Skip to main content

कविता

प्रदेश

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 27/07/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे सुखाचा बसे काळजास दंश शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे विष-वादळानंतर उरे दगडदेह अन मन पिसापरी तरंगणारे चांदणे रमावे असा हा प्रदेश स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे -पुर्वप्रकाशित
काव्यरस

हट्ट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 26/07/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी | आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे | 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे | म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार | हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? -चैतन्य दीक्षित
काव्यरस

प्रवाह....

लेखक वेणू यांनी बुधवार, 25/07/2012 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्य, साचून राहिल्यासरखं वाटतं! सगळे मु़ख्य प्रश्न एकाच पदावर जाऊन बसलेले, अनुत्तराच्या! वेळेने तरी किती कळ सोसावी? शेवटी, आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ, आपलेच दोन घाव आणि साचलेल्या आयुष्याला नवी वाट, नवा प्रवाह!! मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात, सार्‍या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली, कायमसाठी! आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ, सुगंधी.... वेडावणारा! -वेणू

तुझ्या विना

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 23/07/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी || तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही || तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही || तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग || तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा || तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||
काव्यरस

मी तसाच पुढे निघालो…

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जवळ काय घडतय, ह्याची जानिव होवुन, काहीच करता येत नाही त्या वेळी अगतीकता जानवते. न मिळालेली उत्तरं सतावतात, त्या वेळी स्वतवर राग काढन्याशिवाय काहीच करु शकत नाही. मग एक मळीभ दाटून येते...
काव्यरस

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

दवबिंदू..!

लेखक वेणू यांनी बुधवार, 18/07/2012 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यर्थसा दवबिंदू पानावर गोठलेला, धरणीला जो नकोसा आकाशाने त्यागलेला..! तुज रुपवान भासे, मज भासे, मी अभागी उदास घुसमटतो, थिजतो, बसल्या जागी...! क्षणभंगूर सारे काही जाणतो आपण सारे, देखणे दिसणे फक्त हे जगणे आहे का रे..? पानावर ओल्या ओल्या मी खिन्नसा बसलेला टिपेल का मज कोणी, आशेवर बेतलेला.. मज नाते ना रुचते ना जमते बिलगाया, थिजणे संपून जावे वाटे जन्म नवा घ्यावा! जिथे स्वैर मी असावे अलगद मी रुजावे, अन् माझ्या रुजण्याने जन्म नवे उमलावे.. ही इच्छा अधू आहे ही आसही कोरी कोरी, मज ठाव आहे सारे जन्म, ना कोणी उद्धारी! घे जगून संपतो आहे मी मिथ्या जगलो आहे, इच्छा लपेटून सार्‍या जागीच विरतो आहे! माझ्

संजीवक

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 17/07/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
खुळी दालने प्राजक्तासम उलटुन गेली पाने फुलली राने; गूढ नभातिल झरले आषाढाने आभाळातिल गोत उतरले; धुके दंवात नव्याने भुलले अंकुर; पक्षी किलबिल आरव एक रवाने मुके तेवढे सरलेले पळ संजीवकसे मेणे अश्वासक संवाद कळ्यांचे स्नेह भारले गाणे .....................अज्ञात
काव्यरस

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच
काव्यरस