Skip to main content

मुक्तक

काळ नावाचं औषध......

लेखक सविता यांनी सोमवार, 06/09/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
लेख पुर्वी अन्यत्र प्रकाशित ----------------------- लोक म्हणतात काळ हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. जात्या काळाबरोबर सगळ्याच जखमा हळूहळू भरून येतात म्हणे. होतं का बुवा खरंच असं? ११-१२ वर्षापुर्वीची गोष्ट, माझी एक मैत्रिण होती आणि ते म्हणतात ना कोणाच्या तरी प्रभावाखाली येणं तसं माझं झालं होतं. I was much too impressed with her!...तशा बाकीच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या पण ही माझी खूपच आवडती मैत्रिण होती. आणि ती माझ्या बाकीच्या कुठल्याच मैत्रिणींना आवडायची नाही.

वाचा आणि शोधा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही. २. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता. ३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते.

छोटेखानी लेखांची मालिका - इथे शब्द संपतात...१

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
दहीभात..! इथे शब्द संपातात! हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..! कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..! पोटात गडबड? अजीर्ण? हम्म.. थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :) दहीभात कधीही खावा.. छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

लेखक दशानन यांनी मंगळवार, 31/08/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस म्हणून जगण्याची ही किंमत नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे शब्दांची लकीर खुप मोठी होती घाव शब्दांचे चार छोटे होते पण जख्म जरा मोठी होती लपवावे काय आता येथे व्रण चेहर्‍यावर पडले होते नको नको म्हणत असताना दर्द पदरी पडला होता लवपावे काय व दाखवावे काय आपल्यातच खोट दिसली होती चार पुस्तके कमी शिकलो त्यांची ही किंमत खुप वजनी होती काय खरं व काय खोटं नशीबाची थट्टाच थोरं होती वाहत जावे असेल ठरवले तरी जमीनीचे वळण खुप वेगळे होते तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते माणूस म्हणून जगण्याची ही किंमत जरा खरंच मोठी होती... मेल्यावर तरी समाधान लाभेल मुक्त हो
काव्यरस

सैरभैर

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 31/08/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
गजर होतो. पटकन त्याचा आवाज बंद करून उठतो. भरभर आवरून चहा ठेवतो. गरमागरम वाफाळलेला चहा घेत पेपरवर नजर टाकतो. त्याच त्या बातम्या असतात, बदल काही नसतो, पण वाचल्या नाहीत तर दिवसभर चैन पडत नाही. पेपर चाळून झाला की स्नान, देवपूजा आटोपून भाजी करायला घेतो. एकीकडे भाजी शिजत असताना कणीक भिजवतो. पोळ्या करून नाश्ता करून डबा घेऊन कामावर जायचे. दिवसभर काम करून मधल्या वेळेत डबा खाऊन संध्याकाळी परत घरी यायचे. येतानाच काहीतरी भाजी घेऊन, दूध घेऊन यायचे. आल्यावर स्वच्छ होवून देवापाशी दिवा लावायचा. दूध तापवायचे. वरण भाताचा कुकर लावायचा. सकाळची भाजी गरम करायची. पोळ्या असतातच. कुकर झाला की जेवून घ्यायचे. जरावेळ ट

लगी रहो मुन्नीबाई!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 31/08/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं. तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती... ... दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती... देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात.