कविता
सुट्टी संपली -
सुट्टी संपली दिवाळी झाली
घण घण घंटा ऐकायची
दप्तर पाठीवरती टाकुन
तुरू तुरू घाई पळायची !
पाठांतर अभ्यास परीक्षा
वेळच गुंतुन जाण्याची
शुद्ध न राहिल शाळेमध्ये
डबा उघडुनी बघण्याची !
नवीन कपडे खेळ नवे
नीट नेटके जपण्याची
सुट्टीमधली सवय रहावी
रोज पहाटे उठण्याची !
शंकरपाळी चिवडा लाडू
चकली शेव करंजीची
वर्षामधला धमाल सण
आठवण नुसती करायची !
शाळेमधुनी दमून येता
निवांत स्वप्ने पहायची
पुढल्या वर्षी किती फटाके
चक्रे झाडे आणायची ?
याद्या
1193
चपराक
टिपः माझी एक कविता एका महाभागाने चोरुन चक्क आपल्याच नावाने चेपुवर प्रकाशित केली आणि ती नेमकी माझ्या मित्राने पाहीली आणि मला कळवले. ते बघुन असा संताप आला आणि ही कविता सुचली. जरा अतिशियोक्तीच झाली आहे, पण भावनेच्या भरात......... ;)
चोरून चोरून तुम्ही चोरणार किती
आहे अस्सल हिरा इथे माझिया हाती
चोरून काय साधले तुम्ही शब्द माझे ?
उजळल्याविना राहील का प्रारब्ध माझे ?
आहे अजूनही लेखणीला माझ्याही धार
येतो सरसावूनी शब्दांना अजूनच खुमार
चोरलेल्या शब्दांचीच तुम्हा बसेल चपराक सणसणीत
अस्खलित नाणे माझे वाजेल नेहमीच खणखणीत
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/१२/२०१०)
लेखनविषय:
याद्या
1598
काव्यरस
आरास रास
अथांगास काय हिरे माणके सभोवर
कनक रुप्याची आरास रास अंगभर
तरी त्यास मोहवे मोर पाचुवांचा
सद्गदीत धरा सवे मेघ आळवांचा
सकाळी सकाळि मोतियांचे धुके-
स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे
सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि
उधळे जगी रंग चित्त झुंझवाया
ऋणांचे खळे आगळे वेगळे-
स्नेह वाटे परी गोत हे सोवळे
आंसवांना नसे दु:ख खारे इथे
निर्झराचे पिसे अवखळे खळखळे
.................अज्ञात
लेखनविषय:
याद्या
1051
काव्यरस
अर्पणपत्रिका
(चाल : जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया)
शब्दाला वाचेला काव्याला श्रद्धेला जेथे अर्थ प्राप्त झाला
अर्थाचा परमार्थ परमात्म्याचा स्वार्थ जेथून व्युत्पन्न झाला, - - त्या स्वराला
अर्पिता मम काव्य ॐ कारा तत्तक्षण काव्याचा जो मंत्र झाला
मंत्र तो गाउनी समिधा ती अर्पूनी जो धूम्र उत्पन्न झाला, - - त्या धुराला
अवकाश जे व्याप्त त्यासही भेदून एकमात्र जो बाण गेला
बाणाची प्रत्यंचा प्रत्यंचेचे बल बलाचा उद्गम त्या उद्ग्माला, - - वंदिताना
जो भाव बुद्धीचा विवेक नामाचा त्याचाहि जो अंतरात्मा तद् भावनेला, - - - - - -

लेखनविषय:
याद्या
980
काव्यरस
कविता
माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय
कोण आहे?
सारखी टक टक टक
.
.
.
सहन होत नाहीये आता
कोण आहे आत?
.
.
.
बहुतेक एक कविता अडकली आहे
.
.
गोजीर्या शब्दांची,
साजीर्या उपमांची,
खूप काळ लोटला आहे
अडकली आहे, तळघरात
.
.
तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा
पण सगळं निष्फळ
.
.
.
.
.
एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली
.
.
.
बाहेर पडलीय तर
छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ
.
.
.
डॉक्टर म्हणाले
आता ती अन् तिचे नशीब
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(३१/१०/२०११)
याद्या
1458
काव्यरस
नातं
नेहमीच येतो मी इथे
रमणीय तळ्याकाठी
इथली खास शांतता अनुभवण्यासाठी
विस्तिर्ण काठाचं हे तळं मला
नेहमीच वेगवेगळ्या रुपात भासतं
काठाच्या दाट शेवाळी पाणवनस्पतीवर
सतत चमचमणार्या पाण्याच्या रेघा
त्यावरून डौलाने चालणारे बगळे
मध्येच डुबकी घेणारे पाणपक्षी, बेडूक
आंत पाण्याच्या मोठ्या तुकड्यावर
अमाप छोटी गुलाबी कमळं असतात
त्यावर दिसतात फुलपाखरं, चतुर ह्यांच्या भरार्या
हे तळ्याचं नेहमीचं रुप
पण हिवाळ्यात काही काळ हे बदलतं
अचानक एके दिवशी तिथे येतात
देशांतरीत पाहुणे गुलाबी, पांढर्या रंगाचे
कलकलाटांनी तळ्याची अभिजात
शांतता भंग करीत.
पानथळीजागेवर पानापानातून त्यांची
मायेची घरटी वसतात.
नवी वीण घालतात.
हवी
याद्या
1345
काव्यरस
दूर गाव माझा
राहिला दूर गाव माझा
मी असा का भरकटलो
श्वास इथे अन आत्मा तिकडे
खरे, असा मी का जगलो?
क्षण क्षणातून जगलो मी
का कण कणातून मी वधलो
नेत्र इथे अन अश्रू तिकडे
खरे, असा मी का रडलो?
नव्हता दुश्मन रणही नव्हते
दमून पुरता मी हरलो
हृदय इथे अन स्पंदन तिकडे
अरे असा मी का लढलो?
जावे फिरूनी कुशी गावच्या
साद गावची घुमत असे
उगव भास्करा रात्र ढळू दे
प्रभात मंगल पुन्हा दिसे.
लेखनविषय:
याद्या
1240
काव्यरस
मिसळपाव