सोबती
सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात
ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं
हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं
काव्यरस
मिसळपाव
सांज बावरी, सांजेला कळते ना काही
शांत बाह्यतः, आतुन ही घोंगावत राही
सांज बोचरी, काळोखाची पूर्वकल्पना
वर केशरिया, अंतरात दडल्यात वेदना
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी
नेत्र पश्चिमी, मन पूर्वेच्या क्षितिजापाशी
सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी
मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी...
अदिती जोशी