Skip to main content

राजकारण

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

अबू आझमीची लावणी..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 10/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून) (कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत) मनसेच्या कदमांनी, आणि शिशिर शिंद्यांनी, कानाखाली आवाज ऐसा काढीला... हात नका लावू माझ्या दाढीला... पर्वा केली नाही मी विनंतीची, मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात. चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात. नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... मने जिकली मराठी माणसाची, मती गुंग झाली सेना भाजपाची...
काव्यरस

सरहद्दीपलीकडून झालेलं कौतुक!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 09/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉन' या कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकात आज खाली दिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. मजकूर वाचल्यावर असे वाटते कीं पाकिस्तानी सरकार कसेही असो पण पाकिस्तानी जनतेला नीर-क्षीर-विवेक सुचू लागलेला दिसतोय! ही खरंच एक निरोगी परिस्थितीकडे नेणारी घटना आहे व आपण तिचे स्वागत केले पाहिजे. पत्र लिहिणार्‍याने जरी दोनदा भारताचा उल्लेख केला असला तरी जास्त करून माहिती चीनचीच दिली आहे. कदाचित पाकिस्तानी वृत्तपत्रांत भारताची माहिती दिली जात नसावी.

एका आधुनिक अमेरिकन हरिश्चंद्राची करुण कहाणी-पाकिस्तानी अणूबाँब कसा बनला?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 05/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या दिवा़ळी अंकात आधीच प्रसिद्ध झाला आहे. तो अंक प्रकशित होऊन ३ आठवदे झाले म्हणून इथे अपलोड केला आहे. लिपी दुसरीच (लोकसत्ता फ्रीडम) आहे, गमभन नव्हे. त्यामुळे शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती! एका आधुनिक हरिश्चंद्राची करुण कहाणी सुधीर काळे, जकार्ता एक प्रामणिक तरुण आपल्या ध्येयवादी व देशभक्तीपूर्ण भूमिकेमुळे व कायदापालनाबाबतच्या ध्यासापायी कसा दारुण अवस्थेला पोचला आणि सरकार एकदा का आपल्या मागे लागले कीं काय अवस्था होते याची ही दर्दभरी कहाणी आहे.

"एक्स्पोर्ट सरप्लस"

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 29/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"एक्स्पोर्ट सरप्लस" दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारतात एकादा माल "एक्स्पोर्ट सरप्लस आहे" असे सांगणे म्हणजे अप्रत्य़क्षपणे त्या मालाच्या प्रतीबद्दल (qualityबद्दल) ग्वाही देण्याचाच एक भाग होता.

निवडणुका आणि मानोसपचार तज्ज्ञ ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 26/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात.

संघटनापालट-३

लेखक अन्वय यांनी सोमवार, 26/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जेवण घेऊन काका पुतणे दोघेही पुन्हा दिवाणखान्यात येऊन विसावले होते. --- "राज, मला या सगळ्या गोष्टींचा आता तिटकारा आलाय. माझ्या आयुष्यात मी कधीच वजाबाकी केली नाही. माझा जो काही निर्णय असे तो सर्वांच्या हिताचाच असे. माझ्या हिताला मी कधीही प्राधान्य दिलं नाही. पण या उतारवयांतच मला काही कटू आणि मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागलेत. त्यामुळे तुझ्यासारखी माणसे मला दुरावली. मी उभं केलेलं वैभव लयाला जात आहे. हे माझ्या डोळ्यासमोर घडते आहे आणि मी काहीच करू शकत नाही. याचं अतीव दु:ख होतंय. यानंच मी खचून गेलोय. या ढाण्या वाघाचा आवाज आता पार बसलाय. डरकाळी फोडण्याची इच्छा होते; पण ती तोंडातून बाहेर पडत नाही.

संघटनापालट-2

लेखक अन्वय यांनी रविवार, 25/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
राज आणि काका बरेच दिवसांनी भेटत होते. बोलत होते. त्यामुळे बराचवेळ दोघे एकमेकांना डोळे भरून पाहात होते. नि:शब्द निरव शांतता त्या भव्य दिवाणखान्यात दाटून राहिली होती. मदतनीस आत निघून गेला होता. "काय म्हणतेय तब्येत?'' त्या शांततेत राजचा स्वर घुमला. "अजून ठणठणीत आहे. तू बघतोच आहेस.'' काका उपरोधाने बोलले. कधीकाळी आपल्या आवाजानं भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱ्या काकांचा आवाज थकल्याचं राजला स्पष्टपणे जाणवत होतं. त्यांना बोलताना मधेमधे धापही लागत होती.

नव्या `इतिहासा'ची `नांदी'?

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
हाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे.