मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

उद्याच्या मभागौदि (#) ची कविता

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
अमृताशी पैजा जिंके माझी मायबोली कळेना, क्यूँ माझ्याशी वो अंग्रेजी में बोली ? वस्त्रे अभिजाततेची भर्जरी मिरवी उपेक्षांच्या लक्तरांना खुबीने दडवी औटघटकेची राणी उद्या सिंहासनी भविष्यात असेल का तिला वाली कुणी? मायमराठी गं तुझे कसे फेडू पांग? प्लेस्कूलच्या प्रवेशाची सोडू कशी रांग? येता जाता तुझ्या नावे आसवे ढाळीन मिंग्लिशची कास घट्ट धरून ठेवीन एक एक निशाणी ही मिटविण्या तुझी निर्ढावली लेकरे गं कशामुळे तुझी? अमृताशी पैज पुन्हा लावण्याच्या आधी... सालोसाल पेरलेले उगवण्याआधी... नक्राश्रूंचे तळे पार तुडुंबण्याआधी तुझ्या साऱ्या बोलीभाषा मुक्या होण्याआधी... शेवटाची सुरूवात वेग घेण्याआधी... शेवटची शाळ

दरम्यान

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय? चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा. झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार. मला घाम फुटतो.

सी पी बेरार सर्किट

गवि ·
लेखनविषय:
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

ब्रेक के बाद..

आजी ·
लेखनप्रकार
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती! या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे. माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.

बांगलादेश

खटपट्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बंगलादेशा ने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास नकार दिला म्हणून आता त्यांचा T20 विश्वचषकातला सहभाग जवळजवळ संपुष्टात आला आहे, मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे, बांगलादेश स्वतःला स्वप्नात अमेरिका, किंवा कॅनडा समजतो की काय? मजा म्हणजे बंगलादेशाच्या खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटत नसेल तर इतके बांगलादेशी धोका पत्करून भारताची सीमा ओलांडून का येतात? कमीतकमी इथून परत गेलेल्या बांगलादेशी नागरिकांनी तरी त्यांच्या खेळाडूंना सांगावे की बाबांनो भारतात काहीच धोकादायक नाही. तुम्ही खेळ

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी ·
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing !

चामुंडराय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Niksen ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing ! अरे, नुसता ठोंब्यासारखा काय बसला आहेस, उठ आणि अभ्यासाला लाग बघू किंवा एखादे सांगितलेले परंतु अजून बाकी असलेले काम केले नसेल ते करण्यासाठी लहानपणी नेहमी "ठोंब्या" असा उद्धार होत असे. त्यात अस्मादिक शेंडेफळ असल्याने "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये" ह्या उक्तीनुसार घरातील सर्वांकडून अगदी हक्काने विविध कामे अंगावर पडत असत.

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि ·
लेखनप्रकार
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा.

तू

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
ग्रीष्म-तप्त भूमीवर तू तर सर सर मृगसर कोसळणारी विकल-विव्हल प्राणांवर फुंकर घालुनी सांत्वन तू करणारी क्षणभंगुरता गर्वे मिरवीत चिरंतनासम तू फुलणारी परंपरांचे अवजड बंधन सहज समूळ तू झुगारणारी कोलाहल भवताली त्यावर प्रशांत शिडकावा करणारी भळभळते व्रण माझे बांधून भरजरी पैठणी तू उरणारी

रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड ============= --राजीव उपाध्ये कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं? थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत.