चायना आणि चुंबी (२)
आधीचा भाग
वस्तुतः भारत-चीन संघर्षमय संबंधास आशियातील युरोपीयन वसाहतवादाचा इतिहासाचीही पार्श्वभूमी असावी हे सहसा आपल्याला माहित नसते. युरोपीयन वसाहतवादाच्या इतिहासाची आपल्याला माहित असलेली थोडक्यात उजळणी करावयाची झाली तर इ.स. १४९८ च्या सुमारास पोर्तुगीज वास्को द गामा पाय भारतीय किनार्यास टेकले १६०० च्या नंतर ब्रिटीशांनी आळस झटकून पोर्तुगीज, फ्रेंच, डच स्पर्धकांना मात देत व्यापारात आणि वसाहतवादात आघाडी घेतली. हा आपल्यासा माहित असलेला ढोबळ इतिहास, १५०० ला पोर्तुगीजांनी भारतास दर्शन दिले तर चिनी लोकांना १५५० मध्ये.
मिसळपाव