मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

राजे – १

श्रावण मोडक ·
मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र. बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...!

`संकल्प'यात्रा!

आपला अभिजित ·
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांची आसनेही हलली. हल्ली असं काही झालं, की मीडियावाले लगेच चांव चांव करायला लागतात आणि दिवस साजरा करण्यासाठी तेवढ्यापुरता कुणाचा तरी बळीचा बकरा करून टाकतात. पोलिसांपासून अतिरेक्‍यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्याचं तपशीलवार "लाइव्ह कव्हरेज' देणाऱ्या मीडियाने एका गंभीर प्रसंगात शिवराज पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी दिवसभरात तीनदा कपडे बदलल्याचीच "ब्रेकिंग न्यूज' केली. त्यामुळं तो अनुभव लक्षात घेता, मुंबई हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटलांनी तीन दिवस कपडेच बदलले नाहीत.

मुखर्जीसाहेब कॄती केली पाहीजे , पण ...

बामनाचं पोर ·
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून भारताचे सर्व नेते हे पाकिस्तानला धमकी देण्यात आणि " ओ , हे ऐकत नाहीत बघा " असे रडगाणं अमेरीकेसमोर गाण्यात फार व्यस्त आहेत. प्रणव मुखर्जी हे नुकतेच म्हणाले " बडबड नको कॄती करा ". मुखर्जीसाहेबांचे अगदी बरोबर आहे कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण ...आपल्या देशातली घाण साफ करण्याची कॄती .. या हल्यानंतर अगदी मच्छीमार संघटना ते पार रॉ पर्यंत सगळयांनी जे एकमेकांवर आरोप केले ते अगदी घृणास्पद होते. प्रत्येकाचे हेच म्हणणे होते " आम्ही इशारा दिला होता , त्यांनी ऐकलं नाही " ..

जाहीर विचारणा आणि आवाहन

घाटावरचे भट ·
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

आबा , देशमुख साहेब व उद्योग मंत्री.

बामनाचं पोर ·
स्थळ :- अंजनी, तासगाव तालुका, आबा व त्यांच्या आईंमधील संवाद... कायं र ! अध्यात ना मध्यात हिकड कूट वाट चुकला मंत्री साहेब तुम्ही ? ते बी बीन दिव्याच्या गाडीतन् .. पोलिसबी न्ह्याय म्होरं. .. ---मंत्रीसाहेब नाय आमी आता , राजीनामा दिला मंत्री पदाचा.. अर् काय सांगतुयास.. अस् कस् राजीनामा दिला ?? ---कस म्हंजे .. दिल्ली वरनं साहेबांचा फोन आला " राजीनामा द्या " .. देउन टाकला. अरं त्यांचा लाडका नव्हं तू ? ---आपल्या साहेबांच म्हाईत नाय व्हंय तूला.. कधी कूनाला डोक्यावर बशीवतील अन कधी खाली टाकतील ह्याचा काय नेम न्ह्याय.