Skip to main content

मुक्तक

अस्पृश्यतेचा कळस

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 25/09/2010 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यप्रदेशमधे एका राजपुत घराण्यातील कुत्र्याने,ज्याचे नाव शेरु आहे, एका दलित वस्तीत राहणा-या स्त्रीने घातलेली भाकरी खाल्ली.त्यानंतर घडलेल्या काही घटना : १.

स्मृतिभ्रंश!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 25/09/2010 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी खूप वाईट आहे. गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे. माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे! काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता.

प्रश्न..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी पासून मी जेव्हा स्वतःला बघत आलो.. तेव्हा मला जाणवलं की मी आजिबात बदल्लेलो नाही.. ..आणि बदल होणं हे जीवंतपणाचं लक्षण असेल तर मी जीवंत कसा..? असाही मला प्रश्न पडतो मला असही वाटतं की मी जीवंत नसतो तर या प्रश्नानीही मला सतावलं नसतं कारण मढ्याला पडत नाहीत प्रश्न आणि स्वप्नही...! मला तर दोन्ही ही पडतात...!!
काव्यरस

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

तू येतोस ...

लेखक ढब्बू पैसा यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच. जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर.
काव्यरस

ती

लेखक कुसुमिता१२३ यांनी गुरुवार, 23/09/2010 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
चौदावं सरुन पंधरावं लागलय तिला.. दाट केसांच्या घट्ट दोन वेण्या घालुन शाळेला निघालीये ती.. तळपत्या सूर्याची किरणं पडताहेत तिच्या कोवळ्या चेहर्‍यावर त्यांना चुकवण्यासाठी मान खाली घालून चाललीये ती.. रस्त्यातून जाणार्‍या एक-दोन आज्ज्यांच्या डोलताहेत माना.. "कशी सालस पोर हो..कधी डोकं वर करुन नाही बघायची!" पण खरं तर मनातुन तिलाही वाटतय कुणीतरी यावं मागून सायकलवरुन अन 'विचारावं' तिला मग निर्दयपणे हसून 'नाही' म्हणावं तिनं त्याला.. पण नाही वाजत सायकलची घंटी मागून! जाऊ द्या..तिला काय त्याची पर्वा.. तिला माहितीये, एक दिवस येणार आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार, अन घेऊन जाणार आहे तिला दू.....र देशी विमान
काव्यरस

सर्वधर्मप्रेम !

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 22/09/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
साध्याचे मीपा वर प्रकाशित झालेले काही लेख आणि अयोध्धेचा निकल ह्या पार्श्वभूमी वर सर्वधर्मसमभाव आजूबाजुला मला कुठे दिसतो ह्या साठी प्रपंच ! पहिला किस्सा लग्ना नंतर आम्ही सध्या राहत असलेल्या घरी भाढ्याने रहवायस आलो. आमचा मजला म्हणजे एक छोटा भारत असावा , आम्ही हिंदू , समोरच घर मुस्लिम , शेजारी ख्रिचन जैन आणि अजुन एक हिंदू. अश्या एकदम कॉसमपलिटिन शेजार म्हणजे आम्हाला सॉलिड धाकधुक होती , खासकरून घरी येणारे सर्व पाहुणे समोरच फ्लॅट वरच मुस्लिम नाव पाहून नाक मुरडायचे.

जन्मभराचं ऋण !

लेखक जिप्सी यांनी मंगळवार, 21/09/2010 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दुपार. असाच निवांत पडलो होतो,शुक्रवारी रात्री ट्रेकला निघून रविवारी सकाळीचं परत आलो होतो,आणि जेवून झाल्यावर मस्त झोपायच्या तयारीत होतो. आणि दार वाजलं! आत्ता एवढ्या दुपारी कोण आलं असेल ? असा विचार करतच दार उघडलं तर एक सेल्समन ! जेल साबण आणि फ्लोअर क्लिनर वगैरे घेउन आलेला होता. चेहेर्‍यावर अतिशय दमलेला भाव, उन्हातनं आल्यामुळं घामाघूम झालेला. मी त्याला आत घेतलं,फॅन लावला आणि पाणी आणायला आत गेलो.पाणी भरत असतनाच मला त्याच्या जागी मीच दिसायला लागलो. २००४ साल असावं, मी पुण्यात येउन सुमारे वर्षभर होउन गेलेलं होतं,ज्यासाठी आलो ते अजूनही गवसतं नव्हतं,जीवाची नुसती तगंमग चाललेली होती.

का होत असेल हो असं !?

लेखक चिगो यांनी सोमवार, 20/09/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा. जरा चावून चोथा झालेल्या, मेंदुचा भुगा करणार्‍या प्रश्नावर विचार करतोय. आजच बातमी कळली की माझ्या एका सहकार्‍याने, बॅचमेटने आत्महत्या केली? का केलं असेल त्याने? मुलगा दिसायला चांगला, घरची परिस्थिती उत्तम.. अगदी दर दोन आठवड्यांनी विमान प्रवास करु शके, इतकी. त्याच्या लग्नात त्याने एका प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे अश्वपथाचे संचालन करण्याचा मान मिळवलेला.. नोकरी कुठल्याही आई-वडीलांना अभिमान वाटावी अशी.. वन ऑफ द बेस्ट अ‍ॅथलिट्स आय हॅव सीन.. सगळं कसं आलबेल (दिसायला तरी)... ....

(तथास्तु !!)

लेखक चेतन यांनी सोमवार, 20/09/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनुप्रियाची तथास्तु !! वाचुन विडंबन करावे असे वाटले नाही (खर तर तसा कवितेचा विषय विडंबावा असा बिल्कुल नाही आहे ) तरिपण रिकामा वेळ असल्याने थोडासा हा नराधमपणा....
काव्यरस