमधे एका मनुष्याला 'रिऍलिटी शो' सारखा एक शो करायचाय हे सांगुन त्याला एक स्क्रिप्ट देण्यात आली होती.त्या मनुष्याने स्क्रीप्टमधले डायलॉग्स म्हटले.आणि नंतर त्याने या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावाही केला आहे. आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. जे डिव्होट ख्रिश्चन्स आहेत ते प्रचंड कट्टर आहेत. अमेरीकेत एका चर्चने फलक लावला होता चर्चबाहेर 'ओसामा ऍन्ड ओबामा- आर दे ब्रदर्स???'. आणि नंतर म्हटल होत की 'अमेरिकेचा राष्ट्रपती जर नॉन ख्रिश्चन झाला तर काय होईल एव्हढच मला सांगायच होत'. आणि या इतरांचा धर्माला सैतानाकडुन आलेला म्हणणार्‍या ख्रिश्चनांना इतका पैसा युरोप,अमेरिकाच पुरवतो हे तुम्हाला माहीत नाही काय?? ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. पोपने मागच्याच वर्षी तुर्कस्तानला जाण्यापुर्वी 'मुस्लिम धर्म हिंसाचारी धर्म आहे' असे म्हटले होते ज्यावर त्यांनी प्रचंड टिका केली होती. आणि माओरी च काय धरुन बसलाय. 'विच हंट' द्वारे कित्येक हजारो महीलांना जिवंत जाळुन टाकण्यात आल होत चर्चद्वारे.ख्रिश्चन्सने इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली जितके लोक मारले आहेत त्याच्या कितीतरी कमी लोक सध्याचा 'इस्लामी दहशतवादाने' मारलेले आहेत. शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही त्यांची कुठलीच प्रतिक्रिया कानावर येत नसते.मुख्य म्हणजे शंकराचार्य आणि दंगलींचा काय संबंध??? कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का? खैरलांजीच्या वेळी कुठल सरकार होत्???मुंबईतल्या दंगलींच्या वेळी कुठल सरकार होत??पुण्यात काही वर्षांपुर्वी गणपतीच्या मंदिराची वटंबना झाली होती त्यावेळी कुठल सरकार होत???शिखांचे दिल्लीत्,कानपुरात हत्याकांड करणार कुठल सरकार होत???,कश्मिरातल्या हिंदुंना बेघर केल गेल तेंव्हा कुठल सरकार होत्???अशी अनेक उदाहरणे देता येतील. गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं अस केल्यानी मुस्लिमांनी शांतता राखली असती तर या देशात कधीच दंगली झाल्या नसत्या.मुळात मंदिरात घुसुन मुर्ती तोडलीच का???मागच्या वर्षी गणपतीत खामगावमधे दंगल उसळली.कारण काय तर मुस्लिमांनी मागणी केली की विसर्जन मिरवणुक थांबवा कारण तांच्या नमाजाचा टाइम होतोय. ती थांबली नाही तर मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला. हा काय माज्???आम्ही तुम्हाला म्हणतो का की गणेशोत्सव आहे तुम्ही नमाज थांबवा??? मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका. पोलिसांच काम पोलिस करत नाहीत म्हणुन लोकांना शस्त्र हातात घ्याव लागत्.भिवंडीत पोलिसांना अमानुषपणे मुस्लिमांनी मारुन टाकल तरी अजुनही काहीही झालेल नाहीये. आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? रेल्वेच्या डब्यात बसलेल्या भाविकांची मुस्लिमांना काय त्रास दिला होता???त्यांना हकनाक शिक्षा का झाली?? रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. मुर्खपणाच विधान आहे हे. तो मानवनिर्मित आहे का नाही यावर अजुन संशोधनच झालेल नाहीये.ऐतिहासिक पुराव्यांअंती तो मानवनिर्मित आहे हे स्पष्ट होते. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. आजची जी अवाढव्य जहाज आहेत ज्यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ती जहाज तिथुन जाउ शकत नाहीत्.त्यांना लंकेला वेढा घालुन यावच लागणार. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल तिथुन होणार ट्रॅफिक खुप कमी असणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवर काही फारसा फरक पडणार नाही.ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास डीइंडस्ट्रिअलायझेशन आवश्यक आहे .ते कराव का आपण्??त्सुनामीची शक्यता रामसेतु तोडल्याने वाढेल.तुम्हाला कणवला असलेल्या हजारो गरीब कोळ्यांना या प्रकल्पाचा त्रास होणार आहे.म्हणुन त्यांनीही सेतुसमुद्रमला विरोध केलाय..अमेरिकेतल्या जहाज कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतीय कोळ्यांच्या तोंडातला घास हिरावुन घेण तुम्हाला चालत का??? याबद्दल खालील लेख आवर्जुन वाचा- http://www.rediff.com/news/2007/apr/25tarun.htm?zcc=rl 'The Sethu Samudram does not make nautical sense'- http://www.rediff.com/news/2007/oct/01inter.htm 'Adam's Bridge a man-made structure'- http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm 'Widening Ramar Sethu can amplify tsunamis- http://www.rediff.com/news/2007/jun/22inter.htm 'Project won't bring development or employment'- http://www.rediff.com/news/2005/jul/19inter.htm The purely scientific case for Rama's Bridge- http://www.rediff.com/news/2007/sep/17rajeev.htm हे सर्व व त्या ठीकाणचे इतर लेख वाचा आणि सांगा काय ते. हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! काय कराव अस तुम्हाला वाटत?? मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. मग ही खुळचट कल्पना कुठुन आली तुमच्या डोक्यात?? ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ आहेत हेही तुम्हाला माहीत नाही?? कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येइपर्यंत माहीत नव्हत अस विधान तुम्ही केल होत. त्यामुळे धर्म म्हणजे तुमच काय मत आहे?? जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत. मान्य! म्हणजेच या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येण्यापुर्वी माहीत होत. आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? सुखाचा आणि याचा काय संबंध्???युरोप्,अमेरिकेत पैसा आहे म्हणजे कुठलीच समस्या नाही असे का??ते सुखात आहेत का???

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 24/07/2008 - 00:46
जरा वेगळा मुद्दा येथे चर्चेला आणतो... मोदींच्या बाजूने नाही .. मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? या संदर्भात मोदींच्या बाजूने म्हणून नाही पण योग्य भूमिका म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेले भाषण आठवले. संदर्भ होता अमेरिकेने मोदींना नाकारलेला "डिप्लोमॅटीक व्हिसा". मूळ भाषण लगेच मिळाले नाही पण रिडीफमधील दुवा मात्र मिळाला. या भाषणामुळे अनेक मोदी विरोधक संस्था/माणसांनी पंतप्रधानांवर टिका केली होती. त्यातील मूळ मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो खाली त्याच शब्दात लिहीतो. (त्यातील ठळक गोष्टी मी मला महत्वाचा वाटणारा मुद्दा म्हणून दाखवत आहे):
"I share the concern expressed in this matter on all sides of the House. When I came to know of the denial of visa to Shri Modi yesterday (Friday), I immediately instructed our external affairs minister to call the US ambassador and explain we are greatly concerned and we greatly regret the decision," Dr Singh said. The US decision lacks senitivity and courtesy, he added. "The American government has been informed that while we respect their sovereign right to grant and refuse visa to any person, we do not believe it is appropriate to use allegations or anything less than due legal process to make a subjective judgement," the prime minister said.
हे सांगायचे कारण काय? तर मोदींची चूक जी पंतप्रधान वाजपेयींना वाटली असे त्यांनी सांगीतले ती म्हणजे राजधर्म पाळला नाही ही होती. त्याबद्दल ते जाहीर बोललेपण होते. पण गंमत बघा इंदीरा गांधींच्या हत्येनंतर ३००० शिखांना निर्घृणपणे मारणारी दंगल झाली. त्याबद्दल सबरंग, टेस्टा सेटलवाड वगैरे अथवा तत्सम तत्कालीन सामाजीक नेते काही मानवी हक्काच्या नावाने बोलताना दिसत नाही. पण त्याहून ही आश्चर्य म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी काय म्हणाले होते? - "मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना! पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
  1. जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
  2. दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे. बाकी चर्चा चालू देत!

In reply to by विकास

इथे पहा. अशी हिम्मत कोणताही भारतीय सेक्युलर नेता दाखवेल तर त्याची धर्म निरपेक्षता खरी नाहीतर ते निव्वळ ढोंगच. असाच ढोंगीपणा शिखांच्या शिरकाणानंतरच्या राजीव गांधींच्या विधानात दिसतो असे वाटते. पुण्याचे पेशवे

In reply to by विकास

कोलबेर 24/07/2008 - 01:09
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.) ८४ साली काँग्रेसने चुका केल्या म्हणून आज भाजप किंवा इतर कुणाला चुका करायची मुभा मिळत नाही. मोदी सरकारने जे केले ते चूकच (ह्याबाबतीत तुमची सहमती ग्राह्य धरायची का?). त्याबद्दल जर मिडीयाने आवाज उठवला तर तुम्ही ८४ साली कुठे होता? आता गप्प बसा, असे म्हणण्यात काय हशील? निदान आतातरी प्रसार माध्यमांना खरी जाग आली असे म्हणू नये का?

In reply to by कोलबेर

८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.) म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला. म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का? मग माफी मागणे हे निव्वळ मतांसाठी केलेले ढोंग का वाटू नये. जर ते कुंपण झाड याच्या विधानासोबतच माफीची पुस्ती जोडली असती तर त्याला थोडाफार अर्थ होता असे म्हणता येईल. प्रसारमाध्यामांबद्दल स्वतंत्र चर्चा करता येईल सदर विषय राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा आहे त्यामुळे त्यावर वेगळे लिहीता येईल. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोलबेर 24/07/2008 - 01:39
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला.
होय,जमावाच्या प्रक्षोभाला आवरण्याच्या दॄष्टीकोनातुन दोन्ही दंगे वेगळे. सामन्य माणूस आणि पंतप्रधान ह्यातील फरक तरी तुम्हाला मान्य असावा.
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का?
असे माझ्या प्रतिसादात नेमके कुठे दिसते ते सांगा. दंगलही कुणीही /कोणत्याही कारणासाठी केली तरी असमर्थनीयच. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते. माफीचा मुद्दा ह्या वाक्या संदर्भात होता -
मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!

In reply to by कोलबेर

विकास 24/07/2008 - 01:31
सर्वप्रथम, "८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही." या आपल्या विधानाशी मी सहमत नाही कारण दंगल ही दंगल आहे, हिंसा ही हिंसा आहे त्यात जर सामान्यांचे आणि निरपराध व्यक्तींचे हाल होतात तर ती कोणाला मारले म्हणून कमी अथवा जास्त ठरत नाही कारण त्या संदर्भात एकाचे प्राधान्य पंतप्रधान असेल तर दुसर्‍याचे कारसेवक. बरोबर दोघेही नाहीत कारण कायदा हातात घेत आहेत. म्हणून असली हिंसा कोणिही केलेली योग्य म्हणणे मला पटत नाही. शिवाय सोनियाने माफी ही जस्टीस नानावटींचा शिखविरोधी दंगलीवरील रीपोर्ट प्रकाशीत झाल्यावर मागितली... पण, माझा मुद्दा मी माझ्याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मोदी अथवा दंगल समर्थनाचा नव्हता. तसेच राजीव गांधींच्या टिकेपेक्षा या संदर्भात जो दुटप्पीपणा असतो त्याबद्दलचा होता. म्हणून लोकशाहीचे तत्व म्हणून खालील दोन मुद्दे मान्य होतात का? का चुकीचे वाटतात?
पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
  1. जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
  2. दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे.

In reply to by विकास

कोलबेर 24/07/2008 - 01:58
प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते.
जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का? निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्‍याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय?
दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे?

In reply to by कोलबेर

विकास 24/07/2008 - 02:26
प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते. आपल्या मूळ प्रतिसादातील, "...देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे ..." हा जो भाग आहे त्यात स्वाभाविक / ऑब्व्हियस असणे हे आहे त्यात आपण प्राधान्य दिलेत असे वाटले. म्हणून म्हणले की आपल्याला पंतप्रधानाची हत्या स्वाभाविक कारण वाटेल तर दुसर्‍याला कारसेवकांची हत्या, तिसर्‍याला अजून काही तरी...आपले तसे म्हणणे नसेल तर ठीकच आहे. अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का? हो मला असेच वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जो पर्यंत कोर्टात अथवा संशयविरहीत एखादी गोष्ट सिद्ध झालेली नसेल तो पर्यंत त्या विरुद्ध, विशेष करून गुन्हेगार म्हणून बोंब करणे मला योग्य वाटत नाही. अतिरेकी म्हणून एन्काऊंटर केलेले पण अयोग्यच वाटते. संशयविरहीत म्हणजे कशी तर उदाहरणार्थ अमेरिकेतील रॉडनी किंग या काळ्या माणसाला पोलीसांनी कायदा हातात घेऊन बदडला आणि ते टिव्हीचॅनल्सनी सरळ प्रक्षेपीत केले. तेंव्हा कोर्टाच्या आधीपण पोलीसांचा माजोरीपणा सिद्ध झाला होता. निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्‍याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय? न्यायालयाच्या विरुद्ध बोंब मारा, आरोप सिद्ध न झालेल्या आरोपीच्या विरुद्ध नको. त्यातही मी आपल्याला स्मरणशक्तीच्या आधारावर जसे आठवते तसे एक उदाहरण सांगतो: जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपींना सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा झाली होती. सुप्रिम कोर्टानेपण ती वैध ठरवली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नाकारला होता. पण त्याची अंमलबजावणी करायचे कारण माहीत नाही पण लांबवले जात होते. जोशी-अभ्यंकर कुटूंबियांनी या संदर्भातपण बोंबाबोंब न करता सर्वोच्च न्यायालयाला आणि केंद्रसरकारला विनंती केली की भावनांशी खेळू नका आणि नंतर अंमलबजावणी झाली... न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे? राजकारणी, समाजकारणी आणि प्रसारमाध्यमांनी असे वागवणे. उदाहरणच द्यायचे झाले तर सावरकरांचे आहे - गांधी हत्येतून त्यांची विशेषकोर्टातून सन्मान्य मुक्ततता होऊनपण आजही काँग्रेसी, कॉमीज आणि विशेष करून इंग्रजी प्रसार माध्यमे त्याचा वापर करतात. अशा घटनासंदर्भात मला म्हणायचे आहे की,"जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?"

In reply to by कोलबेर

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:03
पण पंतप्रधानांची हत्या का झाली???जे ऑपरेशन ब्लु स्टार केले गेले त्यात किती निर्दोष लोक मारले गेले याची माहीती आहे का???ज्या दिवशी सुवर्णमंदिराचा स्थापना दिवस होता त्या दिवशी तिथे खुप गर्दी जमते.मग त्या दिवशीच हे ऑपरेशन ब्लु स्टार करण्ञाची गरज का होती???त्यामुळे शिखांकडे असा संदेश गेला की भारत सरकार आपल 'एथनिक क्लिनसिंग' करु पहातय. तडकाफडकी निर्णय घ्यायची घाणेरडी सवय इंदिरांना होती. भिंद्रनवाले जेंव्हा मु.म्बईला व इतर ठीकाणी गेला तेंव्हा त्याला अटक का केली गेली नाही?? आणि त्यानंतर पीमची हत्या झाली त्यानंतर ४००० शिखांची हत्या काँग्रेसने केली.यांचे हात रक्ताने इतके माखले आहेत्,त्यांना इतरांना कम्युनल म्हणायचा हक्कच नाही. आणि गुजरातच म्हणाल गोध्राबाबत सो कॉलड सेक्युलर्सना आम्ही ओरडताना पाहील नाही. मग हिंदु मेल्यावर तुम्ही दखलही घेत नाही आणि मुस्लिम गेल्यावर बेंबीच्या देठापासुन बोंबा मारता याला काय अर्थ आहे???आणि पींम चा खुन २ माणसांनी केला होता .ते दहशतवादी होते. आणि गोध्रात ट्रेन २०००च्या जमावाने जाळली होती. त्यामुळे पीएम च्या खुनच्या नंतर जनप्रक्षोभ स्वाभाविक होता तर गोध्रानंतर तो २००० पटींनी जास्त साभाविक होता

In reply to by कोलबेर

अमितकुमार 25/07/2008 - 11:50
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे आपल्याला असे म्हणायचे आहे का कि आपले नातेवाईक, भाउबंध, आप्तेष्ट याच्या निर्घण हत्ते पेक्षा देशाच्या पंतप्रधनाच्या हत्ते मूळे लोक अधिक पेटून उठ्तात ???? ८४ दंगे हे नालायाक कॉग्रेस वाल्यानि केले त्यात सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या माणसाचे सर्मथन कधिच नव्हते......... या उलट...२००४ चे दंगे.. हे सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या हिंदू पेटून उठल्यानेत झाले. २००४ मध्ये हिंदू जनतेने कॉग्रेसला दाखवून दिले कि तूम्हि कितिहि आम्हाला अहिंसेचे (षंड्।त्वाचे) डोस पाजा...... हिंदू हा प्रभु रामचंद्रा प्रमाणे वेळ पड्ल्यास शस्त्र उच्अलेल.

In reply to by विकास

चिन्या१९८५ 24/07/2008 - 13:54
काय आहे माहीती का विकासराव्,आपल्याभोवती एखादी गोष्ट जर का सतत घुमवली तर ती आपल्याला सत्य वाटायला लागते.मोदीविरोधाच तेच आहे. मिडीयानी हे इतक मोठ केलय की लोक मोदींची बाजु ऐकुन घ्यायलाही तयार नाहीत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संहिता, आपल्याला म्हणायच्या असलेल्या गोष्टी कुणी आयत्या मुद्देसूद मांडून दिल्या की किती बरं वाटतं म्हणून सांगू!

In reply to by मेघना भुस्कुटे

चिन्या१९८५ 25/07/2008 - 13:27
अहो,संहिताच्या पोस्टला उत्तरेही दिली आहेत. त्याच्याबद्दल संहिताने काहीही लिहिलेले नाही.तुमची आणि त्यांची मते एकसारखी असतील तर तुम्ही त्याला उत्तरे द्या

In reply to by चिन्या१९८५

या वादातून काहीच निष्पन्न होणार नाही, असा निष्कर्ष मला वाटतं संहितानी पुढे मांडला आहे. संहिताच्या या निष्कर्षाशीही मी सहमत आहे.

अनिल हटेला 23/07/2008 - 12:09
चीन्या !!! एकदम detail मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!! सहीता मॅडम बद्दल काहीही बोलण्यात हशील नाहीये... त्यान्ची चुकी नाही... "हिन्दू" धर्मीयानी अत्याचार सहन करत रहावेत ... कुणी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसावे अशी सर्व जगाची इच्छा आहे ... कारण आज पर्यन्त तसच होत आलये... सेक्युलर !! सेक्युलर !!! सेक्युलर !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by कोलबेर

चिन्या१९८५ 23/07/2008 - 22:40
तुमचा गळा कापायला आल्यावर तुम्हीच त्याचा गळा नाही तर ऍट्लिस्ट हात तरी कापा आणि तरीही मानला नाही तर गळा कापायलाही मागेपुढे पाहु नका. यात काही चुक नाही.सेल्फ डिफेन्स म्हणतात याला. आणि तुम्हाला कोणी हातच कसा लावतो????

अमितकुमार 23/07/2008 - 15:01
मि गुजराथ मध्ये राहतोय. संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण....... सत्य असे आहे. २००२ च्या दंगलीत.... ३५८ मुस्लिम (त्या पैकि ८२ पोलिस फायरिंग मध्ये) व १३४ हिंदु मारले गेलेत पैकि ७७ पोलिस फायरिंग मध्ये) १२ मशिदिची नासधूस झाली व ८२ छोटे मोठे मंदिराचि... त्या आधिच्या आकाड्या कडे नजर ताकु... १९८१ ते १९९४ पर्यतच्या हिंदु मुस्लिम दंगलित... १७०२ हिंदू व १८४ मुस्लिम....... सत्य हे हि आहे.... काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५% पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८% पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९% केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८% या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर..... हिंदूनी अत्याचार सहन करावे....प्रतिकार करायचा तो अहिंसेनी व कायद्यनि ....असा सर्व सहीता सारख्या "विचावंताचा"विचार....

नारायणी 23/07/2008 - 11:50
चिन्या, तुमचं पटतं पण तुमचा नेमका पवित्रा कोणता? तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि? मी पुन्हा सांगते, हिंदुंवर अन्याय होतात हे मला पूर्ण मान्य आहे पण तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही. खरंतर कोनाकडेही काही उपाय नाही. प्र्त्येक मुसलमान व्यक्ती वाईट नसतो. पण त्यांचे हे धर्मान्ध नेते,मौलवी त्यांना भडकवतात.तो दिल्लिचा ईमाम तर समाजासाठी अत्यंत घातक आहे. या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का? नाहि. कारण तेचं. मतं. तुम्ही पुन्हा म्हणाल कि केलं असतं पण आघाडिचं सरकार होतं. याचाचं अर्थ, बाकि सगळ्या पक्षांप्रमाणे भाजपालाही फक्त सत्ता हवी आहे. कोणत्याही पक्षाकडे काहिहि उपाय नाहि हेचं खरं आहे. काहि कठोर पाउले उचललि तर सगळिकडे दंगे उसळतील. पुन्हा निरपराध लोकचं बळि जातिल. हिंदु आनि मुस्लिम सगळेचं.

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 23/07/2008 - 22:52
निरपराध मुस्लिमांना मारा अस मी म्हणतच नाहीये.पण मुस्लिमांची ८०%हिंदुंना मारण्याची हिम्मतच झाली नाही पाहीजे. पण भिवंडीसारखी,मालेगावसारखी प्रकरणे होतात आणि मग मुस्लिमांना वाटते आपण काहीही कराव. त्यांना स्पष्ट समजले पाहीजे की हा हिंदुस्तान आहे.पाकिस्तान्,अफगाणिस्तान नाही. इथे राहुन हिंदुंवर हल्ले करुन चालणार नाही. अशी भिती त्यांच्यात असली तर आपोआपच हे सगळ बंद होईल. मी फक्त सेक्युलर डबल स्टँडर्ड्स दाखवुन दिले.जेंव्हा निरपराध हिंदु मरतो तेंव्हा हे सेक्युलरवादी निषेधही नोंदवत नाहीत आणि निरपराध मुस्लिम मरतो तेंव्हा हे हादरुन जातात,आरडाओरडा करतात. तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही. हिंसेचा आग्रह मी करतच नाही. गुजरातमधे अमानुष प्रकरण झाल पण गोध्रात मरणार्‍या हिंदुला मारणही तितकच अमानुष होत. या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का? कस कंट्रोल करणार त्याला??भाजप कंट्रोल ठेवु शकत नाही कारण समस्त सेक्युलर लगेच आकांडतांडव करतील. मुस्लिमांनी धर्मांधता सोडेपर्यंत या समस्येला उपाय नाही. त्यांनी धर्मांधता सोडली की प्रश्नच मिटेल्.पण गांधिवादी बनुन हिंदुंनी स्वतःचे वाटोळे करुन घेउ नये.

In reply to by नारायणी

तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि? गांधीजी म्हणत असत की 'कोणी तुमचा एक डोळा फोडला तर तुम्ही त्याचा एक डोळा फोडू नका अशाने सारे जगच एक दिवस आंधळे होईल'. पण मी म्हणेन माझा एक डोळा कोणी फोडला तर मी त्याचे दोन्ही डोळे फोडेन जेणे करून इतर अनेक लोकांचे दोन्ही डोळे अशा माथेफिरूपासून सुरक्षित राहतील. या साठी मला कोणी माथेफिरू म्हटले तरी हरकत नाही. कधी कधी जसात तसा जवाब देणे आवश्यक असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नारायणी 23/07/2008 - 23:54
नाही नाही मी निरपराध मुस्लिमांविषयी बोलत होते. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही अवश्य झोडा. मीही येईन तुमच्यासोबत. पण ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा करा. फक्त गुन्हेगार एका विशिष्ट धर्माचा होता म्हणुन त्या धर्माच्या एकुन एक माणसाला मारायला हवे, या भुमिकेच्या मी विरोधात आहे.

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:12
नारायणी,तुमच बरोबर आहे. पण तुमचा एक डोळा फोडण्याचा प्रश्न वेगळा आहे कारण एक डोळा फोडण एक आहे आणि एका २००-३०० च्या जमावाने तुमच्यावर हल्ला करण वेगळ आहे .नीरपराधांना मारायला नको हे मान्य आहे पण याची दखल मुस्लिमांनी घ्यायला हवी. धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती जी तुर्कीत मुस्तफ्फा केमालने घडवली तशी यांनी घडवायला हवी. कुराणातील मतांना बुध्दिवर तपासुन पहायला हवे. जी मते बुध्दिस पटत नाहीत व दुसर्‍यास अन्यायकारक आहेत(४ बायका,जिहाद्,काफीर इत्यादी) ती सोडायला हवीत.हाच याला उपाय आहे. नाहीतर असे दंगे होणारच.

अन्या दातार 23/07/2008 - 11:58
मि. मोदींनी गुजरातमध्ये जे काही केले त्याची फळे आता गुजरातमधील जनतेला आता मिळत आहेत. ती दंगल झाल्यानंतर एकदाही तिथे दहशतवादी हल्ला झालेला नाही. त्यांचे सगळे स्लीपर सेल्स बंद पडले आहेत. तेच भिवंडीत अगदी ठरवून पोलिसांची कत्तल करण्यात आली. तेथील मुसलमानांकडून परिस्थिती मुद्दाम चिघळवण्यात आली जेणेकरुन मुंबई उपनगरातील पोलिस तिकडे(भिवंडीकडे) वळले. आणि लगेच दोन दिवसात मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मात्र चुकीने भिवंडीतील कृत्य झाले असा निर्वाळा त्या संघटनेतर्फे करण्यात आला व कृत्याबद्दल माफी मागण्यात आली. अशा लोकांवर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुद्दा क्र.२] अफजल गुरु माफी प्रकरण ज्या अफजल गुरुवर असलेले सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झालेले आहेत; न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आहे त्याने आता राष्ट्रपतींना माफीचे पत्र पाठवले आहे. त्यावरील निर्णय अजूनही निकालात लागलेला नाही, कारण सरकारला मुस्लिमांची मते गमवायची नाहीत. त्याला जरी जन्मठेप झाली तर मग कोणीतरी दहशतवादी कोणातरी मंत्र्याचे, त्याच्या नातेवाईकाचे अपहरण करतील आणि त्याबदल्यात या देशद्रोह्याची सुटका करण्याची मागणी करतील. आणी षंढ सरकार ती मागणी पूर्ण करेल यात काही शंका असू नये. सुटका झाल्यानंतर हा माणूस अजून किती निरपराध लोकांचे जीव घेईल हा विचार कोणीच करणार नाही. मग कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेऊन त्याला फाशी का देऊ नये? मग कट्टर म्हणवून घेण्यात मला आजिबात गैर वाटणार नाही.

In reply to by अन्या दातार

चिन्या१९८५ 23/07/2008 - 22:54
बरोबर आहे तुमच्.पोलिस ,कायदे हे फक्त हिंदुंविरुध्दच कठोर बनतात. मुस्लिमांना गुन्हे करायला मोकळ रान मिळत. जर पोलिसांनी कठोरपणे आपल काम केल तर आपोआपच ही सर्व हिंसा थांबेल.

सुचेल तसं 23/07/2008 - 23:10
काही एन.जी.ओज, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवुन घेणारे समाजसेवक केवळ अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करताना आढळतात. कारण आपल्या देशात हिंदु हे बहुसंख्यांक आहेत आणि इतर सगळे धर्म अल्पसंख्यांक. मला कुठेही वाचल्याचं किंवा पाहिल्याचं आठवत नाही की एखाद्या हिंदु धर्माच्या माणसानी कोणावर धर्मांतराची जबरदस्ती केली आहे. आपण बर्‍याचदा "चलता है" असं म्हणुन चाललयं त्याकडे दुर्लक्ष करतो. अफजल सारख्या एखाद्या प्रकरणाचं पाकिस्तान किंवा तत्सम राष्ट्रामधे "भिजत घोंगडं" राहिलं नसतं हे नक्की. आणि चुकुन जरी राहिलं असतं तरी लोकांनी तुरुंगात घुसुन त्यांच्या संसदेवर हल्ला करणार्‍याला ठार मारलं असतं. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:16
सुपरकॉप के.पी.एस्.गिलनी अस दाखवुन दिल आहे की काही एन्.जी.ओ.ज स्वतः दहशतवाद्यांच्या विचारसरणीशी संलग्न आहेत. ते एन्.जी.ओ., ह्युमन राईट्स च्या नावाखाली देशद्रोह्यांना वाचवत आहेत

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सगळी कार्यकारिणी निद्राधीन झालेली दिसते. आम्ही तर काळजीपुर्वक वाचतोय !!! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 24/07/2008 - 01:01
मग http://www.misalpav.com/node/2550 ह्या धोरणाची अंमलबजावणी का होत नाहीये ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास 24/07/2008 - 01:02
जाती-धर्म विषयक लिखाणाचे मिपाचे धोरण ??? उगाच तात्विक प्रतिसाद देण्याऐवजी चर्चेची "कत्तल' करायला हवी होती. मिपाचे धोरण विसरूनच गेलो :) चाळीशी नंतर असेच (विसरणे) होणार काहो ? ;)

प्रियाली 24/07/2008 - 01:08
याबाबत योग्य आहे असे वाटते. वर एका सदस्येवर झालेल्या चिखलफेकीचे प्रतिसाद मी उडवले आहेत.

In reply to by प्रियाली

टिउ 24/07/2008 - 01:29
प्रतिसाद तसेच ठेवुन सदस्यास समज देण्यात यावी...म्हणजे नंतर वाचणारयांना मिपाचं धोरणही कळेल (वैयक्तीक टिका) आणि कोण कसं वागतं/लिहितं तेही कळेल... तीन वेळा समज दिल्यावर सदस्यत्व रद्द करण्यात यावं... अश्या प्रकारच्या लेखांना मिपा वर जागा असु नये असं वाटतं.

सुनील 24/07/2008 - 10:27
वास्तविक ह्या निरर्थक चर्चेत भाग घेण्याची इच्छा नव्ह्ती. परंतु अमितकुमार यांनी आकडेवारी सादर केल्यामुळे लिहावेसे वाटले. मोघम विधानांकडे सहज दुर्लक्ष करता येते पण आकडेवारीला एक प्रकारचे वजन असते आणि त्यामुळे अधिकृतपणाचा आभास निर्माण होतो. प्रेषक अमितकुमार ( बुध, 07/23/2008 - 15:01) . सत्य हे हि आहे.... काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५% पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८% पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९% केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८% या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर..... वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल. कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे. तसेच केरळातदेखिल हिंदूंची संख्या ५६.१६% आहे. १९५१ चे खात्रीलायक आकडे मला उपलब्ध होऊ शकले नाहीत. तुमच्याकडे असतील तर त्याचे source द्यावेत म्हणजे पडताळणी करता येईल. १९५१ सालच्या पाकिस्तानात आजचा बांगलादेशही समाविष्ट होता, हे तुम्ही ध्यानात घेतले नसेल तर पाकिस्तानातील हिंदूंच्या संखेबद्दल केलेली तुलना ही संत्र्या-सफरचंदाच्या तुलनेसारखी ठरेल! सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत? बाकी लेख आणि इतर प्रतिक्रिया याबाबत आनंदी-आनंद आहे!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अमितकुमार आपण माझ्या माहितीच्या स्रोताबद्दल पुढील विधान केले आहे: संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण....... मी (माहितीजालावरील) वृत्तपत्र आणि माहितीजाल वाचून, माहिती मिळवली आणि माझी मतं गोळा केली. त्यामुळे तुमचं विधान नक्कीच अर्धतरी खरं आहे. आता हे सर्व किंवा काही स्रोत किती "बाजारू" आहेत याची मला कल्पना नाही. पण जेव्हा धूर येतो तेव्हा तिथे आग असण्याची शक्यता खूपच जास्त असते. आणि जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचणारी ९९% पेक्षा जास्त प्रसिद्धीमाध्यमं एकच घटना सांगतात तेव्हा माझ्यासारखे लोक त्यावर विश्वास ठेवतात. या स्रोतांच्या "बाजारू"पणाबद्दल माझ्यापर्यंत कुठूनही काहीही आकडेवारी पोहोचत नाही तेव्हा मी कशावर विश्वास ठेवावा. दुसरा मुद्दा: अमितकुमार साहेब, आपण ज्या विश्वासाने ही आकडेवारी छापली आहेत, गुजराथमधे राहता असे म्हटले आणि प्रसिद्धीमाधमांवर अविश्वास दाखवला त्याचा अर्थ माझ्या (रिकाम्या) डोक्याने असा काढला की आपण स्वतः गुजराथमधे फिरून ही आकडेवारी जमा केली. (जर तसं नसेल तर कृपया माझा गैरसमज दूर करा.) तर मी आपल्या व्यासंग आणि चिकाटीला दाद देऊन विचारते की आपण तेव्हा फक्त आकडेवारी गोळा केलीत का "योग्य" (याचा अर्थ आपण हिंदू आणि दंगलपीडीत किंवा फक्त दंगलपीडीत असा घ्यावात) लोकांना मदतही केलीत? काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५% याचं सर्वात मुख्य कारण लादलेलं किंवा परिस्थितीप्राप्य स्थलांतर! माझा असा अंदाज आहे की सर्वांनाच ही परिस्थिती काय ते आपण सर्वांनाच माहित आहे. आणि मी त्या कारणाचं समर्थन करीत नाही. पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८% पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९% दुसय्रा देशात कायदे वेगळे आहेत आणि मी स्वतः कधीच या देशांत जाऊन पाहून आले नाही. पण त्याच (बाजारू?) माधमांकडून मिळालेली माहिती: पाकिस्तानात किमान एकतरी हिंदू न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहे; आणि त्यांनी हंगामी सरन्यायाधीश म्हणूनही काम केलं आहे. पण माझा मुद्दा असा आहे की जर या "काथ्याकूटा"ची सुरुवात जर भारतातील राजकीय पक्षांपासून झाली आहे तर आपण पाकिस्तानातली आकडेवारी दाखवून भारतातल्या राजकीय पक्षांवर आगपाखड करू नये. आणि तरीही तुमच्या या बहुसंख्यांच्या धर्माची कड घेणाय्रा पक्षाने कधी पाकिस्तान / बांग्लादेशाला खडसावल्याचं माझ्या ऐकीवात नाही. उलट कारगिलच्या युद्धात सरकारकडून किती हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे आपले किती सैनिक धारातिर्थी पडले याची आकडेवारी आपण देणार नाही का? कारण माझ्या आकड्यांवर आपण कवडीभर विश्वासही ठेवणार नाहीत. तर याच युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या शवपेटीकांच्या घोटाळ्याचं काय? तो पण वाजपेयी सरकारच्या कारकीर्दीतला आहे. देशासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकणाय्रा सैनिकांना तुमचे हिंदुत्त्ववादी पक्ष ही अशी वागणूक देतात. रामानीच म्हटलं आहे ना रामायणात "मरणान्तानि वैराणि"? इथे तर स्वतःच्याच सैनिकांच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या होत्या. केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८% मी तुम्हाला माझ्या एका चांगल्या मित्राने सांगितलेला किस्सा सांगते. तो खडकीला (पुण्यातच आहे हे ठिकाण, केरळ, काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेश नव्हे ... भटा-बामणांचं पुणं) एका ठिकाणी धर्मांतर चाललं होतं तिथे गेला होता; असंच पहायला की लोकं का धर्म बदलतात. तिथे बरेचसे कनिष्ठ आर्थिक वर्गातलेच लोक दिसत होते. याने काही लोकांना विचारलं तुम्ही धर्म का हो बदलतात. त्यावर त्यांचं उत्तर होतं, "आपले राम वगैरे काही पावरबाज नाहीत; पण त्यांचा देव जाम पावरफूल असतो; जाम भारी असतो म्हणून आमी आलो हिकडं." आणि त्यांच्यावर कोणीही काही सक्ती केली नव्हती, मतपरिवर्तन असेल तर गोष्ट वेगळी. आता पुढे माझा प्रश्न ऐका: या लोकांना जर हिंदू धर्मात धरून ठेवायचं होतं तर का नाही त्यांना योग्य शिक्षण दिलं गेलं? या धर्मांतराचा सक्तीशी काहीही संबंध नाही हे मी पुनःपुन्हा सांगत आहे.

