भाग १ : http://www.misalpav.com/node/14243
---
मागील धाग्याला रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद...
माझे सर्व लेखन अनुभवा वरुन असले तरी त्या मध्ये वन लाईनर लिहिने हे मी व.पुं च्या कथा/ कादंबरी मुळे शिकलो आहे .
आणि विस्म्रुतीत जाणार्या कवितांपेक्षा विचारांचे सरळ वर्णन वन लाईनर मध्ये करणे आवडले म्हणुन येथे देत आहे.
आपले वन - लाईनर्स आल्यावर आनंद आहे .
- गणेशा
...............
31. "अस्थिर जीवन झाले की जगणे व्यर्थ वाटते माणसाला, आणि मग मनाच्या धुसर खिडकीतुन दिसतो फक्त एक मार्ग.. शेवटाचा.., भाबडे पणा हा अस्थिरतेची पहीली शिकार असतो त्यामुळे विचारांची ढाल हाती घेवुन अस्थिरतेचा सामना करावा प्रत्येकाने "
32. relations हे माणसांसाठी असतात .. माणसे relations साठी नसतात ..
33. "कुठल्याही कलाकारास त्यानी केलेल्या विविध कलाकृतींच्या निर्मितीमध्ये कधीच फ़रक जानवत नसतो त्याला दिसतो तो फ़क्त आनंद.. एक निस्सीम कलाकृतीच्या निर्मितीचा आनंद" ..
34 " स्वप्न आणि अस्तित्व यांचा मेळ घालण्यासाठी सत्याच्या वाटेवर चालत रहावे .. तेंव्हाच माणसास मिळते एक स्वप्नवत अस्तित्व .. सत्य हाच जीवनात यशस्वी होण्याचा एकमात्र महामार्ग आहे" ..
35."आपण काय आहोत आणि कोण आहोत हे समाजाला दाखवताना दुसर्यास तुच्छ लेखुन वक्तव्य करणे म्हणजे आपल्याच विचारांवर आपणच केलेला निर्घुन बलात्कार असतो" ----
36 लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे ..
37. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..."
38. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.."
39. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर"
40. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.."
41. संस्कृती आणि आपले विचार यात तफ़ावत आली तरी चालते ..पण आपले विचार, जर विचार करण्यास लावत असले तर आपण तरी त्या विचारांचा रीस्पेक्ट केला तरी बस्स ..बाकी संस्कृती ही विचारांच्या अस्तित्वावर तर टीकुन आहे
42. " 'माझा' हा मनातील भावच 'परके'पणाचा जन्मदाता असतो, कुठल्याही वस्तुविषयी 'माझा' हा भाव निर्मान झाला की इतर जे ' आपले' या संज्ञेत बसतात, त्याविषयी ही आपोआप परकेपणाची जाणीव निर्मान होते."
43. " 'शुभविवाह' ह्या शब्दाविषयी जरी वलय असले, तरी शुभविवाह हा नविन जोडप्यासाठी मंदिराबाहेरील पायरीसमानच असतो,'संसार' हेच खरे मंदिर.. आणि शुभसंसार हाच खरा भक्तीमार्ग"
44. "क्रियेटीविटी आणि त्यातुन मिळणारा आनंद हीच जीवनाची खरी संपत्ती असते.."
45. विचार हे प्रत्येकाच्या मनात असतात .. आणि प्रत्येकाच्या विचारांचा रीस्पेक्ट करणे हे आपल्या मनावर असते
47. मैत्रीमध्ये आपला फ़्रेंड मित्र आहे की मैत्रीण असा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हाच त्यातिल निखळता निखळली जाते ... आणि मग उरते ती फ़क्त अस्तित्वाची आणि समाजकारणाची एक रेघ, उरतो फ़क्त एक पशुतुल्य माणुस आणि स्त्री ...
48. " गगनभेदी इमारती बांधुन स्व:तावरच खुष असणारा माणुस, आकाशाच्या ईवल्याश्या तुकड्यावरही आपला हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणुनच आनंदाचे परिमान उंची न मानता, काही क्षणांचे खोल समाधान मानावे .."
49. " समाधान आणि सुख यात फ़रक आहे .. समाधान हे आत्मिक असते, सुख हे सार्वभौम असते.
माणसाचा प्रवास सार्वभौमतेकडुन आत्मिकतेकडे जेंव्हा होतो तेंव्हा जीवनास पुर्णत्व लाभते"
50. समाज म्हणजे काय ?
विशिष्ट चालीरीती आणि रुढींवर जातीची पगडी घेवून स्वार झालेले लोक म्हणजे समाज
51 एकजुट ह्या शब्दातुनच फ़ुट आहे हे अधोरेखीत करुन आपला असणारा मराठी माणुस आपल्या तुकड्यांवर प्रेम करु लागला की एकजुट हे एक स्वप्न वाटते.. दुभंगलेले स्वप्न "
52. यशस्वीतेचे कोठलेही परिमान न मानुन, येणारा प्रत्येक क्षण सुखाचा असो वा दुखाचा योग्य पद्धतीने जगणे म्हणजेच कदाचीत यशस्वी आयुष्य असेन
53. "प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"
54. "माणसाचे विचार मनातुन येतात, भाषेतुन येते ते फ़क्त त्या विचारांचे प्रतिबिंब"
55. "वाईट घडलेल्या गोष्टींकडे जग जागरुकतेने पहात असते, आणि चांगल्या गोष्तींकडे एक अपवाद म्हणुन,
त्यामुळे आपण आपल्या गोष्टी आपल्या मनाने करत जायचे"
56. "आघात हा मनावर होतो, शरीरावर होते ती जखम. जखम कालांतराने बरी होते, परंतु आघाताचे तरंग आयुष्यभर मनात संचार करत असतात."
57. "इतिहास हा कागदाच्या पानावर नाही तर मनावर कोरला गेला पाहिजे "
58. "प्रत्येक वर्तमान हा कालांतराने भुतकाळ होत जातो, परंतु त्याचा इतिहास बनवणे हे प्रत्येकाच्या मनगटात असते."
59. तन हे विहिर माणले तरी प्रेम हे पाणी असते हे जाणावे.
प्रेम विहिरिवर करायचे की पाण्यावर हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
60. प्रेमाचा रंग जरी दिसत नसला तरी आयुष्य रंगीत करण्याची ताकद प्रेमा मध्येच असते.
61. "प्रेमाला व्याख्येत लिहिणे जरी सोपे असले तरी प्रेमाला जीवनात अखंड बसवने तितकेच अवघड असते, हे ज्याला जमते तो माणुस."
62. जोड मिळाल्याने अजोड अशी निर्मिती होते. तशेच अपुर्णत्वाचे सैल बंध ही, पुर्णत्वाचे आकाश विणत असतात...
63. शुन्य भावनेच्या पाठीमागे, विचारांची एक शलाखा असते .. एक रेघ असते , जेव्हड्या शुन्य भावना जास्त तेव्हडी विचारांची रेघ मोठी
64. "यशाच्या मार्गावरील अमुर्त अपयश हे आनंद देण्याचे कारंजे असते"
65. "मुर्ख लोकांची परिसिमा दाखवताना .. त्यांच्या रेषेला आपला स्पर्ष होणे सहाजीकच असते .. त्या रेषेलाच बांध म्हणुन शकतो आपण .. कधी तरी आपले एखादे विचारांचे पान घोंगावत तो बांध ओलंढतोच .. म्हणुन आपल्या हद्दीतील विचारांचा व्रुक्ष काही जागा बदलत नसतोच मुळी..."
66. " माणुस सवईचा गुलाम झाला की ती सवयच माणसाची ओळख बनते .. आणी कधी कधी त्याचे आयुष्य ह्याच सवईने अधोरेखीत होते "
वाचने
3483
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे वन लाईनर्स संदर्भासह दिले
तुमच्या रिप्लाय्चा खेद आहे.
माझे सर्व लेखन अनुभवा वरुन
धन्यवाद
श्री. गणेशा, खरंच मी दिलेल्या
In reply to धन्यवाद by गणेशा
धन्यवाद ..
In reply to श्री. गणेशा, खरंच मी दिलेल्या by स्वानन्द
वाद राहू द्या हो...
प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर
छान
In reply to प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर by एक अनामी
मी पुरुष बिच्चारा , मुंबई ..
जन्माचार्य .. चालायचेच
In reply to मी पुरुष बिच्चारा , मुंबई .. by हेम