बस्स! फक्त एवढंच कर...
दिवस कसाबसा निघून जाईल
कातरवेळ मात्र अंगावर येईल
तू फक्त माझी सय काढू नको
"ती" आली तशी संपून ही जाईल
मग काही अबोल-अनाथ स्वप्ने
वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत
रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील
डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील
त्यांना अजिबात थारा देऊ नकोस
डोळे अगदी घट्ट मिटून घे
हात बाहेर न काढता आतूनच
निग्रहाने "ती" खिडकी बंद कर
मग मऊ केस झटकून जरासे
कुरळ्या बटांना मोकळं कर
सुकलेले ओठ घट्ट करून
पाठीला उशी लावून स्वस्थ बस
पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये
तर त्याला तिथेचं थोपवून ठेव
अन् माझा चेहरा आठवलाचं
तर चुकूनसुद्धा झरू नकोस
मी "हरवून" गेलोय कधींचं
मला पुन्हा शोधत बसू नकोस
तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला
काव्यरस
मिसळपाव
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.