अमितकुमार 24/07/2008 - 11:23
प्रेषक सुनील ( गुरू, 07/24/2008 - 10:27) .--- वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल. wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites, अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल. कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे. मि काश्मिर बद्द्ल लिहले आहे.... जम्मु व काश्मिर बद्द्ल नाहि. सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत? भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि.

In reply to by अमितकुमार

भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि. तुमच्यासारखा विचार प्रत्येकाने करावा अशी काही सक्ती आहे का हिंदू धर्मात/धर्मग्रंथात किंवा आधुनिक संदर्भपुस्तकांमधे? wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites, अच्छा असं आहे तर! आता तुम्हाला वैज्ञानिक जगातल्या काही गोष्टी सांगते. आम्हाला सगळ्यात पहिले सांगतात, की wikipedia हा संदर्भ मान्य होत नाही. याचं कारण असं आहे की उद्या मी काहीही लिहिलं तिथे, खोटंनाटं, तर ते मान्य करावं का? पुन्हा मी पाकिस्तानबद्दल बोलणार नाही. बाहेरच्या देशांवर अजूनतरी आपले राजकीय पक्ष राज्य करत नाही. आणि जसं आपण म्हणता की ही "बाजारू" (मला हा शब्द बिलकुल आवडला नाही आहे, पण आपल्यामुळेच मी अजूनही तो वापरत आहे) माध्यमं जे काही म्हणतात त्यावर आपण विश्वास ठेवत नाही तसंच नावातच एवढा धर्म असणाय्रा माहितीस्थलांवर आम्ही का विश्वास ठेवावा हो? काही तटस्थ संदर्भ (उदा: भारत सरकारचं माहितीस्थल) दाखवा मी मान्य करेन. (तटस्थ) संहिता

In reply to by अमितकुमार

सुनील 24/07/2008 - 13:04
wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites, अच्छा तर हे तुमचे खात्रीशिर माहिती देणारे स्त्रोत! मग चालूद्यात तुमचं, माझं काऽऽऽही म्हणणं नाही!! अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल. एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल. शुभेच्छा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अमितकुमार 24/07/2008 - 13:15
एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल. माझ्या बांधवावर कोठे अत्याचार होतोय याचि दखल घ्यायचि...कि बाकि धर्मियावर हि अत्याचार होतात त्यामूळे हे चालतेच असे मानून गप्प बसायचे....

In reply to by सुनील

चिन्या१९८५ 24/07/2008 - 14:27
सुनिल आणि संहिताच मत काय आहे हेच कळत नाही. अरे पाकिस्तानात्,बांग्लादेशात हिंदुंची निर्घुण हत्या अथवा तलवारीच्या जोरावर धर्मांतर केल गेल हे कुणालाही अमान्य होणार नाही.काश्मिरात तर हिंदुंना ' उद्या सकाळपर्यंत घर सोडून जा नाहीतर जगणार नाही आणि जाताना आपली बायको आणि मुली इथेच सोडुन जा' असे फतवे निघाले तेंव्हा तुम्ही लोक कुठे होता???कित्येक काश्मिरी हिंदु आता रेफ्युजीसारखे रहात आहेत. त्यांचे काय???आणि दुसर्‍या प्रकारच धर्मांतर मीही डोळ्यांनी बघितलय. सुमो वगैरे गाड्यांमधुन मिशिनरीज येतात्.पैसे काढतात गरीबांना देतात आणि धर्मांतर घडवुन आणतात. मणिपुरमधल्या एका ओळखिच्यानी सांगितल होत की त्यांच्याकडे मिशिनरीज मोठी बिल्डींग बांधतात आणि नंतर सांगतात की ख्रिश्चन व्हा आणि ही बिल्डींग तुमच्या नावावर करुन घ्या. हे बेकायदेशिर आहे. आम्ही गरीब म्हणुन आमचा धर्म संपवावा हे चुक आहे.

In reply to by चिन्या१९८५

अमितकुमार 24/07/2008 - 14:38
त्यांना फक्त ऐवढेच म्हणायचे असेल....जो पर्यत मुस्लिमाच्या धर्मांधतेचा त्रास आम्हाला होत नाहि तो पर्यत आम्हि ह्या सार्‍या कडे काना डोळा करू.........

अन्या दातार 24/07/2008 - 11:43
गांधी: भारतवासीयांनो, शत्रुवर विश्वास ठेवा, त्याच्यावर प्रेम करा. सावरकरः शत्रुवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा सावरकरः स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. हिंदूंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा गळाच उरत नाही. गांधी: मी पण एक हिंदू आहे. हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात. सावरकरः तुम्ही पोकळ हिंदू आहात. प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य आहे; श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. सज्जनाच्या रक्षणासाठी देवांनाही हातात शस्त्रे घ्यावी लागतात. गांधी: शत्रुशी लढायचे असेल तर तत्त्वांशी लढा. हाती शस्त्र घेणे कदापि वाईटच सावरकरः युद्धात तत्त्वे नाही, तलवारी टिकतात व जिंकतात.राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात. तत्त्वांनी नव्हे. गांधी: हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रुचे मन जिंका सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते यानुसार जे लोक हिंदूंची देवळे, मुर्त्या यांची नासधूस करतात त्यांना अजून मंदिरे मोकळी करुन देण्यात काहीच उपओग नसतो. त्यांना काठीनेच वठणीवर आणावे लागते कधीतरी या विषयावर पाहुणा संपादक म्हणून सविस्तर लिहिनच.

In reply to by अन्या दातार

आपण जो वाद इथे दिला आहेत त्याचा संदर्भही दिलात तर बरं कारण आज या दोन्ही व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या नावावर खपवल्या जाणाय्रा विधनांचा बचाव करण्यासाठी हयात नाहीत. जर हा वाद खरा आहे असं मानलं तर ... १. स्वातंत्र्यवीरांनी कधी निर्दोष लोकांना मारा असं सांगितलं का? २. गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा याच गांधींनी म्हणे असंही सांगितलं की पळपुटेपणा करण्यापेक्षा आक्रमकाचा प्रतिकार करा. ३. सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते पुन्हा तेच, सावरकर असं म्हणाले का, "त्यांनी मंदिर फोडलं तर तुम्ही मशीद्/चर्च पाडा"? याच हिंदू धर्मातल्या ज्ञानेश्वरांनी शेवटी हे ही सांगितलं, "दुरितांचे तिमिर जावो" संहिता

अनिल हटेला 24/07/2008 - 12:31
हाच तर प्रॉब्लेम आहे आपला !! आप्न सर्वाना समानतेची , अहिन्सेची च शिकवण देत आलोये... आज वर्च्या इतीहासात आपण ( भारत देश म्हणा किवा हिन्दुनी म्हणा) कधीच कुणावरही जाअणुन बुजुन आक्रमन ही लेलेल नाही.किवा कुणाच्या स्वातन्त्रायावर ही घाला घातलेला नाही.. आपली सभ्यता आपल हिन्दु धर्म सान्गतो की प्रेमाने जिन्का !! मान्य !! एकदम मान्य !! पन लातो के भूत बातोसे मानते नही !! पार सन्सदे वर हल्ला करण्या इतपत ह्या लोकाची हिम्मत होते... आणी आपन अजुन ही न्यायदेवतेचा मान ठेउन त्याच्या शिक्षेची अम्मल बजावणी केलेली नाही... प्रत्येक वेळी असच होत आलये ... का म्हणुन प्रत्येक वेळी सहन करत रहावे आपनच !! तीकडे इस्रायल मध्ये काहीही घातपात झाला की सरळ रणगाडे घेउन घुसतात ते !! आपणच काय म्हणुन ह्यान्न प्रेमाने शिकवण्याचा प्रयत्न करावा .. आणी किती वेळ !!! वरील सहीता मॅडम असोत वा सुनिल राव !! ह्याच्या मताचा च मी पण आहे !! पण कधीतरी रक्त खवळून येत !! (इथ मिपा च्या धोरणानुचा आदर ठेउन अगदी मवाळ भाषेत लिहिल आहे ,वास्तवीक सेक्युलर पणाचा कोणीही आव आणला की ~~~~~~~~) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

या सर्व वादा-प्रतिवादानंतर मला असं वाटतंय की मी इथे एवढा वेळ का "घालवते" ते ही जरा सांगावं. यात महत्त्व मला नाही तर कारणाला आहे, मी निमित्त आहे. अनेक लोकांची विचार करण्याची पद्धत थोड्या-बहुत फरकाने माझ्यासारखीच असेल पण त्यांना वेळ नसेल, (किंवा माझ्यासारखे ह.प.चे धं. करण्याची इच्छा नसेल,) किंवा मी बोलत आहे ते पटत आहे म्हणून शांत बसत असतील किंवा काहीही कारण असेल. तर असं नमनाला थोडं तेल वाया घालवल्यावर ... ० माझ्या मते सगळेच राजकीय पक्ष थोड्याफार फरकाने स्वतःचंच कल्याण करण्यासाठी आहेत; सामान्य, कर-भरणारी आणि कर भरण्याच्या उत्पन्नाच्याही खाली असणारी, दोन वेळचं खायलाही न मिळणारी जी बहुसंख्य जनता आहे त्यांच्यासाठी विचार, कृती करणारे फारच कमी राजकारणी असतील. जे असे भले लोक असतील, त्यांतसुद्धा किती लोक non-polar (मी secular मुद्दामच म्हणत नाही आहे) असतील माहिती नाही. ० या देशात आणि संपूर्ण जगातच थोड्याफार फरकाने काही गट आहेत; उदा: श्रीमंत आणि गरीब, संधी मिळालेला वर्ग आणि वंचित वर्ग, ज्यांना दोन वेळेचं पोटभर जेवण मिळतो तो आणि ज्यांना एक अधिक मूल म्हणजे कमावणारे दोन जास्तीचे हात हे कळतं तो वर्ग. तर यातल्या दुसय्रा प्रकारच्या लोकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात जर आपण फक्त नैसर्गिक नियम मान्य केले तर गरीब, दुबळे लोक मरू देत असं म्हणता येईल. पण आपल्या आणि इतर बय्राचशा देशात मानवतावादी दृष्टीकोन कायद्याने मान्य केला आहे आणि राज्य कायद्याचं आहे. त्यामुळे या वंचित वर्गाच्या कल्याणची जबाबदारी बहुतांशी policy makers => राजकारणी लोकांवर आहे. (अर्थात आपण आपली जबाबदारी मान्य केलीच पाहिजे पण ती तुलनात्मकरित्या कमी येते. उदा: मी सायकल घेऊन हापिसात आले म्हणून ग्लोबल वॉर्मींगवर लक्षणीय परिणाम होणार नाही, पण मी माझ्या जबाबदारीतला थोडा वाटा तरी उचलते.) ० भारतात आणखी एक गंमत आहे; बहुसंख्य लोकांना (उदा: हिंदू) असं वाटतं की आपल्यावर अन्याय होतो, कारणं अगदी गांधीजींपासून दिली जातात. आणि इतर बय्राचशा अल्पसंख्य लोकांप्रमाणे मुसलमानांना असं वाटतं की आम्हाला डावलतात. आता दोन्ही गोष्टी खय्रा असतील तर फायदा कोणाचा होतो? राजकारणी आणि उद्योगपतींचा? बहुतेक हो! हे उत्तर योग्य वाटतं. ० हिंसेमुळे हिंसा संपते का? उदाहरणच घ्या, अगदी इथलंच ... चिन्यानी हा लेख लिहिला. मी त्याच्या विरुद्ध बोलले आणि इतरांनी माझ्या विरुद्ध गरळ ओकून झालं. (चिन्या, तुमच्या खिलाडूवृत्तीबद्दल मला खरोखर आदर आहे.) याशिवाय वादामुळे वाद वाढला. कमी झाला का? आणि का कमी व्हावा. मी चिन्या, अन्या, अमितकुमारच्या विचारांच्या विरुद्ध लिहिलं, त्यांनी का म्हणून ऐकून घ्यावं. मला त्यांचं हिंसेचं समर्थन आवडत नाही मी तरी का असे (माझ्या मते) भडक लेख तसेच सोडून द्यावेत? (शिवाय एक बिन महत्त्वाचं कारण आहे तात्यामहाराज आणि मिपा च्या व्यवस्थापनाने आत्तापर्यंततरी या चर्चेला जागा उपलब्ध करून दिली आहे. मिपाचं धोरण मी विसरले होते. सर्कीटरावांंनी आठवण करून दिली म्हणून हा प्रतिसाद लिहित आहे.) तर मुद्दा असा की मला एवढंच म्हणायचं होतं की हिंसेमुळे हिंसा वाढत जाते, ती शारिरीक असेल अथवा शाब्दीक! माझ्या टिकेला "अक्कलशून्य टीका" म्हणणाय्रांची अक्कल मी काढली असती तर संभाषणाची पातळी कुठे जाऊ शकली असती याचा जरा विचार करा. पण माझा आणि इतर अनेक लोकांचा असा स्वभाव नसतो. त्यामुळेच की काय, दादरला दंगली झाल्या १९९३ मधे तेव्हाही खूपच कमी प्रमाणात लोक त्या हिंसेत सहभागी झाले होते. आता याचं कारणंच शोधायचं तर, अयोध्येत (जिथे युद्ध होत नाही ती नगरी अयोध्या, काय विरोधाभास आहे पहा ना) हिंसाचार झाला, त्याची परिणती मुंबईच्या बाँबस्फोटात झाली, त्यातून पुढे दंगली झाल्या, मुसलमानांना या देशात फारच असुरक्षित वाटू लागलं (किंवा असा विचार करण्याची सबब मिळाली). किंवा अगदी अयोधेत असं मंदीर होतं, ते मुसलमानांनी फोडलं असं मानलं तरीही हिंसेतून हिंसाच आली शांतता नाही. (आणि "धर्मच सगळं काही आहे का?" या माझ्या प्रश्नाचा रोख या मुद्द्याकडे होता.) तुम्हाला हे आपलं उदाहरण पटत नसेल तर दुसरं, बाहेरचं उदाहरण देते. आजचा इस्रायल, १९४८ च्या आधी अरबांचा पॅलेस्टाईन होता. आणि त्याच्या २००० वर्ष आधी ती जागा ज्यू लोकांची होती म्हणतात. जेव्हा इस्रायल असं स्वतंत्र राष्ट्र घोषित झालं तेव्हा तेव्हाच्या इस्रायली परदेश मंत्री रश्यात (Russia) होत्या. क्रेमलिनमधे असं मत होतं की आत्त नको, थोडं थांबा. तेव्हा या बाई म्हणाल्या, "अजून किती वर्ष थांबू आम्ही, २००० वर्ष तर अशीच गेली". आणि आज इस्रायल-पॅलेस्टाईन या प्रकरणामुळे किती अशांतता आहे हे आपल्याला माहिती आहे. आज जगाच्या त्या भागात शांतता असती, तर जग बरंच शांत असतं, किमान आत्ता आहे त्यापेक्षा असं मलातरी वाटतं. जरा विचार करून पहा. ० बय्राच प्रतिसादांचा असा सूर आहे, "बाई गं, शांती, सबुरी या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, जरा दुसय्रा बाजूलाही (उदा: मुसलमान) जाऊन असली बडबड कर. आम्हालाच का अक्कल शिकवतेस?" पण यातही दोन मुद्दे आहेत. एकतर जे लोकं विचार करू शकतात त्यांच्याशी वाद-विवाद केला जातो, म्हणून मी इथे माझा वेळ, वीज खर्च करून (फुकट घालवून असं मी म्हणणार नाही. मला अजूनही आशा आहे, की या वादविवादामुळे कोणीतरी तरी हिंसेला त्याज्य मानेल) प्रतिसाद देत आहे. मी बंदूका आणि सुय्रांना जाऊन सांगणार नाही की हिंसेने कोणाचंही भलं होणार नाही. दुसरा मुद्दा: मला असं वाटतं की माझ्या नावामुळे मी हिंदू आहे असं बहुतांश लोकांचं मत असेल. (मी कागदोपत्री हिंदूच आहे. माझं आणि इतरांचं मत काय हा एक मोट्ठा प्रश्नच आहे. पण तो मुद्दा नाही.) तर एका हिंदूने दुसय्राला सांगितलं की हे तुझं जे चाललंय ते बरं वाटत नाही, "अहिंसा परमोधर्मः" प्रत्यक्ष आचरणातही चांगलं आहे असं मला वाटतं, तर ऐकणारा ऐकून घेण्याची, त्यावर विचार करण्याची शक्यता फारच वाढते. पण समजा कोणी "महम्मद फकीरुद्दीन" नावाच्या माणसाने हेच, याच शब्दात सांगितलं असतं तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या? आता याच उदाहरणाचा दुसय्रा बाजूने विचार करा. कोणी डॉ. संहिता जोशी नावाची पोरगी/बाई जाऊन सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगते की तुम्ही हिंदूंच्या विरोधात हिंसा करू नका. याची प्रतिक्रिया काय होईल? याचंच एक आत्यंतिक (पुन्हा एकदा) उदाहरण देते: जॉर्ज बुश नावाचा एक इसम त्याच्या टोनी, माईक, इयन, कोंडोलिसा, डिक नावाच्या मित्रांबरोबर जाऊन त्याच सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगतो की लोकशाहीचाच स्वीकार करा. धर्म वगैरे त्याच्या जागी ठीक आहे, पण लोकशाहीचाच स्वीकार करा तर त्याचं काय झालं? (अर्थात प्रत्यक्ष आयुष्य एवढंच काय काहीच सरळसोट नाही याची मलाही कल्पना आहे.) ०. हिंसा टिकाऊ नाही याचं आणखी एक उदाहरण देते. ओसामा बिन लादेन हिंसा करतो, तो आज काय प्रकारचं आयुष्य जगत असेल? लपून छपून, कोणावरही विश्वास ठेवता येत नसेल, याच्या मुलाला ब्रिटीश बाईशी लग्न करूनही ब्रिटिश व्हीजा मिळत नाही (मोदींच्या बाजूने डॉ. मनमोहन सिंग बोलले तरी, ओसामापुत्राचं काय?) .... झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे येणार म्हणून गॉर्डन ब्राऊन शिखर बैठकीला जात नाही आणि असे अनेक! महात्मा गांधी, नेल्सन मंडेला ही दुसरी टोकं! जसं आपण गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली तशीच मंडेलांनाही दिली जावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे (संदर्भः म.टा., एक "बाजारू" वृत्तपत्र). ०. तर प्रश्न असा आहे की आपल्याला काय हवंय? दीर्घकाळ टीकणारी शांतता, प्रगती, हवी आहे. चीन/पाकिस्तान आपल्या डोक्यावर जाऊन नाचायला हवे आहेत का आपणही एक सुखी देश असावं? आपल्याला एक हेकेखोर हिंदू देश अशी ओळख हवी आहे का ग्रॉस हॅपीनेस कोशंट सगळ्यात जास्त असणाय्रा देशांमधे स्थान हवंय? माझ्या बाजूने मी जाहीर करत आहे की मी आता या वादात नाक खुपसणार नाही. एक-एक उदाहरण देऊन "मी आणि माझ्यासारखे विचार करणारे सुनील, कोलबेर इत्यादी भारी की चिन्या आणि आन्या, अमितकुमार वगैरे भारी" अशा प्रकारचं काथ्याकूट करून माझा हेतू साध्य होणार नाही आहे. वादात तुम्हाला भारी वाक्य टाकता आलं म्हणून तुमचा मुद्दाच बरोबर हे मला पटत नाही ( अशोक गोडबोले यांचं हे वाक्य आहे). अशा वादांतून (फार) काही निष्पन्न होत नाही या मिपाच्या धोरणावर माझा (जवळजवळ) संपूर्ण विश्वास आहे (जवळजवळ अशासाठी की माझंही एका भल्या मित्राने मतपरिवर्तन केलं). मिपाने मला ही बाजू मांडण्याची (नेहेमीप्रमाणे, पण थोडेफार धोरणाविरुद्ध जाऊन) संधी दिली त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. आणि माझ्या बाजूने हा वाद मी बंद करत आहे. (अवकाशस्थ वस्तूंमधल्या polarization चा अभ्यास करणारी, पण non-polar) संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्या१९८५ 24/07/2008 - 15:12
संहिता," aim of an argument or a discussion should be progress and not victory" अस कुणीतरी म्हटलय. मी या वाक्याला धरुन बोलतो त्यामुळे मी शक्यतो वैयक्तिक चिखलफेक करत नाही. तुमच्या कालच्या पोस्ट्सना मी उत्तर दिली आहेत त्याची उत्तरे द्यावित मी वाट पहातोय.सर्वात महत्वाच म्हणजे माझा लेख अजिबात भडकावु नाही.ते राजकीय विश्लेशण आहे.त्याला तुम्ही दिलेले उत्तर भडकावु आहे. *हिंसेमुळे हिंसाच मिळते.-प्रश्न असा आहे की जगाच्या इतिहासात तुम्हाला कधी शांतता दिसली आहे??सतत कुठे ना कुठे हिंसा होतीच्.मुळ मुद्दा हा आहे की हिंसेला हिंसेनी उत्तर दिल तर प्रश्न बिकट होतात का. कधीकधी होतात कधीकधी नाही. अहिंसेनी हिंसेविरुध्दच युध्द जिंकता येत का???हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही उदाहरणे नाहीत्.भारताच स्वातंत्र्य म्हणाल तर ते गांधींच्या अहिंसेनी मिळाल हे मला मान्य नाही. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात ब्रिटनला प्रचंड हानी झाली होती.त्यानंतर भारतातील आर्मीमधे उठाव सुरु झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पार्लिमेंटमधे सांगिता होत की ' भारतातील सैन्य आता आपल्या ताब्यात राहीलेले नाही त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्याशिवाय पर्याय नाही'.पण हिंसेनी अनेकदा समस्यांच समाधान झालय. हैद्राबादचा भारतात समावेश्,गोव्याचा भारतात समावेश्,काश्मिरमधे हिंसेनीच भारतीय सैन्याने जो सध्या काश्मिर आपल्याकडे आहे तो राखला,फ्रेंच राज्यक्रांती,अमेरिकन राज्यक्रांती इत्यादी अनेक उदाहरणे आहेत ज्यात हिंसेने प्रश्न सुटले आहेत.दिर्घकाळ शांततेसाठी दुसर्‍यानी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.दुसर म्हणजे सावरकर म्हणतात त्याप्रमाणे 'शत्रुला दया दाखवा' या हिंदु धोरणामुळे हिंदु धर्माला अत्यंत हानी झाली आहे. मग ते धोरण सोडुन द्यावे. आपण अनेक अंधश्रध्दांचा त्याग केला आहे.त्याप्रमाणे ज्याला वाटेल त्याने हिंदु धर्मातील अहिंसेच्या तत्वाचे जरुर पालन करावे पण ते वैयक्तिक पातळीवर. सार्वजनिक अथवा सरकारी पातळीवर तसे करणे म्हणजे देश संकटात टाकणे आहे. आम्हालाही हिंसा करायची अजिबात इच्छा नाही. पण आम्ही जर घरी बसुन राहीलो तर उद्या दाढ्यावाले आम्हाला आमच्या घरात घुसुन मारतील. कारण ते धर्मांध आहे. त्यांच्या धर्मात काफिराला संपवणे मान्य आहे. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरही हे लिहितात की 'मुस्लिम नेहमी 'दार्-उल्-हरब' म्हणजे अनैस्लामिक आणि 'दार्-उल्-इस्लाम' म्हणजे जिथे इस्लामी राजवट आहे असा भेद करतात . हरबला इस्लाम बनवण्यासाठी वेळ आल्यावर जिहाद पुकारु शकतात आणि जे मुस्लिम नाहीत त्यांची कत्तल करु शकता.' मग यांचा विरोध केला नाही तर हे आपल्याला संपवतील. म्हणुन वेळ पडल्यास पोथीला बाजुला ठेवुन शस्त्र हातात घेणे जरुरीचे आहे. *इस्राईलने २००० वर्ष गुलामगिरी सहन केलीय. आता ते थांबणार नाहीत. *संहिताने हिंदुंनाच अहिंसेचे धडे देणे-आम्ही समजु शकतो हे ठिक आहे.पण आमचा हिंसेचा पुरस्कार जोपर्यंत ते करत आहेत तोपर्यंतचाच आहे. त्यांनी सांगितल की आम्ही जिहाद्,काफीर,धर्मावर आधारीत हिंसाचार, 'इस्लाम हाच खरा धर्म आणि हिंदु धर्म सैतानाचा' या गोष्टींचा त्याग करत आहोत त्यानंतर आम्हीही शस्त्र टाकुन त्यांना मिठी मारु.पण सध्या ज्याच्या हातात शस्त्र आहे आणि जो मला मारायची तयारी करतोय त्याला मिठी मारुन त्याला माझा गळा कापायला देणे ही आत्महत्या आणि मुर्खपणा आहे. जे हिंदु आम्हाला विरोध करतात ते याचा विचार करत नाहीत. होय्,हिंदुत्व हा एक प्रतिकार आहे. घराला कुलुप नसाव ही चांगली ,आदर्श गोष्ट आहे.पण जगात जोपर्यंत चोर आहेत तोपर्यंत आम्ही दाराला कुलुप लावणार्.चोर संपले की कुलुप लावणे आम्हीही बंद करणार.मानवता हेच आमचे ध्येय आहे.माणुसकी हाच सर्वांचा धर्म आहे.पण जोपर्यंत इस्लामी जिहादाची दारु पिउन मुस्लिमांचा दहशतवादाचा नंगानाच देशात चालेल तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकणारच.शेंडिच्या गाठीत्,जाणव्याच्या दोरीत्,वेदांच्या उक्तित हिंदुत्व नाही. देशद्रोह्यांची ,धर्मांधांची दाढी उपटन्यात हिंदुत्व आहे.

In reply to by चिन्या१९८५

अमितकुमार 24/07/2008 - 15:26
अप्रतिम उत्तर...... गांधिने देशाला स्वातंत्र मिळवून दिले हे म्हणने हूतात्मा क्रांतिकारांचा अपमान आहे.

ऍडीजोशी 24/07/2008 - 13:46
मला मोदींचा अभिमान वाटतो. गेल्या हजारो वर्षात असं रिटॅलीएशन हिंदूंनी कधीही केलं नव्हतं. तसंच, शिवसेना होती म्हणून बाँबस्फोटानंतरच्या दंगलीत मुंबईमधला हिंदू वाचला हे १००% खरं आहे. दर वर्षी नित्यनेमाने अमरनाथ आणि इतर यात्रांवर होणारे अतिरेकी हल्ले बाळासाहेबांनी "हे हल्ले थांबले नाहित तर ह्यापुढे मुंबईतून एकही मुसलमान हज ला बहेर पडू शकणार नाहे" असे सांगितल्यावरच थांबले. त्यावेळी हे असे बजाऊन सांगण्याचा कुणातही दम नव्हता. हिंदूंचा इतिहास पहाता मागची शेकडो वर्ष कुणी ना कुणी आपल्यावर राज्य केले. पण कुणाही हिंदू राजाने कारण नसताना स्वार्थापायी एखाद्या देशावर हल्ला करून त्याची वाट लावल्याचे दिसत नाही (जेत्यांनी लिहिलील्या इतिहासातही अशी नोंद नाही) ह्या उलट मुसलमान हे कायम हिंसकच होते. एकत्र जगण्यापेक्षा दुसर्‍याला मारून त्याची संपत्ती बळकाऊन स्वतः सम्रुद्ध होण्यावरच त्यांचा भर आहे. स्वतःच्या भावांना, जन्मदात्याला सत्तेपायी मारणारे त्यांच्यातच जन्मले. अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते. त्यांनी तेच केले. फाळणी नंतर गाड्या भरभरून हिंदूंची प्रेते भारतात पाठवली गेली. आपण ते न केल्याची फळे आपण आता भोगतो आहोत. अतिरेक्यांना इथलेच मुसलमान कसे साथ देतात हे नव्याने सांगायला नको. दंगली नंतर शिवसेनेनी केलेल्या मुसलमानांच्या कत्तलींमुळे आणि मोदींच्या जशास तशा धोरणामुळे आत ते बरेच शांत झाले आहेत. मुसलमान जिथे जिथे गेले तिथे त्यांनी वाटच लावली. नुस्ते देश जिंकून न थांबता कायम त्यांनी दुसर्‍याच्या बायकांवर सामूहीक बलात्कार, मुलांची कत्तल, मंदीरांची तोडफोड, ग्रंथालये जाळणे, लोकांना बाटवणे असले किळसवाणे प्रकार केले. आता ह्यांच्या पुढे आपण दुसरा गाल करावा अशी अपेक्षा आहे का? नको तिथे दाखवलेली सहिष्णूता भ्याडपणात मोडते. ग्रंथांच्या संरक्षणासाठी तलवारच लागते. एक मंदीर गेल्याने काय फरक पडणार आहे? अस प्रश्न काही दळभद्री मंडळी विचारतात. पण का सोडावं एक मंदीर तरी? त्यात ज्या ठिकाणी रामजन्म झाला तिथलं मंदीर. जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी काय केलं. मुर्त्या फोडल्या, देवळांच्या मशिदी बनवल्या, हजारो लोकांना बाटवलं. आता हा हिंदूस्थान आहे. त्यामुळे खरं तर आपण बाटवलेली सगळी मंदीरं पुन्हा बनवली पाहिजेत. आणि कायमच मुसलमानांवर वचक ठेवला पाहिजे. थोडी सूट दिली की लगेच त्यांचे उद्योग सुरू होतात. अशा विंचवांना ठेचलंच पाहिजे. त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे. त्याशिवाय ते प्रथम १ हिंदू मारायचे थांबवणार नाहीत. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

चिन्या१९८५ 24/07/2008 - 15:22
ऍडी बर्‍याच अंशी बरोबर आहे तुमच. मुस्लिम धाकात असले तरच व्यवस्थित वागतात. धाक सुटला की मग भारतातच काय लंडनमध्येही टेररिस्ट कँप्स सुरु होतात आणि मग त्यालाही लोक 'लंडनीस्तान' म्हणुन लागतात.

अमितकुमार 24/07/2008 - 14:00
१०००% सहमत जोशि साहेब आपणाशि...... हिंदू मधिल जे सेक्यूलर आहेत ...ते तो पर्यत जागे होणार नाहित्...जो पर्यत... त्याच्या घरातिल श्रधा स्तान असणारे देवारे हे मुस्लिम येउन तोडनार नाहित... काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच

अमितकुमार 24/07/2008 - 14:59
संहिता व सूनिल ....मान्य आहे वरिल माहिति देणारे स्त्रोत हे हिंदू संस्थांनि चालवलेले आहेत ....पण डोंगरितिल हनूमान मंदिर पाड्ण्याचे बातमि ५व्या पानावर ४ ओळि मध्ये देणार्‍या व दर ६ डिसेला बाबरि मश्जिदे बाबत पान रंगवणार्‍या म्.टा. पेशा आधिक पारदर्शक आहेत.....

नारायणी 24/07/2008 - 21:12
त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का? अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल. मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशा काही विधानां मुळेचं एक हिंदु सुध्धा त्यांना मत देताना कचरतो. आले सत्तेवर तरि अघाडि असेल आनि मग आहेचं पुन्हा हिदुंचे हाल. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!! ऍडी तुम्ही इतकं छान लिहिता.(ट्रकवाले सारखा हळुवार लेख लिहिणारे तुम्हीचं ना?)हे वाक्य तुमच्याकडुन येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.

In reply to by नारायणी

या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? नाही कारण दंगली करणारे लोक गुंडच असतात असे नाही. आणि जेव्हा दंगली होतात तेव्हा त्यात सहभाग घेणारे युध्द म्हणूनच भाग घेतात. आता त्या युध्दात आपलीच माणसे मारली जाऊ शकतात ही दुर्दैवी बाब आहे. पण म्हणूनच माझा त्या वाक्याला आक्षेप नाही. निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हो कदाचित माझ्या आईला कोणी मारले तर मी मारेकर्‍याला न मारता त्याच्या आईला मारेन म्हणजे त्याला जाणीव होईल की आई जाण्याचे दु:ख काय असते ते. आता तुम्ही म्हणाल की त्यात त्याच्या आईचा अपराध काय होता तर मी म्हणेन माझ्या तरी आईचा अपराध काय होता? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का? नाही हिंदुत्व म्हणजे हेच नाही पण परिस्थिती प्रत्येक गोष्ट घडवत असते. ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल. अहो तसे बघाल तर अनेक मुस्लिम कलाकार, सैनिक, पोलिस आणि प्रशासकिय अधिकारी, शास्त्रज्ञ, कवि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले म्हणून त्यामुळे देश बंद पडला का? (अब्दुलकरीम खां साहेबांचा चाहता) पुण्याचे पेशवे

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 24/07/2008 - 23:14
निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? बरोबर आहे. पण जनता भडकल्यावर जनतेला कोण समजावणार?? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. ते तसेच करतात. हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात त्यांनी दहशतवाद्यांना मदत करायची थांबवली की मग दंगली होणारच नाहीत. आणि कोण अपराधी,कोण निरपराधी हे ठरवण अवघड असत. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग शिवसेना म्हणत नाही की सर्वांना मारुन टाका. धर्मांध मुस्लिमांना विरोध आहे.पण आता जे देशभक्त आहेत त्यांनी यांना पकडुन द्यायला हव. मुस्लिम लोकांच्या बस्त्यांमधे ही सगळी काम होतात. तिथल्या देशभक्त मुस्लिमांनी देशद्रोह्यांना ,धर्मांधांना पाठीशी घालु नये,त्यांना पकडुन द्याव. पण ते तस करत नाहीत्.ते गप्प रहातात. मग दंगली झाल्या की या धर्मांधांबरोबर यांचही घर जळत. पण आजपर्यंत प्रखर राष्ट्राभिमानी मुस्लिम संस्था झालेली नाही की जी म्हणेल की आम्ही प्रखर देशभक्त आहोत,इस्लाम आणि देशभक्ति यांच्यातील निवड करायची झाल्यास आम्ही देशभक्तीच निवडु.बहुसंख्य मुस्लिम समाज मुल्ला,मौलवीच्या ऐकण्यात असतो. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशी भाषा त्यांनी कधी केलिय्???मागच्या वर्षी लालबागच्या गणपतीसमोर मुस्लिमांनी फटाके फोडुन स्वागत केले होते. त्याचे बाळासाहेबांनी अग्रलेख लिहुन कौतुक केले होते.२ वर्षांपुर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर काही मुस्लिमांनी रॅली काढुन बॉम्बब्लास्टचा निषेध केला होता. बाळासाहेबांनी त्यावेळेसही रॅलीत भाग घेणार्‍या मुस्लिमांना अग्रलेखातुन सलाम केला होता.पण तुमची सेक्युलर मिडीया तुम्हाला हे सांगत नाही. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!! कुठल्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही???हिंदुत्ववाद्यांच्या शासनात कायदा आणि सुव्यवस्था कितीतरी चांगली असते कारण मुस्लिमांना हा संदेश जातो की त्यांचा माज चालवुन घेतला जाणार नाही.

