Skip to main content

कविता

नको रे दिवा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 02/01/2012 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे दिवा नको रे दिवा तू मालवू असा उजेड का नकोसा उलघाल मनाची होई लाज आली अशी थोडी वेडी पिशी जरा थांबलीस का वेळ निघूनी जाई मोहरून येई जवळी स्पर्श घेई करूनी का उगाच अंगी काटा फुलूनी येई चढली ही रात्र थकले रे गात्र चिंब यौवन मात्र तुझ्या हाती येई नको रे तू असा नको करू राजसा हातामधे तुझ्या नकळत का हात जाई नको रे तू असा नको करू राजसा हात हातामधे नकळत का जाई ऐक गोड गुपीत हे सांगतो मी कानी सखी तूच माझी आता एकरूप होई - पाभे
काव्यरस

थांब जरासा..

लेखक राघव यांनी रविवार, 01/01/2012 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः नववर्षाच्या शुभेच्छा!! याचसाठी म्हणून काही लिहावे म्हटले, पण भराभर ओळी सुचत गेल्या अन् लिहित गेलो. या कवितेसाठी मागच्या ज्ञात इतिहासापासून ते आजपर्यंत घडलेले कोणतेही मृत्यूचे तांडव उदाहरणादाखल घेता येईल, ज्याला जे म्हणून घ्यायचे ते घेण्यास अडचण नसावी. पण त्यातून काहीतरी स्फूर्तीदायक अंगांगातून शिरशिरत उठले पाहिजे म्हणजे ही कविता लिहिल्याचे सार्थक झाले. अरे मानवा, नववर्षाला भेट परंतू, थांब जरासा.. आठव थोडा मृत्यूचा तो नाच पुन्हा अन्‌..

(ती येते आणिक जाते )

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 31/12/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता येते मग येते निर्माण अपेक्षा करते नाक उंचावल्या जाते हुळहुळ अशी लावते ताण डोळ्यान्ना देते काहीही ना दिसते लबाड येवढी असते जगाचा विसर पाडते स्फोटाची तयारी होते मुठी वळवून सोडते आह्ख छ्छी केव्हा वाजते जग सारे वाट पहाते उंचावलेले डोके झुकते हुळहुळीची चिडचिड होते नाकाला अतृप्त सोडून ती न येताच जाते ************
काव्यरस

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी शुक्रवार, 30/12/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी ज

बासूंदी गोड गोड

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/12/2011 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
बासूंदी गोड गोड तो: तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ|| ती: तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ|| तो: दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१|| ती: माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||२||

उद्याची बात का करु मी

लेखक santosh waghmare यांनी गुरुवार, 29/12/2011 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
ओन्जळीत पानी असताना, म्रुगजळाला का फसु मी, तहान तर भागत आहे, मग उद्याची बात का करु मी. दिवसा उजेड असताना, अंधारात का चाचपडू मी, रात्र होन्यास उशिर आहे मग उद्याची बात का करु मी. ताटात अन्न असताना, आनंदाने का नाही खाऊ मी, खाल्लेला घास हि न पचन्यास, उद्याची बात का करु मी. परिक्षा तर दिली आहे, परिणामांची भीती का बाळगु मी, परिक्षा ते परिणाम ह्या मधील दिन व्यर्थ जाण्या, मग उद्याची बात का करु मी. म्रुत्युची वेळ माहित नसताना, म्रुत्यु समोर असल्याप्रमाणे का वागू मी, जिवनही जगता न येण्यास, मग उद्याची बात का करु मी. येणार भविष्य हे वर्तमान होत असत, मग प्रत्येक क्षण वर्तमानात का नाही जगू मी, पण आ

ती येते आणिक जाते

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 29/12/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
गालावर येणारी अवखळ लट मानेला हिसका देऊन बाजुला सारण्याची तुझी जीवघेणी लकब... त्याचवेळी तुझ्या डोळ्याचे कोपरे हळूच बघून घेतात समोरचा तडफडणारा जीव अजून जिवंत आहे किंवा कसे? काळ्याभोर लटेचा तो हिसका बसताच खोलवर दडलेले कुठलेसे बीज तरारून थरथरते आणि वरवर यायला बघते ते धुमारे काळ्या डोहात कसलासा आकार घेत आहेत असे वाटू लागते तोच टिक टॉक सॅंडल्स उडवित तू निघून देखील जातेस समोरचा पाचोळा बेफिकीरीने उधळीत उडालेली धूळ काळ्या डोहात धुमार्‍यान्ना गुदमरून टाकीत पाण्यात विलीन होते अस्वस्थ तरंग देखील नि:शब्द होतात शब्दावाचून कुठली कविता? तू येते आणिक जाते......