वडा पाव रे........!!!
ती म्हणे : प्रत्येक जन्मी
हाच नवरा मिळावा
तो म्हणे : देवा ,
नविन चॉइस तरी कळावा.....!!
ती म्हणे : बरा असतो
एकच एक गडी
माहीत होऊन गेलेल्या
सार्या त्याच्या खोडी .....!!
तो म्हणे : चांगली असे
अंबाड्या ची भाजी
तरीही खावी वाटे
कधी तरी कांदाभजी ....!!
नाठाळाला वठणी वर
आणावयाचा त्रास
हरेक जन्मात वाचेल बाई
आमचा तो ख़ास....!!
ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!
जायचे तर जा नाथा
नाजुक धागे तोडून
हात तिने जोडले
डोळे आले भरुन ....!!
इथ
काव्यरस
मिसळपाव