In reply to by नारायणी

ऍडीजोशी 24/07/2008 - 23:53
मी जे लिहीलंय ते पुर्ण विचरांतीच लिहीलं आहे. चुकून काहीही नाही. त्यावेळी जे रहिले त्यांना आता मारा असं मी म्हणालो नहिये. पण आता जे आहेत त्यांना तरी धाकात ठेवा. कारण ते अतिरेक्यांना समर्थन देतात हे सत्य आहे. जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हो. कारण त्यांनी आधी मारलेला मनुष्य सुद्धा कुणाचा मुलगा / भाऊ / नवरा होताच ना. हेचं का हिंदुत्त्व? नाही. हे स्वसंरक्षण. मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. म्हणूनच धाकात ठेवायचं. नाहितर ते आपलीच सिस्टीम आपल्याविरुद्ध वापरतील. बराच काळ बुळचट अहिंसा कवटाळून बसल्याने हे प्रकार झाले आहेत आणि आपण दुसरा गाल पुढे केला की ती लोकं दुसर्‍या गालावरही थापड मारत आहेत. गोध्रा मधे झालेल्या दंगलींमधे सगळ्यांनी मुसलमान मारल्या गेले म्हणून दु:ख व्यक्त केलें. पण ते का मारल्या गेले ह्याचा विचार नाही केला. कधी ऐकलंय का हिंदू पारसी दंगल झाल्याचं. मिळून मिसळून रहाणे म्हणजे काय हे मुसलमानांना महितीच नाहिये. कुठेही बघा, ह्यांचे कायम वेगेळे भागच असतात. धाकात असल्या शिवाय मुसलमान सरळ वागत नाही हा इतीहास आहे. ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नारायणी 24/07/2008 - 23:30
वा. सगळे मुद्दे cover केले तुम्ही. अशी भाषा त्यांनी कधी केलिय्??? हा .... असं नका म्हणु. नक्किचं ते असं बोलतात. कुठे,कधी हे सगळे तपशील नाहित मझ्याकडे पण शिवसेनेने केलेल्या अशा काही भडक विधानांमुळेचं मला हा पक्ष आवडत नाही .त्यामुळे माझी ईथे नक्किचं चुक झालेली नाही. बाकी तुम्हि बाळासाहेंबा विषयी जे जे सांगितलत ते मला खरोखर माहित नव्हतं. हे खरं असेल तर उत्तमचं.

In reply to by नारायणी

चिन्या१९८५ 25/07/2008 - 00:12
हे खर आहे.वाटल्यास मी लिंक्स देतो. बाळासाहेबांनी मुस्लिमांविरुध्द भडकावु भाषण नक्की दिली आहेत. पण सरसकट सगळ्यांना काढुन टाका अथवा मारुन टाका असे ते म्हणालेले नाहीत्.मी सामना वाचतो त्यामुळे मला माहीत आहे.मुस्लिमविरोधी लेखांमधे नेहमीच धर्मांध मुस्लिम लिहिलेले असते पण मिडीयावाले भाषांतर करताना धर्मांध काढुन टाकतात्.बाळासाहेबांची भुमिका स्पष्ट आहे. मुस्लिमांनी इथल्या मातीशी इमान ठेवाव तर त्यांच्याविरुध्द दंगे होणार नाहीत.

अनिल हटेला 25/07/2008 - 10:08
ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं. काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच (एक हिन्दुस्तानी) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अमितकुमार 25/07/2008 - 11:11
हिंदूचे दमण आणि मुस्लिमाचे तूष्टिकरण याचे ताजे उदहरण .... अमरनाथला दिलेलि जमिन.... ३ दिवसाच्या मुस्लिमाच्या आंदोलना नंतर सरकारने निर्णय माघारे घेतला पण गेलि २५ दिवस हिंदू जम्मू येथे आंदोलन करतायत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातायत......

In reply to by अमितकुमार

चिन्या१९८५ 25/07/2008 - 13:21
तेच ना. ठिकठीकाणी यांचे डबल स्टँडर्ड्स दिसुन येतात. आता अमरनाथला १००एकर जमीनही हिंदुंना मिळु नये???बर त्या जमिनी कुणाच्याही नाहीत.त्यामुळे त्याचा तोटा तर कुणालाच नाही. हिंदुंच्या सोईसाठी मुस्लिम काहीच करत नाहीत्.सरकार करत तर त्याचा विरोध करत. मग हिंदुंनी त्यांची काळजी का घ्यावी??

अमितकुमार 25/07/2008 - 13:30
अश्या मुद्द्यावर माझे सो कॉलड सेक्यूलर मित्र गप्प राहने पसंत का करतात ?

अनिल हटेला 25/07/2008 - 16:21
घ्या !! बन्गलूरू मध्ये अजुन बॉम्ब्स्फोट झालेत !!! आणी फक्त निष्पाप लोकाना त्रास ह्या सर्वाचा !!!! सहन शक्ती ला सुद्धा मर्यादा असतात !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विजुभाऊ 26/07/2008 - 18:20
मिपावर बरेच दिवसानी मुद्देसूद चर्चा चालली आहे (कृपया ह्या वाक्यावरुन प्रस्तुत लेखकाला गुद्दे देवु नयेत) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला 27/07/2008 - 11:50
पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला 27/07/2008 - 11:51
पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्. समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ त

मोरारजी आणि जेठमलानी

अजय ·

पण शिवांबू वरून आठवली एक गोष्ट. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत मुतारीत भिंतीवर लिहीले होते मोरारजीज् ज्युस बार. मोरारजींच्या नावामुळे ती गोष्ट आठवून अंमळ हसू आले. :) पुण्याचे पेशवे

मावळा 23/07/2008 - 16:52
अजयराव आतापर्यंत न वाचलेल्या किश्‍श्‍यांसाठी धन्यवाद. तुम्ही पत्रकार दिसतात. राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार.... त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर... ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. याच्याशी शंभर टक्के सहमत. कालच लोकसभेतली भाषणं ऐकली. त्यावरून तर ते खरेच ठरले आहे. त्यामुळे असे काही किस्से कळाले तर आमच्यासाठी नक्कीच लिहा. पुढच्या लिखाणाची वाट बघतो. पुलेशु - मर्द मावळा

पण शिवांबू वरून आठवली एक गोष्ट. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत मुतारीत भिंतीवर लिहीले होते मोरारजीज् ज्युस बार. मोरारजींच्या नावामुळे ती गोष्ट आठवून अंमळ हसू आले. :) पुण्याचे पेशवे

मावळा 23/07/2008 - 16:52
अजयराव आतापर्यंत न वाचलेल्या किश्‍श्‍यांसाठी धन्यवाद. तुम्ही पत्रकार दिसतात. राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार.... त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर... ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. याच्याशी शंभर टक्के सहमत. कालच लोकसभेतली भाषणं ऐकली. त्यावरून तर ते खरेच ठरले आहे. त्यामुळे असे काही किस्से कळाले तर आमच्यासाठी नक्कीच लिहा. पुढच्या लिखाणाची वाट बघतो. पुलेशु - मर्द मावळा
राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार.... त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर... ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं. त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

सैतानाची बाळे

हेरंब ·

कथानक चांगले आहे. लवकरात लवकर दुसरा भाग टाकावा ही विनंती. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

कथानक चांगले आहे. लवकरात लवकर दुसरा भाग टाकावा ही विनंती. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम. एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते.

अनादि मी अनंत मी...

विकास ·

धनंजय 28/05/2008 - 07:43
यातले अनेक शब्द रोजवापरात आलेले आहेत. ही असामान्य प्रतिभा म्हणावी.

आजानुकर्ण 28/05/2008 - 08:06
सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. (नम्र) आजानुकर्ण मात्र, भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे. :B एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. #o अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. उदा. दूध, मासा, डुक्कर, कोंबडा असे रोजच्या वापरातले शब्द सोडून भाषाशुद्धी करून सोवळे केलेले दुग्ध, मत्स्य, वराह, कुक्कुट असे शब्द वापरण्याचा आग्रह भाषाशुद्धी करणारे सफाईकामगार करतात. #:S अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ;)) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? (|: आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. ~X( आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 08:32
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते! कोलू राहिला दूर, आधी एक सबंध दिवस नारळ तरी सोलून दाखव, किंवा बिनधास्त भर समुद्रात उडी मारून दाखव, किंवा बेरीसायबाला त्याच्याच कैदेत असतांना निडरपणे, 'पण ब्रिटिश राजवट या देशात ५० वर्षे टिकेल काय?' हा प्रश्न विचारून दाखव आणि मग अगदी हव्वी तेवढी मतं मांड म्हणावं तात्यारावांबद्दल! आला मोठा मतं मांडणारा फोकलिचा!! =)) असो, बाकी चालू द्या! आपला, (कट्टर सावरकरभक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 28/05/2008 - 08:48
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!
सहमत आहे ... बाकी सावरकरांचे कर्तुत्व पहायचे सोडून असल्या फालतू गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे ह्यालाच कदाचीत "काँग्रेसी मानसीकता" म्हणत असावेत ... असो. विषयांतर नको ... "न घेतले हे व्रत अंधतेने " अशी भुमीका असणार्‍या "स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ... (कट्टर सावरकरभक्त!) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:17
कोलू पिसण्याचा आणि भाषाविषयक धोरणांचा काही संबंध म्या अडाण्याला स्पष्ट कराल का तात्यासाहेब. (वरच्या आळीतला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 11:15
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. सावरकरानी जेवढे म्हणुन प्रती शब्द दिलेत ते शक्यतो मराठी शब्दच दिले आहेत. जिथे शक्य नाही तिथे आई (संस्कृत ही मराठीची आईच)कडून काही शब्द घेतले तर काय बिघडले? का त्यानी फारसी वा अरबी भाषेतील शब्द घ्यायला पाहिजे होते? इंग्रजी, फारसी,उर्दू,अरबी शब्द काढून संस्कृतप्रचूर शब्द दिल्याने मराठीचे अत्यंत नुकसान कसे काय झाले? अंदमानात कोलू पिसत असतानाही मातृभूमी आणि मातृभाषे बद्दल विचार करणार्‍या महामानवाला वंदन!

In reply to by आंबोळी

आजानुकर्ण 28/05/2008 - 11:34
दिनांक क्रमांक उपस्थित प्रतिवृत्त नगरपालिका महापालिका महापौर पर्यवेक्षक विश्वस्त त्वर्य/त्वरित गणसंख्या स्तंभ मूल्य शुल्क हुतात्मा निर्बंध शिरगणती विशेषांक सार्वमत झरणी नभोवाणी दूरदर्शन चित्रपट मध्यंतर अर्थसंकल्प क्रीडांगण प्राचार्य विधिमंडळ क्रमांक बोलपट नेपथ्य वेशभूषा दिग्दर्शक प्राध्यापक मुख्याध्यापक शस्त्रसंधी टपाल दूरध्वनी ध्वनिक्षेपक परीक्षक तारण संचलन गतिमान नेतृत्व सेवानिवृत्त वेतन यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? संस्कृत ही मराठीची आई आहे. मग फारसी आणि अरबी काय पूतना मावश्या आहेत का? ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आपला (पूतनामामा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 13:14
मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? इथे प्रश्न नुकसान भरून निघण्याचा नसून तुम्ही उपस्थीत केलेल्या मराठीचे अत्यंत नुकसान झाले याचा आहे. या शब्दांमुळे असे काय नुकसान झाले हो मराठीचे? आणि पुतनामावशी अरबी/फारसी शब्द वापरुन असा काय फायदा होणार होता मराठीचा? त्वर्य, हुतात्मा, मूल्य हे शब्द जर अवघड आहेत तर प्लेबिसाइट,अर्जंट,शहीद वगैरे शब्द सोप्पे कसे ते ही सांगा. सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आयला..... मग मराठीला बिचकून ते कुठली भाषा वापरतात? अरबी , फारसी की इंग्रजी?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:06
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. हे विधान खोटं वाटत असेल तर बिरूटेसरांनी येथे येऊन हे खोटे आहे हे सांगावे - मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:22
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. यात संस्कृतच्या नाळेचा काय संबंध? आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:29
का कळून घ्यायचं नाहीये...म्हणजे कळून घ्यायचं नसेलच तर हा शेवटचा प्रतिसाद.
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला? इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:49
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे.ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? हे मामासाहेबांचे(कर्ण) वाक्य काय सुचवते? संस्कृतातून नवे शब्द आणा आणि अत्ता प्रचलित मराठी शब्दांच्या ऐवजी वापरा असेही कोणी म्हणत नाही (उदा.डुक्कराला वराह्,कोंबड्याला कुक्कुट). पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले? वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:59
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?
हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?
या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 19:13
मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. अहो प्रियाली ताई हेच तर सांगतोय मी..... तुम्हाला अरबी-फारसी शब्द जवळचे वाटतायत तर तुम्ही ते वापरा. सावरकराना संस्कृत शब्द जवळचे वाटले म्हणुन त्यानी ते आणले.... दोघांच्याही मराठीप्रेमाविषयी शंका घेण्याचा प्रश्नच असु नये... पण सावरकरानी मराठीचे नुकसान केले अश्या दुगाण्या लोक का झाडातायत ?

In reply to by प्रियाली

मराठी भाषेचा स्वतंत्र असा प्रवास होईपर्यंत संस्कृत शब्दांनी, रचनांनी, मराठीची दुर्दशाच झाली असे वाटायला लागते. प्रमाण संस्कृत जेव्हा बोलल्या जात असावी तेव्हा बहुजनांना इतर भाषेकडे वळवले असले तरी प्रारंभीच्या मराठीला संस्कृत शब्दांच्या भरणांमुळे बीचकावे लागेल अशी अवस्था नक्कीच असेल, तसे नसते तर प्राकृत बरोबरचा मराठी भाषेचा प्रवास अधिक जोमदारपणे झाला असता असे म्हणन्यास हरकत नसावी असे वाटते. मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली. इतिहासाच्या एका जाणकार अभ्यासकांने, सतत ज्यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात, अनेक ऐतिहासिक संदर्भासहीत लेखन असते, अशा लेखन करणा-या एका लेखकाने केलेले कौतुक अभ्यासाचे बळ देते. आपले मनापासून आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 15:13
तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. बाकी, सावरकरांना प्रणाम. त्यांनी आपल्या परीने कार्य केले. त्यांनी दिलेले सर्व शब्द स्वीकारावे असे तर नाही. जे शब्द रूजू होतात ते आपोआप स्वीकारले जातात, जे होत नाहीत ते मागे पडतात. भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 15:52
"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही. असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.

In reply to by प्रियाली

अभिज्ञ 28/05/2008 - 16:48
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी? हे कळत नाही... आणि मग फारसीच का? हिब्रु, स्वाहीली, सिंहली झालेच तर आफ्रिकेतील भाषा यांचा विचार का नाही करायचा? असो. विषय फारच भरकटत चाललाय.... आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. अतिअवांतर :१) संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. म्हणजे संस्कृत येत असणार्‍यानी मारुन मुटकून बाकीच्या भाषांची गळचेपी केली. २)भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते. ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आंबोळी 28/05/2008 - 17:01
आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. सहमत. प्रशासकीय सेवेतील लोकाना जाज्वल्य देशा/भाषाभिमानापेक्षा सेवा महत्वाची असते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 18:43
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?
मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.
आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही. मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!

In reply to by प्रियाली

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या. पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे. दुसर्‍याला उपदेश करणे सोपे असते पण स्वतः ते आचरणात आणणे अवघड असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रियाली 28/05/2008 - 20:25
कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.
हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.
संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.

In reply to by प्रियाली

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही. वरील विधाने आपल्याच वेगवेगळ्या प्रतिसादातून निवडली आहेत. आता ठरवा बुवा आचरट कोण ते. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. संस्कृताचा चष्मा नाही का? मग कोणता बरे??? संस्कृत मराठीची आई हा संस्कृताचा चष्मा नाही होत का? वा! मला चष्मे कळत नाहीत का ! असेल बॉ.. आम्ही नाही ना तुमच्यासारखे भाषातज्ञ. संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. : पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा. आपण हसे लोकाला आणि *** आपल्या नाकाला. अशी सध्या गत तुमची मला वाटत आहे. हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे. अहो आता 'संस्कृताला मराठीची जननी' म्हटलेले तुम्हाला नाही ना सहन होत तसेच आहे इतरांचे. त्याना उगाच पाली का फारसी काय त्या भाषा मराठीच्या जनन्या का काय ते म्हटलेले नाही सहन होत. (आचरट) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन 28/05/2008 - 20:28
बर्‍याच अंशी सहमत. आजही जर मराठीतील मूळ शब्द काढुन पाहिले, तर संस्कृत शब्दांचा किंवा संस्कृत मधुइन आलेल्या शब्दांचा भरणा जास्त असावा असं वाटतं. अगदि लेखन शैली पासुन. मराठी डाविकडुन उजवीकडे लिहितात (संस्कृत प्रमाणे) अरबी उजवीकडुन डावीकडे. मराठित अरबी शब्द आले, त्या काळात आख्ख्या भारतावर इस्लामिक पगडा चढला होता. खुद्द मोठ मोठ्या मराठा सरदारांची नावं पीर्-जी, शेखु-जी,शहा-जी,मौला-जी अशी ठेवली जात होती. (मग इथल्या भाषेमध्ये या शब्दांचा प्रवेश झाला त्यात नवीन काय?) आता ती/तशी नावं सुद्धा अगदि मराठी संस्कृतीला धरुन आहे का? तशी नावं तुम्ही आज ठेवाल का? आपलाच, मनोबा

In reply to by अभिज्ञ

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का. अभियांत्रिकी, या शद्बाला पाली भाषेत ' सिप्पस्तथ्य' असा शब्द आहे. सिप्प = शिल्प स्तथ्य = शास्त्र शिल्पशास्त्र . बाकी भाषेचे जाणकार भेटल्यावर 'अभियांत्रिकी' शब्दास पर्यायी शब्द असल्यास इथे नक्कीच टंकेन :) चुभुदेघे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by अभिज्ञ

मन 28/05/2008 - 17:58
"अभियांत्रिकी"चे पर्यायी शब्द या भाषांत आहेत ते:- फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- बिरुटे सरांनी दिलेला शब्द स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हां मिळाले? आता सांगा,हे शब्द कशासाठी हवे आहेत? मला तरी ह्या "अभियांत्रिकी"साठी पर्यायी शब्द शोधत बसायचं प्रयोजन कळलं नाही. आपण स्पष्ट केलत, तर खरच बर होइल. आपलाच, मनोबा

In reply to by मन

अभिज्ञ 28/05/2008 - 18:13
फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? अभिज्ञ

In reply to by आजानुकर्ण

सहज 28/05/2008 - 09:03
>>सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

In reply to by सहज

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:16
धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व. हा हा हा! हे मस्त! :))

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 09:26
सावरकरांनी सुचवलेली भाषाशुद्धी ही परभाषेतील शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द तयार करण्यासंदर्भात होती. त्यात त्यांना जे वाटले तसे शब्द त्यांनी तयार केले. प्राकृत भाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर केल्याचे ऐकलेले नाही. आपण म्हणलेल्या शब्दांबद्दल (दूध, मासा, डुक्कर, कोंबडा इत्यादी) आणि त्यांच्या नेहेमीच्या वापराबद्दल त्यांना काही पडले असेल असे वाटत नाही. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. म्हणजे इतर भाषातज्ञ आणि भाषावैज्ञानिकांनी म्हणलेले बरोबर ... बरं मग अशा भाषातज्ञांचे नक्की योगदान तरी काय? माधवरावांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल शंका नाही, पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार हा एक प्रश्न येतोच. बाकी सरकारने शासकीय मराठी भाषा तयार करताना काय केले हा वेगळाच मुद्दा आहे. त्यांच्या हयातीत तर तमाम काँग्रेसची सरकारे होती - ज्यांना सावरकरांबद्दल फार प्रेम होते अशातला भाग नाही... म्हणून आपण म्हणत असलेला मुद्दा योग्य जरी वाटला तरी सावरकरांसंदर्भात (आणि या लेखा/चर्चेसंदर्भात) थोडाफार अवांतर वाटला. अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. हे बाकी बरोबर. त्यासाठी मूळ बातमीतील खालील परीच्छेद वाचल्यावर त्यांच्या इतर लेखात/बातम्यात काय अवस्था असते असा विचार माझ्याही डोक्यात आला होता...
आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं.

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:21
धन्यवाद विकासराव, तुमचा प्रतिसाद जरा संयमित आणि भक्तीच्या नशेखाली दिलेला नाही असे दिसते पण
पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले. (चकित) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 19:46
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! सर्वप्रथम मी माधव ज्युलीयनना सावरकरांचे शत्रू अथवा विरोधक वगैरे म्हणले असे मला तरी वाटत नाही. माझा मुद्दा सरळ होता, जो माणूस स्वतःच्या टोपण नाव म्हणून "ज्युलीयन" हा शब्द वापरतो त्याचे भाषा विषयी सावरकरांशी मतभेद असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय माझे तेथे असेही म्हणणे होते की जे कोणी भाषाततज्ञ वगैरे आहेत (ज्यांचे सावरकरांशी त्या संदर्भात मतभेद होते, असे) त्यांचे नक्की भाषेच्या बाबतीत एक तज्ञ म्हणून योगदान काय होते? पण, आपण ह्या मूळ मुद्यांना बुद्धीवादीपणा दाखवण्याच्या नशेत बगल मारलीत. सावरकरांना वाटले की मराठी भाषेत परभाषेतील शब्दांना समान तयार शब्द होऊ शकतात आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊ शकते, त्यांनी तसे केले. त्यावर आपला आक्षेप काय, तर, "यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? ... ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते." म्हणजे आपला मुद्दा हा संस्कृत भाषेवर आणि संस्कृत प्रचुर शब्द वापरले यावर आहे. बाकी त्वर्य हा शब्द मला माहीत नाही पण हुतात्मा आणि मूल्य हे शब्द नक्की कोणाला वापरताना बिचकायला होते ते माहीत नाही.... तसे म्हणाल तर "अजानु" आणि "कर्ण" असे दोन संस्कृतप्रचूर शब्द वापरून केलेले नाव देखील आम्हाला वापरताना बिचकायला होते (ह.घ्या.) तेंव्हा एखादे फार्सी नाव कसे सुचले नाही याचे पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्द हे वजा केल्यास ना धड तुम्हाला लिहीता येईल ना धड तुम्हाला आवडणारे अधुनीक अथवा संतसाहीत्य पुरे होऊ शकेल. "न लगे मुक्ती आणि संपदा" असे म्हणत तुकारामाने संस्कृत शब्द का वापरले, त्यामुळे सामान्य "हे ची दान देगा देवा" असे म्हणताना बिचकून जातात असे उद्या म्हणाल... (ह. घ्या.) थोडक्यात तुम्ही संस्कृतशी नाळ आहे असे माना अथवा मानू नका, तो केवळ शब्दच्छल आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे आपल्याला समजत नसेल तरच आश्चर्य आहे. आता थोडेफार भक्ती आणि नशेबद्दल मी काही कुणाएका भक्तसंप्रदायतील नाही ज्याचे जे आवडते/भावते त्याला तेथे हार घालायला मला कमी वाटत नाही. थोडक्यात ज्याच्यात जे चांगले दिसते त्याचे तेव्हढ्यापुरते गुणगान करतो. नाहीतर, "गुणगाईन आवडे हेची माझी सर्व जोडी" असे म्हणायचा मला अधिकार कसा राहील? आणि राहता राहीली नशा - त्यात काही फक्त भक्तीचाच सहभाग नसतो तर एखादी गोष्ट एकेरी पद्धतीने पाहत, मनात वेगवेगळी ओझी बाळगत आकसाने बघणार्‍या वृत्तीचापण सहभाग असतो, इतकेच म्हणावेसे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 28/05/2008 - 21:46
ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये इंग्रजीचा नको इतका पुरस्कार होणार आणि अनावश्यक इंग्रजी शब्द घुसडले जाणार हे निश्चितच आहे. हे 'अनावश्यक' शब्द काढून टाकून त्याला पर्यायी सुटसुटीत मराठी शब्द रुळवणे हे गरजेचे होते/आहे. त्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण काही ठीकाणी हा आग्रह जेव्हा 'हट्ट' बनतो तेव्हा वाद उत्पन्न होतो. उदा. वरील यादीतील काही शब्द - झरणी - हा शब्द मी आयुष्यत कधीही वापरला नाही. 'शाईचे पेन' हा सुटसुटीत प्रकार शाळेत असल्यापासून वापारला. वेतन - 'पगार' हा रुळलेला (कोणत्या का भाषेतला असेना!) शब्द उपलब्ध असताना 'वेतन' हा (आणखी दुसरर्‍या भाषेतुन उधार आणलेला) शब्द लादण्याचे काय कारण? सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

In reply to by कोलबेर

विकास 28/05/2008 - 22:10
सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही. कारण सोप्पे आहे! लेख लिहीताना केवळ त्यांची १२५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नुसते अभिवादन लिहीण्याऐवजी आणि दरवेळेस त्यांची उडी अथवा अंदमान लिहीण्याऐवजी म.टा. मधे आयती शब्दांची यादी लिहीली होती ती येथे दिली आणि त्यांची एक वेगळीच ओळख दिली. पण झाले भलतेच. रामेश्वरची चर्चा सोमेश्वर जाऊन आदळली... सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आणि त्यांना सक्रीयराजकारणात येण्याची बंदी असताना भाषाशुद्धि आणि इतर सामाजीक कामाने लोकजागृती सुरू केली. थोडक्यात जे काही शस्त्र हातात होते त्याचा उपयोग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्रिटीशांच्या विरोधातील धार वाढवायला करणे हा उद्देश. झरणी हा शब्द आपण दाखवल्यावर वाचला आणि "व्हॉट अ पेन!" असे उद्गार डोक्यात आले :-) थोडक्यात प्रत्येक शब्द पटला पाहीजे असे कोण म्हणते? पण उद्देश समजणे महत्वाचे. पण त्या ऐवजी संस्कृत आणि इतर असला वाद चालू झाला. "रत्नागिरीला असताना सावरकरांकडे गुप्तपणे इतिहासकार र.गो.सरदेसाई त्यांना भेटायला गेले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की लोकं मला भेटायला घाबरतात कारण असा एक समज आहे की माझ्याशी संबंध आला तर काही तरी त्रासच होणार, तेंव्हा तुम्ही कसे आलात? " बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

In reply to by विकास

मन 28/05/2008 - 23:02
>> बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत! +१. आपलाच, मनोबा

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. तात्यांचा भाषाशुद्धीचा प्रयत्न खरोखरच फार उत्तम आहे असे वाटते. एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. मुळात मग नवीन शब्द सुचवण्याचे प्रयोजनच काय जर तो वापरायचा नसेल तर? मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. आणि वरील मते ही फक्त आपल्यालाच भाषेतले काहीतरी कळते असा पुरोगामी अहंकार जोपासणार्‍याची असतात असे मला वाटते. अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? असाच एक बदनाम कोष शिवाजी महाराजानी 'राज्यव्यवहारकोष'या नावाने मराठी भाषा फारसीच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी तयार करवून घेतला होता. त्यामुळे भाषाशुद्धीचा प्रयत्न मला मुळीच भंपक वाटत नाही. (सनातनी) पुण्याचे पेशवे

प्रमोद देव 28/05/2008 - 08:57
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेल्या महान कार्याच्या १लक्षांश जरी कार्य आपल्या सारख्यांना करता आले तरी आपण कृतकृत्य होऊ. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:14
काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . सहमत आहे! अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. अवांतर - फडके, टिळक, चाफेकर, सावरकर, कान्हेरे, या मंडळींनीही मधल्या आळीला अभिमान वाटावा असे कर्य केले आहे! :) असो, आपण विषय काढलात म्हणून चोख उत्तर द्यावं लागलं, नाहीतर आम्हाला कोणत्याही आळीत शिरण्याची काहीही आवश्यकता नव्हती! मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखन एन्करेज करत नाही! तात्या.

राजे 28/05/2008 - 09:00
स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. !!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव 28/05/2008 - 09:54
"मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. हे पुलंचे वाक्य आहे आणि ते कोणत्या संदर्भातले आहे हे मी तात्यासारख्या भाईकाका भक्ताला सांगावे लागतेय हे काही बरे नाही. मधल्या आळीतल्या लोकांच्या गुणांना नव्हे तर अवगुणांना उद्देशून हे वाक्य आहे.(हिणकस शेरा मारण्याची वृत्ती) बाकी वैयक्तिक रित्या मी जातीपातींचा समर्थक मुळीच नाही हेही इथे नमूद करतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:12
भाषाशुद्धीच्या नावाने गावगोंधळ घालणार्‍यांना माधव जूलियन हे स्वतः भाषाशुद्धिसाठी झटणारे होते हे माहिती नसावे हे दुर्दैव व त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन करणारे आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधवरावांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली आणि स्वतःच्या चांगल्या कवितांची वाट लावली. भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी आता आमच्या लक्षात आली आहे. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते आपला, (समजूतदार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 10:31
भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे! विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्‍यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात! केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या.

गणा मास्तर 28/05/2008 - 10:20
मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे. रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:49
आमचे काही प्रतिसाद उडालेले दिसताहेत :) आपला, (संशोधक) आजानुकर्ण

नीलकांत 28/05/2008 - 10:55
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य, भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य, त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव, त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर, त्यांना मराठीचा असलेला अभिमान.... या सर्वांचा मी चाहता आहे. नीलकांत

विसुनाना 28/05/2008 - 14:19
स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम... म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली. 'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!

शशांक 28/05/2008 - 14:19
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे
स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही. बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.

भोचक 28/05/2008 - 15:15
भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी. ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत. (सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)

मन 28/05/2008 - 16:07
थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार. बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं. हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? " किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्‍यांना नराधम का म्हणु नये"? (किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:- "शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला. आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला. कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या." हे कसं वाटतं वाचायला? हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश. ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती, गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?) आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर. थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित. चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| ) आपलेच, जनसामान्यांचे मन

चतुरंग 28/05/2008 - 19:05
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती. इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते. त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही. मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल. काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्‍हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. :) ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे. किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्‍या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये. असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन. चतुरंग

वळू 28/05/2008 - 19:06
सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्‍या गोर्‍यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही. सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! - वळू

ऍडीजोशी 28/05/2008 - 19:33
उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्‍याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्‍यांची कीव करावीशी वाटते. अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मन 28/05/2008 - 19:46
म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे? अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्‍हाटी मला येत नाय. शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण? एक शंका:- मर्‍हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष" मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का? आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का? ह्.घ्या. आपलाच, मनोबा

सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात. तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्‍याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्‍या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम

चिन्या१९८५ 02/06/2008 - 00:34
येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत. याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्‍यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी. काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला. आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???

In reply to by चिन्या१९८५

विकेड बनी 02/06/2008 - 02:24
आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव? पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.

चिन्या१९८५ 02/06/2008 - 02:40
काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.

धनंजय 28/05/2008 - 07:43
यातले अनेक शब्द रोजवापरात आलेले आहेत. ही असामान्य प्रतिभा म्हणावी.

आजानुकर्ण 28/05/2008 - 08:06
सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. (नम्र) आजानुकर्ण मात्र, भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे. :B एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. #o अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. उदा. दूध, मासा, डुक्कर, कोंबडा असे रोजच्या वापरातले शब्द सोडून भाषाशुद्धी करून सोवळे केलेले दुग्ध, मत्स्य, वराह, कुक्कुट असे शब्द वापरण्याचा आग्रह भाषाशुद्धी करणारे सफाईकामगार करतात. #:S अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ;)) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? (|: आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. ~X( आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 08:32
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते! कोलू राहिला दूर, आधी एक सबंध दिवस नारळ तरी सोलून दाखव, किंवा बिनधास्त भर समुद्रात उडी मारून दाखव, किंवा बेरीसायबाला त्याच्याच कैदेत असतांना निडरपणे, 'पण ब्रिटिश राजवट या देशात ५० वर्षे टिकेल काय?' हा प्रश्न विचारून दाखव आणि मग अगदी हव्वी तेवढी मतं मांड म्हणावं तात्यारावांबद्दल! आला मोठा मतं मांडणारा फोकलिचा!! =)) असो, बाकी चालू द्या! आपला, (कट्टर सावरकरभक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 28/05/2008 - 08:48
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!
सहमत आहे ... बाकी सावरकरांचे कर्तुत्व पहायचे सोडून असल्या फालतू गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे ह्यालाच कदाचीत "काँग्रेसी मानसीकता" म्हणत असावेत ... असो. विषयांतर नको ... "न घेतले हे व्रत अंधतेने " अशी भुमीका असणार्‍या "स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ... (कट्टर सावरकरभक्त!) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:17
कोलू पिसण्याचा आणि भाषाविषयक धोरणांचा काही संबंध म्या अडाण्याला स्पष्ट कराल का तात्यासाहेब. (वरच्या आळीतला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 11:15
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. सावरकरानी जेवढे म्हणुन प्रती शब्द दिलेत ते शक्यतो मराठी शब्दच दिले आहेत. जिथे शक्य नाही तिथे आई (संस्कृत ही मराठीची आईच)कडून काही शब्द घेतले तर काय बिघडले? का त्यानी फारसी वा अरबी भाषेतील शब्द घ्यायला पाहिजे होते? इंग्रजी, फारसी,उर्दू,अरबी शब्द काढून संस्कृतप्रचूर शब्द दिल्याने मराठीचे अत्यंत नुकसान कसे काय झाले? अंदमानात कोलू पिसत असतानाही मातृभूमी आणि मातृभाषे बद्दल विचार करणार्‍या महामानवाला वंदन!

In reply to by आंबोळी

आजानुकर्ण 28/05/2008 - 11:34
दिनांक क्रमांक उपस्थित प्रतिवृत्त नगरपालिका महापालिका महापौर पर्यवेक्षक विश्वस्त त्वर्य/त्वरित गणसंख्या स्तंभ मूल्य शुल्क हुतात्मा निर्बंध शिरगणती विशेषांक सार्वमत झरणी नभोवाणी दूरदर्शन चित्रपट मध्यंतर अर्थसंकल्प क्रीडांगण प्राचार्य विधिमंडळ क्रमांक बोलपट नेपथ्य वेशभूषा दिग्दर्शक प्राध्यापक मुख्याध्यापक शस्त्रसंधी टपाल दूरध्वनी ध्वनिक्षेपक परीक्षक तारण संचलन गतिमान नेतृत्व सेवानिवृत्त वेतन यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? संस्कृत ही मराठीची आई आहे. मग फारसी आणि अरबी काय पूतना मावश्या आहेत का? ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आपला (पूतनामामा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 13:14
मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? इथे प्रश्न नुकसान भरून निघण्याचा नसून तुम्ही उपस्थीत केलेल्या मराठीचे अत्यंत नुकसान झाले याचा आहे. या शब्दांमुळे असे काय नुकसान झाले हो मराठीचे? आणि पुतनामावशी अरबी/फारसी शब्द वापरुन असा काय फायदा होणार होता मराठीचा? त्वर्य, हुतात्मा, मूल्य हे शब्द जर अवघड आहेत तर प्लेबिसाइट,अर्जंट,शहीद वगैरे शब्द सोप्पे कसे ते ही सांगा. सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आयला..... मग मराठीला बिचकून ते कुठली भाषा वापरतात? अरबी , फारसी की इंग्रजी?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:06
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. हे विधान खोटं वाटत असेल तर बिरूटेसरांनी येथे येऊन हे खोटे आहे हे सांगावे - मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:22
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. यात संस्कृतच्या नाळेचा काय संबंध? आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:29
का कळून घ्यायचं नाहीये...म्हणजे कळून घ्यायचं नसेलच तर हा शेवटचा प्रतिसाद.
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला? इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:49
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे.ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? हे मामासाहेबांचे(कर्ण) वाक्य काय सुचवते? संस्कृतातून नवे शब्द आणा आणि अत्ता प्रचलित मराठी शब्दांच्या ऐवजी वापरा असेही कोणी म्हणत नाही (उदा.डुक्कराला वराह्,कोंबड्याला कुक्कुट). पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले? वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:59
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?
हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?
या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 19:13
मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. अहो प्रियाली ताई हेच तर सांगतोय मी..... तुम्हाला अरबी-फारसी शब्द जवळचे वाटतायत तर तुम्ही ते वापरा. सावरकराना संस्कृत शब्द जवळचे वाटले म्हणुन त्यानी ते आणले.... दोघांच्याही मराठीप्रेमाविषयी शंका घेण्याचा प्रश्नच असु नये... पण सावरकरानी मराठीचे नुकसान केले अश्या दुगाण्या लोक का झाडातायत ?

In reply to by प्रियाली

मराठी भाषेचा स्वतंत्र असा प्रवास होईपर्यंत संस्कृत शब्दांनी, रचनांनी, मराठीची दुर्दशाच झाली असे वाटायला लागते. प्रमाण संस्कृत जेव्हा बोलल्या जात असावी तेव्हा बहुजनांना इतर भाषेकडे वळवले असले तरी प्रारंभीच्या मराठीला संस्कृत शब्दांच्या भरणांमुळे बीचकावे लागेल अशी अवस्था नक्कीच असेल, तसे नसते तर प्राकृत बरोबरचा मराठी भाषेचा प्रवास अधिक जोमदारपणे झाला असता असे म्हणन्यास हरकत नसावी असे वाटते. मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली. इतिहासाच्या एका जाणकार अभ्यासकांने, सतत ज्यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात, अनेक ऐतिहासिक संदर्भासहीत लेखन असते, अशा लेखन करणा-या एका लेखकाने केलेले कौतुक अभ्यासाचे बळ देते. आपले मनापासून आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 15:13
तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. बाकी, सावरकरांना प्रणाम. त्यांनी आपल्या परीने कार्य केले. त्यांनी दिलेले सर्व शब्द स्वीकारावे असे तर नाही. जे शब्द रूजू होतात ते आपोआप स्वीकारले जातात, जे होत नाहीत ते मागे पडतात. भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 15:52
"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही. असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.

In reply to by प्रियाली

अभिज्ञ 28/05/2008 - 16:48
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी? हे कळत नाही... आणि मग फारसीच का? हिब्रु, स्वाहीली, सिंहली झालेच तर आफ्रिकेतील भाषा यांचा विचार का नाही करायचा? असो. विषय फारच भरकटत चाललाय.... आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. अतिअवांतर :१) संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. म्हणजे संस्कृत येत असणार्‍यानी मारुन मुटकून बाकीच्या भाषांची गळचेपी केली. २)भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते. ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आंबोळी 28/05/2008 - 17:01
आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. सहमत. प्रशासकीय सेवेतील लोकाना जाज्वल्य देशा/भाषाभिमानापेक्षा सेवा महत्वाची असते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 18:43
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?
मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.
आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही. मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!

In reply to by प्रियाली

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या. पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे. दुसर्‍याला उपदेश करणे सोपे असते पण स्वतः ते आचरणात आणणे अवघड असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रियाली 28/05/2008 - 20:25
कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.
हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.
संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.

In reply to by प्रियाली

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही. वरील विधाने आपल्याच वेगवेगळ्या प्रतिसादातून निवडली आहेत. आता ठरवा बुवा आचरट कोण ते. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. संस्कृताचा चष्मा नाही का? मग कोणता बरे??? संस्कृत मराठीची आई हा संस्कृताचा चष्मा नाही होत का? वा! मला चष्मे कळत नाहीत का ! असेल बॉ.. आम्ही नाही ना तुमच्यासारखे भाषातज्ञ. संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. : पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा. आपण हसे लोकाला आणि *** आपल्या नाकाला. अशी सध्या गत तुमची मला वाटत आहे. हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे. अहो आता 'संस्कृताला मराठीची जननी' म्हटलेले तुम्हाला नाही ना सहन होत तसेच आहे इतरांचे. त्याना उगाच पाली का फारसी काय त्या भाषा मराठीच्या जनन्या का काय ते म्हटलेले नाही सहन होत. (आचरट) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन 28/05/2008 - 20:28
बर्‍याच अंशी सहमत. आजही जर मराठीतील मूळ शब्द काढुन पाहिले, तर संस्कृत शब्दांचा किंवा संस्कृत मधुइन आलेल्या शब्दांचा भरणा जास्त असावा असं वाटतं. अगदि लेखन शैली पासुन. मराठी डाविकडुन उजवीकडे लिहितात (संस्कृत प्रमाणे) अरबी उजवीकडुन डावीकडे. मराठित अरबी शब्द आले, त्या काळात आख्ख्या भारतावर इस्लामिक पगडा चढला होता. खुद्द मोठ मोठ्या मराठा सरदारांची नावं पीर्-जी, शेखु-जी,शहा-जी,मौला-जी अशी ठेवली जात होती. (मग इथल्या भाषेमध्ये या शब्दांचा प्रवेश झाला त्यात नवीन काय?) आता ती/तशी नावं सुद्धा अगदि मराठी संस्कृतीला धरुन आहे का? तशी नावं तुम्ही आज ठेवाल का? आपलाच, मनोबा

In reply to by अभिज्ञ

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का. अभियांत्रिकी, या शद्बाला पाली भाषेत ' सिप्पस्तथ्य' असा शब्द आहे. सिप्प = शिल्प स्तथ्य = शास्त्र शिल्पशास्त्र . बाकी भाषेचे जाणकार भेटल्यावर 'अभियांत्रिकी' शब्दास पर्यायी शब्द असल्यास इथे नक्कीच टंकेन :) चुभुदेघे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by अभिज्ञ

मन 28/05/2008 - 17:58
"अभियांत्रिकी"चे पर्यायी शब्द या भाषांत आहेत ते:- फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- बिरुटे सरांनी दिलेला शब्द स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हां मिळाले? आता सांगा,हे शब्द कशासाठी हवे आहेत? मला तरी ह्या "अभियांत्रिकी"साठी पर्यायी शब्द शोधत बसायचं प्रयोजन कळलं नाही. आपण स्पष्ट केलत, तर खरच बर होइल. आपलाच, मनोबा

In reply to by मन

अभिज्ञ 28/05/2008 - 18:13
फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? अभिज्ञ

In reply to by आजानुकर्ण

सहज 28/05/2008 - 09:03
>>सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

In reply to by सहज

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:16
धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व. हा हा हा! हे मस्त! :))

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 09:26
सावरकरांनी सुचवलेली भाषाशुद्धी ही परभाषेतील शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द तयार करण्यासंदर्भात होती. त्यात त्यांना जे वाटले तसे शब्द त्यांनी तयार केले. प्राकृत भाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर केल्याचे ऐकलेले नाही. आपण म्हणलेल्या शब्दांबद्दल (दूध, मासा, डुक्कर, कोंबडा इत्यादी) आणि त्यांच्या नेहेमीच्या वापराबद्दल त्यांना काही पडले असेल असे वाटत नाही. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. म्हणजे इतर भाषातज्ञ आणि भाषावैज्ञानिकांनी म्हणलेले बरोबर ... बरं मग अशा भाषातज्ञांचे नक्की योगदान तरी काय? माधवरावांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल शंका नाही, पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार हा एक प्रश्न येतोच. बाकी सरकारने शासकीय मराठी भाषा तयार करताना काय केले हा वेगळाच मुद्दा आहे. त्यांच्या हयातीत तर तमाम काँग्रेसची सरकारे होती - ज्यांना सावरकरांबद्दल फार प्रेम होते अशातला भाग नाही... म्हणून आपण म्हणत असलेला मुद्दा योग्य जरी वाटला तरी सावरकरांसंदर्भात (आणि या लेखा/चर्चेसंदर्भात) थोडाफार अवांतर वाटला. अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. हे बाकी बरोबर. त्यासाठी मूळ बातमीतील खालील परीच्छेद वाचल्यावर त्यांच्या इतर लेखात/बातम्यात काय अवस्था असते असा विचार माझ्याही डोक्यात आला होता...
आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं.

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:21
धन्यवाद विकासराव, तुमचा प्रतिसाद जरा संयमित आणि भक्तीच्या नशेखाली दिलेला नाही असे दिसते पण
पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले. (चकित) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 19:46
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! सर्वप्रथम मी माधव ज्युलीयनना सावरकरांचे शत्रू अथवा विरोधक वगैरे म्हणले असे मला तरी वाटत नाही. माझा मुद्दा सरळ होता, जो माणूस स्वतःच्या टोपण नाव म्हणून "ज्युलीयन" हा शब्द वापरतो त्याचे भाषा विषयी सावरकरांशी मतभेद असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय माझे तेथे असेही म्हणणे होते की जे कोणी भाषाततज्ञ वगैरे आहेत (ज्यांचे सावरकरांशी त्या संदर्भात मतभेद होते, असे) त्यांचे नक्की भाषेच्या बाबतीत एक तज्ञ म्हणून योगदान काय होते? पण, आपण ह्या मूळ मुद्यांना बुद्धीवादीपणा दाखवण्याच्या नशेत बगल मारलीत. सावरकरांना वाटले की मराठी भाषेत परभाषेतील शब्दांना समान तयार शब्द होऊ शकतात आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊ शकते, त्यांनी तसे केले. त्यावर आपला आक्षेप काय, तर, "यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? ... ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते." म्हणजे आपला मुद्दा हा संस्कृत भाषेवर आणि संस्कृत प्रचुर शब्द वापरले यावर आहे. बाकी त्वर्य हा शब्द मला माहीत नाही पण हुतात्मा आणि मूल्य हे शब्द नक्की कोणाला वापरताना बिचकायला होते ते माहीत नाही.... तसे म्हणाल तर "अजानु" आणि "कर्ण" असे दोन संस्कृतप्रचूर शब्द वापरून केलेले नाव देखील आम्हाला वापरताना बिचकायला होते (ह.घ्या.) तेंव्हा एखादे फार्सी नाव कसे सुचले नाही याचे पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्द हे वजा केल्यास ना धड तुम्हाला लिहीता येईल ना धड तुम्हाला आवडणारे अधुनीक अथवा संतसाहीत्य पुरे होऊ शकेल. "न लगे मुक्ती आणि संपदा" असे म्हणत तुकारामाने संस्कृत शब्द का वापरले, त्यामुळे सामान्य "हे ची दान देगा देवा" असे म्हणताना बिचकून जातात असे उद्या म्हणाल... (ह. घ्या.) थोडक्यात तुम्ही संस्कृतशी नाळ आहे असे माना अथवा मानू नका, तो केवळ शब्दच्छल आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे आपल्याला समजत नसेल तरच आश्चर्य आहे. आता थोडेफार भक्ती आणि नशेबद्दल मी काही कुणाएका भक्तसंप्रदायतील नाही ज्याचे जे आवडते/भावते त्याला तेथे हार घालायला मला कमी वाटत नाही. थोडक्यात ज्याच्यात जे चांगले दिसते त्याचे तेव्हढ्यापुरते गुणगान करतो. नाहीतर, "गुणगाईन आवडे हेची माझी सर्व जोडी" असे म्हणायचा मला अधिकार कसा राहील? आणि राहता राहीली नशा - त्यात काही फक्त भक्तीचाच सहभाग नसतो तर एखादी गोष्ट एकेरी पद्धतीने पाहत, मनात वेगवेगळी ओझी बाळगत आकसाने बघणार्‍या वृत्तीचापण सहभाग असतो, इतकेच म्हणावेसे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 28/05/2008 - 21:46
ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये इंग्रजीचा नको इतका पुरस्कार होणार आणि अनावश्यक इंग्रजी शब्द घुसडले जाणार हे निश्चितच आहे. हे 'अनावश्यक' शब्द काढून टाकून त्याला पर्यायी सुटसुटीत मराठी शब्द रुळवणे हे गरजेचे होते/आहे. त्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण काही ठीकाणी हा आग्रह जेव्हा 'हट्ट' बनतो तेव्हा वाद उत्पन्न होतो. उदा. वरील यादीतील काही शब्द - झरणी - हा शब्द मी आयुष्यत कधीही वापरला नाही. 'शाईचे पेन' हा सुटसुटीत प्रकार शाळेत असल्यापासून वापारला. वेतन - 'पगार' हा रुळलेला (कोणत्या का भाषेतला असेना!) शब्द उपलब्ध असताना 'वेतन' हा (आणखी दुसरर्‍या भाषेतुन उधार आणलेला) शब्द लादण्याचे काय कारण? सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

In reply to by कोलबेर

विकास 28/05/2008 - 22:10
सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही. कारण सोप्पे आहे! लेख लिहीताना केवळ त्यांची १२५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नुसते अभिवादन लिहीण्याऐवजी आणि दरवेळेस त्यांची उडी अथवा अंदमान लिहीण्याऐवजी म.टा. मधे आयती शब्दांची यादी लिहीली होती ती येथे दिली आणि त्यांची एक वेगळीच ओळख दिली. पण झाले भलतेच. रामेश्वरची चर्चा सोमेश्वर जाऊन आदळली... सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आणि त्यांना सक्रीयराजकारणात येण्याची बंदी असताना भाषाशुद्धि आणि इतर सामाजीक कामाने लोकजागृती सुरू केली. थोडक्यात जे काही शस्त्र हातात होते त्याचा उपयोग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्रिटीशांच्या विरोधातील धार वाढवायला करणे हा उद्देश. झरणी हा शब्द आपण दाखवल्यावर वाचला आणि "व्हॉट अ पेन!" असे उद्गार डोक्यात आले :-) थोडक्यात प्रत्येक शब्द पटला पाहीजे असे कोण म्हणते? पण उद्देश समजणे महत्वाचे. पण त्या ऐवजी संस्कृत आणि इतर असला वाद चालू झाला. "रत्नागिरीला असताना सावरकरांकडे गुप्तपणे इतिहासकार र.गो.सरदेसाई त्यांना भेटायला गेले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की लोकं मला भेटायला घाबरतात कारण असा एक समज आहे की माझ्याशी संबंध आला तर काही तरी त्रासच होणार, तेंव्हा तुम्ही कसे आलात? " बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

In reply to by विकास

मन 28/05/2008 - 23:02
>> बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत! +१. आपलाच, मनोबा

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. तात्यांचा भाषाशुद्धीचा प्रयत्न खरोखरच फार उत्तम आहे असे वाटते. एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. मुळात मग नवीन शब्द सुचवण्याचे प्रयोजनच काय जर तो वापरायचा नसेल तर? मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. आणि वरील मते ही फक्त आपल्यालाच भाषेतले काहीतरी कळते असा पुरोगामी अहंकार जोपासणार्‍याची असतात असे मला वाटते. अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? असाच एक बदनाम कोष शिवाजी महाराजानी 'राज्यव्यवहारकोष'या नावाने मराठी भाषा फारसीच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी तयार करवून घेतला होता. त्यामुळे भाषाशुद्धीचा प्रयत्न मला मुळीच भंपक वाटत नाही. (सनातनी) पुण्याचे पेशवे

प्रमोद देव 28/05/2008 - 08:57
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेल्या महान कार्याच्या १लक्षांश जरी कार्य आपल्या सारख्यांना करता आले तरी आपण कृतकृत्य होऊ. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:14
काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . सहमत आहे! अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. अवांतर - फडके, टिळक, चाफेकर, सावरकर, कान्हेरे, या मंडळींनीही मधल्या आळीला अभिमान वाटावा असे कर्य केले आहे! :) असो, आपण विषय काढलात म्हणून चोख उत्तर द्यावं लागलं, नाहीतर आम्हाला कोणत्याही आळीत शिरण्याची काहीही आवश्यकता नव्हती! मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखन एन्करेज करत नाही! तात्या.

राजे 28/05/2008 - 09:00
स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. !!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव 28/05/2008 - 09:54
"मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. हे पुलंचे वाक्य आहे आणि ते कोणत्या संदर्भातले आहे हे मी तात्यासारख्या भाईकाका भक्ताला सांगावे लागतेय हे काही बरे नाही. मधल्या आळीतल्या लोकांच्या गुणांना नव्हे तर अवगुणांना उद्देशून हे वाक्य आहे.(हिणकस शेरा मारण्याची वृत्ती) बाकी वैयक्तिक रित्या मी जातीपातींचा समर्थक मुळीच नाही हेही इथे नमूद करतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:12
भाषाशुद्धीच्या नावाने गावगोंधळ घालणार्‍यांना माधव जूलियन हे स्वतः भाषाशुद्धिसाठी झटणारे होते हे माहिती नसावे हे दुर्दैव व त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन करणारे आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधवरावांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली आणि स्वतःच्या चांगल्या कवितांची वाट लावली. भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी आता आमच्या लक्षात आली आहे. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते आपला, (समजूतदार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 10:31
भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे! विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्‍यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात! केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या.

गणा मास्तर 28/05/2008 - 10:20
मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे. रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:49
आमचे काही प्रतिसाद उडालेले दिसताहेत :) आपला, (संशोधक) आजानुकर्ण

नीलकांत 28/05/2008 - 10:55
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य, भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य, त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव, त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर, त्यांना मराठीचा असलेला अभिमान.... या सर्वांचा मी चाहता आहे. नीलकांत

विसुनाना 28/05/2008 - 14:19
स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम... म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली. 'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!

शशांक 28/05/2008 - 14:19
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे
स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही. बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.

भोचक 28/05/2008 - 15:15
भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी. ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत. (सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)

मन 28/05/2008 - 16:07
थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार. बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं. हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? " किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्‍यांना नराधम का म्हणु नये"? (किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:- "शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला. आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला. कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या." हे कसं वाटतं वाचायला? हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश. ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती, गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?) आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर. थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित. चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| ) आपलेच, जनसामान्यांचे मन

चतुरंग 28/05/2008 - 19:05
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती. इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते. त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही. मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल. काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्‍हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. :) ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे. किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्‍या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये. असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन. चतुरंग

वळू 28/05/2008 - 19:06
सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्‍या गोर्‍यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही. सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! - वळू

ऍडीजोशी 28/05/2008 - 19:33
उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्‍याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्‍यांची कीव करावीशी वाटते. अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मन 28/05/2008 - 19:46
म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे? अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्‍हाटी मला येत नाय. शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण? एक शंका:- मर्‍हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष" मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का? आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का? ह्.घ्या. आपलाच, मनोबा

सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात. तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्‍याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्‍या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम

चिन्या१९८५ 02/06/2008 - 00:34
येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत. याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्‍यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी. काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला. आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???

In reply to by चिन्या१९८५

विकेड बनी 02/06/2008 - 02:24
आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव? पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.

चिन्या१९८५ 02/06/2008 - 02:40
काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला... असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

रंगपंचमी (उत्तरार्ध)

बट्ट्याबोळ ·

केसं कलर केली होती.. एकदम चपखल.. एकूणच पुण्यातल्या राजकीय बोलीचा अभ्यास आपला लैच भारी दिसत आहे, पण भाग थोडे तुटक वाटले. जरा जास्त लिहा की. पुण्याचे पेशवे

वेलदोडा 13/05/2008 - 12:03
प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढणार. ह्म्म्...छान चाललीये रंगपंचमी..पण थोडक्यातच आटोपली असे वाटतय. जरा अ़जून लिहायला हवे / वाचायला मिळायला हवे होते असे वाटले. किन्वा २ भागात लिहिण्यापेक्षा एकच मोठा भाग केला असता तर मजा आली असती. २ भागांमुळे गोष्टीची लिन्क तुटल्यासारखी वाटली. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांची भाषा , त्यांचे राहणीमान, बोलण्यावागण्याची पध्दत अचूक मांडली आहे.

बट्ट्याबोळ 13/05/2008 - 22:13
पुढील लेखन करताना सूचना ध्यानात ठेवल्या जातील. दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक आभार!! -बट्ट्या.

केसं कलर केली होती.. एकदम चपखल.. एकूणच पुण्यातल्या राजकीय बोलीचा अभ्यास आपला लैच भारी दिसत आहे, पण भाग थोडे तुटक वाटले. जरा जास्त लिहा की. पुण्याचे पेशवे

वेलदोडा 13/05/2008 - 12:03
प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढणार. ह्म्म्...छान चाललीये रंगपंचमी..पण थोडक्यातच आटोपली असे वाटतय. जरा अ़जून लिहायला हवे / वाचायला मिळायला हवे होते असे वाटले. किन्वा २ भागात लिहिण्यापेक्षा एकच मोठा भाग केला असता तर मजा आली असती. २ भागांमुळे गोष्टीची लिन्क तुटल्यासारखी वाटली. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांची भाषा , त्यांचे राहणीमान, बोलण्यावागण्याची पध्दत अचूक मांडली आहे.

बट्ट्याबोळ 13/05/2008 - 22:13
पुढील लेखन करताना सूचना ध्यानात ठेवल्या जातील. दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक आभार!! -बट्ट्या.
(पात्र व घटना काल्पनीक) रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच. इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून.

आपली बस

हेरंब ·

गणपा 27/04/2008 - 15:56
वाह हेरंबराव! आरक्षणावर छान हाणलय. सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे दादूच म्हणण एकदम पटल. - (लोंबकळता ) गणपा

देवदत्त 27/04/2008 - 16:44
छान लिहिलंय... आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे मस्तच :)

शितल 27/04/2008 - 21:03
तुम्ही लिहले आहे ते बरोबर आहे, बाकी मी स्त्री असुन ही आरक्षणा मला आरक्षणा बद्द्ल चीड आहे, इथे स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची. बसमध्ये जो पहिला त्याला बसायला जागा पण जर कोणाला गरज असेल त्याला जे बसलेले असतील त्या॑नी जागा द्यावी. :))

In reply to by शितल

गर्भवती महिला, कडेवर मुल असलेल्या महिला, लहान मुले, आजारी माणसे, वृद्ध स्त्री-पुरूष ह्यांना बसण्यासाठी जागा द्यावी. अनेक जणं देतातही.

In reply to by शितल

लंबूटांग 27/04/2008 - 23:56
स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची
माझे पण अगदी असेच म्हणणे आहे ...

In reply to by शितल

विकि 28/04/2008 - 16:42
तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. कळावे कॉ.विकि

वावा.... मस्त लेख... माझ्या कॉलेजच्या वेळी पी एम टी मध्ये लिहिलेले असायचे........ गरोदर स्त्रिया ,वृद्ध, अपंग आणि महिलांना बसायला जागा द्या. मी कोणत्या महिलेला विचारले नाही, पण वाटायचे की मी स्वतः निरोगी, तरूण आणि सक्षम महिला असतो तर त्या वाक्यावर मला आक्षेप घ्यावासा वाटला असता.... असो...

धमाल मुलगा 28/04/2008 - 15:36
एकदम ठकाठक टोले.... मस्त! अवांतरः स्त्रिया आणि आरक्षणावरुन 'अगंबाई अरेच्च्या' मधला एक डायलॉग आठवला... स्थळःमंत्रालयाचं गेट, बायकांचा घोळका घोषणा देतोय "साडे-तेहत्तीस टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे! " त्यावर नार्वेकरः आयला, तिथंसुध्दा नापास...पुर्ण ३५% सुध्दा नाही?

शितल 28/04/2008 - 18:57
>>>>>तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. तुमचे म्हणने बरोबर आहे, पण आरक्षण म्हणजेच दुय्यम लेखणे, कि॑वा दया देणे -करणे,(माझे हे वैयक्तीक मत) आरक्षणाचा लाभ स्त्रिया॑ना होतो ही, पण आरक्षण नसत तरी त्या॑नी आपले कर्तुत्व सिध्द केलेच असते. >>>बस मध्ये गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. पण आरक्षण नसताना बसमध्ये गरजु स्त्रिया॑ना जागा दिली अथवा मदत केली तर ती माणुसकीच ठरेल.

तिमा 08/02/2014 - 17:58
जुने धागे उकरुन नवीन सभासदांना वाचायला देणे हा ही एक उद्योग आहे. हे बहुतेक मुंबईतल्या बसला रुपक धरुन आहे.

गणपा 27/04/2008 - 15:56
वाह हेरंबराव! आरक्षणावर छान हाणलय. सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे दादूच म्हणण एकदम पटल. - (लोंबकळता ) गणपा

देवदत्त 27/04/2008 - 16:44
छान लिहिलंय... आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे मस्तच :)

शितल 27/04/2008 - 21:03
तुम्ही लिहले आहे ते बरोबर आहे, बाकी मी स्त्री असुन ही आरक्षणा मला आरक्षणा बद्द्ल चीड आहे, इथे स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची. बसमध्ये जो पहिला त्याला बसायला जागा पण जर कोणाला गरज असेल त्याला जे बसलेले असतील त्या॑नी जागा द्यावी. :))

In reply to by शितल

गर्भवती महिला, कडेवर मुल असलेल्या महिला, लहान मुले, आजारी माणसे, वृद्ध स्त्री-पुरूष ह्यांना बसण्यासाठी जागा द्यावी. अनेक जणं देतातही.

In reply to by शितल

लंबूटांग 27/04/2008 - 23:56
स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची
माझे पण अगदी असेच म्हणणे आहे ...

In reply to by शितल

विकि 28/04/2008 - 16:42
तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. कळावे कॉ.विकि

वावा.... मस्त लेख... माझ्या कॉलेजच्या वेळी पी एम टी मध्ये लिहिलेले असायचे........ गरोदर स्त्रिया ,वृद्ध, अपंग आणि महिलांना बसायला जागा द्या. मी कोणत्या महिलेला विचारले नाही, पण वाटायचे की मी स्वतः निरोगी, तरूण आणि सक्षम महिला असतो तर त्या वाक्यावर मला आक्षेप घ्यावासा वाटला असता.... असो...

धमाल मुलगा 28/04/2008 - 15:36
एकदम ठकाठक टोले.... मस्त! अवांतरः स्त्रिया आणि आरक्षणावरुन 'अगंबाई अरेच्च्या' मधला एक डायलॉग आठवला... स्थळःमंत्रालयाचं गेट, बायकांचा घोळका घोषणा देतोय "साडे-तेहत्तीस टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे! " त्यावर नार्वेकरः आयला, तिथंसुध्दा नापास...पुर्ण ३५% सुध्दा नाही?

शितल 28/04/2008 - 18:57
>>>>>तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. तुमचे म्हणने बरोबर आहे, पण आरक्षण म्हणजेच दुय्यम लेखणे, कि॑वा दया देणे -करणे,(माझे हे वैयक्तीक मत) आरक्षणाचा लाभ स्त्रिया॑ना होतो ही, पण आरक्षण नसत तरी त्या॑नी आपले कर्तुत्व सिध्द केलेच असते. >>>बस मध्ये गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. पण आरक्षण नसताना बसमध्ये गरजु स्त्रिया॑ना जागा दिली अथवा मदत केली तर ती माणुसकीच ठरेल.

तिमा 08/02/2014 - 17:58
जुने धागे उकरुन नवीन सभासदांना वाचायला देणे हा ही एक उद्योग आहे. हे बहुतेक मुंबईतल्या बसला रुपक धरुन आहे.
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा. सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात. सदू : बस आली बस. दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस! (तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.) दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे. सदू : मग दुसर्‍या सीटवर बसु या का ? दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे. सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ? दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्‍या आयांसाठी आहे.

अपयशाचे व्यवस्थापन

विकास ·

शितल 24/04/2008 - 00:58
डॉ. कलाम या॑च्या बद्दलचा असलेला आदर हे वाचुन अजुनही वाढला, तसे त्या॑चे अग्निप॑ख हे मी वाचले आहे आणि सर्व भारतीया॑नी ते वाचावे अशी इच्छा. अवघ्या ३ ते ४ बॅगा घेऊन राष्टपती भवन सोडणारे ते पहिलेच राष्टपती असावेत. डॉ. कलाम या॑चा बद्दल अत्य्॑त आदर असलेली. शितल

मैत्र 24/04/2008 - 01:03
हा लेख आणि मूळ दुवा मिपावर आणल्याबद्द्ल... कलामांसारखे दहा जण जर भारतात पुढे आले तर देशात नक्कीच सुधारणा होइल.. त्यांचा एक एक विचार आपल्या व्यक्तिगत प्रॉब्लेम्स वर उपाय ठरेल... आणि काय विलक्षण आशावादी आहे हा माणूस... साध्या रोजच्या त्रासाने - बॉस, सहकारी, कामाचं स्वरुप, कामाचा ताण, सार्वजनिक सोयी, विविध ग्राहक सहाय्य वाल्यांचे अनुभव यानेच वैताग येतो... कलाम कुठेही काहीही निगेटिव्ह बोलत नाहीत.. सगळे सरकारी अनुभव काय उत्तम असतील ? शक्यच नाही.. सलाम त्यांच्या सरळपणाला... मराठी प्रतिशब्द मिळत नाहीये म्हणून मूळ शब्द तसाच लिहितो त्या लेखातला - Integrity.. मिपाकरांनी लेखानंतर मूळ दुवा जरुर वाचावा... विकास.. पुन्हा आभार...

सहज 24/04/2008 - 08:16
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अतिशय अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केली आहे व करत आहेत. अश्या सकारात्मक अनुभवातुन माणूस नक्कीच जास्त शिकतो व जास्त प्रयत्न करुन दाखवतो. बाकी इतर सरकारी खात्यात बॉस बळीचा बकरा शोधत असेलच. घाटपांडे साहेबांना जास्त माहीती असेल. बाकी बॉस च्या बाबत फिरोज खानच्या चित्रपटातील [तिथे ते साथिदाराबाबत आहे] एक गाणे आठवते, तितकेच लागु आहे - हर किसीको नही मिलता... :-)

मनस्वी 24/04/2008 - 10:30
त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.

कलाम यांच्या विषयीच्या आदर हे वाचून नक्कीच वाढला, ह्या अशा व्यक्ती हीच तर भारताची खरी संपत्ती! विकास,भाषांतराबद्दल धन्यवाद, स्वाती

धमाल मुलगा 24/04/2008 - 12:29
"Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great." - डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.
त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.
सुंदर! विकासराव, धन्यवाद. 'अजातशत्रू' म्हणतात ते कलामसाहेबांसारख्यानाच. मला नाही वाटत उभ्या हिंदुस्थानात त्यांच्याविषयी आदर नसलेला एकही मनुष्य सापडेल. अतिशय संतुलीत मनोवृत्ती, विज्ञाननिष्ठा, आणि आपल्या कामाप्रती तळमळ असलेल्या त्या महान व्यक्तिबद्दलचा आदर आणखी वाढला.

इथे लिन्क दिल्याबद्द्ल धन्यवाद. माझे आवडते राष्ट्र्पती म्हणून पण त्या अगोदर एक माणूस म्हणून आवडतात. त्यांच्या पुस्तकाचे तर पारायण होते अवांतरः तसेच एक होता कार्व्हर हे एक पुस्तक माझे आवडते आहे.

प्राजु 24/04/2008 - 13:54
सुंदर लेख. हि सगळी माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आणि कलाम यांना मानाचा मुजरा... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्रभाकर पेठकर

धनंजय 25/04/2008 - 01:03
चांगला धडा! अशा शिकवणुकीच्या बाबतीत बहुतेकदा माझे "कळते पण वळत नाही". इथेच गाडे अडते.

चतुरंग 25/04/2008 - 01:19
व्यवस्थापनातला एक अतिशय महान धडा अशा पध्दतीने समोर ठेवावा हे फारच उच्च! हा दुवा दिल्याबद्दल अभिनंदन विकास! कलाम महान शास्त्रज्ञ तर आहेतच पण एक माणूस म्हणून ते जास्त महान आहेत असे माझे प्रामाणिक मत. त्यांचे 'अग्निपंख' एकदा वाचून थांबता येत नाहीच. पुनःपुन्हा वाचावे असे सुंदर पुस्तक! चतुरंग

राघव 11/09/2008 - 17:38
हे विचार येथे आणल्याबद्दल. डॉ. धवन यांचे कौतुक तर केलेच पाहिजे, अन् सोबत त्या प्रसंगातून योग्य ते शिकण्याची तयारी दाखवणार्‍या द्रष्ट्या व्यक्तीचेही! आपल्याही आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात. शिकण्याची मानसिक तयारी असेल तर त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यात करता येतो. (अभ्यासू) मुमुक्षू

शितल 24/04/2008 - 00:58
डॉ. कलाम या॑च्या बद्दलचा असलेला आदर हे वाचुन अजुनही वाढला, तसे त्या॑चे अग्निप॑ख हे मी वाचले आहे आणि सर्व भारतीया॑नी ते वाचावे अशी इच्छा. अवघ्या ३ ते ४ बॅगा घेऊन राष्टपती भवन सोडणारे ते पहिलेच राष्टपती असावेत. डॉ. कलाम या॑चा बद्दल अत्य्॑त आदर असलेली. शितल

मैत्र 24/04/2008 - 01:03
हा लेख आणि मूळ दुवा मिपावर आणल्याबद्द्ल... कलामांसारखे दहा जण जर भारतात पुढे आले तर देशात नक्कीच सुधारणा होइल.. त्यांचा एक एक विचार आपल्या व्यक्तिगत प्रॉब्लेम्स वर उपाय ठरेल... आणि काय विलक्षण आशावादी आहे हा माणूस... साध्या रोजच्या त्रासाने - बॉस, सहकारी, कामाचं स्वरुप, कामाचा ताण, सार्वजनिक सोयी, विविध ग्राहक सहाय्य वाल्यांचे अनुभव यानेच वैताग येतो... कलाम कुठेही काहीही निगेटिव्ह बोलत नाहीत.. सगळे सरकारी अनुभव काय उत्तम असतील ? शक्यच नाही.. सलाम त्यांच्या सरळपणाला... मराठी प्रतिशब्द मिळत नाहीये म्हणून मूळ शब्द तसाच लिहितो त्या लेखातला - Integrity.. मिपाकरांनी लेखानंतर मूळ दुवा जरुर वाचावा... विकास.. पुन्हा आभार...

सहज 24/04/2008 - 08:16
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अतिशय अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केली आहे व करत आहेत. अश्या सकारात्मक अनुभवातुन माणूस नक्कीच जास्त शिकतो व जास्त प्रयत्न करुन दाखवतो. बाकी इतर सरकारी खात्यात बॉस बळीचा बकरा शोधत असेलच. घाटपांडे साहेबांना जास्त माहीती असेल. बाकी बॉस च्या बाबत फिरोज खानच्या चित्रपटातील [तिथे ते साथिदाराबाबत आहे] एक गाणे आठवते, तितकेच लागु आहे - हर किसीको नही मिलता... :-)

मनस्वी 24/04/2008 - 10:30
त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.

कलाम यांच्या विषयीच्या आदर हे वाचून नक्कीच वाढला, ह्या अशा व्यक्ती हीच तर भारताची खरी संपत्ती! विकास,भाषांतराबद्दल धन्यवाद, स्वाती

धमाल मुलगा 24/04/2008 - 12:29
"Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great." - डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.
त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.
सुंदर! विकासराव, धन्यवाद. 'अजातशत्रू' म्हणतात ते कलामसाहेबांसारख्यानाच. मला नाही वाटत उभ्या हिंदुस्थानात त्यांच्याविषयी आदर नसलेला एकही मनुष्य सापडेल. अतिशय संतुलीत मनोवृत्ती, विज्ञाननिष्ठा, आणि आपल्या कामाप्रती तळमळ असलेल्या त्या महान व्यक्तिबद्दलचा आदर आणखी वाढला.

इथे लिन्क दिल्याबद्द्ल धन्यवाद. माझे आवडते राष्ट्र्पती म्हणून पण त्या अगोदर एक माणूस म्हणून आवडतात. त्यांच्या पुस्तकाचे तर पारायण होते अवांतरः तसेच एक होता कार्व्हर हे एक पुस्तक माझे आवडते आहे.

प्राजु 24/04/2008 - 13:54
सुंदर लेख. हि सगळी माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आणि कलाम यांना मानाचा मुजरा... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्रभाकर पेठकर

धनंजय 25/04/2008 - 01:03
चांगला धडा! अशा शिकवणुकीच्या बाबतीत बहुतेकदा माझे "कळते पण वळत नाही". इथेच गाडे अडते.

चतुरंग 25/04/2008 - 01:19
व्यवस्थापनातला एक अतिशय महान धडा अशा पध्दतीने समोर ठेवावा हे फारच उच्च! हा दुवा दिल्याबद्दल अभिनंदन विकास! कलाम महान शास्त्रज्ञ तर आहेतच पण एक माणूस म्हणून ते जास्त महान आहेत असे माझे प्रामाणिक मत. त्यांचे 'अग्निपंख' एकदा वाचून थांबता येत नाहीच. पुनःपुन्हा वाचावे असे सुंदर पुस्तक! चतुरंग

राघव 11/09/2008 - 17:38
हे विचार येथे आणल्याबद्दल. डॉ. धवन यांचे कौतुक तर केलेच पाहिजे, अन् सोबत त्या प्रसंगातून योग्य ते शिकण्याची तयारी दाखवणार्‍या द्रष्ट्या व्यक्तीचेही! आपल्याही आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात. शिकण्याची मानसिक तयारी असेल तर त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यात करता येतो. (अभ्यासू) मुमुक्षू
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.