Skip to main content

प्रेम

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 14/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे साला , अंधार झालाय अंधार . अब्रू वेशींवर टांगलेली नि, भावनांचा चाललेला व्यापार . नजर वखवखणारी असूनही येथे, कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात. अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी, नात्यांची बीजे भिकार असतात. पैशाच चामडं पांघरून इथ , वासानेच कोल्हं सोकावत. संस्कृतीने झाकलेल सार मग, पेपरातन डोकावत . माग चालताना पश्चिमेच्या , कोवळी उन्हं पोळायला लागतात. महागड्या सिगरेटच्या ठिणग्या , गरीबाची घरं जाळायला लागतात . प्रेम-बीम काही नाही , हि मायबापांच्या अपेक्षांची होळी असते. पोरं नागवी नाचून मोकळी.अन , मायबापांच्या हाती झोळी असते . आपली कामं नीट न केली कि हि नसती थेरं सुचू लागतात. अन , ऊसाला टाकलेल्या urea ने, गाजर-गवताला पेरं फुटू लागतात. ....................................................................................................................-मुकुंद
काव्यरस

वाचने 879
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया