Skip to main content

कविता

पिंपळ

लेखक पथिक यांनी सोमवार, 01/06/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा! एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/05/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल पूर्वीचे आज महानगर झाले पहिल्या पेक्षा जास्त खतरनाक झाले. भरल्या पोटी वाघ करत नव्हता शिकार. बेधुंध कार आज कधीही घेते प्राण. तेंव्हा दरवळत होता सुगंध मलयज गिरीचा. पेट्रोलच्या वासाने आज कासावीस होतो प्राण. कांव कांव कावळ्यांचे घरटे उंच मीनारांवर अंगणातली चिवताई कुठे हरवली आज.
काव्यरस

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 29/05/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली

एक केवळ बाप तो

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 27/05/2015 22:30 या दिवशी प्रकाशित केले.

एक केवळ बाप तो


तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

वरूणराजाचे आगमन

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी बुधवार, 27/05/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
वरूणराजाचे आगमन ऐश आरामात जगती माणसे, निसर्गाची विल्हेवाट लावून. पाऊस पडला नाही म्हणून, शेतकरी घेतो जीवन संपवून. वाचवा सर्वांचा शेतकरी राजा, घ्या हे मनावर कोरून. पिकवतो धान्य आपल्यासाठी तो, स्वतः काबाडकष्ट करून.  वरूणराजाचे आगमन होणार, म्हणून मन प्रसन्न आहे. कसा बरसेल कोणावर ? हेच एक प्रश्न चिन्ह आहे. यल्लप्पा सटवाजी कोकणे २६ मे २०१५ ९८९२५६७२६४

भोगदासी........

लेखक एक एकटा एकटाच यांनी मंगळवार, 26/05/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
घडयाळ्याचे काटे मध्यरात्रीकडे कलत असताना जेव्हा सारे शहर निद्रेच्या अधीन होत असते हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये तेव्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते ओठांवर लाली,केसांत मोगर्‍याच्या माळा सर्वांगावर मंद अत्तर दरवळत असते वरकरणी लावलेल्या पावडरच्या थरांमागे नशिबाने गंजलेला चेहरा लपवत असते. रात्री घराकडे परतणारी जोडपी डोळ्यांत साठवूण नकळत मग तीही मनातून सुखावत असते त्याच्या बाहुत विश्वासाने विसावलेल्या तिच्याजागी गुपचुप स्वतःची छबी नेऊन ठेवत असते थंड वार्‍यासोबत वहावत आलेल्या त्याच्या आठवणीने हलकेच मग आतून शहारत असते त्याच्यासोबत रचलेला भातुकलीचा संसार आता दररात्री एका नव्या नवर्‍यासं